कोणत्याही गोष्टीची पार्श्वभूमी जेवढी सुसंस्कृत असते तेवढी ती लोकांच्या मनावर जास्त ठसते. आपल्या भारतीय संस्कृतीकडे म्हणूनच अवघं विश्व विश्वासाने नाही; तरी आदराने नक्कीच बघते! विश्वास ह्यासाठी डळमळीत असतो की आजच्या विज्ञान युगात ‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल’ याला जास्त महत्त्व दिले जाते. जे दृष्टीने पाहता येते, प्रयोगाने सिद्ध करता येते त्यातच अस्तित्व मानण्यात येते नाहीतर मग फक्त वादविवादाचाच भाग होतो.
आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व सण वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. जसे वटपौर्णिमेला बायका वडाचे झाड पुजतात तर ‘कोजागिरी’ला जागरण करून चंद्रप्रकाशातील दुधाचे सेवन केले जाते. दिवाळीला दीपोत्सव होतो तर अगदी शेतकरी सण पोळ्याला बैलाला आराम देऊन पूजा केली जाते. ह्या सणांच्या धार्मिक प्रथांच्या मागे वैज्ञानिक कारणच दडलेले आहे.
अनेक ऋषीमुनींनी ‘संशोधन’ करून जे सिद्धांत मांडले त्या सर्वांचे उपयोग मानवी जीवनात करून घेता येतील, याचाच त्यांना अभ्यास करावा लागला. कारण त्यांच्या वेळची समाजव्यवस्था ही धर्मपूर्ण होती. धार्मिक व्यासपीठावर तर वैज्ञानिक सिद्धांताचा उपयोग करायचा होता त्यामुळेच त्यांनी मग धार्मिक महत्त्व देऊन प्रत्येक प्रथेचा प्रत्येक सण शोधून काढला.
वडाच्या झाडांच्या पारंब्या, खोड, पाने ही बायकांचे गर्भाशय जास्त पोषक, सुदृढ बनवतात. म्हणूनच बायकांना वटपौर्णिमेला वडाला प्रदक्षिणा घातल्यास सात जन्म तोच नवरा मिळतो किंवा त्याचे आयुष्य वाढते अशी लालूच निर्माण केली व त्यानिमित्ताने बायकांना वडाच्या सहवासात आणले. तसेच अशाप्रकारे अनेक वनस्पतींचा गुणधर्म घालून घेऊन गणपतीला ‘दुर्वा’, शमीपत्र, जास्वंद वाहायला लावले तर विष्णुला ‘तुळस’ प्रिय केली शंकराला ‘बेल’ वाहिला तर देवीला ‘कमळ’ प्रिय केले, की जेणेकरून ह्या सर्वांशी मानवी जीवनाचा संपर्क साधला जावा.
अशाच ह्या वैज्ञानिक बैठकीवर आपल्या ‘पाडव्या’चेही आसन आहे. पाडवा हा सण चैत्र महिन्यात वसंत ऋतूत येतो़. यावेळी उन्हाळा ऋतू असल्यामुळे उन्हामुळे शरीरात ‘पित्त’ वाढलेले असते. त्याला मग कडूनिंब, धणे-जिरे, गूळ, खोबरे यांसारख्या पित्तनाशक पदार्थांची गरज असते. म्हणूनच मग पाडव्याला आपण ह्या सर्व पदार्थांची गोळी करून ‘प्रसाद’ म्हणून खातो़. कारण ‘गोळी’मध्ये कडूत्वाची भावना असते तर प्रसादामध्ये श्रद्धेची भावना असते आणि श्रद्धेच्या भावनेने सेवन केलेले कडू औषधही चटकन चागला परिणाम करून जाते.
गुढी पाडवा म्हणजे आनंद साजरा करण्याचा दिवस. माणसाला आनंद झाला की तो हात उंचावून व्यक्त करतो़. हे काहीतरी उंचावणे म्हणजे ‘उन्नत’ भावनांचे प्रतीक असते. म्हणूनच आपण काठीला उंच रेशमी वस्त्र, पालथा गडू, कडुनिंब व साखरेच्या गाठींची माळ अशापद्धतीने गुढी उभारतो़ व आपल्याला झालेल्या आनंदाची उत्स्फुर्त भावना प्रदर्शित करतो अर्थात, आपण आपल्या प्रिय व्यक्तींचे स्वागतही दुरुनच पाहिल्यानंतर हात उंचावून करतो आणि म्हणून रावणाला मारून सीतेला घेऊन अयोध्येत प्रवेश करणाऱ्या लाडक्या रामाचे स्वागत अयोध्यावासीयांनी ‘गुढ्या’ उभारून केले.
वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाले तर; बांबूची काठी म्हणजे लाकूड. हे सर्व ऊर्जाप्रवाहांना संयमित करते, तर रेशमी वस्त्र ऋण आयनांना धरून ठेवते. आकाशातील ऊर्जा तांब्यात प्रवाहीत होतात तर ऋण ऊर्जा वस्त्रात शिरतात. ह्या उर्जांचे अर्थिंग काठीमुळे होते. कडूलिंब हवेतील आॅक्सिजनचे प्रमाण वाढवतो तर ह्या सर्वांना गाठीमुळे गोडवा येतो आणि सण म्हटला की, घरातील सर्व व्यक्ती एकत्रित जमून कामाला लागतात, एकमेकांचा सहवास होतो, गप्पा-गोष्टींमुळे एकमेकांमधील नात्याचा गोडवाही वाढतो. आजकालच्या ह्या ‘यांत्रिक’ युगात तर ‘जिवंत’पणा ‘जिवंत’ ठेवण्यासाठी सण साजरे करण्याची खूप गरज आहे. असे मला वाटते. कारण त्यानिमित्ताने तरी माणसे एकत्रित येतील. मुलांना आपली नाती समजतील, प्रेम वाढेल आणि मानवी जीवनाला पाडव्यातील हा ‘गोडवा’ वैज्ञानिक आणि सांस्कृतिक पद्धतीने वाढवता येईल.
आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व सण वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. जसे वटपौर्णिमेला बायका वडाचे झाड पुजतात तर ‘कोजागिरी’ला जागरण करून चंद्रप्रकाशातील दुधाचे सेवन केले जाते. दिवाळीला दीपोत्सव होतो तर अगदी शेतकरी सण पोळ्याला बैलाला आराम देऊन पूजा केली जाते. ह्या सणांच्या धार्मिक प्रथांच्या मागे वैज्ञानिक कारणच दडलेले आहे.
अनेक ऋषीमुनींनी ‘संशोधन’ करून जे सिद्धांत मांडले त्या सर्वांचे उपयोग मानवी जीवनात करून घेता येतील, याचाच त्यांना अभ्यास करावा लागला. कारण त्यांच्या वेळची समाजव्यवस्था ही धर्मपूर्ण होती. धार्मिक व्यासपीठावर तर वैज्ञानिक सिद्धांताचा उपयोग करायचा होता त्यामुळेच त्यांनी मग धार्मिक महत्त्व देऊन प्रत्येक प्रथेचा प्रत्येक सण शोधून काढला.
वडाच्या झाडांच्या पारंब्या, खोड, पाने ही बायकांचे गर्भाशय जास्त पोषक, सुदृढ बनवतात. म्हणूनच बायकांना वटपौर्णिमेला वडाला प्रदक्षिणा घातल्यास सात जन्म तोच नवरा मिळतो किंवा त्याचे आयुष्य वाढते अशी लालूच निर्माण केली व त्यानिमित्ताने बायकांना वडाच्या सहवासात आणले. तसेच अशाप्रकारे अनेक वनस्पतींचा गुणधर्म घालून घेऊन गणपतीला ‘दुर्वा’, शमीपत्र, जास्वंद वाहायला लावले तर विष्णुला ‘तुळस’ प्रिय केली शंकराला ‘बेल’ वाहिला तर देवीला ‘कमळ’ प्रिय केले, की जेणेकरून ह्या सर्वांशी मानवी जीवनाचा संपर्क साधला जावा.
अशाच ह्या वैज्ञानिक बैठकीवर आपल्या ‘पाडव्या’चेही आसन आहे. पाडवा हा सण चैत्र महिन्यात वसंत ऋतूत येतो़. यावेळी उन्हाळा ऋतू असल्यामुळे उन्हामुळे शरीरात ‘पित्त’ वाढलेले असते. त्याला मग कडूनिंब, धणे-जिरे, गूळ, खोबरे यांसारख्या पित्तनाशक पदार्थांची गरज असते. म्हणूनच मग पाडव्याला आपण ह्या सर्व पदार्थांची गोळी करून ‘प्रसाद’ म्हणून खातो़. कारण ‘गोळी’मध्ये कडूत्वाची भावना असते तर प्रसादामध्ये श्रद्धेची भावना असते आणि श्रद्धेच्या भावनेने सेवन केलेले कडू औषधही चटकन चागला परिणाम करून जाते.
गुढी पाडवा म्हणजे आनंद साजरा करण्याचा दिवस. माणसाला आनंद झाला की तो हात उंचावून व्यक्त करतो़. हे काहीतरी उंचावणे म्हणजे ‘उन्नत’ भावनांचे प्रतीक असते. म्हणूनच आपण काठीला उंच रेशमी वस्त्र, पालथा गडू, कडुनिंब व साखरेच्या गाठींची माळ अशापद्धतीने गुढी उभारतो़ व आपल्याला झालेल्या आनंदाची उत्स्फुर्त भावना प्रदर्शित करतो अर्थात, आपण आपल्या प्रिय व्यक्तींचे स्वागतही दुरुनच पाहिल्यानंतर हात उंचावून करतो आणि म्हणून रावणाला मारून सीतेला घेऊन अयोध्येत प्रवेश करणाऱ्या लाडक्या रामाचे स्वागत अयोध्यावासीयांनी ‘गुढ्या’ उभारून केले.
वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाले तर; बांबूची काठी म्हणजे लाकूड. हे सर्व ऊर्जाप्रवाहांना संयमित करते, तर रेशमी वस्त्र ऋण आयनांना धरून ठेवते. आकाशातील ऊर्जा तांब्यात प्रवाहीत होतात तर ऋण ऊर्जा वस्त्रात शिरतात. ह्या उर्जांचे अर्थिंग काठीमुळे होते. कडूलिंब हवेतील आॅक्सिजनचे प्रमाण वाढवतो तर ह्या सर्वांना गाठीमुळे गोडवा येतो आणि सण म्हटला की, घरातील सर्व व्यक्ती एकत्रित जमून कामाला लागतात, एकमेकांचा सहवास होतो, गप्पा-गोष्टींमुळे एकमेकांमधील नात्याचा गोडवाही वाढतो. आजकालच्या ह्या ‘यांत्रिक’ युगात तर ‘जिवंत’पणा ‘जिवंत’ ठेवण्यासाठी सण साजरे करण्याची खूप गरज आहे. असे मला वाटते. कारण त्यानिमित्ताने तरी माणसे एकत्रित येतील. मुलांना आपली नाती समजतील, प्रेम वाढेल आणि मानवी जीवनाला पाडव्यातील हा ‘गोडवा’ वैज्ञानिक आणि सांस्कृतिक पद्धतीने वाढवता येईल.