एखादे शहर आवडण्यासाठी त्या शहरात किती काळ राहायची गरज असते? एक-दोन दिवसाचा मुक्कामही पुरेसा असतो की, किमान दोन वर्षे राहिल्याशिवाय एखादे शहर आपल्याला आवडतंय की नाही हे नीट समजत नसतं? शहर आवडण्यासाठी त्या शहरामध्ये कायकाय असावे लागते? आणि ते ज्याला आवडते त्याच्या स्वभावात कायकाय असावे लागते?
जगभरात तर नव्हेच; पण भारतातही फारशी प्रसिद्ध नसलेली काही शहरे मला दोन-चार दिवसांच्या मुक्कामातच अनपेक्षितपणे आवडली होती. मुंबईशी तुलना केली तर ही धड शहरेदेखील नव्हती. शहरीपणाचे आणि गावपणाचे मिश्रण असलेली नगरे होती ही. पण ह्या नगरांमधले दोन-चार दिवसांचे अनुभव वीसेक वर्षानंतरही मी विसरलेलो नाही.
ते अनुभव तसे खूप साधेच होते. दोनचार दिवसांच्या मुक्कामात काहीही थरारक, विलक्षण असं घडलं नव्हतं तरीही; ते अनुभव मला अजूनही आठवतात आणि आवडतात. का आवडतात हे समजून घ्यायचा प्रयत्न मी अधूनमधून करत असतो.
एका लहानशा खाजगी कंपनीत नोकरी करताना कामानिमित्ताने मला जळगावच्या एमआयडीसीमधील एका कारखान्यात जावं लागणार होतं. इलेक्ट्रॉनिक्स व सॉफ्टवेअर असलेल्या एका लहानशा यंत्रणेत काही दुरुस्ती करायची होती आणि कंपनीतील काही लोकांना थोडं प्रशिक्षण द्यायचं होतं. हे तसं नेहमीचं, साधं काम होतं. असलं काम करायला मुंबईतून इतकं लांब जायचं म्हणजे तसा वैतागच होता.
नव्वदचं दशक संपतानाचा काळ होता हा. रोजच्या व्यवहारात इंटरनेट, मोबाईलचा वापर होत नव्हता. कंपनीतला फोन किंवा सार्वजनिक फोन हीच मुख्य संपर्कसाधने होती. एका मुंबईखेरीज महाराष्ट्रातील बहुतेक शहरांबाबतचा माझा अडाणीपणा फार थोर होता.
जळगाव नेमकं कुठे आहे हेच मला माहीत नव्हतं. मुंबईहून निघून नाशिक, धुळे अशा मार्गाने जळगावला पोहोचावे लागते, ही माहिती माझ्यासाठी नवीन होती.
जळगावला खूप धूळ असणार, अस्वच्छ हॉटेलांमध्ये मिळेल ते जेवावं लागणार. अशा ठिकाणी एक-दोन दिवस मुक्काम करायचा. वैताग. वेळ तरी किती लागतो मुंबईहून तिथे पोहोचायला?
जाताना-येताना रेल्वेचं आरक्षण मिळेलच असं नाही. बसने जावं लागणार, रस्ते वाईट असणार, लहानशा रस्त्यांवर बस अडकणार. असले सकारात्मक विचार माझ्या मनात घोळू लागले होते.
ही माझी पहिली फेरी होती. त्यानंतरच्या दोन-तीन वर्षांमधे मला अनेकदा जळगावला जावं लागलं. जळगावबाबतचा माझा पहिला अंदाज खरा ठरला नाही; असंच आज मला वाटतं. वीसेक वर्षांपूर्वींच्या जळगावच्या काही आठवणी मध्येच कधीतरी आठवतात. आपलेच जुने फोटो अचानक सापडावेत तशा.
सकाळी सातला जळगावला पोहोचू असं मला बसवाले म्हणायचे पण नीट चालणारी बसही रात्री नऊच्या सुमारास मुंबईहून निघून सकाळी बहुदा साडेआठला पोहोचत असे. उशीर झाला तरी सकाळी सहानंतरचा धुळे-जळगाव हा प्रवास सकाळच्या हवेत आणि सूर्यप्रकाशात होत असे. जळगावला उतरताना छान, उत्साही वाटायचं.
एकदा असाच उतरलो आणि पाहिलं की इतक्या सकाळी काही लोक कसलीतरी पुस्तकं विकत होते. जवळ जाऊन पाहिलं तर ती एका अध्यात्मिक पंथाची, सत्संगछाप उपदेश करणारी पुस्तकं होती. विकणारे लोक ज्येष्ठ नागरिक दिसत होते. उत्साहात बोलत होते. जळगावचे लोक इतक्या सकाळी उठून सत्संगाचे प्रचारकाम करतात? त्यांच्याशी गप्पा मारल्यावर समजलं की, ह्यातले बहुतेकजण मुंबईतले किंवा ठाण्याचेच आहेत. तिथून जळगावला केवळ प्रचार, प्रसार करायला आलेले आहेत.
मी कितीतरी लांबून भलतीकडेच कुठेतरी आलोय असं काहीतरी मला वाटत होतं आणि मुंबईची ही ज्येष्ठ-नागरिक गँग घराजवळच भटकावं तशा मूडमधे फिरत होती.
एमआयडीसीतल्या त्या कंपनीतले लोक बाहेरूनच जेवण मागवायचे. इथली शेवसब्जी फेमस आहे वगैरे मला सांगायचे व तीच मागवायचे. शेवसब्जी हा प्रकार म्हणजे मुंबई-पुण्याच्या मिसळीचाच एक अवतार वाटला. मिसळीबरोबर रोटी, चपाती खायची? विचित्रच. कंपनीतल्या लोकांना बरं वाटावं म्हणून मी जमेल तितकी तारीफ करत खायचो.
बाहेरच्या हॉटेलातलं जेवणही साधं होतं पण सुदैवाने माझ्या अंदाजाइतकं वाईट नव्हतं. व्यापारासाठी किंवा एमआयडीसीतील उद्योगांसाठी जळगावला अनेक लोक दोनचार दिवसांच्या मुक्कामाला येत असल्यामुळे मध्यम दर्जाच्या सोई-सुविधा विकसित झाल्या असाव्यात.
नाक्यानाक्यावर काही टपऱ्या होत्या, त्यात मात्र खूपच चहलपहल असायची. दिवसभरात कधीही गेलं तरीही अगदी गरम समोसे आणि कचोऱ्या मिळायच्या. इतके समोसे कसे खपतात ह्याचे मला आश्चर्य वाटत असे. समोसे तसे ठीक होते पण गरम असताना चिंचेच्या चटणीबरोबर ते खासच लागत.
त्यानंतर दही कचोरी खाल्ली की चवदारपणाचा उत्सवच साजरा होत असे.
बाजारपेठेतलं एक टपरीवजा हॉटेल. हिंदू उपहारगृह वगैरे लिहिलेलं.
सकाळी आठला तिथे गेलो तर पिवळ्या पोह्यांचा डोंगर, भज्यांचा डोंगर, शिऱ्याची परात, उसळीचे पातेलं असं सगळं छान मांडलेलं असायचं.
जुनी बाकं. जुनी सजावट. गल्ल्यावरचे मालक पहिलवान होते. त्यांचे पूर्वजही पहिलवान होते हे भिंतीवरच्या फोटोंमधून दिसत होतं. सत्तरच्या दशकातल्या एखाद्या मराठी सिनेमातच शिरलो आहोत असं वाटावं असला माहौल. आत्ता उषा चव्हाण येईल आणि शिणेमातला सीन चालू होईल असे वाटायचे.
रात्रीच्या जेवणापूर्वी बाजारात मांडलेले ठेले बघत फिरायचो. देवळांमधे जाऊन बसायचो. तिथल्या लोकांशी गप्पा मारायचो. लोकांच्या व्यवहारातला खानदेशी नजरिया परिचयाचा होत होता. हाव् नं भाऊ, हाय नं यिथं मी… रिक्शावाले, वॉचमन, कंपनीतले कारकून अशा सगळ्यांच्या बोलण्यातला ‘नं, नं ’ वाला लहेजा. सहजपणाचा, आपुलकीचा. बाजारपेठेच्या आसपासच कुठेतरी जुने दिवाळी अंक, मासिके मिळत. एखाद्या ठेल्यावरचा चहा पीत पीत ते वाचत बसायचो. एका चौकात घड्याळाचा टॉवर. त्याच्याजवळ लांबच्यालांब रांग. केवळ मोजे विकणाऱ्यांची. कामचलाऊ गुणवत्तेचे पण खूप प्रकारचे मोजे. इतके मोजे कोण विकत घेतं? जळगाव हे कपडेखरेदी, लग्नाचा बस्ता वगैरेचं मुख्य ठिकाण असणार बहुतेक.
स्टेशनजळ नेहरुंचा पुतळा असलेला चौक. त्याच्या जवळच इंग्रजी सिनेमाचं एक लहानसं थिएटर. आरामात पाय पसरून बसायला खुर्च्यांसमोर बाकडी ठेवलेली! चित्रपट सुरू असताना अंधारातच सगळ्या प्रेक्षकांसाठी कॉफी आली! एका सिनेमाबरोबर एक कॉफी फुकट. हे मस्तच की. मुंबईत का नाही असं काही?
दरवेळी वेगवेगळ्या लॉजमधे राहायचो. बाजारपेठ, एस टी स्टँड अशा ठिकाणच्या लॉजमधे राहून रात्री गॅलरीतून तिथली वर्दळ बघत बसायचो.
शिरीष कणेकर त्यांच्या कणेकरीतील विनोदामध्ये सांगायचे ती पाटी असलेलं गेस्टहाऊसही स्टेशनजवळच होतं. ‘इथे ऑफिसर आणि जंटलमन लोकांनाच प्रवेश मिळेल’ अशी पाटी.
ती पाटी खरंच आहे हे रस्त्यावरून पाहून, आतमध्ये जाऊन, मला मिळेल का राहायला असं उगाचंच विचारलं. ऑफिसर नाही म्हणून नाकारतील की, जंटलमन नाही म्हणून हे पाहायचं होतं. सगळ्या रुम फुल आहेत असं काहीतरी तिथले गृहस्थ थंड चेहऱ्याने म्हणाले.
पण जळगावची खरी सलामी तर पहिल्याच भेटीत झाली होती. सकाळी त्या एमआयडीसीत जायला रिक्क्षा केली होती. कंपनीचा पत्ता सांगताना अजंठा रोड असं सांगितलं होतं.
एमआयडीसी आहे म्हणून मला वाटलं की अजंठा नावाच्या कंपनीकडे जात असणार हा रस्ता. रिक्क्षावाल्याला विचारलं तर तो म्हणाला की तसं नाही, अजिंठा लेण्यांकडे जातो हा रस्ता.
अजिंठा लेणी? जळगावजवळ आहेत? हे मला अजिबातच अपेक्षित नव्हतं. भौगोलिक अडाणीपणा.
रिक्क्षावाल्याकडून समजलं की एसटी स्टँडातून औरंगाबादला वगैरे जाणारी गाडी थेट अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशीच जाते. जळगावच्या दोन-तीन भेटींमधे मी दरवेळी अजिंठा-लेणी पाहायला गेलो. काहीवेळा एक दिवस रजा टाकून मुक्काम वाढवला. चाळीसगाव जवळच होतं. तिथे जाऊन मला केकी मूसचं घर पाहायचं होतं पण ते राहूनच गेलं. वेळ मिळाला तसा अजिंठ्यालाच गेलो. दर भेटीत अनेक तास, लेणी बघत फिरलो. निवांतपणे.
अजिंठा लेणी आपल्या ओळखीची होतील असं अजिबातच वाटलं नव्हतं जळगावला जाताना. जळगावयात्रेने दिलेली अनपेक्षित अशी ही देणगी.
जळगावच्या प्रवासातील सकाळच्या हवेतील कोवळ्या उन्हाशी जुळणारी. फिकट जलरंगात रंगवलेलं चित्र अनेकदा पाहिल्यावर हळूहळू आवडू लागावं तसं झालं जळगावात राहताना.
जगभरात तर नव्हेच; पण भारतातही फारशी प्रसिद्ध नसलेली काही शहरे मला दोन-चार दिवसांच्या मुक्कामातच अनपेक्षितपणे आवडली होती. मुंबईशी तुलना केली तर ही धड शहरेदेखील नव्हती. शहरीपणाचे आणि गावपणाचे मिश्रण असलेली नगरे होती ही. पण ह्या नगरांमधले दोन-चार दिवसांचे अनुभव वीसेक वर्षानंतरही मी विसरलेलो नाही.
ते अनुभव तसे खूप साधेच होते. दोनचार दिवसांच्या मुक्कामात काहीही थरारक, विलक्षण असं घडलं नव्हतं तरीही; ते अनुभव मला अजूनही आठवतात आणि आवडतात. का आवडतात हे समजून घ्यायचा प्रयत्न मी अधूनमधून करत असतो.
एका लहानशा खाजगी कंपनीत नोकरी करताना कामानिमित्ताने मला जळगावच्या एमआयडीसीमधील एका कारखान्यात जावं लागणार होतं. इलेक्ट्रॉनिक्स व सॉफ्टवेअर असलेल्या एका लहानशा यंत्रणेत काही दुरुस्ती करायची होती आणि कंपनीतील काही लोकांना थोडं प्रशिक्षण द्यायचं होतं. हे तसं नेहमीचं, साधं काम होतं. असलं काम करायला मुंबईतून इतकं लांब जायचं म्हणजे तसा वैतागच होता.
नव्वदचं दशक संपतानाचा काळ होता हा. रोजच्या व्यवहारात इंटरनेट, मोबाईलचा वापर होत नव्हता. कंपनीतला फोन किंवा सार्वजनिक फोन हीच मुख्य संपर्कसाधने होती. एका मुंबईखेरीज महाराष्ट्रातील बहुतेक शहरांबाबतचा माझा अडाणीपणा फार थोर होता.
जळगाव नेमकं कुठे आहे हेच मला माहीत नव्हतं. मुंबईहून निघून नाशिक, धुळे अशा मार्गाने जळगावला पोहोचावे लागते, ही माहिती माझ्यासाठी नवीन होती.
जळगावला खूप धूळ असणार, अस्वच्छ हॉटेलांमध्ये मिळेल ते जेवावं लागणार. अशा ठिकाणी एक-दोन दिवस मुक्काम करायचा. वैताग. वेळ तरी किती लागतो मुंबईहून तिथे पोहोचायला?
जाताना-येताना रेल्वेचं आरक्षण मिळेलच असं नाही. बसने जावं लागणार, रस्ते वाईट असणार, लहानशा रस्त्यांवर बस अडकणार. असले सकारात्मक विचार माझ्या मनात घोळू लागले होते.
ही माझी पहिली फेरी होती. त्यानंतरच्या दोन-तीन वर्षांमधे मला अनेकदा जळगावला जावं लागलं. जळगावबाबतचा माझा पहिला अंदाज खरा ठरला नाही; असंच आज मला वाटतं. वीसेक वर्षांपूर्वींच्या जळगावच्या काही आठवणी मध्येच कधीतरी आठवतात. आपलेच जुने फोटो अचानक सापडावेत तशा.
सकाळी सातला जळगावला पोहोचू असं मला बसवाले म्हणायचे पण नीट चालणारी बसही रात्री नऊच्या सुमारास मुंबईहून निघून सकाळी बहुदा साडेआठला पोहोचत असे. उशीर झाला तरी सकाळी सहानंतरचा धुळे-जळगाव हा प्रवास सकाळच्या हवेत आणि सूर्यप्रकाशात होत असे. जळगावला उतरताना छान, उत्साही वाटायचं.
एकदा असाच उतरलो आणि पाहिलं की इतक्या सकाळी काही लोक कसलीतरी पुस्तकं विकत होते. जवळ जाऊन पाहिलं तर ती एका अध्यात्मिक पंथाची, सत्संगछाप उपदेश करणारी पुस्तकं होती. विकणारे लोक ज्येष्ठ नागरिक दिसत होते. उत्साहात बोलत होते. जळगावचे लोक इतक्या सकाळी उठून सत्संगाचे प्रचारकाम करतात? त्यांच्याशी गप्पा मारल्यावर समजलं की, ह्यातले बहुतेकजण मुंबईतले किंवा ठाण्याचेच आहेत. तिथून जळगावला केवळ प्रचार, प्रसार करायला आलेले आहेत.
मी कितीतरी लांबून भलतीकडेच कुठेतरी आलोय असं काहीतरी मला वाटत होतं आणि मुंबईची ही ज्येष्ठ-नागरिक गँग घराजवळच भटकावं तशा मूडमधे फिरत होती.
एमआयडीसीतल्या त्या कंपनीतले लोक बाहेरूनच जेवण मागवायचे. इथली शेवसब्जी फेमस आहे वगैरे मला सांगायचे व तीच मागवायचे. शेवसब्जी हा प्रकार म्हणजे मुंबई-पुण्याच्या मिसळीचाच एक अवतार वाटला. मिसळीबरोबर रोटी, चपाती खायची? विचित्रच. कंपनीतल्या लोकांना बरं वाटावं म्हणून मी जमेल तितकी तारीफ करत खायचो.
बाहेरच्या हॉटेलातलं जेवणही साधं होतं पण सुदैवाने माझ्या अंदाजाइतकं वाईट नव्हतं. व्यापारासाठी किंवा एमआयडीसीतील उद्योगांसाठी जळगावला अनेक लोक दोनचार दिवसांच्या मुक्कामाला येत असल्यामुळे मध्यम दर्जाच्या सोई-सुविधा विकसित झाल्या असाव्यात.
नाक्यानाक्यावर काही टपऱ्या होत्या, त्यात मात्र खूपच चहलपहल असायची. दिवसभरात कधीही गेलं तरीही अगदी गरम समोसे आणि कचोऱ्या मिळायच्या. इतके समोसे कसे खपतात ह्याचे मला आश्चर्य वाटत असे. समोसे तसे ठीक होते पण गरम असताना चिंचेच्या चटणीबरोबर ते खासच लागत.
त्यानंतर दही कचोरी खाल्ली की चवदारपणाचा उत्सवच साजरा होत असे.
बाजारपेठेतलं एक टपरीवजा हॉटेल. हिंदू उपहारगृह वगैरे लिहिलेलं.
सकाळी आठला तिथे गेलो तर पिवळ्या पोह्यांचा डोंगर, भज्यांचा डोंगर, शिऱ्याची परात, उसळीचे पातेलं असं सगळं छान मांडलेलं असायचं.
जुनी बाकं. जुनी सजावट. गल्ल्यावरचे मालक पहिलवान होते. त्यांचे पूर्वजही पहिलवान होते हे भिंतीवरच्या फोटोंमधून दिसत होतं. सत्तरच्या दशकातल्या एखाद्या मराठी सिनेमातच शिरलो आहोत असं वाटावं असला माहौल. आत्ता उषा चव्हाण येईल आणि शिणेमातला सीन चालू होईल असे वाटायचे.
रात्रीच्या जेवणापूर्वी बाजारात मांडलेले ठेले बघत फिरायचो. देवळांमधे जाऊन बसायचो. तिथल्या लोकांशी गप्पा मारायचो. लोकांच्या व्यवहारातला खानदेशी नजरिया परिचयाचा होत होता. हाव् नं भाऊ, हाय नं यिथं मी… रिक्शावाले, वॉचमन, कंपनीतले कारकून अशा सगळ्यांच्या बोलण्यातला ‘नं, नं ’ वाला लहेजा. सहजपणाचा, आपुलकीचा. बाजारपेठेच्या आसपासच कुठेतरी जुने दिवाळी अंक, मासिके मिळत. एखाद्या ठेल्यावरचा चहा पीत पीत ते वाचत बसायचो. एका चौकात घड्याळाचा टॉवर. त्याच्याजवळ लांबच्यालांब रांग. केवळ मोजे विकणाऱ्यांची. कामचलाऊ गुणवत्तेचे पण खूप प्रकारचे मोजे. इतके मोजे कोण विकत घेतं? जळगाव हे कपडेखरेदी, लग्नाचा बस्ता वगैरेचं मुख्य ठिकाण असणार बहुतेक.
स्टेशनजळ नेहरुंचा पुतळा असलेला चौक. त्याच्या जवळच इंग्रजी सिनेमाचं एक लहानसं थिएटर. आरामात पाय पसरून बसायला खुर्च्यांसमोर बाकडी ठेवलेली! चित्रपट सुरू असताना अंधारातच सगळ्या प्रेक्षकांसाठी कॉफी आली! एका सिनेमाबरोबर एक कॉफी फुकट. हे मस्तच की. मुंबईत का नाही असं काही?
दरवेळी वेगवेगळ्या लॉजमधे राहायचो. बाजारपेठ, एस टी स्टँड अशा ठिकाणच्या लॉजमधे राहून रात्री गॅलरीतून तिथली वर्दळ बघत बसायचो.
शिरीष कणेकर त्यांच्या कणेकरीतील विनोदामध्ये सांगायचे ती पाटी असलेलं गेस्टहाऊसही स्टेशनजवळच होतं. ‘इथे ऑफिसर आणि जंटलमन लोकांनाच प्रवेश मिळेल’ अशी पाटी.
ती पाटी खरंच आहे हे रस्त्यावरून पाहून, आतमध्ये जाऊन, मला मिळेल का राहायला असं उगाचंच विचारलं. ऑफिसर नाही म्हणून नाकारतील की, जंटलमन नाही म्हणून हे पाहायचं होतं. सगळ्या रुम फुल आहेत असं काहीतरी तिथले गृहस्थ थंड चेहऱ्याने म्हणाले.
पण जळगावची खरी सलामी तर पहिल्याच भेटीत झाली होती. सकाळी त्या एमआयडीसीत जायला रिक्क्षा केली होती. कंपनीचा पत्ता सांगताना अजंठा रोड असं सांगितलं होतं.
एमआयडीसी आहे म्हणून मला वाटलं की अजंठा नावाच्या कंपनीकडे जात असणार हा रस्ता. रिक्क्षावाल्याला विचारलं तर तो म्हणाला की तसं नाही, अजिंठा लेण्यांकडे जातो हा रस्ता.
अजिंठा लेणी? जळगावजवळ आहेत? हे मला अजिबातच अपेक्षित नव्हतं. भौगोलिक अडाणीपणा.
रिक्क्षावाल्याकडून समजलं की एसटी स्टँडातून औरंगाबादला वगैरे जाणारी गाडी थेट अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशीच जाते. जळगावच्या दोन-तीन भेटींमधे मी दरवेळी अजिंठा-लेणी पाहायला गेलो. काहीवेळा एक दिवस रजा टाकून मुक्काम वाढवला. चाळीसगाव जवळच होतं. तिथे जाऊन मला केकी मूसचं घर पाहायचं होतं पण ते राहूनच गेलं. वेळ मिळाला तसा अजिंठ्यालाच गेलो. दर भेटीत अनेक तास, लेणी बघत फिरलो. निवांतपणे.
अजिंठा लेणी आपल्या ओळखीची होतील असं अजिबातच वाटलं नव्हतं जळगावला जाताना. जळगावयात्रेने दिलेली अनपेक्षित अशी ही देणगी.
जळगावच्या प्रवासातील सकाळच्या हवेतील कोवळ्या उन्हाशी जुळणारी. फिकट जलरंगात रंगवलेलं चित्र अनेकदा पाहिल्यावर हळूहळू आवडू लागावं तसं झालं जळगावात राहताना.