भारत हा जीवन जगण्याचाच उत्सव करणाऱ्या व गीतेत शिकवल्याप्रमाणे चराचरामध्ये ईश्वरी रूप शोधणाऱ्या भाविकांचा देश. वर्षातील तीनशे पासष्ट दिवस निसर्गानंद साजरा करणाऱ्या सण-उत्सवांचा देश. तेथे सृष्टीतील प्रत्येक सजीव-निर्जीव रूप पूजनीय आहे. भारतीयांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये सजीव सृष्टीतील प्रत्येक भागीदाराचा समतोल जितका राखला जात असे, तितका जगात अन्यत्र कुठेही सांभाळला गेला नसेल.
पर्यावरण सरंक्षण आणि संवर्धन यांचा असा उदात्त वारसा असलेल्या भारत देशात आधुनिक काळात सण-उत्सवांना हिडीस स्वरूप येत गेले आहे. त्यांमागील संस्कारांचा मूळ हेतू हरवला आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे दसरा. दसरा म्हटल की सोनं म्हणून वाटण्यात येणारी आपट्याची पानं सगळ्यांना माहीत असतात. दरवर्षी आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून सर्वाना वाटतो.त्यासाठी जंगलातून फार मोठ्या प्रमाणात आपट्याच्या फांद्या तोडून आणल्या जातात. विकून उरलेली, वाटून झालेली पान शेवटी कचऱ्यात टाकली जातात. याउलट जर हि पान झाडावर असती तर त्यावर असंख्य जीवजंतु, कीटक, सूक्ष्मजीव यांचे जीवनचक्र चालते. पाने हि झाडांचा श्वास आहेत, पानातून प्रकाशसंश्लेषणाद्वारे मोठ्या प्रमाणात प्राणवायु हवेत सोडतात व हवेतील विषारी कार्बनडाय ऑक्साईड झाडात शोषून घेतात.
महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांची आठवण होते पण गुजरात, राजस्थान ह्या भागात बिड्या तयार करण्यासाठी आपट्याच पाने वापरली जातात. कोण्या एके काळी भरतात सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात. प्रस्तुत इतीहासकाराला घराघरातुन निघणाऱ्या आपट्याच्या पानांच्या बिड्यातून निघणाऱ्या धुराबद्दल सांगावयाचे असेल.
दसऱ्याच्या दिवशी असे काय घडले असेल की त्यामुळे आपट्याच्या पानांना सुवर्णाचे मोल प्राप्त होते. त्याचे असे झाले पूर्वी पैठण नगरात देवदत्त नावाचा ब्राम्हण राहत होता. त्याला कौत्स नावाचा मुलगा होता. तो भडोच येथे वरतंतु ऋषींकडे विद्यार्जनासाठी गेला. कौत्साची बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती, एकाग् रता पाहून वरतंतुंचा तो अल्पावधीत लाडका विद्यार्थी झाला. सर्व विद्या, वेद, पुराणे, शास्त्रे शिकून झाली. आता निरोपाची वेळ आली. ऋषींनी कोणाकडेही गुरुदक्षिणा मागीतली नाही परंतु गुरुऋणातुन मुक्त व्हावे असे कौत्साला वाटत होते. त्याने आपला विचार गुरुंजवळ बोलून दाखवला. त्यावर शिष्याने उत्तम प्रकारे विद्येचा उपयोग करून घेणे हीच गुरुदक्षिणा असे वरतंतू ऋषींनी समजावले. पण कौत्साने आपला हट्ट सोडला नाही. गुरुशिष्यांचा हा प्रेमळ झगडा पाहून गुरुपत्नी थट्टेने म्हणाली कौत्सा तुझा आग्रहच असेल तर गुरुंच्या वतीने मी गुरुदक्षिणा मागते. माझ्या पतीने तुला चौदा विद्या शिकवल्या आहेत. प्रत्येक विद्येसाठी एक कोट सुवर्णमुद्रा ह्याप्रमाणे चौदा कोट सुवर्णमुद्रा गुरुदक्षिणा म्हणून दे! यावर कौत्सा गुरु मातेचे थट्टेचे बोलणे थट्टाच समज असे गुरुंनी सांगितले.
थट्टेत का होईना केलेली मागणी कौत्साच्या मनात ठाण करून बसली. त्याने कोठल्याही परिस्थितीत गुरुदक्षिणा देण्याचा संकल्प सोडला. परंतु चौदा कोटी सुवर्ण मुद्रांचे दान तरी कोण करणार. साऱ्या भारतवर्षात त्या काळी फक्त रघुराजाच दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. रघुराजने नुकताच विश्वजीत यज्ञ केला होता. आपली अगणित संपत्ती त्याने यज्ञात दान करून टाकली. त्याच्या मालकीचे अगवरच्या वस्त्रा शिवाय काही उरले नव्हते. रघुराजाची किर्ती एकूण कौत्स मोठ्या आशेने आयोध्येला गेला. पुढे सर्व गोष्टी समजल्यावर कौत्साचा चेहरा उतरला. ते पाहून रघुराजाने इंद्रावर स्वारी करण्याचा निश्चय केला. रघुराजाचा मनोदय कळताच इंद्राला नेहमीप्रमाणे आपल्या इंद्रपदाची चिंता निर्माण झाली. इंद्राने ताबडतोब कुबेराला रघुराजाला चौदा कोटी सुवर्णमुद्रा देण्याचे फर्मावले. आता चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मोजण्याचा कुबेराला आला होता कंटाळा. इंद्रसभेत मेनकेच नृत्यगायन त्या रात्री आयोजन करण्यात आले होते. ते सोडून सुवर्णमुद्रा मोजत बसणे म्हणजे शिक्षाच. त्यारात्री नृत्यगायनाचा कार्यक्रम चुकू नये म्हणून आयोध्यानगरी बाहेर कुबेरने अगणित सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला.
सकाळी आयोध्यावासीय पहातात तर काय, गावाबाहेर शमी व आपट्याच्या झाडाजवळ सुवर्णमुद्रांचे ढीगच ढीग पडले होते. रघुरजला हि गोष्ट कळताच त्याने त्या सुवर्णमुद्रा न मोजताच हत्ती, उंट, बैल यांच्यावर लादून कौत्साला मोठ्या आनंदाने दान दिल्या. राजाने पाठवलेल काफीला घेऊन कौत्स भडोच गावी गुरुंपाशी आला. जास्त असल्या तर त्यावर आपला नैतिक हक्क नाही म्हणून त्या थोर गुरूने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मोजून घेतल्या व रहीलेल्या कौत्साला परत केल्या. निर्लोभ कौत्साने आपल्याला या सुवर्णमुद्रांचा काय उपयोग म्हणून रघुराजाला परत केल्या. दिलेल दान परत घेण्यास राजा तयार होईना. शेवटी जेथून त्या सुवर्णमुद्रा आणल्या होत्या तिथेच म्हणजे शमी आणि अपट्याच्या झाडापाशी टाकण्यात आल्या.
सुवर्णमुद्रांवर राजानेच हक्क सोडल्याने आयोध्यावासीयांचा नाईलाज झाला. ती बेवारस नाणी मोठ्या आनंदाने आपल्या घरी नेली; आपापसात वाटली. ज्या दिवशी सुवर्णमुद्रा वाटण्यात आल्या तो दिवस आश्विन शुद्ध नवमीचा होता. सुवर्णमुद्रा आपटा व शमीच्या औदर्यामुळे प्राप्त झाल्या आहेत असा आयोध्यावासीयांचा समज झाला. दुसऱ्या वर्षी मोठ्या आशेने आयोध्यावासी आपटा व शमीच्या झाडाजवळ गेले पण तेथे सुवर्णमुद्रा नव्हत्या मग रिकाम्या हाताने परत कसे जायचे? शेवटी सोन्याएवजी आपटा व शमीची पाने सोने म्हणून वाटण्याचा प्रघात पडला. पुढे शमीच्या झाडाला असलेल्या काट्यांमुळे त्याची पानं वाटणे कमी होऊन आपटाच वाटला जाऊ लागला.
आपट्याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. पण झाडे लहान आणि वेडीवाकडी वाढणारी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, इत्यादी तयार करण्यासाठी होतो. जनावरांना,विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. तंतूमय सालीपासून मजबूत व टिकाऊ दोर बनवतात. गावाच्या सीमेवर आणि शेताच्या बांधावर आपट्याची झाडे लावावीत असे जुन्या ग्रंथात संगीतालंय. छोटेखानी आकारामुळे पिकांना सावलीचा त्रास होत नाही उलट अपट्याच्या मुळांवर असलेल्या नत्रस्थिरीकरण करणाऱ्या गाठींमुळे जमीनीचा कस वाढतो.
दर वर्षी दसऱ्याला होणाऱ्या तोडीमुळे व्यथित झालेला आपटा तुम्हाला काही सांगू इच्छितो.
वर्षभरात माझी आठवण तरी आली का?
आज आलात… मला तोडायला…
सीमोलंघन कराचंच असेल तर हात नाका लावू माझ्या अंगाला…
खबरदार! तोडाचेच असतील तर हात तोडा धरणी मातेला उजाड कारणाऱ्यांचे…
लटकवा त्यांची लक्तरं चौकाचौकतल्या पोस्टरांवर…
बुरखे फाडा पखंड्यांचे ज्यांनी पैशासाठी धरणीची हिरवी चादर फाडली…
मग या माझ्याकडे मी सोनं करीन तुमच्या आयुष्याचं…
मी नुसता आपटा नाही या देशाची अस्मिता आहे…
खबरदार! तोपर्यंत हात नका लावू माझ्या अंगाला…
या वर्षी सर्वानी संकल्प करा दसऱ्याला लोकांना भेटायला अपट्याची पाने न वाटता हात जोडून नमस्कार करा व आशीर्वाद द्या व घ्या. जमल्यास सुवासिक फुले भेट द्या व घ्या. जमल्यास घरा जवळ एखाद आपटा, शमी यांच रोप लावा. प्रथा बंद करणे कठीण असते, पण कधीतरी तो बदल घडणे जरुरी आहे, चला या दसऱ्यापासूनच त्याची सुरवात करू, व एक आदर्श विचार समाजात घेऊन जाऊ.
पर्यावरण सरंक्षण आणि संवर्धन यांचा असा उदात्त वारसा असलेल्या भारत देशात आधुनिक काळात सण-उत्सवांना हिडीस स्वरूप येत गेले आहे. त्यांमागील संस्कारांचा मूळ हेतू हरवला आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे दसरा. दसरा म्हटल की सोनं म्हणून वाटण्यात येणारी आपट्याची पानं सगळ्यांना माहीत असतात. दरवर्षी आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून सर्वाना वाटतो.त्यासाठी जंगलातून फार मोठ्या प्रमाणात आपट्याच्या फांद्या तोडून आणल्या जातात. विकून उरलेली, वाटून झालेली पान शेवटी कचऱ्यात टाकली जातात. याउलट जर हि पान झाडावर असती तर त्यावर असंख्य जीवजंतु, कीटक, सूक्ष्मजीव यांचे जीवनचक्र चालते. पाने हि झाडांचा श्वास आहेत, पानातून प्रकाशसंश्लेषणाद्वारे मोठ्या प्रमाणात प्राणवायु हवेत सोडतात व हवेतील विषारी कार्बनडाय ऑक्साईड झाडात शोषून घेतात.
महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांची आठवण होते पण गुजरात, राजस्थान ह्या भागात बिड्या तयार करण्यासाठी आपट्याच पाने वापरली जातात. कोण्या एके काळी भरतात सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात. प्रस्तुत इतीहासकाराला घराघरातुन निघणाऱ्या आपट्याच्या पानांच्या बिड्यातून निघणाऱ्या धुराबद्दल सांगावयाचे असेल.
दसऱ्याच्या दिवशी असे काय घडले असेल की त्यामुळे आपट्याच्या पानांना सुवर्णाचे मोल प्राप्त होते. त्याचे असे झाले पूर्वी पैठण नगरात देवदत्त नावाचा ब्राम्हण राहत होता. त्याला कौत्स नावाचा मुलगा होता. तो भडोच येथे वरतंतु ऋषींकडे विद्यार्जनासाठी गेला. कौत्साची बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती, एकाग्
थट्टेत का होईना केलेली मागणी कौत्साच्या मनात ठाण करून बसली. त्याने कोठल्याही परिस्थितीत गुरुदक्षिणा देण्याचा संकल्प सोडला. परंतु चौदा कोटी सुवर्ण मुद्रांचे दान तरी कोण करणार. साऱ्या भारतवर्षात त्या काळी फक्त रघुराजाच दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. रघुराजने नुकताच विश्वजीत यज्ञ केला होता. आपली अगणित संपत्ती त्याने यज्ञात दान करून टाकली. त्याच्या मालकीचे अगवरच्या वस्त्रा शिवाय काही उरले नव्हते. रघुराजाची किर्ती एकूण कौत्स मोठ्या आशेने आयोध्येला गेला. पुढे सर्व गोष्टी समजल्यावर कौत्साचा चेहरा उतरला. ते पाहून रघुराजाने इंद्रावर स्वारी करण्याचा निश्चय केला. रघुराजाचा मनोदय कळताच इंद्राला नेहमीप्रमाणे आपल्या इंद्रपदाची चिंता निर्माण झाली. इंद्राने ताबडतोब कुबेराला रघुराजाला चौदा कोटी सुवर्णमुद्रा देण्याचे फर्मावले. आता चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मोजण्याचा कुबेराला आला होता कंटाळा. इंद्रसभेत मेनकेच नृत्यगायन त्या रात्री आयोजन करण्यात आले होते. ते सोडून सुवर्णमुद्रा मोजत बसणे म्हणजे शिक्षाच. त्यारात्री नृत्यगायनाचा कार्यक्रम चुकू नये म्हणून आयोध्यानगरी बाहेर कुबेरने अगणित सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला.
सकाळी आयोध्यावासीय पहातात तर काय, गावाबाहेर शमी व आपट्याच्या झाडाजवळ सुवर्णमुद्रांचे ढीगच ढीग पडले होते. रघुरजला हि गोष्ट कळताच त्याने त्या सुवर्णमुद्रा न मोजताच हत्ती, उंट, बैल यांच्यावर लादून कौत्साला मोठ्या आनंदाने दान दिल्या. राजाने पाठवलेल काफीला घेऊन कौत्स भडोच गावी गुरुंपाशी आला. जास्त असल्या तर त्यावर आपला नैतिक हक्क नाही म्हणून त्या थोर गुरूने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मोजून घेतल्या व रहीलेल्या कौत्साला परत केल्या. निर्लोभ कौत्साने आपल्याला या सुवर्णमुद्रांचा काय उपयोग म्हणून रघुराजाला परत केल्या. दिलेल दान परत घेण्यास राजा तयार होईना. शेवटी जेथून त्या सुवर्णमुद्रा आणल्या होत्या तिथेच म्हणजे शमी आणि अपट्याच्या झाडापाशी टाकण्यात आल्या.
सुवर्णमुद्रांवर राजानेच हक्क सोडल्याने आयोध्यावासीयांचा नाईलाज झाला. ती बेवारस नाणी मोठ्या आनंदाने आपल्या घरी नेली; आपापसात वाटली. ज्या दिवशी सुवर्णमुद्रा वाटण्यात आल्या तो दिवस आश्विन शुद्ध नवमीचा होता. सुवर्णमुद्रा आपटा व शमीच्या औदर्यामुळे प्राप्त झाल्या आहेत असा आयोध्यावासीयांचा समज झाला. दुसऱ्या वर्षी मोठ्या आशेने आयोध्यावासी आपटा व शमीच्या झाडाजवळ गेले पण तेथे सुवर्णमुद्रा नव्हत्या मग रिकाम्या हाताने परत कसे जायचे? शेवटी सोन्याएवजी आपटा व शमीची पाने सोने म्हणून वाटण्याचा प्रघात पडला. पुढे शमीच्या झाडाला असलेल्या काट्यांमुळे त्याची पानं वाटणे कमी होऊन आपटाच वाटला जाऊ लागला.
आपट्याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. पण झाडे लहान आणि वेडीवाकडी वाढणारी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, इत्यादी तयार करण्यासाठी होतो. जनावरांना,विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. तंतूमय सालीपासून मजबूत व टिकाऊ दोर बनवतात. गावाच्या सीमेवर आणि शेताच्या बांधावर आपट्याची झाडे लावावीत असे जुन्या ग्रंथात संगीतालंय. छोटेखानी आकारामुळे पिकांना सावलीचा त्रास होत नाही उलट अपट्याच्या मुळांवर असलेल्या नत्रस्थिरीकरण करणाऱ्या गाठींमुळे जमीनीचा कस वाढतो.
दर वर्षी दसऱ्याला होणाऱ्या तोडीमुळे व्यथित झालेला आपटा तुम्हाला काही सांगू इच्छितो.
वर्षभरात माझी आठवण तरी आली का?
आज आलात… मला तोडायला…
सीमोलंघन कराचंच असेल तर हात नाका लावू माझ्या अंगाला…
खबरदार! तोडाचेच असतील तर हात तोडा धरणी मातेला उजाड कारणाऱ्यांचे…
लटकवा त्यांची लक्तरं चौकाचौकतल्या पोस्टरांवर…
बुरखे फाडा पखंड्यांचे ज्यांनी पैशासाठी धरणीची हिरवी चादर फाडली…
मग या माझ्याकडे मी सोनं करीन तुमच्या आयुष्याचं…
मी नुसता आपटा नाही या देशाची अस्मिता आहे…
खबरदार! तोपर्यंत हात नका लावू माझ्या अंगाला…
या वर्षी सर्वानी संकल्प करा दसऱ्याला लोकांना भेटायला अपट्याची पाने न वाटता हात जोडून नमस्कार करा व आशीर्वाद द्या व घ्या. जमल्यास सुवासिक फुले भेट द्या व घ्या. जमल्यास घरा जवळ एखाद आपटा, शमी यांच रोप लावा. प्रथा बंद करणे कठीण असते, पण कधीतरी तो बदल घडणे जरुरी आहे, चला या दसऱ्यापासूनच त्याची सुरवात करू, व एक आदर्श विचार समाजात घेऊन जाऊ.
(लेखक ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशनचे संस्थापक असून,वृक्ष आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहेत.)