बॉलीवुडच्या ख्यातनाम नृत्य दिग्दर्शिका श्रीमती सरोज खान यांनी कास्टिंग काऊच बाबत नुकतेच एक खळबळजनक विधान केलेले आहे. उन्नाव, कठुआ आणि देशभरात होत असलेल्या स्त्री अत्याचारांबाबत जनमानस संतप्त असतांना श्रीमती सरोज खान यांचे वक्तव्य आगीत तेल ओतण्यासारखे आहे. आपल्या वक्तव्याच्या स्पष्टीकरणात, समर्थनात त्यांनी जे काही अकलेचे तारे तोडले आहेत; ते पाहता स्त्री हीच स्त्रीची सर्वात मोठी शत्रू असते याची खात्री पटते. परंपरा किंवा जुन्या चालीरितीच्या नावावर सुरू असलेल्या घाणेरड्या कृत्याचे निर्लज्ज समर्थन करून श्रीमती सरोज खान यांनी तमाम स्त्रीजातीचा अपमान केलेला आहे.
झाले काय तर बॉलीवुडच्या ए टू झेड तारकांना आपल्या बोटावर “रोज रोज” थिरकवणाऱ्या श्रीमती स’रोज’ खान यांनी बॉलीवुडच्या कास्टिंग काऊचचे विदारक सत्य सर्वांसमोर उघड केले. सोबतच हा किळसवाणा प्रकार बाबा आदमच्या जमान्यापासून सुरू असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. शिवाय केवळ बॉलीवुडच नव्हे; तर सरकारदरबारी आणि इतरत्रसुद्धा हा प्रकार राजेरोसपणे चालत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मग असे सर्वत्र कास्टिंग काऊच सुरू असतांना केवळ एकट्या बॉलीवुडलाच का टारगेट करता; असा त्यांचा सवाल आहे. बॉलीवुडच्या कास्टिंग काऊचची तरफदारी करतांना त्यांनी जे दाखले दिले; ते अत्यंत संतापजनक आहेत. काय म्हणे तर बॉलीवुडच्या कास्टिंग काऊचच्या बदल्यात रोजीरोटी मिळते. काय म्हणावे ह्या निर्लज्जपणाला? सरकारसारखे बॉलीवुड अत्याचार करून त्यांना मोकळे न सोडता त्यांच्या उपजिविकेची संधी प्रदान करत असते असे त्यांचे म्हणणे आहे.
खरेतर कोणतीही सुज्ञ व्यक्ती अशा घृणास्पद कृत्याचे कदापी समर्थन करणारच नाही. शिवाय एखाद्या बॉलीवुड सेलेब्रिटीचे स्टेटस असलेल्या श्रीमती सरोज खान यांनी याविरोधात तोंड उघडले असते; तर नक्कीच सर्व स्तरातून त्याचे स्वागत झाले असते. बाबा आदमच्या काळाची प्रथा आहे म्हणून ती आपण पुढे नेलीच पाहिजे असा अट्टहास कशासाठी? शिवाय देशात सर्वत्र दिवसेंदिवस स्त्रियांवरील अत्याचाराने परिसीमा गाठली असतांना प्रवाहाविरुद्ध जाऊन श्रीमती सरोज खान यांनी आघाडी उघडली असती तर तमाम महिलावर्गासाठी तो सोनियाचा दिवस ठरला असता.
इकडे अंगावर एकदोन चिंध्या पांघरायच्या आणि तिकडे हातात खर्डे पकडून ‘जस्टिस फॉर ….’चे नाटक केल्याने खरोखरच ह्या देशातल्या पिडितांना न्याय मिळेल काय? बॉलीवुड उक्ती आणि कृतीमध्ये ताळमेळ कधी साधणार? खुद्द बॉलीवुडमध्ये अनेकजणी कास्टिंग काऊचला बळी पडत असतांना त्याविरुद्ध मूग गिळून गप्प बसणाऱ्या अभिनेत्री निव्वळ चमकोगिरीसाठी काही घटनांत आवाज उठवतांना पाहून आश्चर्य वाटते. अगदी काहीच दिवसांपूर्वी वयाची पन्नाशी ओलांडलेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीने ती बालकलाकार असतांना तिचे लैंगिक शोषण झाल्याची दुर्दैवी कबुली दिली होती. यामुळेच बॉलीवुडमध्ये इतका काळ घालवलेल्या श्रीमती सरोज खान आणि त्यांच्या सारख्यांनी वेळेवरच ह्या कुप्रथेविरूद्ध आवाज उठवला असता तर कित्येकींचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचले असते.
श्रीमती सरोज खान यांच्या दुर्दैवी वक्तव्याला काही काळ उलटायच्या आतच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती रेणुका चौधरी यांनी सुद्धा राजकारणातही असले दुष्ट प्रकार होत असल्याची कबुली दिली. वास्तविकतः लिंगपिसाटांना ना काळवेळ ना कोणत्या जागेचे काही सोयरसुतक असते. यत्रतत्रसर्वत्र ह्या नरराक्षसांनी धुमाकूळ घातला असतांना कायदा, सुव्यवस्था आणि न्यायसंस्थेची चांगलीच दमछाक होत आहे. श्रीमती सरोज खान असो, की श्रीमती रेणुका चौधरी ह्या दोघीही आपापल्या क्षेत्रात ज्येष्ठ आहेत, त्यांच्या शब्दाला किंमत आहे, त्या दोघीही ह्या विषयाबाबत अधिकारवाणीने बोलू शकतात. मात्र कास्टिंग काऊचसारख्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर निव्वळ शब्दांचे बुडबुडे उडविण्यापेक्षा काहीतरी ठोस कृती किंवा पावले उचलली असती तर ते जास्त योग्य झाले असते आणि संयुक्तिक ठरले असते. श्रीमती सरोज खान यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी जरूर मागितली. परंतु एकदा सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेले शब्द माघारी घेणे केवळ अशक्य असते. मुख्य म्हणजे एखादी कुप्रथा किंवा वाईट चालीरीती बंद करतो म्हटले तर ते कठीण नसतेच. फक्त गरज असते ती दृढनिश्चयाची आणि प्रामाणिक प्रयत्नांची.
कौन कहता है, आसमां में सुराग नहीं हो सकता
बस एक पत्थर तबियत से उछालों तो यारों…
शेवटी काय; तर अशाच सिलेक्टीव्ह चूप राहण्याने लिंगपिसाटांचे फावते आणि बॉलीवुडचे कलाकार असोत; की निरागस बालिका, ह्या कळत-नकळत बळी पडतात.
झाले काय तर बॉलीवुडच्या ए टू झेड तारकांना आपल्या बोटावर “रोज रोज” थिरकवणाऱ्या श्रीमती स’रोज’ खान यांनी बॉलीवुडच्या कास्टिंग काऊचचे विदारक सत्य सर्वांसमोर उघड केले. सोबतच हा किळसवाणा प्रकार बाबा आदमच्या जमान्यापासून सुरू असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. शिवाय केवळ बॉलीवुडच नव्हे; तर सरकारदरबारी आणि इतरत्रसुद्धा हा प्रकार राजेरोसपणे चालत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मग असे सर्वत्र कास्टिंग काऊच सुरू असतांना केवळ एकट्या बॉलीवुडलाच का टारगेट करता; असा त्यांचा सवाल आहे. बॉलीवुडच्या कास्टिंग काऊचची तरफदारी करतांना त्यांनी जे दाखले दिले; ते अत्यंत संतापजनक आहेत. काय म्हणे तर बॉलीवुडच्या कास्टिंग काऊचच्या बदल्यात रोजीरोटी मिळते. काय म्हणावे ह्या निर्लज्जपणाला? सरकारसारखे बॉलीवुड अत्याचार करून त्यांना मोकळे न सोडता त्यांच्या उपजिविकेची संधी प्रदान करत असते असे त्यांचे म्हणणे आहे.
खरेतर कोणतीही सुज्ञ व्यक्ती अशा घृणास्पद कृत्याचे कदापी समर्थन करणारच नाही. शिवाय एखाद्या बॉलीवुड सेलेब्रिटीचे स्टेटस असलेल्या श्रीमती सरोज खान यांनी याविरोधात तोंड उघडले असते; तर नक्कीच सर्व स्तरातून त्याचे स्वागत झाले असते. बाबा आदमच्या काळाची प्रथा आहे म्हणून ती आपण पुढे नेलीच पाहिजे असा अट्टहास कशासाठी? शिवाय देशात सर्वत्र दिवसेंदिवस स्त्रियांवरील अत्याचाराने परिसीमा गाठली असतांना प्रवाहाविरुद्ध जाऊन श्रीमती सरोज खान यांनी आघाडी उघडली असती तर तमाम महिलावर्गासाठी तो सोनियाचा दिवस ठरला असता.
इकडे अंगावर एकदोन चिंध्या पांघरायच्या आणि तिकडे हातात खर्डे पकडून ‘जस्टिस फॉर ….’चे नाटक केल्याने खरोखरच ह्या देशातल्या पिडितांना न्याय मिळेल काय? बॉलीवुड उक्ती आणि कृतीमध्ये ताळमेळ कधी साधणार? खुद्द बॉलीवुडमध्ये अनेकजणी कास्टिंग काऊचला बळी पडत असतांना त्याविरुद्ध मूग गिळून गप्प बसणाऱ्या अभिनेत्री निव्वळ चमकोगिरीसाठी काही घटनांत आवाज उठवतांना पाहून आश्चर्य वाटते. अगदी काहीच दिवसांपूर्वी वयाची पन्नाशी ओलांडलेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीने ती बालकलाकार असतांना तिचे लैंगिक शोषण झाल्याची दुर्दैवी कबुली दिली होती. यामुळेच बॉलीवुडमध्ये इतका काळ घालवलेल्या श्रीमती सरोज खान आणि त्यांच्या सारख्यांनी वेळेवरच ह्या कुप्रथेविरूद्ध आवाज उठवला असता तर कित्येकींचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचले असते.
श्रीमती सरोज खान यांच्या दुर्दैवी वक्तव्याला काही काळ उलटायच्या आतच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती रेणुका चौधरी यांनी सुद्धा राजकारणातही असले दुष्ट प्रकार होत असल्याची कबुली दिली. वास्तविकतः लिंगपिसाटांना ना काळवेळ ना कोणत्या जागेचे काही सोयरसुतक असते. यत्रतत्रसर्वत्र ह्या नरराक्षसांनी धुमाकूळ घातला असतांना कायदा, सुव्यवस्था आणि न्यायसंस्थेची चांगलीच दमछाक होत आहे. श्रीमती सरोज खान असो, की श्रीमती रेणुका चौधरी ह्या दोघीही आपापल्या क्षेत्रात ज्येष्ठ आहेत, त्यांच्या शब्दाला किंमत आहे, त्या दोघीही ह्या विषयाबाबत अधिकारवाणीने बोलू शकतात. मात्र कास्टिंग काऊचसारख्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर निव्वळ शब्दांचे बुडबुडे उडविण्यापेक्षा काहीतरी ठोस कृती किंवा पावले उचलली असती तर ते जास्त योग्य झाले असते आणि संयुक्तिक ठरले असते. श्रीमती सरोज खान यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी जरूर मागितली. परंतु एकदा सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेले शब्द माघारी घेणे केवळ अशक्य असते. मुख्य म्हणजे एखादी कुप्रथा किंवा वाईट चालीरीती बंद करतो म्हटले तर ते कठीण नसतेच. फक्त गरज असते ती दृढनिश्चयाची आणि प्रामाणिक प्रयत्नांची.
कौन कहता है, आसमां में सुराग नहीं हो सकता
बस एक पत्थर तबियत से उछालों तो यारों…
शेवटी काय; तर अशाच सिलेक्टीव्ह चूप राहण्याने लिंगपिसाटांचे फावते आणि बॉलीवुडचे कलाकार असोत; की निरागस बालिका, ह्या कळत-नकळत बळी पडतात.
(लेखक बीएएमएस, एमडी असून, भाजपाच्या वैद्यकीय आघाडी-नागपूर जिल्हा(ग्रामीण)चे महामंत्री म्हणून कार्यरत आहेत.)