आमच्या विषयी

काळ बदलतो तशी संवादाची; अभिव्यक्तीची माध्यमे बदलत जातात. संवाद ही आपली मानसिक, भावनिक गरज असते. ‘ऋतुगंध’ सुद्धा ही गरज पूर्ण करणारे व्यासपीठच आहे. वाचनसंस्कृतीसोबत विचारसंस्कृतीची जोपासना व्हायला हवी; हा ह्या लेखनव्यापारामागील उदात्त हेतू आहे. ह्या व्यासपीठावर मानवी जीवनातील अनेक अंगांचा लेखनमाध्यमातून निरंतर वेध घेण्याचा प्रयत्न असणार आहे. मताचे, भूमिकेचे स्वातंत्र्य ही ‘ऋतुगंध’ची धारणा आहे; ज्यायोगे वाचकांना अनेकविध विषयांचे विभिन्न पैलू जाणून घेता येतील. शब्दांचे बोट पकडून पुढे चालत राहता येईल. वाचन आणि लेखनसंस्कृतीसोबत अखंड संपर्कात राहता येईल. या, ह्या वाचन-लेखनयात्रेत सहभागी होऊ या…

संपादक : एस. सी. पाटोळे

कार्यकारी संपादक : विवेक तेंडुलकर

Maintain by Designwell Infotech