छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे पहिले प्रमुख केंद्र म्हणजे किल्ले राजगड. पुण्यापासून 48 किमी अंतरावर असणारा राजगड आजही हिंदवी स्वराज्याची साक्ष देत उभा आहे. त्यामुळेच राजगड भ्रमंतीबाबत आम्हाला कमालीची उत्सुकता होती. म्हणूनच ‘अस्तित्त्व’च्या टीमने यावेळी ‘मोहीम राजगड’ची आखणी केली. सूरज वाडकर, स्वप्नेश नाईक, मयुरेश पुरो, राजेश बालुगडे यांच्यासह आम्ही १८ मावळे नोव्हेंबरच्या रखरखत्या उन्हात एका थरारक अनुभवासाठी सज्ज झालो. ठाण्याहून ट्रेनने पुणे गाठले आणि स्थानिक वाहनाने गडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात पोहचून ट्रेकींगला सुरुवात केली.
सकाळी सव्वासहाच्या दरम्यान सूर्यनारायणाच्या साक्षीने आमच्या ट्रेकला सुरुवात झाली. जवळपास अर्ध्या तासात सपाट भाग पालथा घातल्यानंतर मुख्य चढाईची वेळ आली. वाट तशी सोपी असली तरी तेवढीच दमछाक करणारी होती. जवळपास अर्धी वाट सर केल्यानंतर सगळ्यांनी साधारण साडे दहाच्या दरम्यान थोडा ब्रेक घेतला. अर्ध्या तासाच्या विश्रंतीनंतर पुन्हा चालण्यास सुरुवात केली. तोपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. आमच्या ग्रुपमधील लकी कुडाळकर आणि त्याच्या पत्नीने आम्हाला मागे टाकत आघाडी घेतली होती. आम्ही किल्याच्या टेकडीपर्यंत पोहोचायच्या आत लकी आणि त्याच्या पत्नीने गडाच्या बुरूजावरून आम्हाला हात दाखवत आवाज दिला. त्यानंतर आमचाही वेग वाढला आणि बरोबर बारा वाजता आम्ही किल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत पोहोचलो. मग सगळ्यानी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत शिवगर्जना केली.
थकलेलो असल्यामुळे थोडा आराम करावा म्हणून आम्ही पद्मावती मंदिराकडे गेलो. लकीने अगोदरच जाऊन मंदिरात आमच्यासाठी जागा अडवून ठेवली होती. थोडासा आराम, दुपारचे जेवण यानंतर संध्याकाळी सुवेळा माचीकडे आमचा मोर्चा वळला. रात्रीची थंडी घालवण्यासाठी मग आम्हीच जमा केलेल्या लाकडांच्या शेकोटीने गप्पांचा फड जमवत आकाशातल्या चांदण्याच्या सोबतीने विविध खेळ रंगत गेले.
दुसर्या दिवशीची सुरुवातही पहाटेच सहा वाजता झाली. आम्ही तासाभरात किल्ल्याच्या मुख्य दरावाज्यापर्यंत पोहोचलो. बालेकिल्ला गडावरील सर्वांत उंचीवर असल्यामुळे तिथून तोरणा गडासह आसपासच्या भागाचे विहंगमय दृष्य दिसते. अकरा साडे अकरापर्यंत संपूर्ण बालेकिल्ला पाहून खाली आलो आणि शॉर्टकटने संजिवनी माचीकडे कूच केली. एका स्थानिक लहान मुलाच्या मदतीने डोंगराच्याकडेने जाणाऱ्या पायवाटेने आमचा प्रवास सुरू झाला. एका बाजूस खोल दरी तर दुसऱ्या बाजूस डोंगर आणि त्यात एकावेळी एकजणच जाऊ शकेल अशा पायवाटेने माचीकडे जाण्याचा मार्ग आम्ही पार केला. त्यानंतर दुपारी दोनच्या आसपास परतीच्या प्रवासास सुरुवात केली. अशा प्रकारे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड, अशी ओळख असणाऱ्या किल्ले राजगडची आमची ही मोहीम फत्ते झाली.
पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात राजगड दिमाखात उभा आहे. राजगडावर पोहोचण्याच्या वाटा
१) गुप्त दरवाजाने : पुणे – राजगड अशी एसटी पकडून आपल्याला वाजेघर ह्या गावी उतरता येते. बाबुदा झापा ह्या ठिकाणापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. यावाटेने गडावर जाण्यास ३तास लागतात.
२) पाली दरवाज्याने : पुणे – वेल्हे एसटीने वेल्हे मार्गे पाबे ह्या गावी उतरुन, कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा. ही वाट पायऱ्यांची असून सर्वात सोपी आहे. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.
३) गुंजवणे दरवाज्याने : पुणे – वेल्हे ह्या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे ह्या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे. ह्या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात.
४) अळु दरवाज्याने : भुतोंडे मार्गे अळु दरवाजाने राजगड गाठता येतो. शिवथर घळीतूनही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.
५) गुप्त दरवाजामार्गे सुवेळा माची : गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्त दरवाजामार्गे सुवेळा माचीवर येते.
सकाळी सव्वासहाच्या दरम्यान सूर्यनारायणाच्या साक्षीने आमच्या ट्रेकला सुरुवात झाली. जवळपास अर्ध्या तासात सपाट भाग पालथा घातल्यानंतर मुख्य चढाईची वेळ आली. वाट तशी सोपी असली तरी तेवढीच दमछाक करणारी होती. जवळपास अर्धी वाट सर केल्यानंतर सगळ्यांनी साधारण साडे दहाच्या दरम्यान थोडा ब्रेक घेतला. अर्ध्या तासाच्या विश्रंतीनंतर पुन्हा चालण्यास सुरुवात केली. तोपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. आमच्या ग्रुपमधील लकी कुडाळकर आणि त्याच्या पत्नीने आम्हाला मागे टाकत आघाडी घेतली होती. आम्ही किल्याच्या टेकडीपर्यंत पोहोचायच्या आत लकी आणि त्याच्या पत्नीने गडाच्या बुरूजावरून आम्हाला हात दाखवत आवाज दिला. त्यानंतर आमचाही वेग वाढला आणि बरोबर बारा वाजता आम्ही किल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत पोहोचलो. मग सगळ्यानी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत शिवगर्जना केली.
थकलेलो असल्यामुळे थोडा आराम करावा म्हणून आम्ही पद्मावती मंदिराकडे गेलो. लकीने अगोदरच जाऊन मंदिरात आमच्यासाठी जागा अडवून ठेवली होती. थोडासा आराम, दुपारचे जेवण यानंतर संध्याकाळी सुवेळा माचीकडे आमचा मोर्चा वळला. रात्रीची थंडी घालवण्यासाठी मग आम्हीच जमा केलेल्या लाकडांच्या शेकोटीने गप्पांचा फड जमवत आकाशातल्या चांदण्याच्या सोबतीने विविध खेळ रंगत गेले.
दुसर्या दिवशीची सुरुवातही पहाटेच सहा वाजता झाली. आम्ही तासाभरात किल्ल्याच्या मुख्य दरावाज्यापर्यंत पोहोचलो. बालेकिल्ला गडावरील सर्वांत उंचीवर असल्यामुळे तिथून तोरणा गडासह आसपासच्या भागाचे विहंगमय दृष्य दिसते. अकरा साडे अकरापर्यंत संपूर्ण बालेकिल्ला पाहून खाली आलो आणि शॉर्टकटने संजिवनी माचीकडे कूच केली. एका स्थानिक लहान मुलाच्या मदतीने डोंगराच्याकडेने जाणाऱ्या पायवाटेने आमचा प्रवास सुरू झाला. एका बाजूस खोल दरी तर दुसऱ्या बाजूस डोंगर आणि त्यात एकावेळी एकजणच जाऊ शकेल अशा पायवाटेने माचीकडे जाण्याचा मार्ग आम्ही पार केला. त्यानंतर दुपारी दोनच्या आसपास परतीच्या प्रवासास सुरुवात केली. अशा प्रकारे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड, अशी ओळख असणाऱ्या किल्ले राजगडची आमची ही मोहीम फत्ते झाली.
पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात राजगड दिमाखात उभा आहे. राजगडावर पोहोचण्याच्या वाटा
१) गुप्त दरवाजाने : पुणे – राजगड अशी एसटी पकडून आपल्याला वाजेघर ह्या गावी उतरता येते. बाबुदा झापा ह्या ठिकाणापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. यावाटेने गडावर जाण्यास ३तास लागतात.
२) पाली दरवाज्याने : पुणे – वेल्हे एसटीने वेल्हे मार्गे पाबे ह्या गावी उतरुन, कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा. ही वाट पायऱ्यांची असून सर्वात सोपी आहे. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.
३) गुंजवणे दरवाज्याने : पुणे – वेल्हे ह्या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे ह्या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे. ह्या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात.
४) अळु दरवाज्याने : भुतोंडे मार्गे अळु दरवाजाने राजगड गाठता येतो. शिवथर घळीतूनही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.
५) गुप्त दरवाजामार्गे सुवेळा माची : गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्त दरवाजामार्गे सुवेळा माचीवर येते.
राहण्याची सोय
गडावरील पद्मावती मंदिरात २०ते २५ जणांची राहण्याची सोय होते.
पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.
‘अस्तित्त्व’ची ओळखमहाराष्ट्रातील गड-किल्ले हे आपल्या हिंदवी स्वराज्याचे ऐतिहासिक वैभव. ह्या गड किल्ल्यांची भ्रमंती करून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याची ओळख आपल्याला व्हावी, यासाठी ठाण्यातील जुन्या शाळांपैकी एक असलेल्या मो. ह. विद्यालयाच्या २००० च्या बॅचच्या दोन मित्रंनी एकत्र येत आपली भटकंती सुरू केली. त्यानंतर त्यांच्या ह्या उपक्रमात अनेकजण सहभागी होत गेले. अशाप्रकारे गड किल्ले, डोंगर भटकंतीची आवड असलेले युवक एकत्र येत गेले आणि ‘अस्तित्त्व’ची स्थापना झाली.
1 Comment
Akki… Kya bat hai…?