तिन्ही लोक आनंदाने भारून जाऊ दे अशी आशा मनात पल्लवित करणारा सण म्हणजे दीपावलीचा सण! अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, आनंदाचा, मांगल्याचा असा हा सण. म्हणूनच प्रत्येक श्रध्दावान भारतीय अधिरतेने ह्या सणाची वाट पाहात असतो. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार सुरू होणारा चातुर्मास हा खरं तर सर्व भारतीय सणांचं माहेरघर! अगदी आषाढी एकादशीपासून सुरू होऊन नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गणेश चतुर्थी, नवरात्र, दसरा असे हे चढत्या श्रेणीचे सण आपल्या समाजजीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत आणि ह्या सर्व सणांचा कळसाध्याय गाठला आहे दीपावली ह्या सणाने.
भारतीय सणांचा विचार करायला गेलं तर आपला प्रत्येक सण बदलत्या ऋतुमानाशी, त्यातल्या निसर्गाच्य्या विविधतेशी निगडीत आहे असं म्हटलं तरी चालेल. मोसमी-मान्सून-पावसाची मिळालेली देणगी हे भारताला लाभलेलं वरदान आहे आणि म्हणूनच अधिक पावसातले नारळीपौर्णिमा, गोकुळाष्टमी हे सण निसर्गाशी खूप जवळचं नातं सांगतात.
नवरात्रीत पावसाचं प्रमाण कमी होत जातं. शेतातल्या कणसाकणसात दाणा भरू लागतो. एकदा नवान्न पौर्णिमा पार पडली की शेतातलं धान्य हळूहळू घरात यायला लागतं, साठवणीचे, सुगीचे दिवस सुरू होतात. शारदीय पौर्णिमा ही आनंदाची चाहूल देते आणि सगळ्यांना दिवाळीचे वेध लागतात. ह्या अगोदरचे सगळे सण एकेका दैवताचे, एकएकटे साजरे केले जातात पण दिवाळीचा महिमाच वेगळा!
दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची कथा वेगळी. त्या कथेवर एकेक सण असे मिळून चार दिवसांचा हा सण लोक मोठ्या हौसेने साजरा करतात. महिने सुध्दा दोन. म्हणजे आश्विन महिन्याचे शेवटचे दोन दिवस व कार्तिक महिन्याचे सुरुवातीचे दोन दिवस असा हा मुख्य उत्सव! मग त्यातही आश्विन महिन्य्यातली द्वादशी-वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दोन दिवस जोडले जातात. प्रत्येक ठिकाणी एकापेक्षा अधिक हे सूत्र ह्या सणात दिसते. दीपावलीचा सण म्हणजे रंगांची उधळण! मग ती अनेक रंग वापरून रेखाटलेली रांगोळी असो वा विविध मनोहारी रंगांचे आकाशकंदील असोत. आकाशकंदीलांचे ते फिकट पिवळा, आकाशी, मोरपिशी, गुलाबी, अबोली असे रंग आजही मनाला मोह घालतात. त्यावेळी घरा-घरात स्वत: खपून आकाशकंदील बनवले जायचे. आमचा दादा फिरता आकाशकंदील सुरेख करायचा. कधी-कधी निरनिराळ्या देवतांची तर कधी प्राणी-पक्ष्यांची सुंदर चित्रे ड्रॉईंग पेपरवर काढून ती कोरून त्यांची गुंडाळी आतमध्ये करायची आणि बाहेरून विविध कागद लावायचे. आतल्या दिव्याच्या उजेडामुळे हवेच्या झोताने कंदीलाची चित्रे फिरू लागली की चित्रे फार सुरेख दिसायची. दादाची दुसरी खासियत म्हणजे मातीचा किल्ला बनवणे, मात्र या दोन्ही गोष्टींत आमची लुडबुड त्याला मुळीच चालायची नाही. तशीच त्या विविध रांगोळ्यांची सजावट!
‘रांगोळी’ हा शब्द रंगावली-रंगाची ओळ (आवली) या शब्दापासूनच आला आहे. इथेही परत अनेकत्वाची प्रेरणा आहे. एखादी कलावंत गृहिणी दारासमोर सुबक रेखाकृतींची अनेकरंगी रांगोळी दिवाळीच्या दिवसात रेखाटते अन् घराला मंगलमय रूप देते. लहानपणी वडिलांनी आमच्यासाठी केलेला खास मातीचा ओटा आणि त्यावर रेखाटलेल्या रांगोळ्या आठवतात अन् मन भूतकाळात रमून जातं. दिवाळीत तेवणार्या त्या छोट्या-छोट्या पणत्या, त्यांची नजाकत कोण विसरेल? इमारतींचे कठडे, गच्ची, खिडक्या इतकंच नव्हे तर बगिच्यातल्या झाडांभोवती बांधलेल्या गोलाकार पारांवर हारिने मांडलेल्या त्या पणत्यांची शोभा काय वर्णावी? दीपावली म्हणजे दीपांची आवली-दिव्यांची ओळ. एकापेक्षा अधिक हे सूत्र इथेही आहेच.
दीपावलीच्या संयुक्त उत्सवाच्या प्रत्येक दिवसाचं स्वतंत्र महत्त्व आहे. आश्विन महिन्याच्या वैद्य द्वादशीला येणार्या वसुबारसेला गोठ्यातल्या गाई-गुरांची पूजा केली जाते. त्यांना गोडधोड भरवले जाते, यामागची कल्पना स्पष्टच आहे, आदि मानव भटकंती करीत-करीत नद्यांच्या प्रदेशात स्थायिक झाला, तेथे शेती करू लागला. अर्थात, ह्या शेतीप्रधान व्यवस्थेत गाई-गुरे हीच त्याची संपत्ती, म्हणूनच ह्या पशुधनाचा आदरपूर्वक सांभाळ करायचा. त्यानंतर येते धनत्रयोदशी. अधिक करून व्यापारी लोकांचा सण. कुबेर, लक्ष्मी, विष्णू अशा धन देणार्या देवतांची पूजा केली जाते. समाजातला इतर वर्गही आपापल्या धनाची ह्या दिवशी पूजा करतो.
दिवाळीच्या मुख्य सणाचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुदर्शी किंवा नर्क चतुर्दशी! नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्री विष्णुने वध केला. मरताना नरकासुराने लोकांमध्ये आपली स्मृती कायम राहावी म्हणून हा दिवस आपल्या नावाने साजरा व्हावा, अशी इच्छा प्रकट केली. विष्णूने ‘तथास्तु’ म्हटले. आमच्या लहानपणी चिराट्याचे फळ पायाखाली चिरडून त्या प्रतिकात्मक दैत्याचा आमचे भाऊ वध करीत तेव्हा आम्हाला केवढा आनंद व्हायचा! याच दिववशी पहाटे अभ्यंगस्नान व्हायचे. त्यानंतर येतो लक्ष्मीपूजनाचा दिवस! यामागची आख्यायिका अशी- बळीराजा हा दैत्यांचा राजा फार पराक्रमी होता. त्याने इंद्रासह सर्व देवांना युद्धात जिंकून बंदिवासात टाकले. त्यांच्याबरोबर विष्णू पत्नी लक्ष्मीलाही त्याने बंदिवान केले. विष्णूने त्याच्याशी युद्ध करून सर्व देवांची मुक्तता केली. त्यात लक्ष्मीही होती. म्हणून ह्या दिवशी तिचे पूजन केले जाऊ लागले. व्यापारी वर्गाच्या दृष्टीने ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या दिवशी त्यांच्या पेढीवर हिशेबांच्या वह्यांचे पूजन- चोपडी पूजन केले जाते. सर्व आप्तेष्ट मित्रांना बोलावले जाते. रात्रभर फटाक्यांची आतीषबाजी केली जाते. प्रत्येक घराघरातही आपापल्या मगदुराप्रमाणे लक्ष्मीचे पूजन, घरातील दागदागिने इत्यादींचे पूजन केले जाते.
तिसरा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा! बळीराजा हा दैत्यांचा एक पराक्रमी राजा. पण तो दैत्य कुळातला असला तरी अत्यंत प्रजाहितदक्ष आणि दानशूर होता. त्याच्या राज्यात रयत सुखी होती. पण दानशूरपणा हा त्याचा गुणच त्याचा वैरी ठरला. वामनावतार घेऊन आलेल्या श्री विष्णूने तीन पावले भूमी त्याच्याकडे मागितली. दानशूर बळीने त्याची मागणी मान्य करताच दोन पावलांत वामनाने स्वर्ग व पृथ्वी व्यापली. आता तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारताच बळीने क्षणाचाही विलंब न लावता आपले मस्तक पुढे केले. त्याच्या मस्तकावर पाऊल ठेवीत विष्णूने त्याला पाताळात रेटले, अशी ही कथा आहे. पण याही कथेनुसार तुझी आठवण म्हणून लोक बलिप्रतिपदा साजरी करतील असा वर विष्णूने त्याला दिला. दिवाळीच्या सर्व दिवसांत ह्या दिवसाचे महत्त्व खूपच आहे. कोणत्याही नव्या गोष्टीचा मुहूर्त ह्या दिवशी करतात. नवीन वास्तू, नवीन वाहन खरेदी यासाठी हा दिवस शुभ मानतात. व्यापारी लोकांचे नवीन वर्ष या दिवशी सुरू होते. ह्या दिवसाच्या सणात काही उपपूजाही अंतर्भुत आहेत. काही ठिकाणी गोवर्धन पर्वताची प्रतिकृती, कृष्ण व गाई-वासरे यांच्या प्रतिमा यासह पुजली जाते. दुसरी एक पूजा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या देवळातून अन्नकोट/अन्नकूट मांडला जातो. नाना प्रकारचे गोड व तिखट पदार्थ मोठ्या टोपल्यांमधून देवांपुढे मांडले जातात. विविध प्रकारचे लाडू, वड्या, चकल्या, शेव-चिवडा, धीवर अशा पदार्थांबरोबरच भात वरण, भाज्य-चटण्या इत्यादी डावी-उजवीकडच्या पदार्थांनी परिपूर्ण असे भोजनही मांडले जाते. दिवाळीच्या हंगामात जनसामान्यांना अनुभवायला मिळणार्या सुबत्तेचे जणू प्रतीकच. असा हा अन्नकोट बघण्यासारखा असतो. यातले पदार्थ प्रसाद म्हणून सर्वांना वाटण्याची प्रथा आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडील शेतकरी वर्गात बळीची शेणाची प्रतिमा करून गाई-गुरांच्या गोठ्यात ठेवण्याची प्रथा आहे.
दीपावलीचा अखेरचा दिवस म्हणजे भाऊबीज! एकीकडे भावाबहिणीच्या मंगल प्रेमाची महती सांगणारा तर एकीकडे आता ह्या आनंदमय सणाची सांगता होणार ही हूरहूर लावणारा हा दिवस! यमराज आपली बहीण यमुना हिला वस्त्रा-भूषणे देऊन तिची पूजा करतो, अशी एक कथा यामागे आहे. आजही यमुना नदीचे पूजन, तिच्यात स्नान करणे हे पवित्र मानले जाते. दुसरी कथा यम-यमी ह्या भावंडांची! यम मृत्यू पावल्यावर यमी अनावर शोक करते. काही केल्या तिचे अश्रू व दु:ख कमी होत नाही. शेवटी देवांनी रात्र निर्माण केली आणि तिला तो वाईट दिवस संपल्याचे सांगितले. यमीचे दु:ख अशा प्रकारे देवांनी हलके केले. तिचे अश्रू थांबले. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे, त्याला सर्व प्रकारचे वैभव प्राप्त व्हावे म्हणून बहीण प्रेमाने त्याला ओवाळून पूजन करते, अशी यामागची भावना आहे. भावाबहिणीच्या गहिर्या नात्याचं प्रेममय बंधन स्वीकारून दीपावलीच्या सणाची सांगता होते. ज्या भगिनींना भाऊ नसतो त्या ह्या दिवशी आकाशीच्या चंद्राला ओवाळतात. किती सुंदर कल्पना आहे ही! आपण सारी धरतीची लेकरं! चंद्र हाही पृथ्वीपासूनच जन्मला. म्हणजे पृथ्वीवरील सार्या भगिनींचा चंद्र हा भाऊच झाला, असं उदात्त, मंगलमय नातं फक्त भारतीय संस्कृतीच जोडू शकते.
थंडीची उबदार चाहूल देणारा दिवाळीचा हा मंगलमय सण साजरा करताना आपण भारतीय किती सहजपणे निसर्गाशी एकरूप होऊन जातो! साधे अभ्यंगस्नान म्हटले तरी आज लोकांना त्याची महती पंचकर्म चिकित्सेतून सांगावी लागते. पण पुढे येणार्या तीव्र थंडीच्या मोसमाशी दोन हात करायला काहीतरी पूर्वतयारी हवी ना! तिळाचे तेल, खोबरेल तेल हे त्यासाठीच वापरायचे. निरनिराळे सुगंधी साबण आता आले. पण पूर्वी नागरमोथा, गव्हला काचरी, हळद याचे चूर्ण करून घरी बनविलेले सुगंधी उटणे दुधात कालवून अंगाला लावून आंघोळी करीत असत. न्हालेल्या केसांवर त्या कोरड्या पावडरीचा मंद सुगंध दिवसभर जाणवत राहायचा. दुसरी गोष्ट फराळाच्या पदार्थांची! तूप, खोबरे, शेंगदाणे, खसखस, तीळ, विविध धान्ये असे शरीराला पोषणमूल्ये व उष्मांक देणारे पदार्थ वापरून फराळाचे जिन्नस केले जायचे. आज ह्या सर्व पदार्थांची आवडच कमी होत चालली आहे. बाहेरच्या दुकानात आज बारा महिने तेरा काळ जर हे पदार्थ मिळत असतील, तर त्यांची अपूर्वाई ती काय राहणार? पुन्हा चीझ-सँडविच, बर्गर, हॅमबर्गर, पिझ्झा असे सारे एलियन्स आहेतच तुमच्यापुढे हजर! असो!
ह्या दीपोत्सवामागे अंधाराचा नाश करायचा हा तर उद्देश आहेच पण आणखीही काही गोष्टी यामागे असू शकतात. प्राचीन मानव स्थिर वस्ती करून एके ठिकाणी राहू लागला तरी तो तसा अल्पसंख्यच होता. आजूबाजूला घनदाट अरण्ये असायची, अशावेळी एखादे जंगली श्वापद आले तर ह्या एकदम सर्वत्र दिसणार्या प्रकाशाला भिऊन ते निघून जायचे. कदाचित आवाजच्या फटाक्यांमागेसुध्दा हेच तर्कशास्त्र असावे. उत्तरेला काश्मीरपासून ते थेट दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत धूमधडाक्याने साजर्या होणार्या ह्या दिवाळीच्या सणाने भारतीय एकात्मता जपली आहे. दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत सुद्धा खूप सारखेपणा दिसून येतो. क्वचित राज्या-राज्यागणिक खाद्यपदार्थ बनविण्याच्या पद्धतीत फरक असेल तेवढाच. आजही आपण सारे, अगदी पुढची पिढीसुद्धा हा सण उत्साहाने साजरा करतो. दारावरची झेंडू व आंब्याच्या पानांची तोरणं तुम्हाला अगत्याचं आमंत्रण देत असतात. नातेवाईक, मित्र यांना भेटी देऊन शुभेच्छा देणे, फराळाचे आदान-प्रदान करणे, कलावंतांच्या कलेला उत्तेजन देणारे ‘दिवाळी पहाट’ सारखे कार्यक्रम आयोजित करणे, ह्या सगळ्या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकीचे नाते दृढ होत जाते हे महत्त्वाचे!
यानिमित्ताने कितीतरी चांगल्या प्रथा समाजात आज रुजत आहेत. अनाथ विद्यार्थीगृहातल्या मुलांचा दिवाळीच्या निमित्ताने एका दिवसाचा जेवणखर्च किंवा वृद्धाश्रमातल्या निराधार एकाकी वृद्धांना फळफळावळ, उत्तमोत्तम वाचनीय पुस्तके भेट देणे, असे अनेक उपक्रम काही संस्था किंवा व्यक्ती अंमलात आणतात, हे खरंच गौरवास्पद आहे. दीपावलीचा संदेश तरी दुसरा काय आहे? तमसो मां ज्योतिर्गमयम् ह्या वेदमंत्रात हेच सांगितले आहे. मनामनातले विकल्प दूर व्हावेत; नैराश्याचा अंधार दूर व्हावा, आशेचा दीपक तेवत-प्रज्वलित रहावा हाच तर तो संदेश!
भारतीय सणांचा विचार करायला गेलं तर आपला प्रत्येक सण बदलत्या ऋतुमानाशी, त्यातल्या निसर्गाच्य्या विविधतेशी निगडीत आहे असं म्हटलं तरी चालेल. मोसमी-मान्सून-पावसाची मिळालेली देणगी हे भारताला लाभलेलं वरदान आहे आणि म्हणूनच अधिक पावसातले नारळीपौर्णिमा, गोकुळाष्टमी हे सण निसर्गाशी खूप जवळचं नातं सांगतात.
नवरात्रीत पावसाचं प्रमाण कमी होत जातं. शेतातल्या कणसाकणसात दाणा भरू लागतो. एकदा नवान्न पौर्णिमा पार पडली की शेतातलं धान्य हळूहळू घरात यायला लागतं, साठवणीचे, सुगीचे दिवस सुरू होतात. शारदीय पौर्णिमा ही आनंदाची चाहूल देते आणि सगळ्यांना दिवाळीचे वेध लागतात. ह्या अगोदरचे सगळे सण एकेका दैवताचे, एकएकटे साजरे केले जातात पण दिवाळीचा महिमाच वेगळा!
दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची कथा वेगळी. त्या कथेवर एकेक सण असे मिळून चार दिवसांचा हा सण लोक मोठ्या हौसेने साजरा करतात. महिने सुध्दा दोन. म्हणजे आश्विन महिन्याचे शेवटचे दोन दिवस व कार्तिक महिन्याचे सुरुवातीचे दोन दिवस असा हा मुख्य उत्सव! मग त्यातही आश्विन महिन्य्यातली द्वादशी-वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दोन दिवस जोडले जातात. प्रत्येक ठिकाणी एकापेक्षा अधिक हे सूत्र ह्या सणात दिसते. दीपावलीचा सण म्हणजे रंगांची उधळण! मग ती अनेक रंग वापरून रेखाटलेली रांगोळी असो वा विविध मनोहारी रंगांचे आकाशकंदील असोत. आकाशकंदीलांचे ते फिकट पिवळा, आकाशी, मोरपिशी, गुलाबी, अबोली असे रंग आजही मनाला मोह घालतात. त्यावेळी घरा-घरात स्वत: खपून आकाशकंदील बनवले जायचे. आमचा दादा फिरता आकाशकंदील सुरेख करायचा. कधी-कधी निरनिराळ्या देवतांची तर कधी प्राणी-पक्ष्यांची सुंदर चित्रे ड्रॉईंग पेपरवर काढून ती कोरून त्यांची गुंडाळी आतमध्ये करायची आणि बाहेरून विविध कागद लावायचे. आतल्या दिव्याच्या उजेडामुळे हवेच्या झोताने कंदीलाची चित्रे फिरू लागली की चित्रे फार सुरेख दिसायची. दादाची दुसरी खासियत म्हणजे मातीचा किल्ला बनवणे, मात्र या दोन्ही गोष्टींत आमची लुडबुड त्याला मुळीच चालायची नाही. तशीच त्या विविध रांगोळ्यांची सजावट!
‘रांगोळी’ हा शब्द रंगावली-रंगाची ओळ (आवली) या शब्दापासूनच आला आहे. इथेही परत अनेकत्वाची प्रेरणा आहे. एखादी कलावंत गृहिणी दारासमोर सुबक रेखाकृतींची अनेकरंगी रांगोळी दिवाळीच्या दिवसात रेखाटते अन् घराला मंगलमय रूप देते. लहानपणी वडिलांनी आमच्यासाठी केलेला खास मातीचा ओटा आणि त्यावर रेखाटलेल्या रांगोळ्या आठवतात अन् मन भूतकाळात रमून जातं. दिवाळीत तेवणार्या त्या छोट्या-छोट्या पणत्या, त्यांची नजाकत कोण विसरेल? इमारतींचे कठडे, गच्ची, खिडक्या इतकंच नव्हे तर बगिच्यातल्या झाडांभोवती बांधलेल्या गोलाकार पारांवर हारिने मांडलेल्या त्या पणत्यांची शोभा काय वर्णावी? दीपावली म्हणजे दीपांची आवली-दिव्यांची ओळ. एकापेक्षा अधिक हे सूत्र इथेही आहेच.
दीपावलीच्या संयुक्त उत्सवाच्या प्रत्येक दिवसाचं स्वतंत्र महत्त्व आहे. आश्विन महिन्याच्या वैद्य द्वादशीला येणार्या वसुबारसेला गोठ्यातल्या गाई-गुरांची पूजा केली जाते. त्यांना गोडधोड भरवले जाते, यामागची कल्पना स्पष्टच आहे, आदि मानव भटकंती करीत-करीत नद्यांच्या प्रदेशात स्थायिक झाला, तेथे शेती करू लागला. अर्थात, ह्या शेतीप्रधान व्यवस्थेत गाई-गुरे हीच त्याची संपत्ती, म्हणूनच ह्या पशुधनाचा आदरपूर्वक सांभाळ करायचा. त्यानंतर येते धनत्रयोदशी. अधिक करून व्यापारी लोकांचा सण. कुबेर, लक्ष्मी, विष्णू अशा धन देणार्या देवतांची पूजा केली जाते. समाजातला इतर वर्गही आपापल्या धनाची ह्या दिवशी पूजा करतो.
दिवाळीच्या मुख्य सणाचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुदर्शी किंवा नर्क चतुर्दशी! नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्री विष्णुने वध केला. मरताना नरकासुराने लोकांमध्ये आपली स्मृती कायम राहावी म्हणून हा दिवस आपल्या नावाने साजरा व्हावा, अशी इच्छा प्रकट केली. विष्णूने ‘तथास्तु’ म्हटले. आमच्या लहानपणी चिराट्याचे फळ पायाखाली चिरडून त्या प्रतिकात्मक दैत्याचा आमचे भाऊ वध करीत तेव्हा आम्हाला केवढा आनंद व्हायचा! याच दिववशी पहाटे अभ्यंगस्नान व्हायचे. त्यानंतर येतो लक्ष्मीपूजनाचा दिवस! यामागची आख्यायिका अशी- बळीराजा हा दैत्यांचा राजा फार पराक्रमी होता. त्याने इंद्रासह सर्व देवांना युद्धात जिंकून बंदिवासात टाकले. त्यांच्याबरोबर विष्णू पत्नी लक्ष्मीलाही त्याने बंदिवान केले. विष्णूने त्याच्याशी युद्ध करून सर्व देवांची मुक्तता केली. त्यात लक्ष्मीही होती. म्हणून ह्या दिवशी तिचे पूजन केले जाऊ लागले. व्यापारी वर्गाच्या दृष्टीने ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या दिवशी त्यांच्या पेढीवर हिशेबांच्या वह्यांचे पूजन- चोपडी पूजन केले जाते. सर्व आप्तेष्ट मित्रांना बोलावले जाते. रात्रभर फटाक्यांची आतीषबाजी केली जाते. प्रत्येक घराघरातही आपापल्या मगदुराप्रमाणे लक्ष्मीचे पूजन, घरातील दागदागिने इत्यादींचे पूजन केले जाते.
तिसरा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा! बळीराजा हा दैत्यांचा एक पराक्रमी राजा. पण तो दैत्य कुळातला असला तरी अत्यंत प्रजाहितदक्ष आणि दानशूर होता. त्याच्या राज्यात रयत सुखी होती. पण दानशूरपणा हा त्याचा गुणच त्याचा वैरी ठरला. वामनावतार घेऊन आलेल्या श्री विष्णूने तीन पावले भूमी त्याच्याकडे मागितली. दानशूर बळीने त्याची मागणी मान्य करताच दोन पावलांत वामनाने स्वर्ग व पृथ्वी व्यापली. आता तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारताच बळीने क्षणाचाही विलंब न लावता आपले मस्तक पुढे केले. त्याच्या मस्तकावर पाऊल ठेवीत विष्णूने त्याला पाताळात रेटले, अशी ही कथा आहे. पण याही कथेनुसार तुझी आठवण म्हणून लोक बलिप्रतिपदा साजरी करतील असा वर विष्णूने त्याला दिला. दिवाळीच्या सर्व दिवसांत ह्या दिवसाचे महत्त्व खूपच आहे. कोणत्याही नव्या गोष्टीचा मुहूर्त ह्या दिवशी करतात. नवीन वास्तू, नवीन वाहन खरेदी यासाठी हा दिवस शुभ मानतात. व्यापारी लोकांचे नवीन वर्ष या दिवशी सुरू होते. ह्या दिवसाच्या सणात काही उपपूजाही अंतर्भुत आहेत. काही ठिकाणी गोवर्धन पर्वताची प्रतिकृती, कृष्ण व गाई-वासरे यांच्या प्रतिमा यासह पुजली जाते. दुसरी एक पूजा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या देवळातून अन्नकोट/अन्नकूट मांडला जातो. नाना प्रकारचे गोड व तिखट पदार्थ मोठ्या टोपल्यांमधून देवांपुढे मांडले जातात. विविध प्रकारचे लाडू, वड्या, चकल्या, शेव-चिवडा, धीवर अशा पदार्थांबरोबरच भात वरण, भाज्य-चटण्या इत्यादी डावी-उजवीकडच्या पदार्थांनी परिपूर्ण असे भोजनही मांडले जाते. दिवाळीच्या हंगामात जनसामान्यांना अनुभवायला मिळणार्या सुबत्तेचे जणू प्रतीकच. असा हा अन्नकोट बघण्यासारखा असतो. यातले पदार्थ प्रसाद म्हणून सर्वांना वाटण्याची प्रथा आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडील शेतकरी वर्गात बळीची शेणाची प्रतिमा करून गाई-गुरांच्या गोठ्यात ठेवण्याची प्रथा आहे.
दीपावलीचा अखेरचा दिवस म्हणजे भाऊबीज! एकीकडे भावाबहिणीच्या मंगल प्रेमाची महती सांगणारा तर एकीकडे आता ह्या आनंदमय सणाची सांगता होणार ही हूरहूर लावणारा हा दिवस! यमराज आपली बहीण यमुना हिला वस्त्रा-भूषणे देऊन तिची पूजा करतो, अशी एक कथा यामागे आहे. आजही यमुना नदीचे पूजन, तिच्यात स्नान करणे हे पवित्र मानले जाते. दुसरी कथा यम-यमी ह्या भावंडांची! यम मृत्यू पावल्यावर यमी अनावर शोक करते. काही केल्या तिचे अश्रू व दु:ख कमी होत नाही. शेवटी देवांनी रात्र निर्माण केली आणि तिला तो वाईट दिवस संपल्याचे सांगितले. यमीचे दु:ख अशा प्रकारे देवांनी हलके केले. तिचे अश्रू थांबले. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे, त्याला सर्व प्रकारचे वैभव प्राप्त व्हावे म्हणून बहीण प्रेमाने त्याला ओवाळून पूजन करते, अशी यामागची भावना आहे. भावाबहिणीच्या गहिर्या नात्याचं प्रेममय बंधन स्वीकारून दीपावलीच्या सणाची सांगता होते. ज्या भगिनींना भाऊ नसतो त्या ह्या दिवशी आकाशीच्या चंद्राला ओवाळतात. किती सुंदर कल्पना आहे ही! आपण सारी धरतीची लेकरं! चंद्र हाही पृथ्वीपासूनच जन्मला. म्हणजे पृथ्वीवरील सार्या भगिनींचा चंद्र हा भाऊच झाला, असं उदात्त, मंगलमय नातं फक्त भारतीय संस्कृतीच जोडू शकते.
थंडीची उबदार चाहूल देणारा दिवाळीचा हा मंगलमय सण साजरा करताना आपण भारतीय किती सहजपणे निसर्गाशी एकरूप होऊन जातो! साधे अभ्यंगस्नान म्हटले तरी आज लोकांना त्याची महती पंचकर्म चिकित्सेतून सांगावी लागते. पण पुढे येणार्या तीव्र थंडीच्या मोसमाशी दोन हात करायला काहीतरी पूर्वतयारी हवी ना! तिळाचे तेल, खोबरेल तेल हे त्यासाठीच वापरायचे. निरनिराळे सुगंधी साबण आता आले. पण पूर्वी नागरमोथा, गव्हला काचरी, हळद याचे चूर्ण करून घरी बनविलेले सुगंधी उटणे दुधात कालवून अंगाला लावून आंघोळी करीत असत. न्हालेल्या केसांवर त्या कोरड्या पावडरीचा मंद सुगंध दिवसभर जाणवत राहायचा. दुसरी गोष्ट फराळाच्या पदार्थांची! तूप, खोबरे, शेंगदाणे, खसखस, तीळ, विविध धान्ये असे शरीराला पोषणमूल्ये व उष्मांक देणारे पदार्थ वापरून फराळाचे जिन्नस केले जायचे. आज ह्या सर्व पदार्थांची आवडच कमी होत चालली आहे. बाहेरच्या दुकानात आज बारा महिने तेरा काळ जर हे पदार्थ मिळत असतील, तर त्यांची अपूर्वाई ती काय राहणार? पुन्हा चीझ-सँडविच, बर्गर, हॅमबर्गर, पिझ्झा असे सारे एलियन्स आहेतच तुमच्यापुढे हजर! असो!
ह्या दीपोत्सवामागे अंधाराचा नाश करायचा हा तर उद्देश आहेच पण आणखीही काही गोष्टी यामागे असू शकतात. प्राचीन मानव स्थिर वस्ती करून एके ठिकाणी राहू लागला तरी तो तसा अल्पसंख्यच होता. आजूबाजूला घनदाट अरण्ये असायची, अशावेळी एखादे जंगली श्वापद आले तर ह्या एकदम सर्वत्र दिसणार्या प्रकाशाला भिऊन ते निघून जायचे. कदाचित आवाजच्या फटाक्यांमागेसुध्दा हेच तर्कशास्त्र असावे. उत्तरेला काश्मीरपासून ते थेट दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत धूमधडाक्याने साजर्या होणार्या ह्या दिवाळीच्या सणाने भारतीय एकात्मता जपली आहे. दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत सुद्धा खूप सारखेपणा दिसून येतो. क्वचित राज्या-राज्यागणिक खाद्यपदार्थ बनविण्याच्या पद्धतीत फरक असेल तेवढाच. आजही आपण सारे, अगदी पुढची पिढीसुद्धा हा सण उत्साहाने साजरा करतो. दारावरची झेंडू व आंब्याच्या पानांची तोरणं तुम्हाला अगत्याचं आमंत्रण देत असतात. नातेवाईक, मित्र यांना भेटी देऊन शुभेच्छा देणे, फराळाचे आदान-प्रदान करणे, कलावंतांच्या कलेला उत्तेजन देणारे ‘दिवाळी पहाट’ सारखे कार्यक्रम आयोजित करणे, ह्या सगळ्या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकीचे नाते दृढ होत जाते हे महत्त्वाचे!
यानिमित्ताने कितीतरी चांगल्या प्रथा समाजात आज रुजत आहेत. अनाथ विद्यार्थीगृहातल्या मुलांचा दिवाळीच्या निमित्ताने एका दिवसाचा जेवणखर्च किंवा वृद्धाश्रमातल्या निराधार एकाकी वृद्धांना फळफळावळ, उत्तमोत्तम वाचनीय पुस्तके भेट देणे, असे अनेक उपक्रम काही संस्था किंवा व्यक्ती अंमलात आणतात, हे खरंच गौरवास्पद आहे. दीपावलीचा संदेश तरी दुसरा काय आहे? तमसो मां ज्योतिर्गमयम् ह्या वेदमंत्रात हेच सांगितले आहे. मनामनातले विकल्प दूर व्हावेत; नैराश्याचा अंधार दूर व्हावा, आशेचा दीपक तेवत-प्रज्वलित रहावा हाच तर तो संदेश!