गेल्या काही काळात कोंकणातील पर्यटन बऱ्यापैकी विकसित झाले आहे. गोव्याला जाणारे देशी-विदेशी पर्यटक गोव्याला लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांनाही भेटी देऊ लागले आहेत. पण तारकर्ली, देवबागसारखे काही ठरावीक समुद्र किनारे आणि सावंतवाडी- मालवणसारखी शहरे वगळता इतर ठिकाणे म्हणावी तशी पर्यटनाच्या नकाशावर आलेली नाहीत. सिंधुदुर्गातील अशाच काही पर्यटन स्थळांचा घेतलेला आढावा.
मिठबाव-तांबळडेग
सिंधुदुर्गातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून तांबळडेग किनाऱ्याचा उल्लेख करावा लागेल. निळेशार पाणी, स्वच्छ वाळू यामुळे फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या याच गावात ‘गाव गाता गजाली’ ह्या मराठी मालिकेतील काही भागांचे चित्रिकरण झाले होते.
# जवळचे रेल्वेस्टेशन : कणकवली
# जवळचे बसस्थानक : देवगड
किल्ले निवती
वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे, कोंडुरा ह्या किनाऱ्यांप्रमाणेच किल्ले निवतीलाही निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याचं देणं दिलं आहे. त्याच समुद्रकिनारी असलेल्या छोट्या बेटामुळे येथील किनारपट्टीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. किल्ले निवती वेंगुर्ला आणि कुडाळ ह्या शहरांपासून जवळ आहे. नव्याने होत असलेले चिपी विमानतळ येथून हाकेच्या अंतरावर आहे.
# जवळचे रेल्वे स्टेशन : कुडाळ
# जवळचे बसस्थानक : वेंगुर्ला, कुडाळ
डच वखार (वेंगुर्ला)
वेंगुर्ला बंदर, सागरेश्वर किनारा प्रसिद्ध असला तरी अनोळखी पर्यटकांसाठी वेंगुर्ल्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक डच वखारीविषयी फारशी माहिती नाही. आज ह्या वास्तूची कमालीची पडझड झाली असली तरी इतिहासाची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी डच वखारीला भेट देणे पर्वणी ठरू शकते. डच वखार वेंगुर्ला बसस्थानकापासून जवळच आहे.
# जवळचे रेल्वे स्थानक : सावंतवाडी रोड
# जवळचे बस स्थानक : वेंगुर्ला
नापणे धबधबा ( नापणे, वैभववाडी)
कोंकणातील बहुतांश धबधबे पावसाळ्यानंतर वाहण्याचे बंद होतात. मात्र याला अपवाद आहे तो वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील धबधबा. बारमाही वाहणारा हा धबधबा म्हणजे एक आश्चर्यच आहे. नैसर्गिक उमाळ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा बारमाही प्रवाहित असतो. त्यामुळे उन्हाळ्यातही वाहणारा धबधबा पाहण्यासाठी नापणेला भेट दिलीच पाहिजे.
# जवळचे रेल्वे स्टेशन : वैभववाडी
यशवंतगड (रेडी)
महाराष्ट्राच्या ७२० कि.मी. लांब किनारपट्टीवरील शेवटचा किल्ला म्हणून यशवंतगड ओळखला जातो. मॅगेनिजच्या खाणीमुळेही व गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रेडी ह्या गावात हा दुर्ग वसलेला आहे. ह्या किल्ल्यास एकापाठोपाठ एक अशी सहा प्रवेशद्वारांची मालिका असून, आतमध्ये प्रचंड मोठा वाडा, मंदिर, विहीर, लांबचलांब तट व बुरूज आजही सुस्थितीत उभे आहेत. पूर्णपणे जांभ्या दगडात बांधलेल्या ह्या गडाची तट-बुरूजाची मांडणी आजही सुस्थितीत आहे.
रांगणागड (कुडाळ)
कुडाळ तालुक्यातील नारूर मुक्कामाहून रांगणागडावर जायला पायवाट आहे. भयाण जंगल, दगडधोंड्यातील पायवाट, जंगली पशूंचा वावर ह्या संकटांवर मात करत रांगणागड गाठावा लागतो. वाटेत जर लक्ष चुकून तुमचा पाय घसरल्यास १०० ते १५० फूट तुम्ही खालीच गेला समजा. ह्या गडावर जायचं म्हणजे दांडगी इच्छाशक्तीच हवी. तब्बल २ तासांनंतर गडावर पोहोचता येते. गडाची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे. जुना दिंडी दरवाजादेखील अर्धवट उभा आहे. दिंडी दरवाजातून आतमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याची विहीर लागते. थोडंसं पुढे चालत गेल्यावर दुसरा एक दरवाजा लागतो. ह्या दरवाजाचं नक्षीकाम फारच सुंदर आहे. दरवाजातून पुढे गेल्यानंतर मोठा तलाव पाहायला मिळतो. ह्या तलावात वर्षांचे बाराही महिने मुबलक पाणी असते. तलावाच्याच काठावर पश्चिमेला भग्नावस्थेतील शंकर मंदिर आहे, तर थोडंसं पुढे रांगणाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरील नक्षीदार दीपमाळ लक्ष वेधून घेते. ह्या दीपमाळेचे बांधकाम काळ्या दगडाचे आहे.
(गुढीपूर) पिंगुळी
येथे विविध कलांचा वारसा जपणाऱ्या ठाकर समाजाची वस्ती आहे. चित्रकथी, कळसूत्री, पांगुळबैल अशा कलांचा वारसा त्यांनी जपला आहे. गुढीपूर हे मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळजवळ वसले आहे.
#जवळचे रेल्वेस्टेशन : कुडाळ, झाराप
जवळचे बसस्थानक : कुडाळ
मिठबाव-तांबळडेग
सिंधुदुर्गातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून तांबळडेग किनाऱ्याचा उल्लेख करावा लागेल. निळेशार पाणी, स्वच्छ वाळू यामुळे फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या याच गावात ‘गाव गाता गजाली’ ह्या मराठी मालिकेतील काही भागांचे चित्रिकरण झाले होते.
# जवळचे रेल्वेस्टेशन : कणकवली
# जवळचे बसस्थानक : देवगड
किल्ले निवती
वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे, कोंडुरा ह्या किनाऱ्यांप्रमाणेच किल्ले निवतीलाही निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याचं देणं दिलं आहे. त्याच समुद्रकिनारी असलेल्या छोट्या बेटामुळे येथील किनारपट्टीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. किल्ले निवती वेंगुर्ला आणि कुडाळ ह्या शहरांपासून जवळ आहे. नव्याने होत असलेले चिपी विमानतळ येथून हाकेच्या अंतरावर आहे.
# जवळचे रेल्वे स्टेशन : कुडाळ
# जवळचे बसस्थानक : वेंगुर्ला, कुडाळ
डच वखार (वेंगुर्ला)
वेंगुर्ला बंदर, सागरेश्वर किनारा प्रसिद्ध असला तरी अनोळखी पर्यटकांसाठी वेंगुर्ल्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक डच वखारीविषयी फारशी माहिती नाही. आज ह्या वास्तूची कमालीची पडझड झाली असली तरी इतिहासाची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी डच वखारीला भेट देणे पर्वणी ठरू शकते. डच वखार वेंगुर्ला बसस्थानकापासून जवळच आहे.
# जवळचे रेल्वे स्थानक : सावंतवाडी रोड
# जवळचे बस स्थानक : वेंगुर्ला
नापणे धबधबा ( नापणे, वैभववाडी)
कोंकणातील बहुतांश धबधबे पावसाळ्यानंतर वाहण्याचे बंद होतात. मात्र याला अपवाद आहे तो वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील धबधबा. बारमाही वाहणारा हा धबधबा म्हणजे एक आश्चर्यच आहे. नैसर्गिक उमाळ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा बारमाही प्रवाहित असतो. त्यामुळे उन्हाळ्यातही वाहणारा धबधबा पाहण्यासाठी नापणेला भेट दिलीच पाहिजे.
# जवळचे रेल्वे स्टेशन : वैभववाडी
यशवंतगड (रेडी)
महाराष्ट्राच्या ७२० कि.मी. लांब किनारपट्टीवरील शेवटचा किल्ला म्हणून यशवंतगड ओळखला जातो. मॅगेनिजच्या खाणीमुळेही व गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रेडी ह्या गावात हा दुर्ग वसलेला आहे. ह्या किल्ल्यास एकापाठोपाठ एक अशी सहा प्रवेशद्वारांची मालिका असून, आतमध्ये प्रचंड मोठा वाडा, मंदिर, विहीर, लांबचलांब तट व बुरूज आजही सुस्थितीत उभे आहेत. पूर्णपणे जांभ्या दगडात बांधलेल्या ह्या गडाची तट-बुरूजाची मांडणी आजही सुस्थितीत आहे.
रांगणागड (कुडाळ)
कुडाळ तालुक्यातील नारूर मुक्कामाहून रांगणागडावर जायला पायवाट आहे. भयाण जंगल, दगडधोंड्यातील पायवाट, जंगली पशूंचा वावर ह्या संकटांवर मात करत रांगणागड गाठावा लागतो. वाटेत जर लक्ष चुकून तुमचा पाय घसरल्यास १०० ते १५० फूट तुम्ही खालीच गेला समजा. ह्या गडावर जायचं म्हणजे दांडगी इच्छाशक्तीच हवी. तब्बल २ तासांनंतर गडावर पोहोचता येते. गडाची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे. जुना दिंडी दरवाजादेखील अर्धवट उभा आहे. दिंडी दरवाजातून आतमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याची विहीर लागते. थोडंसं पुढे चालत गेल्यावर दुसरा एक दरवाजा लागतो. ह्या दरवाजाचं नक्षीकाम फारच सुंदर आहे. दरवाजातून पुढे गेल्यानंतर मोठा तलाव पाहायला मिळतो. ह्या तलावात वर्षांचे बाराही महिने मुबलक पाणी असते. तलावाच्याच काठावर पश्चिमेला भग्नावस्थेतील शंकर मंदिर आहे, तर थोडंसं पुढे रांगणाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरील नक्षीदार दीपमाळ लक्ष वेधून घेते. ह्या दीपमाळेचे बांधकाम काळ्या दगडाचे आहे.
(गुढीपूर) पिंगुळी
येथे विविध कलांचा वारसा जपणाऱ्या ठाकर समाजाची वस्ती आहे. चित्रकथी, कळसूत्री, पांगुळबैल अशा कलांचा वारसा त्यांनी जपला आहे. गुढीपूर हे मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळजवळ वसले आहे.
#जवळचे रेल्वेस्टेशन : कुडाळ, झाराप
जवळचे बसस्थानक : कुडाळ