लाॅकडाऊन परिस्थितीमुळे अनेक गोष्टी नव्या दृष्टीने नव्या; पद्धतीने पाहण्याची, विचार करण्याची वेळ आली आहे. संकटात संधी पण असते असे म्हणतात. संगीत, नृत्य, गायन आदी प्रयोगशील सादरीकरण कराव्या लागणार्या अनेक कलाविष्कार आता फेसबुक, इन्स्टाग्रॅम अशा विविध ऑनलाईन अॅप्स् व संकेतस्थळावरून लाईव्ह पद्धतीने सादर करण्यास अधिक प्रोत्साहन मिळत आहे. ह्या कडे सकारात्मक दृष्टीने पाहून ती रसिक श्रोत्यांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचवण्याची सुसंधी आहे असे समजून त्याचा अधिकाधिक प्रभावी वापर व्हायला हवा.
मुळात सुरुवात शास्त्रीय संगीत म्हणजे नेमके काय असते ? आणि ते कसे समजून घ्यावे याच्यासंबंधी मार्गदर्शनाने होऊ शकेल असे वाटते. असे मानले जाते की, ॐकाराच्या प्रथम प्रकटनातून ताल आणि नादांची निर्मिती झाली. तालांवरून वाद्यंनिर्मिती तर नादांमधून श्रुतीध्वनी व स्वर निर्माण झाले. निसर्गातील, विश्वातील अगणित नाद आणि स्वरांच्या मग मोजता येतील अशा प्रमुख २२ श्रुतींमधून मग तीव्र, मध्यम, कोमल, शुद्ध असे १२ आणि अंतिमतः त्यातून ओळखता येतील असे ७ स्वर प्रमुख गणले गेले असावे. ह्या १२ स्वरांच्या वेगवेगळ्या स्वरसमुहांच्या, ध्वनीगटांच्या रागमाला झाल्या. प्रमुख राग व वेगवेगळ्या रागरागिण्या मिळून अनेक रागमाला आहेत. त्यात अनेक नवनवीन राग व जोडरागांची भर पडत गेली असावी.
एका सूर्योदयापासून सलग दुसर्या सूर्योदयापर्यंतच्या कालखंडाला समान भागांत विभागून ८ प्रहर बनले व त्या प्रत्येक प्रहराच्या अनुषंगाने रागांचीही विभागणी झाली. रागांमधील स्वरांचे आरोह अवरोह लिहिले गेले. पुढे ह्या आरोह-अवरोहांना धरून धृपद गायकी अस्तित्वात आली असावी . पुढे काव्यपंक्ती म्हणजेच बंदिशी लिहिल्या गेल्या. त्यात अस्ताई… अंतरा… संचार… अभोग… सम… आलापी… लयकारी…. ताना…. पलटे…. मींड… गमक… हरकत.. खटका… घसीट. …झमझमा… मुर्च्छना… एकेका शब्दावरचा ठहराव… उच्चार.. भावना… दमश्वास टिकवून सप्तकात फिरणे… रागाच्या स्वरसमुहांचा, ध्वनीगटांचा सौंदर्य विचार विषद करणे…. ह्या सगळ्यांवर शास्त्रीय संगीतातील गायनकलेचे सादरीकरण अवलंबून असते. ह्या सार्या गोष्टी ज्ञात आणि मुखोद्गत होण्यासाठी मेहनत, ध्यास, चिकाटी, अभ्यास, आवड ह्या सर्वांची गरज लागते. ही मेहनत सतत नवनवीन पद्धतीने घ्यावी लागते तेव्हा त्यातील आनंद द्विगुणित होत जातो. अशाच मेहनत घेण्याच्या नियम पद्धतीतून सांगीतिक घराण्यांचा उगम झाला. गुरू-शिष्य परंपरेतून ह्या घराण्यांचा विस्तार झाला. आपली स्वतःची एक शैली, खासियत ह्या घराण्यांनी जोपासली. त्यातून पुन्हा नवनवीन प्रयोग, रचना निर्माण झाल्या. ह्या घराण्यांना पुढे मग राजाश्रय लाभला व त्यातूनच गायनकला आणखी समृद्ध झाली. वेगवेगळ्या गानमहोत्सवातून राजाश्रय लाभलेल्या गायकांनी राजदरबाराची प्रतिष्ठा आणि कलेची श्रेष्ठता जपली.
उत्तर भारतातील शास्त्रीय संगीतावर त्या त्या प्रांतातील राज्य शासकांचा प्रभाव पडला. भाषेचा प्रभाव पडला. त्यामुळे तेथे निर्माण झालेल्या अनेक कलाकृतींतून हा प्रभाव दिसून येतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील खूप सार्या बंदिशी ह्या स्त्रीप्रधान व मालकाची मनधरणी, स्तुती, लटकी तक्रार किंवा प्रेमालाप करणाऱ्या आहेत. ज्या काळात ह्या बंदिशी लिहिल्या किंवा सादर केल्या गेल्या त्या त्या काळातील पुरूषप्रधान संस्कृती व सत्ताकेंद्र यानुसार हा मालक, राजा, बादशाह, उच्चभ्रू उच्चपदस्थ अधिकारीच असल्याने त्याच्या मनोरंजनास्तव सादर केलेल्या कलेमध्ये हे प्रतिबिंब दिसून येते. दक्षिण भारतात हीच गोष्ट मंदिर किंवा मठ यांच्या आश्रयाने जोपासली गेली त्यामुळे तामिळ, कर्नाटक शैलीसारख्या दक्षिण भारतीय भाषांमधून बहरलेल्या संगीतप्रकारात देव आणि भक्त हे नाते सांगीतिक रूपातून दिसून येते.
सांस्कृतिक देवाणघेवाणीमधून पुढे काळानुरूप अनेक बदल यात होत गेले व अजूनही होत असतात. पण तरीही शास्त्रीय संगीत म्हटले की, ते अवघड डोक्यावरून जाते असेच मानले जाते. याचे मुख्य कारण त्याची माहिती नसणे हेच असावे असे मला वाटते. गायक-गायिका जेव्हा एखादी चीज सादर करतात त्यावेळी त्याचा राग कोणता आहे. स्वर कोणते आहेत अरोह- अवरोह कसे आहेत, बोल काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्यातला भाव काय आहे, रचना कोणी केली आहे, त्यातील सौंदर्य काय आहे हे कलाकाराला जर पक्के ठाऊक असेल तर ते त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधून विषद केले पाहिजे. त्यामुळे श्रोत्यातील रसिक जागा होऊन तो अधिक जाणकार बनू शकतो. राग उलगडून दाखवणे, त्याची मांडणी स्वरमाला सादर करणे त्याच्या प्रत्येक स्वरावर गायकाने गायकी अंगाने घराण्याची शैली वैशिष्ट्य दाखवणे हे सर्वात पहिले काम. त्या नंतर विलंबित किंवा बडा ख्याल गाताना प्रत्येक शब्दांचा उच्चार, शब्दावरील ठेहराव, फेक, मधुरता आणि हळुवारपणे त्या बंदिशीची मांडणी करता येणे, ताल स्वर सांभाळून लयकारी व तान, आवाजाची फिरत, आणि समेवर येण्याची नजाकत ही हुकमी अस्त्रे आहेत. दृतगती बंदिश सादरीकरणात ताल व स्वरांचा वाढत जाणारा वेग सांभाळून बंदिशीच्या बोलांना एका नादामध्ये परिवर्तीत करता येण्याचे कौशल्य गायकाला साधता आले पाहिजे. याला जोडूनच मग नोमतोम, तराणा, टप्पा, ठुमरी, कजरी, इत्यादी उपशास्त्रीय गानप्रकारही वैविध्यपूर्ण रितीने सादर करणे हे कलावंताच्या प्रगल्भतेचे उदाहरण आहे. जर श्रोत्यांशी संवाद साधत हा कलाविष्कार आपण सादर करत राहिलो तर श्रोत्यांचे केवळ रसिक, जाणकारापासून अभ्यासू व जिज्ञासू कानसेन तयार होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होईल.
खरंतर ह्या लेखात लिहिल्या गेलेल्या संगीतविषयक प्रत्येक संज्ञा (term) आणि वाक्यांश ( phrase ) यावर स्वतंत्र लेखमाला किंवा डेमो व्हिडिओ होऊ शकेल, एवढे अमर्याद संगीतविश्व आहे. एकाच लेखात ते सामावणे सर्वथा अशक्यच म्हणून तूर्तास एवढेच…
मुळात सुरुवात शास्त्रीय संगीत म्हणजे नेमके काय असते ? आणि ते कसे समजून घ्यावे याच्यासंबंधी मार्गदर्शनाने होऊ शकेल असे वाटते. असे मानले जाते की, ॐकाराच्या प्रथम प्रकटनातून ताल आणि नादांची निर्मिती झाली. तालांवरून वाद्यंनिर्मिती तर नादांमधून श्रुतीध्वनी व स्वर निर्माण झाले. निसर्गातील, विश्वातील अगणित नाद आणि स्वरांच्या मग मोजता येतील अशा प्रमुख २२ श्रुतींमधून मग तीव्र, मध्यम, कोमल, शुद्ध असे १२ आणि अंतिमतः त्यातून ओळखता येतील असे ७ स्वर प्रमुख गणले गेले असावे. ह्या १२ स्वरांच्या वेगवेगळ्या स्वरसमुहांच्या, ध्वनीगटांच्या रागमाला झाल्या. प्रमुख राग व वेगवेगळ्या रागरागिण्या मिळून अनेक रागमाला आहेत. त्यात अनेक नवनवीन राग व जोडरागांची भर पडत गेली असावी.
एका सूर्योदयापासून सलग दुसर्या सूर्योदयापर्यंतच्या कालखंडाला समान भागांत विभागून ८ प्रहर बनले व त्या प्रत्येक प्रहराच्या अनुषंगाने रागांचीही विभागणी झाली. रागांमधील स्वरांचे आरोह अवरोह लिहिले गेले. पुढे ह्या आरोह-अवरोहांना धरून धृपद गायकी अस्तित्वात आली असावी . पुढे काव्यपंक्ती म्हणजेच बंदिशी लिहिल्या गेल्या. त्यात अस्ताई… अंतरा… संचार… अभोग… सम… आलापी… लयकारी…. ताना…. पलटे…. मींड… गमक… हरकत.. खटका… घसीट. …झमझमा… मुर्च्छना… एकेका शब्दावरचा ठहराव… उच्चार.. भावना… दमश्वास टिकवून सप्तकात फिरणे… रागाच्या स्वरसमुहांचा, ध्वनीगटांचा सौंदर्य विचार विषद करणे…. ह्या सगळ्यांवर शास्त्रीय संगीतातील गायनकलेचे सादरीकरण अवलंबून असते. ह्या सार्या गोष्टी ज्ञात आणि मुखोद्गत होण्यासाठी मेहनत, ध्यास, चिकाटी, अभ्यास, आवड ह्या सर्वांची गरज लागते. ही मेहनत सतत नवनवीन पद्धतीने घ्यावी लागते तेव्हा त्यातील आनंद द्विगुणित होत जातो. अशाच मेहनत घेण्याच्या नियम पद्धतीतून सांगीतिक घराण्यांचा उगम झाला. गुरू-शिष्य परंपरेतून ह्या घराण्यांचा विस्तार झाला. आपली स्वतःची एक शैली, खासियत ह्या घराण्यांनी जोपासली. त्यातून पुन्हा नवनवीन प्रयोग, रचना निर्माण झाल्या. ह्या घराण्यांना पुढे मग राजाश्रय लाभला व त्यातूनच गायनकला आणखी समृद्ध झाली. वेगवेगळ्या गानमहोत्सवातून राजाश्रय लाभलेल्या गायकांनी राजदरबाराची प्रतिष्ठा आणि कलेची श्रेष्ठता जपली.
उत्तर भारतातील शास्त्रीय संगीतावर त्या त्या प्रांतातील राज्य शासकांचा प्रभाव पडला. भाषेचा प्रभाव पडला. त्यामुळे तेथे निर्माण झालेल्या अनेक कलाकृतींतून हा प्रभाव दिसून येतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील खूप सार्या बंदिशी ह्या स्त्रीप्रधान व मालकाची मनधरणी, स्तुती, लटकी तक्रार किंवा प्रेमालाप करणाऱ्या आहेत. ज्या काळात ह्या बंदिशी लिहिल्या किंवा सादर केल्या गेल्या त्या त्या काळातील पुरूषप्रधान संस्कृती व सत्ताकेंद्र यानुसार हा मालक, राजा, बादशाह, उच्चभ्रू उच्चपदस्थ अधिकारीच असल्याने त्याच्या मनोरंजनास्तव सादर केलेल्या कलेमध्ये हे प्रतिबिंब दिसून येते. दक्षिण भारतात हीच गोष्ट मंदिर किंवा मठ यांच्या आश्रयाने जोपासली गेली त्यामुळे तामिळ, कर्नाटक शैलीसारख्या दक्षिण भारतीय भाषांमधून बहरलेल्या संगीतप्रकारात देव आणि भक्त हे नाते सांगीतिक रूपातून दिसून येते.
सांस्कृतिक देवाणघेवाणीमधून पुढे काळानुरूप अनेक बदल यात होत गेले व अजूनही होत असतात. पण तरीही शास्त्रीय संगीत म्हटले की, ते अवघड डोक्यावरून जाते असेच मानले जाते. याचे मुख्य कारण त्याची माहिती नसणे हेच असावे असे मला वाटते. गायक-गायिका जेव्हा एखादी चीज सादर करतात त्यावेळी त्याचा राग कोणता आहे. स्वर कोणते आहेत अरोह- अवरोह कसे आहेत, बोल काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्यातला भाव काय आहे, रचना कोणी केली आहे, त्यातील सौंदर्य काय आहे हे कलाकाराला जर पक्के ठाऊक असेल तर ते त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधून विषद केले पाहिजे. त्यामुळे श्रोत्यातील रसिक जागा होऊन तो अधिक जाणकार बनू शकतो. राग उलगडून दाखवणे, त्याची मांडणी स्वरमाला सादर करणे त्याच्या प्रत्येक स्वरावर गायकाने गायकी अंगाने घराण्याची शैली वैशिष्ट्य दाखवणे हे सर्वात पहिले काम. त्या नंतर विलंबित किंवा बडा ख्याल गाताना प्रत्येक शब्दांचा उच्चार, शब्दावरील ठेहराव, फेक, मधुरता आणि हळुवारपणे त्या बंदिशीची मांडणी करता येणे, ताल स्वर सांभाळून लयकारी व तान, आवाजाची फिरत, आणि समेवर येण्याची नजाकत ही हुकमी अस्त्रे आहेत. दृतगती बंदिश सादरीकरणात ताल व स्वरांचा वाढत जाणारा वेग सांभाळून बंदिशीच्या बोलांना एका नादामध्ये परिवर्तीत करता येण्याचे कौशल्य गायकाला साधता आले पाहिजे. याला जोडूनच मग नोमतोम, तराणा, टप्पा, ठुमरी, कजरी, इत्यादी उपशास्त्रीय गानप्रकारही वैविध्यपूर्ण रितीने सादर करणे हे कलावंताच्या प्रगल्भतेचे उदाहरण आहे. जर श्रोत्यांशी संवाद साधत हा कलाविष्कार आपण सादर करत राहिलो तर श्रोत्यांचे केवळ रसिक, जाणकारापासून अभ्यासू व जिज्ञासू कानसेन तयार होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होईल.
खरंतर ह्या लेखात लिहिल्या गेलेल्या संगीतविषयक प्रत्येक संज्ञा (term) आणि वाक्यांश ( phrase ) यावर स्वतंत्र लेखमाला किंवा डेमो व्हिडिओ होऊ शकेल, एवढे अमर्याद संगीतविश्व आहे. एकाच लेखात ते सामावणे सर्वथा अशक्यच म्हणून तूर्तास एवढेच…
(लेखिका प्रचार आणि प्रसिद्धी क्षेत्रात कार्यरत आहेत.)