डॉ. अतिंद्र सरवडीकर आजच्या युवा पिढीमधील उल्लेखनीय गायक कलाकार आहेत. प्रत्यक्ष मंचप्रस्तुतीबरोबरच नव्या संगीत रचना करणं, लेखन, संशोधन तसेच गुरू म्हणूनही ते ख्यातिप्राप्त आहेत. इतर कलाकारांची गाजलेली गाणी सादर करून टीव्हीवर लोकप्रियता मिळवणारे अनेक कलाकार आपण आजकाल पाहतो; परंतु आपल्या स्वतंत्र प्रतिभेने स्वतःचा कलाविष्कार घडवणारे कलाकार दुर्मिळ असतात. म्हणूनच डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना संगीत जगतात विशिष्ट स्थान प्राप्त झालं आहे. शास्त्रोक्त संगीताखेरिज, ठुमरी – दादरा, भावगीतं, चित्रपट संगीत, गीत, गझल, भक्तीसंगीत, फ्यूजन अशा अनेक गानप्रकारांवर त्यांचं समान प्रभुत्व आहे. स्वतःच्या ढंगात हे सर्वं गायनप्रकार ते सादर करतात. तशा अनेक नवीन संगीतरचनाही त्यांनी केल्या आहेत. जाणून घेऊया डॉ. अतिंद्र सरवडीकर यांच्या कलाप्रवासाबद्दल…
डॉ. अतिंद्र सरवडीकर यांचा जन्म दि १३ जानेवारी, १९८५ रोजी सोलापूर येथे झाला. त्यांच्या मातोश्री सौ. वृंदा सरवडीकर सोलापुरातल्या नावाजलेल्या संगीतशिक्षिका. त्यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली अतिंद्रजींनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षांपासून संगीतसाधनेस प्रारंभ केला. वयाच्या ७ व्या वर्षी सोलापुरातल्या गणेशोत्सवात गाण्याची तासभराची ‘मैफल’ देखील लहानग्या अतिंद्रने हातात तानपुरा घेऊन एकट्याने रंगवली व जाणकार रसिकांची शाब्बासकी मिळवली. पुढे दत्तूसिंग गहेरवार यांच्या अतिशय कडक तालमीत संगीत शिक्षण सुरू झालं . वयाच्या १६ व्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळाची ‘तबला विशारद’ तर १७व्या वर्षी ‘गायनात विशारद’ ही पदवी मिळवली. पण एवढ्यावर समाधान झालं नव्हतं. आता त्यांना ओढ लागली होती ती मोठं गाणं शिकायची… संगीत सागरात खोलवर शिरण्याची आणि संगीताच्या भव्य स्वरूपाचा उत्कट अनुभव घेण्याची… शिष्याच्या अखंड परिश्रमाला गुरूंच्या वरदहस्ताची जोड मिळाली तर त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. ‘परिसाच्या संगे लोह बी घडले, लोह बी घडले परिसची झाले.’ असंच काहीसं…
भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेत आजवरच्या श्रेष्ठतम कलाकारांमध्ये ज्यांचा अग्रक्रमाने समावेश केला जातो त्या स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचा शिष्य होण्याचं परमसौभाग्य डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना वयाच्या अवघ्या १७व्या वर्षीच लाभलं. त्याचं झालं असं की, स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता, त्यानिमित्त सोलापुरात त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता, तेव्हा अतिंद्र यांना प्रभाताईंचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली. त्यांच्या कलाकुसरीच्या गाण्याचा अतिंद्र यांच्यावर इतका प्रभाव पडला की त्यांनी प्रभाताईंचं शिष्यत्व पत्करण्याचा ध्यासच घेतला. प्रभाताईंच्या गाण्यात भावपूर्णतेबरोबरच अफाट बुद्धिमत्तेचा वापर स्तिमित करणारा होता. मोठ्या मुश्किलीनं प्रभाताईंशी संपर्क साधता आला. मुंबईत जाऊन प्रभाताईंची भेट घेऊन शिष्य म्हणून स्वीकारण्याची अतिंद्रनी ताईंना विनंती केली. प्रभाताईंनी आधी सर्व बाजूंनी कसून परीक्षा घेतली, पारख केली आणि मगच शिष्य म्हणून स्वीकारलं. मग गुरुशिष्य परंपरेने गुरुगृही राहून खूप शिकायला मिळालं. कठोर मेहनतीचे अक्षरशः पहाड फोडले. अनेक तासांचा नियमित रियाझ केला. प्रभाताईंची कलाकुसरीची चिंतनशील गायकी गळ्यावर चढवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले, रियाज करावा लागला. सुरुवातीला सोलापूर मुंबई असा दर आठवड्याला रेल्वेचा प्रवास करून विद्या मिळवली. पुढे प्राणीशास्त्रात पदवीधर झाल्यानंतर पूर्णवेळ संगीत शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि मुंबईलाच स्थलांतरित झाले. २००३ सालापासून हा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला आणि आज डॉ. अतिंद्र सरवडीकर हे स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे वरिष्ठ शिष्य आहेत. एका ऋषितुल्य महान गुरूचा आशिर्वाद त्यांनी संपादन केलाय. प्रभाताईंबरोबर त्यांच्या कार्यक्रमांमध्ये साथसंगत करण्यासाठी जाणे, ताईंनी स्वतः आखलेल्या कार्यक्रमांमध्ये, कार्यशाळांमध्ये व त्यांच्या प्रकट मुलाखतींमध्ये गायन प्रस्तुत करणे यांसारखे अनुभव अत्यंत समृद्ध करणारे व दिशादर्शक ठरले.
पुढे मुंबई विद्यापीठातून संगीत विषयात एमएची पदवी सुवर्ण पदकासह मिळवली. दीर्घ संशोधनानंतर डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना मुंबई विद्यापीठातून मिळालेली संगीत विषयक डॉक्टरेट ही मुंबई विद्यापीठातर्फे प्रदान केली गेलेली संगीत विषयातली पहिली डॉक्टरेट आहे. त्यापूर्वी मुंबई विद्यापीठात संगीत विषयासाठी संशोधनाची सोय नव्हती, ती व्हावी, यासाठी त्यांनी अथक परिश्रम केलेत, ह्या प्रयत्नांना यश आलं आणि तिथे हे नवीन दालन खुलं झालं. संशोधन पूर्ण झाल्यावर त्यांनी तो प्रबंध मिरज येथील *अब्दुल करीम खाँ साहेब* यांच्या समाधीवर ठेवला “तो क्षण खूपच रोमांचित करणारा होता” असे अतिंद्र सांगतात. खां साहेब हे किराणा घराण्याचे जनक आणि याच घराण्याचा अत्यंत सखोल अभ्यास अतिंद्रजींनीं रात्रीचा दिवस करून केला. योगायोग असा की डॉक्टरेट मिळाल्यानंतर पहिल्या रंगमंचीय सादरीकरणासाठी डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना मिरज येथे होणाऱ्या उस्ताद अब्दुल करीम खान स्मृतिनिमित्त आयोजित कार्यक्रमात आपला कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रण आले . जणू काही खांसाहेबांनी डॉ अतिंद्र सरवडीकर यांची सेवा रुजू करून घेतली…
ह्या सर्व अभ्यासात डॉ. अतिंद्र अतिशय अंतर्मुख बनले. त्यांच्या गानप्रतिभेला नवे धुमारे फुटले. मूळच्या संवेदनशील स्वभावाला चिंतनाची जोड लाभली. ह्या अभ्यासावर आधारलेला “किराणा घराणे परंपरा आणि प्रवाह” हा त्यांचा मौलिक शोधग्रंथही प्रकाशित झाला. त्याला जाणकार व रसिकांची उत्स्फुर्त दाद लाभलीय. ह्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.
जगभरातील अनेक प्रतिष्ठित स्वरमंचांवर डॉ. अतिंद्र सरवडीकर यांनी आपल्या संगीत साधनेचा अभूतपूर्व परिचय दिला आहे. सवाई गंधर्व समारोह -कुंदगोळ, इंडिया फेस्टिवल -लंडन, पूरब अंग ठुमरी उत्सव -बनारस , एनसीपीए मुंबई, सप्तक -अहमदाबाद, नॅशनल कॉन्फरन्स ऑफ म्युझिक- कोलकाता, अशा अनेक कार्यक्रमांचा यात समावेश आहे. शास्त्रोक्त संगीताखेरिज, ठुमरी – दादरा, चित्रपट संगीत, गीत, गझल, भक्तीसंगीत, फ्यूजन अशा अनेक गानप्रकारांवर त्यांचं प्रभुत्व आहे. रागदारी संगीतातल्या अनेक रागांमध्ये विविध प्रकारच्या बंदिशी त्यांनी बांधल्यात त्यात हंसकिंकिणी, चक्रधर, अपूर्व कल्याण, यमनी बिलावल, बसंती केदार, सावनी, गावती, मालती यांसारखे अनेक अप्रचलित रागही आहेत. ठुमरी दादऱ्याच्या रसपूर्ण ललित रचना आहेत. तर सुनंद ताल, आडा चौताल, सवारी, मत्त ताल ह्या सारख्या अनवट तालांचाही समावेश आहे. ‘हेमलता’ हे एक नवं रूपही मांडलं आहे.
डॉ अतिंद्र सरवडीकर यांनी आपला बंदिशींचा संग्रह प्रकाशित करावा अशी त्यांच्या चाहत्यांची सततची मागणी असते. रागदारी संगीताच्या नामवंत म्युझिक कंपन्यांकडून प्रकाशित झालेल्या त्यांच्या सीडी उपलब्ध आहेत. त्याच बरोबर, नभातले तारे, दिवे लागले रे, कैसे कह दूं के मुलाकात नहीं होती हैं, पत्नी गायिका सौ. प्रिया सरवडीकरसोबत गायलेलं स्वतःच लिहिलेलं “जय जय वंदे मातरम” यासारखी त्यांची म्युझिक व्हिडीओ रूपातली गाणी चांगलीच लोकप्रिय ठरली आहेत. त्यांनी तमिळ भाषेतही काही गाणी गायली आहेत.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने त्यांनी स्वतःच्या रचनांची प्रस्तुती दिली आहे. डॉ अतिंद्र सरवडीकर मुंबई आकाशवाणीचे अर्हताप्राप्त कलाकार असून टीव्हीवरील अनेक कार्यक्रमातही त्यांचा नियमित सहभाग असतो.
संगीतप्रेमींना योग्य शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी ‘डॉ. अतिंद्र सरवडीकर अकादमी ऑफ म्युझिक’ (ASAM) ह्या संगीत अकादमीची मुंबईत स्थापना केलीये, मुंबईतले आणि मुंबईच्या बाहेरचे जवळपास १०० संगीत शिकू इछीणारे संगीतप्रेमी यामुळे लाभान्वित होतायत. याखेरीज शास्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा या साठी डॉ. अतिंद्र नेहमीच प्रयत्नशील असतात. आपल्या शिष्यांना देखील ह्या कार्याप्रती समर्पित होण्याची शिकवण ते देतात.आपल्या गुरु स्वरयोगीनी डॉ.प्रभा अत्रे यांच्या ८५व्या जन्मवर्षाचे औचित्य साधत *लिसनर्स कॉर्नर* हा अभिनव उपक्रम त्यांनी राबवला होता. घरगुती मैफिल ही संकल्पना हळूहळू लोप पावत चालली आहे, हे लक्षात घेऊन वर्षभर प्रतिमाह १ ह्या प्रमाणे वर्षभरात १२ संवादात्मक संगीत मैफीलींचे आयोजन करत त्यांनी सर्वसामान्य श्रोत्यांना मुंबईत एक सांस्कृतिक दालन उघडलं. लिसनर्स कॉर्नर ह्या उपक्रमात अनेक नव्याजुन्या दिग्गज कलाकारांनी आजवर आपली हजेरी लावली आहे. मुंबईतील १२ मैफीलींच्या अभूतपूर्व यशस्वीतेनंतर सध्या “लिसनर्स कॉर्नर महाराष्ट्र दौरा” ह्या अनोख्या संकल्पनेतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात शास्त्रीय संगीताचा श्रोता घडवण्यावर भर असणाऱ्या मैफली ते आयोजित करतात. याद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये, खेडोपाडी संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी डॉ. अतिंद्र सरवडीकर प्रयत्नशील आहेत. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणूनही ते सध्या कार्यरत आहेत.
महाविद्यालयीन जीवनात विविध प्रतिष्ठित संगीत स्पर्धांमध्ये मिळालेले २८ पुरस्कार, देश पातळीवरच्या अतिशय मोठा बहुमान समजल्या जाणाऱ्या मानाच्या अनेक शिष्यवृत्त्या तसेच पुढील व्यावसायिक कारकीर्दीतही राज्य व देशपातळीवरील अनेक महत्त्वाचे पुरस्कार डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना प्राप्त झाले आहेत. जगदगुरु शंकराचार्यांनी “रसगंधर्व” असा त्यांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या पुढील सांगीतिक वाटचालीस अनंत शुभेच्छा!
डॉ. अतिंद्र सरवडीकर यांचा जन्म दि १३ जानेवारी, १९८५ रोजी सोलापूर येथे झाला. त्यांच्या मातोश्री सौ. वृंदा सरवडीकर सोलापुरातल्या नावाजलेल्या संगीतशिक्षिका. त्यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली अतिंद्रजींनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षांपासून संगीतसाधनेस प्रारंभ केला. वयाच्या ७ व्या वर्षी सोलापुरातल्या गणेशोत्सवात गाण्याची तासभराची ‘मैफल’ देखील लहानग्या अतिंद्रने हातात तानपुरा घेऊन एकट्याने रंगवली व जाणकार रसिकांची शाब्बासकी मिळवली. पुढे दत्तूसिंग गहेरवार यांच्या अतिशय कडक तालमीत संगीत शिक्षण सुरू झालं . वयाच्या १६ व्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळाची ‘तबला विशारद’ तर १७व्या वर्षी ‘गायनात विशारद’ ही पदवी मिळवली. पण एवढ्यावर समाधान झालं नव्हतं. आता त्यांना ओढ लागली होती ती मोठं गाणं शिकायची… संगीत सागरात खोलवर शिरण्याची आणि संगीताच्या भव्य स्वरूपाचा उत्कट अनुभव घेण्याची… शिष्याच्या अखंड परिश्रमाला गुरूंच्या वरदहस्ताची जोड मिळाली तर त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. ‘परिसाच्या संगे लोह बी घडले, लोह बी घडले परिसची झाले.’ असंच काहीसं…
भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेत आजवरच्या श्रेष्ठतम कलाकारांमध्ये ज्यांचा अग्रक्रमाने समावेश केला जातो त्या स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचा शिष्य होण्याचं परमसौभाग्य डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना वयाच्या अवघ्या १७व्या वर्षीच लाभलं. त्याचं झालं असं की, स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता, त्यानिमित्त सोलापुरात त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता, तेव्हा अतिंद्र यांना प्रभाताईंचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली. त्यांच्या कलाकुसरीच्या गाण्याचा अतिंद्र यांच्यावर इतका प्रभाव पडला की त्यांनी प्रभाताईंचं शिष्यत्व पत्करण्याचा ध्यासच घेतला. प्रभाताईंच्या गाण्यात भावपूर्णतेबरोबरच अफाट बुद्धिमत्तेचा वापर स्तिमित करणारा होता. मोठ्या मुश्किलीनं प्रभाताईंशी संपर्क साधता आला. मुंबईत जाऊन प्रभाताईंची भेट घेऊन शिष्य म्हणून स्वीकारण्याची अतिंद्रनी ताईंना विनंती केली. प्रभाताईंनी आधी सर्व बाजूंनी कसून परीक्षा घेतली, पारख केली आणि मगच शिष्य म्हणून स्वीकारलं. मग गुरुशिष्य परंपरेने गुरुगृही राहून खूप शिकायला मिळालं. कठोर मेहनतीचे अक्षरशः पहाड फोडले. अनेक तासांचा नियमित रियाझ केला. प्रभाताईंची कलाकुसरीची चिंतनशील गायकी गळ्यावर चढवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले, रियाज करावा लागला. सुरुवातीला सोलापूर मुंबई असा दर आठवड्याला रेल्वेचा प्रवास करून विद्या मिळवली. पुढे प्राणीशास्त्रात पदवीधर झाल्यानंतर पूर्णवेळ संगीत शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि मुंबईलाच स्थलांतरित झाले. २००३ सालापासून हा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला आणि आज डॉ. अतिंद्र सरवडीकर हे स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे वरिष्ठ शिष्य आहेत. एका ऋषितुल्य महान गुरूचा आशिर्वाद त्यांनी संपादन केलाय. प्रभाताईंबरोबर त्यांच्या कार्यक्रमांमध्ये साथसंगत करण्यासाठी जाणे, ताईंनी स्वतः आखलेल्या कार्यक्रमांमध्ये, कार्यशाळांमध्ये व त्यांच्या प्रकट मुलाखतींमध्ये गायन प्रस्तुत करणे यांसारखे अनुभव अत्यंत समृद्ध करणारे व दिशादर्शक ठरले.
पुढे मुंबई विद्यापीठातून संगीत विषयात एमएची पदवी सुवर्ण पदकासह मिळवली. दीर्घ संशोधनानंतर डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना मुंबई विद्यापीठातून मिळालेली संगीत विषयक डॉक्टरेट ही मुंबई विद्यापीठातर्फे प्रदान केली गेलेली संगीत विषयातली पहिली डॉक्टरेट आहे. त्यापूर्वी मुंबई विद्यापीठात संगीत विषयासाठी संशोधनाची सोय नव्हती, ती व्हावी, यासाठी त्यांनी अथक परिश्रम केलेत, ह्या प्रयत्नांना यश आलं आणि तिथे हे नवीन दालन खुलं झालं. संशोधन पूर्ण झाल्यावर त्यांनी तो प्रबंध मिरज येथील *अब्दुल करीम खाँ साहेब* यांच्या समाधीवर ठेवला “तो क्षण खूपच रोमांचित करणारा होता” असे अतिंद्र सांगतात. खां साहेब हे किराणा घराण्याचे जनक आणि याच घराण्याचा अत्यंत सखोल अभ्यास अतिंद्रजींनीं रात्रीचा दिवस करून केला. योगायोग असा की डॉक्टरेट मिळाल्यानंतर पहिल्या रंगमंचीय सादरीकरणासाठी डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना मिरज येथे होणाऱ्या उस्ताद अब्दुल करीम खान स्मृतिनिमित्त आयोजित कार्यक्रमात आपला कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रण आले . जणू काही खांसाहेबांनी डॉ अतिंद्र सरवडीकर यांची सेवा रुजू करून घेतली…
ह्या सर्व अभ्यासात डॉ. अतिंद्र अतिशय अंतर्मुख बनले. त्यांच्या गानप्रतिभेला नवे धुमारे फुटले. मूळच्या संवेदनशील स्वभावाला चिंतनाची जोड लाभली. ह्या अभ्यासावर आधारलेला “किराणा घराणे परंपरा आणि प्रवाह” हा त्यांचा मौलिक शोधग्रंथही प्रकाशित झाला. त्याला जाणकार व रसिकांची उत्स्फुर्त दाद लाभलीय. ह्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.
जगभरातील अनेक प्रतिष्ठित स्वरमंचांवर डॉ. अतिंद्र सरवडीकर यांनी आपल्या संगीत साधनेचा अभूतपूर्व परिचय दिला आहे. सवाई गंधर्व समारोह -कुंदगोळ, इंडिया फेस्टिवल -लंडन, पूरब अंग ठुमरी उत्सव -बनारस , एनसीपीए मुंबई, सप्तक -अहमदाबाद, नॅशनल कॉन्फरन्स ऑफ म्युझिक- कोलकाता, अशा अनेक कार्यक्रमांचा यात समावेश आहे. शास्त्रोक्त संगीताखेरिज, ठुमरी – दादरा, चित्रपट संगीत, गीत, गझल, भक्तीसंगीत, फ्यूजन अशा अनेक गानप्रकारांवर त्यांचं प्रभुत्व आहे. रागदारी संगीतातल्या अनेक रागांमध्ये विविध प्रकारच्या बंदिशी त्यांनी बांधल्यात त्यात हंसकिंकिणी, चक्रधर, अपूर्व कल्याण, यमनी बिलावल, बसंती केदार, सावनी, गावती, मालती यांसारखे अनेक अप्रचलित रागही आहेत. ठुमरी दादऱ्याच्या रसपूर्ण ललित रचना आहेत. तर सुनंद ताल, आडा चौताल, सवारी, मत्त ताल ह्या सारख्या अनवट तालांचाही समावेश आहे. ‘हेमलता’ हे एक नवं रूपही मांडलं आहे.
डॉ अतिंद्र सरवडीकर यांनी आपला बंदिशींचा संग्रह प्रकाशित करावा अशी त्यांच्या चाहत्यांची सततची मागणी असते. रागदारी संगीताच्या नामवंत म्युझिक कंपन्यांकडून प्रकाशित झालेल्या त्यांच्या सीडी उपलब्ध आहेत. त्याच बरोबर, नभातले तारे, दिवे लागले रे, कैसे कह दूं के मुलाकात नहीं होती हैं, पत्नी गायिका सौ. प्रिया सरवडीकरसोबत गायलेलं स्वतःच लिहिलेलं “जय जय वंदे मातरम” यासारखी त्यांची म्युझिक व्हिडीओ रूपातली गाणी चांगलीच लोकप्रिय ठरली आहेत. त्यांनी तमिळ भाषेतही काही गाणी गायली आहेत.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने त्यांनी स्वतःच्या रचनांची प्रस्तुती दिली आहे. डॉ अतिंद्र सरवडीकर मुंबई आकाशवाणीचे अर्हताप्राप्त कलाकार असून टीव्हीवरील अनेक कार्यक्रमातही त्यांचा नियमित सहभाग असतो.
संगीतप्रेमींना योग्य शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी ‘डॉ. अतिंद्र सरवडीकर अकादमी ऑफ म्युझिक’ (ASAM) ह्या संगीत अकादमीची मुंबईत स्थापना केलीये, मुंबईतले आणि मुंबईच्या बाहेरचे जवळपास १०० संगीत शिकू इछीणारे संगीतप्रेमी यामुळे लाभान्वित होतायत. याखेरीज शास्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा या साठी डॉ. अतिंद्र नेहमीच प्रयत्नशील असतात. आपल्या शिष्यांना देखील ह्या कार्याप्रती समर्पित होण्याची शिकवण ते देतात.आपल्या गुरु स्वरयोगीनी डॉ.प्रभा अत्रे यांच्या ८५व्या जन्मवर्षाचे औचित्य साधत *लिसनर्स कॉर्नर* हा अभिनव उपक्रम त्यांनी राबवला होता. घरगुती मैफिल ही संकल्पना हळूहळू लोप पावत चालली आहे, हे लक्षात घेऊन वर्षभर प्रतिमाह १ ह्या प्रमाणे वर्षभरात १२ संवादात्मक संगीत मैफीलींचे आयोजन करत त्यांनी सर्वसामान्य श्रोत्यांना मुंबईत एक सांस्कृतिक दालन उघडलं. लिसनर्स कॉर्नर ह्या उपक्रमात अनेक नव्याजुन्या दिग्गज कलाकारांनी आजवर आपली हजेरी लावली आहे. मुंबईतील १२ मैफीलींच्या अभूतपूर्व यशस्वीतेनंतर सध्या “लिसनर्स कॉर्नर महाराष्ट्र दौरा” ह्या अनोख्या संकल्पनेतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात शास्त्रीय संगीताचा श्रोता घडवण्यावर भर असणाऱ्या मैफली ते आयोजित करतात. याद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये, खेडोपाडी संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी डॉ. अतिंद्र सरवडीकर प्रयत्नशील आहेत. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणूनही ते सध्या कार्यरत आहेत.
महाविद्यालयीन जीवनात विविध प्रतिष्ठित संगीत स्पर्धांमध्ये मिळालेले २८ पुरस्कार, देश पातळीवरच्या अतिशय मोठा बहुमान समजल्या जाणाऱ्या मानाच्या अनेक शिष्यवृत्त्या तसेच पुढील व्यावसायिक कारकीर्दीतही राज्य व देशपातळीवरील अनेक महत्त्वाचे पुरस्कार डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना प्राप्त झाले आहेत. जगदगुरु शंकराचार्यांनी “रसगंधर्व” असा त्यांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या पुढील सांगीतिक वाटचालीस अनंत शुभेच्छा!
1 Comment
सुंदर आलेख एवं प्रेरणादायक जीवनी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏