२० ऑगस्ट,२०११ पाचच दिवसांपूर्वी भारताने ६५वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला होता. सर्वत्र भारतीय स्वातंत्र्याचे गुणगान केले गेले. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या व ते अबाधित ठेवणाऱ्या वीरांच्या शौर्यकथा सर्वत्र सांगितल्या गेल्या. स्वातंत्र्यदिन संपला त्याचबरोबर सर्व देशवासी पुन्हा आपल्या नेहमीच्या कामात व्यग्र झाले. वीरांच्या शौर्यकथादेखील विसरल्या गेल्या. पण देशाची सुरक्षितता अबाधित राखणाऱ्या वीरांच्या शौर्यकथा मात्र नेहमीप्रमाणे सरहद्दी गाजवत होत्या. अशीच एक शौर्यकथा २० ऑगस्ट,२०११च्या मध्यरात्री भारताच्या उत्तर सीमेवरील ‘गुरेझ सेक्टर’मध्ये लिहिली गेली.
काश्मीर म्हणजे स्वर्ग आणि ह्या स्वर्गाचा एक कोपरा ‘गुरेझ’. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०००फूट उंचीवर हिमालयाच्या कुशीत भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष सीमारेषेजवळ(LOC) वसलेलं निसर्गरम्य ठिकाण. ह्या परिसरात प्रामुख्याने शीना भाषा बोलली जाते. जी जवळपास कश्मीरी भाषेसारखीच आहे. गुरेझला संपन्न असा प्राचीन इतिहासदेखील लाभला आहे. गुरेझ हे ठिकाण प्राचीन रेशीम मार्गाच्या जवळ असलेलं ठिकाण आहे. दार्दीस्तानच्या क्षेत्रात गुरेझ होते तर दार्दी वंशाची दवार हे ठिकाण देखील गुरेझमध्येच होतं. ह्या परिसराचा प्राचीन इतिहास जितका संपन्न आहे तितकाच रक्तरंजित आहे याचा आधुनिक इतिहास आणि वर्तमान. १९४७मध्ये भारत व पाकिस्तान हे दोन राष्ट्रे अस्तित्वात आली. तेव्हापासून आजतागायत काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेपासून लष्करी मार्गांचा अवलंब करण्यात आला. पण तो प्रश्न तसाच आहे. त्यामुळे काश्मीरसाठी पाकच्या भारताविरुद्ध नापाक कारवायांमुळे काश्मीर खोरं धुमसत राहिलं व त्याचा फटका इतर सीमावर्ती भागांप्रमाणेच गुरेझलाही बसला. गुरेझच्या उत्तरेला पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे. जे अनेक अतिरेकी घुसखोरांचे आश्रयस्थान आहे जिथल्या प्रशिक्षण तळांवर भारताविरुद्ध कारवाया करण्याचे प्रशिक्षण दिले जाते व नंतर ह्या सीमावर्ती भागांतून भारतात घुसखोरी केली जाते. १९ ऑगस्ट, २०११ रोजी अशीच दहशतवाद्यांची एक प्रशिक्षित सशस्त्र टोळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करून घुसल्याची बातमी ‘घातक’ कमांडो प्लाटूनला मिळाली. लगेचच त्या घुसखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ही तुकडी निघाली आणि ह्या तुकडीचे नेतृत्व करत होते १५ मराठा लाईट इन्फंट्रीचे लेफ्टनंट नवदीप सिंग.
पंजाबमधील गुरुदासपूर येथे जन्मलेले नवदीप सिंग हे लष्करात जाणारे त्यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील सदस्य होते. याआधी नवदीप सिंग यांचे आजोबा अजित सिंग व वडील सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) जोगिंदर सिंग हे देखील भारतीय सैन्य सेवेत होते. नवदीप हे शाळेपासूनच एक चांगला विद्यार्थी होते. विज्ञानात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी आर्मी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, कोलकाता येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. इथून शिक्षणानंतर त्यांना व्यवसायाच्या अनेक संधी असताना त्यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला व ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई येथून लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून २०१० साली सैन्याला रसद पुरवणाऱ्या आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स विभागात रुजू झाले. पण लष्करी नियमाप्रमाणे प्रत्यक्ष युद्धात सहभाग न घेणाऱ्या विभागातील अधिकाऱ्यांना दोन वर्षे युद्धातील इन्फंट्री बटालियन किंवा सशस्त्र कारवायांमध्ये सहभागी व्हावं लागतं. त्यानुसार नवदीप सिंग जम्मू काश्मीरमध्ये १५ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये सामील झाले.
१९ ऑगस्टच्या रात्री नवदीप सिंग व त्यांचे सैनिक घुसखोरांच्या निघाले. त्यांना घुसखोरांचा मार्ग सापडला व त्यांची तुकडी नियोजनबद्ध सापळा करून दबा धरून बसली. त्यात नवदीप सिंग सर्वांत पुढे व त्यामागे त्यांचे सैनिक अशी रचना होती. साधारण रात्री १२. ३० वाजता (२० ऑगस्ट २०११) जेव्हा अतिरेकी नजरेच्या टप्प्यात आले तेव्हा सर्वप्रथम नवदीप सिंग व भारतीय सैन्याने अतिरेक्यांवर गोळीबार सुरू केला व त्याचबरोबर अतिरेक्यांनी देखील गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अंदाधुंद गोळीबार चालू होता. नवदीप सिंग यांनी आघाडी घेत तीन वेगवेगळ्या जागेवरील अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. त्याचक्षणी दुसरा अतिरेकी त्यांच्या जागी येत आहे हे दिसताच नवदीप यांनी वैयक्तिक सुरक्षेची कोणतीही पर्वा न करता वेगाने गोळीबारीची दिशा त्या अतिरेक्याकडे गोळीबार करत असतानाच त्यांच्या डोक्यात गोळी लागली. तरीही त्यांनी त्या अतिरेक्याचा खात्मा केला. स्वतः गंभीर जखमी असतानाही नवदीप यांनी आपल्या एका जखमी साथीदाराला खेचत सुरक्षित ठिकाणी आणलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इतर अतिरेक्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सशस्त्र घुसखोरीचा डाव उधळून लावला. नवदीप सिंग यांचे पार्थिव प्रथम श्रीनगर येथे आणण्यात आले. त्यांना लष्करी मानवंदना दिल्यांनतर पार्थिव त्यांच्या गावी गुरुदासपूर येथे नेण्यात आले.
लेफ्टनंट नवदीप सिंग यांनी गाजवलेले शौर्य, त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान व स्वतः घायाळ असताना देखील आपल्या साथीदाराचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांना २०१२च्या प्रजासत्ताक दिनी शांतता काळातील सर्वोच्च लष्करी सन्मान अशोकचक्र(मरणोत्तर) देऊन गौरवण्यात आले. लेफ्टनंट नवदीप सिंग यांच्या शौर्याने त्यांच्या घराण्याची, भारतीय सेनेची व मराठा लाईट इन्फंट्रीची ‘पूर्वजांपरि आम्ही अजिंक्य संगरी’ परंपरा अबाधित ठेवली आणि त्यांच्या बलिदानाने ‘ह्याच मातीवरी प्राण गेला तरी आमची वीरगाथा उरे ’ ह्या मराठी स्फूर्तिगीताप्रमाणे अजून एक शौर्यगाथा भारतीय लष्कराच्या व मराठा लाईट इन्फंट्रीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.
काश्मीर म्हणजे स्वर्ग आणि ह्या स्वर्गाचा एक कोपरा ‘गुरेझ’. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०००फूट उंचीवर हिमालयाच्या कुशीत भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष सीमारेषेजवळ(LOC) वसलेलं निसर्गरम्य ठिकाण. ह्या परिसरात प्रामुख्याने शीना भाषा बोलली जाते. जी जवळपास कश्मीरी भाषेसारखीच आहे. गुरेझला संपन्न असा प्राचीन इतिहासदेखील लाभला आहे. गुरेझ हे ठिकाण प्राचीन रेशीम मार्गाच्या जवळ असलेलं ठिकाण आहे. दार्दीस्तानच्या क्षेत्रात गुरेझ होते तर दार्दी वंशाची दवार हे ठिकाण देखील गुरेझमध्येच होतं. ह्या परिसराचा प्राचीन इतिहास जितका संपन्न आहे तितकाच रक्तरंजित आहे याचा आधुनिक इतिहास आणि वर्तमान. १९४७मध्ये भारत व पाकिस्तान हे दोन राष्ट्रे अस्तित्वात आली. तेव्हापासून आजतागायत काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेपासून लष्करी मार्गांचा अवलंब करण्यात आला. पण तो प्रश्न तसाच आहे. त्यामुळे काश्मीरसाठी पाकच्या भारताविरुद्ध नापाक कारवायांमुळे काश्मीर खोरं धुमसत राहिलं व त्याचा फटका इतर सीमावर्ती भागांप्रमाणेच गुरेझलाही बसला. गुरेझच्या उत्तरेला पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे. जे अनेक अतिरेकी घुसखोरांचे आश्रयस्थान आहे जिथल्या प्रशिक्षण तळांवर भारताविरुद्ध कारवाया करण्याचे प्रशिक्षण दिले जाते व नंतर ह्या सीमावर्ती भागांतून भारतात घुसखोरी केली जाते. १९ ऑगस्ट, २०११ रोजी अशीच दहशतवाद्यांची एक प्रशिक्षित सशस्त्र टोळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करून घुसल्याची बातमी ‘घातक’ कमांडो प्लाटूनला मिळाली. लगेचच त्या घुसखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ही तुकडी निघाली आणि ह्या तुकडीचे नेतृत्व करत होते १५ मराठा लाईट इन्फंट्रीचे लेफ्टनंट नवदीप सिंग.
पंजाबमधील गुरुदासपूर येथे जन्मलेले नवदीप सिंग हे लष्करात जाणारे त्यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील सदस्य होते. याआधी नवदीप सिंग यांचे आजोबा अजित सिंग व वडील सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) जोगिंदर सिंग हे देखील भारतीय सैन्य सेवेत होते. नवदीप हे शाळेपासूनच एक चांगला विद्यार्थी होते. विज्ञानात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी आर्मी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, कोलकाता येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. इथून शिक्षणानंतर त्यांना व्यवसायाच्या अनेक संधी असताना त्यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला व ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई येथून लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून २०१० साली सैन्याला रसद पुरवणाऱ्या आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स विभागात रुजू झाले. पण लष्करी नियमाप्रमाणे प्रत्यक्ष युद्धात सहभाग न घेणाऱ्या विभागातील अधिकाऱ्यांना दोन वर्षे युद्धातील इन्फंट्री बटालियन किंवा सशस्त्र कारवायांमध्ये सहभागी व्हावं लागतं. त्यानुसार नवदीप सिंग जम्मू काश्मीरमध्ये १५ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये सामील झाले.
१९ ऑगस्टच्या रात्री नवदीप सिंग व त्यांचे सैनिक घुसखोरांच्या निघाले. त्यांना घुसखोरांचा मार्ग सापडला व त्यांची तुकडी नियोजनबद्ध सापळा करून दबा धरून बसली. त्यात नवदीप सिंग सर्वांत पुढे व त्यामागे त्यांचे सैनिक अशी रचना होती. साधारण रात्री १२. ३० वाजता (२० ऑगस्ट २०११) जेव्हा अतिरेकी नजरेच्या टप्प्यात आले तेव्हा सर्वप्रथम नवदीप सिंग व भारतीय सैन्याने अतिरेक्यांवर गोळीबार सुरू केला व त्याचबरोबर अतिरेक्यांनी देखील गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अंदाधुंद गोळीबार चालू होता. नवदीप सिंग यांनी आघाडी घेत तीन वेगवेगळ्या जागेवरील अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. त्याचक्षणी दुसरा अतिरेकी त्यांच्या जागी येत आहे हे दिसताच नवदीप यांनी वैयक्तिक सुरक्षेची कोणतीही पर्वा न करता वेगाने गोळीबारीची दिशा त्या अतिरेक्याकडे गोळीबार करत असतानाच त्यांच्या डोक्यात गोळी लागली. तरीही त्यांनी त्या अतिरेक्याचा खात्मा केला. स्वतः गंभीर जखमी असतानाही नवदीप यांनी आपल्या एका जखमी साथीदाराला खेचत सुरक्षित ठिकाणी आणलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इतर अतिरेक्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सशस्त्र घुसखोरीचा डाव उधळून लावला. नवदीप सिंग यांचे पार्थिव प्रथम श्रीनगर येथे आणण्यात आले. त्यांना लष्करी मानवंदना दिल्यांनतर पार्थिव त्यांच्या गावी गुरुदासपूर येथे नेण्यात आले.
लेफ्टनंट नवदीप सिंग यांनी गाजवलेले शौर्य, त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान व स्वतः घायाळ असताना देखील आपल्या साथीदाराचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांना २०१२च्या प्रजासत्ताक दिनी शांतता काळातील सर्वोच्च लष्करी सन्मान अशोकचक्र(मरणोत्तर) देऊन गौरवण्यात आले. लेफ्टनंट नवदीप सिंग यांच्या शौर्याने त्यांच्या घराण्याची, भारतीय सेनेची व मराठा लाईट इन्फंट्रीची ‘पूर्वजांपरि आम्ही अजिंक्य संगरी’ परंपरा अबाधित ठेवली आणि त्यांच्या बलिदानाने ‘ह्याच मातीवरी प्राण गेला तरी आमची वीरगाथा उरे ’ ह्या मराठी स्फूर्तिगीताप्रमाणे अजून एक शौर्यगाथा भारतीय लष्कराच्या व मराठा लाईट इन्फंट्रीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.