कुठल्याही अर्जात छंदापुढल्या रकान्यात “वाचन” असं लिहिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अगदी अर्जात छंदाचा रकाना आला तेव्हापासून म्हटलं तरी वावगं ठरायचं नाही. तर, खरंच इतक्या लोकांना वाचनाचा छंद आहे का? तसं असेल तर साहित्य संमेलनं वगळता पुस्तकांची विक्री उपेक्षित का असते? अगदी नकारात्मक विचार नको करायला. एक तर नक्की झालं की वाचनाचं महत्त्व बहुसंख्य लोकांनी मान्य केलंय. तो आपला छंद असावा अशी त्यांची इच्छाही यातून दिसते. खरंतर अर्ध काम इथंच झालंय. बाकी उरलंय त्या इच्छेला वास्तवात आणण्यासाठीचे प्रयत्न आणि तसं वातावरण तयार करणं.
लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागावी, पुस्तकांची सोबत मजेची वाटावी असे प्रामाणिक प्रयत्न करणारे पालक असतातच. माध्यमांच्या उपलब्धतेची मर्यादा लक्षात घेता आधी ते ठळकपणे जाणवायचं. लहानपणीच्या आठवणीत चांदोबा, चंपक, ठकठक, कुमार, किशोर अशा कैक नियतकालिकांची माळ अनेकांच्या डोळ्यात लुकलुकता दिसते. या रंगीत, कल्पनारम्य, तसंच बोधकथांचा समावेश असलेल्या पुस्तकातून भाषेशी आपसूकच मैत्री व्हायची. अनेक पात्रं मित्र व्हायचे. पुस्तक वाचताना ती गोष्ट मनानंच “बघणं” व्हायचं. त्याचा विचार करताना आपलंच आपल्याशी अधिकचं स्पष्टतेकडे जाणारं “बोलणं” व्हायचं. वाचनातून दृषात्मकता, कल्पनाशक्ती यांचा वापर आणि विकास व्हायचा. त्यापुढली मोठ्या गोष्टींची पुस्तक वाचायची ओढ लागायची. त्याचा दमसास वाढायचा. दर्जेदार, क्लासिक म्हणून गणली जाणारी पुस्तकं हाती आली की वाचताना त्यांचं वेगळेपण जाणवत वाचनाच्या कक्षा वाढू लागायच्या. लक्षात यायंचं किंवा येतं की हाती असलेल्या वेळेत किती “अनुभव” स्वतः घेऊ शकणार आहोत आपण? अशात, वाचनातून लेखकाबरोबर त्याच्या अनुभवांची सहअनुभूती तर घेऊच शकतो की आपण. जग जाणू शकतो. विविध ठिकाणच्या जगण्याच्या रिती, भावभावना यांचा कानोसा घेऊ शकतो. एका जागी बसून वैश्विक होण्याचा प्रयत्न करु शकतो.
बदलत्या काळात काही धारणांबद्दल विचार करण्याची निकड वाटू लागली आहे. सध्याचा हा काळ डिजिटलचा. त्यामुळे पुस्तकंही त्या माध्यमात अधिक उपलब्ध होऊ लागलीत. त्याला कारणं दोन, एक म्हणजे कागदाचा वापर नाही त्यामुळे खर्चात मोठी कपात. स्वस्त पडतं. आणि पर्यावरणाचा विचार करता ते पर्यावरणस्नेही देखील आहे. अशात पुस्तक हाती धरुन वाचल्याशिवाय मजाच येत नाही अशा धारणांचा पुनर्विचार करायला हवा. माहिती, ज्ञान, आनंद मिळवणं हे वाचनाचं उद्दीष्ट असतं. माध्यमानं त्यात अडसर ठरता नये.
तंत्रज्ञानस्नेही आणि त्यात पारंगत असलेल्या नव्या पिढीला याकडे जाणीवपूर्वक नेणं. वाचनाची गोडी लावणं ही आपली जबाबदारी आहे. आतातर जगभरातल्या क्लासिक पुस्तकांचा खजिना, इंटरनेटवर उपलब्ध आहे. विविध संकेतस्थळावर तर अगदी मोफत. बरं, काय वाचावं? कसं वाचावं, नवनवे साहित्यप्रवाह… हे समजवून सांगणारेही इथं आहेत. म्हणजे आधीच्यांनी सकस वाचनाची वाट आपलीआपण खूप कष्टानं शोधली. तो वेळ वाचेल. त्यात आणखी चांगलं वाचता येईल. सध्या व्यक्तिमत्व विकासासह माहितीपर पुस्तकांची मागणी अधिक आहे. या सोबतीनंच जाणीव वाढवणाऱ्या पुस्तकांची रुची निर्माण करणं या व्यवस्थेतल्या धुरीणांचं काम आहे. जग जवळ आणायचं असेल तर “अनुवाद” या बाजूकडे गांभीर्यानं बघायला हवं. जगभरातलं चांगल्या अभिरुचीचं लिखाणं आपल्या भाषेत येणं आणि आपल्याकडलं जगभरात जाणं यासाठी अनुवादाचा मोठ्याप्रमाणावर उपयोग करायला हवा.
पुस्तकांबद्दल बोलताना सोशल मिडियाला वगळून चालायचं नाही. साहित्य प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या आधी खूपच कमी होती. इतरवेळी लिहावं वाटणाऱ्यांचीही मर्यादीत. त्यातून लिहिणाऱ्यांची आणखी कमी. लिहिलं तरी बऱ्याचदा वहीतच जपून राहाण्यापुरतंच शब्दांचं मोल राहायचं. फेसबूकावर, ट्विटरवर विविध लिपी उपलब्ध झाल्या आणि आपल्याच भाषेत बोलायला, सांगायला मिळू लागलं. तिथल्यातिथंल्या बोलचवीनं ती भाषा, म्हणणं समोर येऊ लागलं. लिहिणं जाणीवपूर्वक होऊ लागलं. जगभरातला सामान्य माणूसही लिहू लागला. ते जगभरातल्या सगळ्यांना वाचता येऊ लागलं. सोशल मिडिया खऱ्याअर्थानं वैश्विक पुस्तक झालंय. नवं माध्यम असल्यानं परिपक्व व्हायला वेळ लागतोय पण तरी चांगलं निवडण्याचे कष्ट घ्यायलाच हवेत की आपण.
लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागावी, पुस्तकांची सोबत मजेची वाटावी असे प्रामाणिक प्रयत्न करणारे पालक असतातच. माध्यमांच्या उपलब्धतेची मर्यादा लक्षात घेता आधी ते ठळकपणे जाणवायचं. लहानपणीच्या आठवणीत चांदोबा, चंपक, ठकठक, कुमार, किशोर अशा कैक नियतकालिकांची माळ अनेकांच्या डोळ्यात लुकलुकता दिसते. या रंगीत, कल्पनारम्य, तसंच बोधकथांचा समावेश असलेल्या पुस्तकातून भाषेशी आपसूकच मैत्री व्हायची. अनेक पात्रं मित्र व्हायचे. पुस्तक वाचताना ती गोष्ट मनानंच “बघणं” व्हायचं. त्याचा विचार करताना आपलंच आपल्याशी अधिकचं स्पष्टतेकडे जाणारं “बोलणं” व्हायचं. वाचनातून दृषात्मकता, कल्पनाशक्ती यांचा वापर आणि विकास व्हायचा. त्यापुढली मोठ्या गोष्टींची पुस्तक वाचायची ओढ लागायची. त्याचा दमसास वाढायचा. दर्जेदार, क्लासिक म्हणून गणली जाणारी पुस्तकं हाती आली की वाचताना त्यांचं वेगळेपण जाणवत वाचनाच्या कक्षा वाढू लागायच्या. लक्षात यायंचं किंवा येतं की हाती असलेल्या वेळेत किती “अनुभव” स्वतः घेऊ शकणार आहोत आपण? अशात, वाचनातून लेखकाबरोबर त्याच्या अनुभवांची सहअनुभूती तर घेऊच शकतो की आपण. जग जाणू शकतो. विविध ठिकाणच्या जगण्याच्या रिती, भावभावना यांचा कानोसा घेऊ शकतो. एका जागी बसून वैश्विक होण्याचा प्रयत्न करु शकतो.
बदलत्या काळात काही धारणांबद्दल विचार करण्याची निकड वाटू लागली आहे. सध्याचा हा काळ डिजिटलचा. त्यामुळे पुस्तकंही त्या माध्यमात अधिक उपलब्ध होऊ लागलीत. त्याला कारणं दोन, एक म्हणजे कागदाचा वापर नाही त्यामुळे खर्चात मोठी कपात. स्वस्त पडतं. आणि पर्यावरणाचा विचार करता ते पर्यावरणस्नेही देखील आहे. अशात पुस्तक हाती धरुन वाचल्याशिवाय मजाच येत नाही अशा धारणांचा पुनर्विचार करायला हवा. माहिती, ज्ञान, आनंद मिळवणं हे वाचनाचं उद्दीष्ट असतं. माध्यमानं त्यात अडसर ठरता नये.
तंत्रज्ञानस्नेही आणि त्यात पारंगत असलेल्या नव्या पिढीला याकडे जाणीवपूर्वक नेणं. वाचनाची गोडी लावणं ही आपली जबाबदारी आहे. आतातर जगभरातल्या क्लासिक पुस्तकांचा खजिना, इंटरनेटवर उपलब्ध आहे. विविध संकेतस्थळावर तर अगदी मोफत. बरं, काय वाचावं? कसं वाचावं, नवनवे साहित्यप्रवाह… हे समजवून सांगणारेही इथं आहेत. म्हणजे आधीच्यांनी सकस वाचनाची वाट आपलीआपण खूप कष्टानं शोधली. तो वेळ वाचेल. त्यात आणखी चांगलं वाचता येईल. सध्या व्यक्तिमत्व विकासासह माहितीपर पुस्तकांची मागणी अधिक आहे. या सोबतीनंच जाणीव वाढवणाऱ्या पुस्तकांची रुची निर्माण करणं या व्यवस्थेतल्या धुरीणांचं काम आहे. जग जवळ आणायचं असेल तर “अनुवाद” या बाजूकडे गांभीर्यानं बघायला हवं. जगभरातलं चांगल्या अभिरुचीचं लिखाणं आपल्या भाषेत येणं आणि आपल्याकडलं जगभरात जाणं यासाठी अनुवादाचा मोठ्याप्रमाणावर उपयोग करायला हवा.
पुस्तकांबद्दल बोलताना सोशल मिडियाला वगळून चालायचं नाही. साहित्य प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या आधी खूपच कमी होती. इतरवेळी लिहावं वाटणाऱ्यांचीही मर्यादीत. त्यातून लिहिणाऱ्यांची आणखी कमी. लिहिलं तरी बऱ्याचदा वहीतच जपून राहाण्यापुरतंच शब्दांचं मोल राहायचं. फेसबूकावर, ट्विटरवर विविध लिपी उपलब्ध झाल्या आणि आपल्याच भाषेत बोलायला, सांगायला मिळू लागलं. तिथल्यातिथंल्या बोलचवीनं ती भाषा, म्हणणं समोर येऊ लागलं. लिहिणं जाणीवपूर्वक होऊ लागलं. जगभरातला सामान्य माणूसही लिहू लागला. ते जगभरातल्या सगळ्यांना वाचता येऊ लागलं. सोशल मिडिया खऱ्याअर्थानं वैश्विक पुस्तक झालंय. नवं माध्यम असल्यानं परिपक्व व्हायला वेळ लागतोय पण तरी चांगलं निवडण्याचे कष्ट घ्यायलाच हवेत की आपण.