मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरातून एका दिवसांत फिरून येण्यासारखा सोपा आणि नयनरम्य किल्ला म्हणजे कोरीगड. लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणाऱ्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे, त्याच्या सद्यस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे ह्या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड ह्या नावाने ही ओळखतात. पावसाळ्यात तर ह्या गडावर कायम धुक्याचे आच्छादन असते. तर इतर ऋतूंमध्ये ह्या गडावर आल्हाददायक वातावरण असते. गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, मोरगिरी, मृगगड, तिकोना, राजमाची, धाक, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा, माणिकगड आणि मुळशीचा जलाशय असा परिसर दिसतो.
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या लोणावळयापासून २५ किलोमीटरवर कोरीगड दिमाखात उभा आहे. गडावर चढायची वाट सोपी आहे, त्यामुळे कोणालाही सहज हा गड सर करणे शक्य आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. तर दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. घाटमाथ्यावर असल्यामुळे ह्या किल्ल्यावरून एकाच वेळी कोंकण व देशावरील परिसराचे विस्तृत दर्शन घडते. समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यातील बुरुजावरून कोंकणातील मुलुखाचे विहंगम दृश्य दिसते. गडाचा विस्तार साधारणपणे उत्तर दक्षिण आहे. ह्या गडाला निसर्गत: कातळकड्यांचे संरक्षण मिळाले आहे. गडाची तटबंदी साधारणतः दीड किलोमीटर लांबीची आहे. पेठ-शहापूरच्या वाटेने वर येताना मार्गात गुहा व पाण्याची टाके आणि श्रीगणेशाची मूर्ती लागते. गणेशदरवाज्याने गडावर आल्यावर समोरच वाड्यांचे अवशेष आढळतात. पठारावर कोराई देवीचे मंदिर आणि त्याच्यासमोरच एक दीपमाळ आहे. कोराईदेवीच्या मूर्तीची उंची साधारणतः चार फूट असून मूर्ती प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. गडावर आजही सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी तोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे. याशिवाय गडावर दोन विस्तीर्ण तळी आहेत. पण ह्या तळ्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. तळ्यांच्या पुढे बाजूला काही गुहा आहेत. त्यातील एका गुहेत खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथेच शंख-चक्र-गदा-पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे.
गडावर कसे पोहोचाल
सद्यस्थितीला गडावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत.
पेठशहापूर मार्गे
कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आयएनएस शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी किंवा (ऍम्बी व्हॆली) सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि भुशी धरणाच्या पुढे, (आयएनएस शिवाजीच्या) पुढे २२ कि.मी वरील पेठशहापूर गावात उतरावे. ह्या गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला पायऱ्यांपाशी घेऊन जाते. येथून आपण वीस मिनिटांत गडावर पोहोचतो.
आंबवणे गाव मार्गे
आंबवणे गाव हे पेठशहापूर गावाच्या अलीकडे आहे. कोरीगडला जाण्यासाठी आंबवणे गावातूनही जाता येते. ही वाट मात्र जरा अवघड आहे. ह्या वाटेने जाण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेकडे अथवा थेट आंबवणेकडे जाणारी बस पकडावी. गावातून अर्ध्या तासात गडावर जाता येते.
राहाण्याची सोय
गडावरील मंदिरात राहण्याची सोय होते. आंबवणे गावातील महादेव मंदिरात राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय
गडावर नाही, गडावर दोन तळी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पेठशहापूर मार्गे गडावर येणाऱ्या वाटेवर दरवाजाच्या अलीकडे एक टाके आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे वापरावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
पेठशहापूर मार्गे अर्धा तास लागतो. आंबवणे गाव मार्गे अर्धा तास लागतो.
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या लोणावळयापासून २५ किलोमीटरवर कोरीगड दिमाखात उभा आहे. गडावर चढायची वाट सोपी आहे, त्यामुळे कोणालाही सहज हा गड सर करणे शक्य आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. तर दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. घाटमाथ्यावर असल्यामुळे ह्या किल्ल्यावरून एकाच वेळी कोंकण व देशावरील परिसराचे विस्तृत दर्शन घडते. समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यातील बुरुजावरून कोंकणातील मुलुखाचे विहंगम दृश्य दिसते. गडाचा विस्तार साधारणपणे उत्तर दक्षिण आहे. ह्या गडाला निसर्गत: कातळकड्यांचे संरक्षण मिळाले आहे. गडाची तटबंदी साधारणतः दीड किलोमीटर लांबीची आहे. पेठ-शहापूरच्या वाटेने वर येताना मार्गात गुहा व पाण्याची टाके आणि श्रीगणेशाची मूर्ती लागते. गणेशदरवाज्याने गडावर आल्यावर समोरच वाड्यांचे अवशेष आढळतात. पठारावर कोराई देवीचे मंदिर आणि त्याच्यासमोरच एक दीपमाळ आहे. कोराईदेवीच्या मूर्तीची उंची साधारणतः चार फूट असून मूर्ती प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. गडावर आजही सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी तोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे. याशिवाय गडावर दोन विस्तीर्ण तळी आहेत. पण ह्या तळ्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. तळ्यांच्या पुढे बाजूला काही गुहा आहेत. त्यातील एका गुहेत खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथेच शंख-चक्र-गदा-पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे.
गडावर कसे पोहोचाल
सद्यस्थितीला गडावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत.
पेठशहापूर मार्गे
कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आयएनएस शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी किंवा (ऍम्बी व्हॆली) सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि भुशी धरणाच्या पुढे, (आयएनएस शिवाजीच्या) पुढे २२ कि.मी वरील पेठशहापूर गावात उतरावे. ह्या गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला पायऱ्यांपाशी घेऊन जाते. येथून आपण वीस मिनिटांत गडावर पोहोचतो.
आंबवणे गाव मार्गे
आंबवणे गाव हे पेठशहापूर गावाच्या अलीकडे आहे. कोरीगडला जाण्यासाठी आंबवणे गावातूनही जाता येते. ही वाट मात्र जरा अवघड आहे. ह्या वाटेने जाण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेकडे अथवा थेट आंबवणेकडे जाणारी बस पकडावी. गावातून अर्ध्या तासात गडावर जाता येते.
राहाण्याची सोय
गडावरील मंदिरात राहण्याची सोय होते. आंबवणे गावातील महादेव मंदिरात राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय
गडावर नाही, गडावर दोन तळी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पेठशहापूर मार्गे गडावर येणाऱ्या वाटेवर दरवाजाच्या अलीकडे एक टाके आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे वापरावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
पेठशहापूर मार्गे अर्धा तास लागतो. आंबवणे गाव मार्गे अर्धा तास लागतो.
सौजन्य : ट्रेक अस्तित्व