ब्रेकींग न्यूज, एव्ही, एव्हीबी इत्यादी… दिवसभर बातम्यांच्या भडिमारात एखाद्या घटनेवर ‘मी’ म्हणून व्यक्त होणं राहून जातं. बातमीदाराऐवजी एक व्यक्ती म्हणून त्या घटनेविषयी काय वाटतं हे जरा मागे पडत जातं. हे केवळ माझ्या किंवा कुणा एकाच्याच बाबातीत नव्हे तर प्रत्येकाच्या बाबतीत घडत असावं कदाचित… मग एखाद्या निवांत क्षणी आपलेच आपल्याला प्रश्न पडू लागतात की… एखाद्या मंत्र्याला जगण्यासाठी 15 ते 20 प्रशस्त बंगले, 20 ते 30 आलिशान गाड्या, कोट्यवधीचे घोटाळे करून गोळा केलेला बँक बॅलन्स आणि गोत्यात आल्यास इतरांच्या मदतीची, पर्यायानं ‘बळा’ची गरज का पडावी ? हे झाल राजकारणी मंडळींचं.
तरुणाईचं म्हणाल तर… ही कोण मंडळी आहेत जी आधी प्रेम करतात. नंतर प्रेम नाकारणाऱ्या व्यक्तीवर अमानुष हल्ला करतात, अॅसिड टाकून चेहरा विद्रुप करण्यात धन्यता मानतात ? ज्या बालवयात मुलांना घडवण्याची गरज असते त्या वयात ती बिघडून एकमेकांना भोकसल्याच्या बातम्या य़ेऊन थडकतात.
टीव्हीवरील ‘क्राईम शो’ना मिळणारा टीआरपी, हिंसक आणि अश्लिल वेब सिरीजना वाढता प्रेक्षकवर्ग, हे सगळं कशाचं द्योतक आहे? आपल्याकडेही ‘ही’ बातमी चालायलाच हवी ह्या अट्टहासापायी व्यभिचार, खून, बलात्कार, मोमो, कीकी, ब्लु व्हेल चॅलेंजच्या बातम्या दाखवून आपण नकळत त्यांचा प्रचार आणि प्रसार तर करत नाहीत ना ? कारण बातम्यांमधूनच अशा गेम्स आणि घटनांबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली जाते आणि दर्शक त्याकडे आकृष्ट होतात.
ज्या तारे-तारकांना करिअरच्या अत्युच्च ‘पीक’ला असतांना मराठीचा विसर पडलेला असतो तीच मंडळी त्यांच्या पडत्या काळात मराठी चित्रपटांच्या निर्मितीत उतरत, त्यात पहिला-वहिला अभिनय करताना मराठीचा अभिमान, कळवळा असल्याचा आव आणतात. मराठीचं ‘माधुर्य’ अधोरेखित करत मराठीच्या वैशिष्टयांची ‘लीस्ट’ पुढे करतात. (‘धक धक गर्ल’चा ‘बकेट लिस्ट’) हे सगळं बातमी म्हणून चालवतांना आणि बघताना अपण त्यांचा स्वार्थी हेतू नजरेआड करत त्यांना डोक्यावर तर घेत नाही ना? असा प्रश्न पडतो. फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडणारे नट, वन्यजीवांची शिकार करणाऱ्या नट-नट्या, भ्रष्ट राजकारणी, अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले तरीही निवडणूक जिंकणारे नेते, केवळ नावात ‘राम’ आणि रावणाची वृत्ती असलेले दादा, भाऊ, कार्यसम्राट वगैरे यांचं आपण आपल्या नकळत उदात्तीकरण तर नाही ना करत आहोत. कारण त्यांच्या सभांना, भाषणांना होणारी अलोट गर्दी पाहून हेच लक्षात येतं.
ह्या सगळ्या नकारात्मक बातम्यांमध्ये काही सकारात्मक विचार देणाऱ्या बातम्याही असतात, ज्यांमुळे थोडा दिलासा मिळतो. महाराष्ट्रातील अकोलेमधील ग्रामीण भागात राहून बियाण्यांची बँक जपणारी राहिबाई सोमा पोपेरे, रेल्वे स्टेशनवर आपला जीव धोक्यात घालून इतर प्रवाशांचे प्राण वाचणारे आरपीएफ जवान, आपली सोन्याची अंगठी विकून शाळा उभी करणारे बीडचे मुख्याध्यापक, मरणोत्तर अवयवदान करून दुसऱ्याला जीवदान देणारे आसामी. अशा आदर्श बातम्यांमुळे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण समाजाला काहीतरी चांगलंही देतो आहोत हे समाधान त्यातून मिळतं.
असो…शेवटी ‘ब्युरो रिपोर्ट’ म्हणत निरोप घेण्याआधी एक सांगतो. खरं तर वृत्तवाहिनी, रेडिओ, वृत्तपत्र ह्या माध्यमांची हीच खासियत आहे की अपल्याला एकाचवेळी अनेकांशी संवाद साधता येतो. कधी आहे तसं तर कधी मनीचं गूज सांगता येतं आणि काहीअंशी का होईना… जनप्रबोधन करण्याची संधी मिळते.
तरुणाईचं म्हणाल तर… ही कोण मंडळी आहेत जी आधी प्रेम करतात. नंतर प्रेम नाकारणाऱ्या व्यक्तीवर अमानुष हल्ला करतात, अॅसिड टाकून चेहरा विद्रुप करण्यात धन्यता मानतात ? ज्या बालवयात मुलांना घडवण्याची गरज असते त्या वयात ती बिघडून एकमेकांना भोकसल्याच्या बातम्या य़ेऊन थडकतात.
टीव्हीवरील ‘क्राईम शो’ना मिळणारा टीआरपी, हिंसक आणि अश्लिल वेब सिरीजना वाढता प्रेक्षकवर्ग, हे सगळं कशाचं द्योतक आहे? आपल्याकडेही ‘ही’ बातमी चालायलाच हवी ह्या अट्टहासापायी व्यभिचार, खून, बलात्कार, मोमो, कीकी, ब्लु व्हेल चॅलेंजच्या बातम्या दाखवून आपण नकळत त्यांचा प्रचार आणि प्रसार तर करत नाहीत ना ? कारण बातम्यांमधूनच अशा गेम्स आणि घटनांबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली जाते आणि दर्शक त्याकडे आकृष्ट होतात.
ज्या तारे-तारकांना करिअरच्या अत्युच्च ‘पीक’ला असतांना मराठीचा विसर पडलेला असतो तीच मंडळी त्यांच्या पडत्या काळात मराठी चित्रपटांच्या निर्मितीत उतरत, त्यात पहिला-वहिला अभिनय करताना मराठीचा अभिमान, कळवळा असल्याचा आव आणतात. मराठीचं ‘माधुर्य’ अधोरेखित करत मराठीच्या वैशिष्टयांची ‘लीस्ट’ पुढे करतात. (‘धक धक गर्ल’चा ‘बकेट लिस्ट’) हे सगळं बातमी म्हणून चालवतांना आणि बघताना अपण त्यांचा स्वार्थी हेतू नजरेआड करत त्यांना डोक्यावर तर घेत नाही ना? असा प्रश्न पडतो. फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडणारे नट, वन्यजीवांची शिकार करणाऱ्या नट-नट्या, भ्रष्ट राजकारणी, अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले तरीही निवडणूक जिंकणारे नेते, केवळ नावात ‘राम’ आणि रावणाची वृत्ती असलेले दादा, भाऊ, कार्यसम्राट वगैरे यांचं आपण आपल्या नकळत उदात्तीकरण तर नाही ना करत आहोत. कारण त्यांच्या सभांना, भाषणांना होणारी अलोट गर्दी पाहून हेच लक्षात येतं.
ह्या सगळ्या नकारात्मक बातम्यांमध्ये काही सकारात्मक विचार देणाऱ्या बातम्याही असतात, ज्यांमुळे थोडा दिलासा मिळतो. महाराष्ट्रातील अकोलेमधील ग्रामीण भागात राहून बियाण्यांची बँक जपणारी राहिबाई सोमा पोपेरे, रेल्वे स्टेशनवर आपला जीव धोक्यात घालून इतर प्रवाशांचे प्राण वाचणारे आरपीएफ जवान, आपली सोन्याची अंगठी विकून शाळा उभी करणारे बीडचे मुख्याध्यापक, मरणोत्तर अवयवदान करून दुसऱ्याला जीवदान देणारे आसामी. अशा आदर्श बातम्यांमुळे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण समाजाला काहीतरी चांगलंही देतो आहोत हे समाधान त्यातून मिळतं.
असो…शेवटी ‘ब्युरो रिपोर्ट’ म्हणत निरोप घेण्याआधी एक सांगतो. खरं तर वृत्तवाहिनी, रेडिओ, वृत्तपत्र ह्या माध्यमांची हीच खासियत आहे की अपल्याला एकाचवेळी अनेकांशी संवाद साधता येतो. कधी आहे तसं तर कधी मनीचं गूज सांगता येतं आणि काहीअंशी का होईना… जनप्रबोधन करण्याची संधी मिळते.
(लेखक पत्रकार आहेत)
3 Comments
अप्रतीम लेखन नितीनजी. अभ्यासपूर्ण विश्लेषण, प्रत्येकाला अंतर्मुख करणारा,विचार करायला लावणारा लेख.आजच्या पत्रकारितेला शिकण्यासारखा धडा म्हणजे हा लेख.
लेख छान आहे ,मला एखादी Realistic Film (parallel cinema) बधीतल्या वर जी भावना येते अगदी तसेच feel झाले
परंतु
हे जग असच आहे !
आणि हे सत्य स्विकारावेच लागेल,
आपण किती हि प्रयत्न केला तरी ही लोक त्यांना वागायचे तसेच वागतात,माझ वयक्तीक मत अस आहें कि मी कुठेतरी वाचले कि
“भीड जैसी है वैसी हि रहेगी ,अपने को तुम उसमे उलझाना मत, क्युं कि जीवन के परम सत्य उन्ही लोगोंको मिले जो एकांत मे गये ।”
मी चांगलं वागायचय तो माझा आनंद असावा , कारण
दुसऱ्याने माझ्या मनाप्रमाणे वागावे हि सुक्ष्म हिंसा आहे
“असे मला वाटते tnx.
Ravi sthul
Nice opnion