आता काही दिवसांतच दहावी-बारावीचे निकाल जाहीर होतील. जे विद्यार्थी चांगली टक्केवारी मिळवून उत्तीर्ण होतील त्यांचे सर्वत्र तोंडभरून कौतुक होईल. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप अडचण येणार नाही. ज्यांना अपेक्षेपेक्षा कमी टक्के मिळतील त्यांना चांगल्या कॉलेजात व अपेक्षित कोर्सच्या प्रवेशासाठी धावपळ करावी लागेल. जे अगदीच जेमतेम पास झाले आहेत त्यांना मात्र नक्की काय करावे याचे कोडे सुटत नाही. विशेषकरून गरीब घरातील मुलांना कमी टक्केवारी, जेमतेम पास झाल्यामुळे पुढील शिक्षणात रस असला तरी संधी मिळत नाही आणि नोकरी करून शिकण्याची इच्छा असते पण नोकरीही मिळत नाही. आयटीआय-तंत्रशिक्षण हा एक पर्याय त्यांच्या समोर असतो. पण तेथेही प्रवेश, फी, ओळख आणि पुरेशी माहिती नसल्यामुळे नक्की काय करायचे आहे ते ठरवता येत नाही. लवकरात लवकर कुठे तरी नोकरी मिळवणे हा एकच विचार त्यांच्या मनात असतो पण तुटपुंज्या पगाराची नोकरी मिळणेही आजकाल अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे इच्छा खूप आहे पण अडचणींवर मात कशी करायची ह्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन मिळत नाही.
दुसरीकडे आज विविध माध्यमांतून जसे की वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, वेगवेगळ्या संस्थांचे मार्गदर्शन विषयक पेपर्स, पोस्टर्स, माहितिपत्रके, रेडिओ वरील जाहिराती, उपदेश चर्चा, प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम, वेगवेगळ्या दूरदर्शन वाहिन्यांवरील असेच ‘भविष्यातील संधी व करीअर’ ह्या बाबतीतील मार्गदर्शनासाठी अनेक प्रायोजित कार्यक्रम, सेमिनार्स, वैयक्तिक समुपदेशन, आयक्यू चाचण्या, आंतरजालावरील वेगवेगळ्या जाहिराती आणि माहितीच्या संकेतस्थळांच्या links, वेगवेगळ्या संस्थांचे शिका आणि कमवा असे सुचवणारे जाहिरात फलक ह्या साऱ्यातून माहितीचा पूर आलेला दिसतो.
ह्या साऱ्यामध्ये गोंधळ अधिक व निर्णय कमी अशी परिस्थिती होऊन जाते. ‘दात आहेत तर चणे नाही…’ ह्या म्हणीप्रमाणे काहीतरी राहून जाते आणि ‘आखूड शिंगी, पण बहुगुणी’ असे काही शोधण्याच्या नादात करायचे असते एक पण होते दुसरेच असे काहीसे होऊन बसते. वेळ, श्रम व पैसा पुन्हा एकदा वाया जातात आणि मनस्ताप होतो तो वेगळाच. हे सारे बिलकुल परवडणारे नसते. त्यातून अधिकच नैराश्य येते आणि प्रश्नांचा गुंता वाढत जातो.
यावर उपाय काय? तर आत्ता जेव्हा निकाल येण्यासाठी वेळ आहे तेव्हाच आपल्या भविष्यातील योजनांबाबत थोडे व वस्तुनिष्ठपणे नियोजन करा. प्लॅन ए व प्लॅन बी, जरूरी वाटल्यास प्लॅन सी असे पर्याय समोर, शक्य झाल्यास कागदावर मांडून त्यावर विचार करा. अगदी अचूक असे काही नसते. प्रत्येकाच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार मतमतांतरे असतात. त्यामुळे योग्य अयोग्य असा विचार न करता, काय काय शक्य आहे त्यातील अधिक-उण्या शक्यतांचा ताळेबंद करून त्याबाबत आपले आईवडील, पालक, शिक्षक, मार्गदर्शक, शिक्षक, ज्येष्ठ व अनुभवी मित्र, समुपदेशक, सल्लागार, माहितीतज्ज्ञ, समवयस्क मित्रमैत्रिणी यांच्याशी चर्चा करा.
SWOT अशी इंग्रजी मध्ये एक संज्ञा आहे. Strengths म्हणजे आपल्यातील उत्तम क्षमता, Weakness म्हणजे आपल्यातील कमतरता, Opportunities म्हणजे प्लॅन्स A, B अथवा C प्रमाणे पुढे उपलब्ध असणाऱ्या संधी आणि Threats म्हणजे ज्या कारणांमुळे धोके निर्माण होऊ शकतात त्यांची पूर्व चाचपणी, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण घेणार असलेले निर्णय यांचा आलेखच कागदावर मांडा. शक्य असल्यास प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन माहिती घ्या. माहिती नीट समजून घ्या, न समजल्यास पुन्हा प्रश्न विचारण्यात कमीपणा वाटू देऊ नका. आपल्यासाठी वेळ देणे ही आपल्या भविष्यासाठीची गुंतवणूक आहे असे समजा. कुठल्याही सांगोवांगी कानावर आलेल्या माहितीची खातरजमा करा. ह्या सगळ्यामुळे आत्मविश्वासाने ठामपणे निर्णय पक्का करणे शक्य होईल. कदाचित मनासारखे निकाल नाहीच मिळाले तर खचून न जाता वेगवेगळ्या प्लॅन्सवर चटकन अंमलबजावणी करणे शक्य होईल. निर्णय घेणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे यात ‘वेळ’ हा खूप महत्त्वाचा घटक आहे, जो आपण आधीपासूनच दिला तर ऐनवेळी होणारी फसगत टाळण्यात मदत होऊ शकते.
दुसरीकडे आज विविध माध्यमांतून जसे की वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, वेगवेगळ्या संस्थांचे मार्गदर्शन विषयक पेपर्स, पोस्टर्स, माहितिपत्रके, रेडिओ वरील जाहिराती, उपदेश चर्चा, प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम, वेगवेगळ्या दूरदर्शन वाहिन्यांवरील असेच ‘भविष्यातील संधी व करीअर’ ह्या बाबतीतील मार्गदर्शनासाठी अनेक प्रायोजित कार्यक्रम, सेमिनार्स, वैयक्तिक समुपदेशन, आयक्यू चाचण्या, आंतरजालावरील वेगवेगळ्या जाहिराती आणि माहितीच्या संकेतस्थळांच्या links, वेगवेगळ्या संस्थांचे शिका आणि कमवा असे सुचवणारे जाहिरात फलक ह्या साऱ्यातून माहितीचा पूर आलेला दिसतो.
ह्या साऱ्यामध्ये गोंधळ अधिक व निर्णय कमी अशी परिस्थिती होऊन जाते. ‘दात आहेत तर चणे नाही…’ ह्या म्हणीप्रमाणे काहीतरी राहून जाते आणि ‘आखूड शिंगी, पण बहुगुणी’ असे काही शोधण्याच्या नादात करायचे असते एक पण होते दुसरेच असे काहीसे होऊन बसते. वेळ, श्रम व पैसा पुन्हा एकदा वाया जातात आणि मनस्ताप होतो तो वेगळाच. हे सारे बिलकुल परवडणारे नसते. त्यातून अधिकच नैराश्य येते आणि प्रश्नांचा गुंता वाढत जातो.
यावर उपाय काय? तर आत्ता जेव्हा निकाल येण्यासाठी वेळ आहे तेव्हाच आपल्या भविष्यातील योजनांबाबत थोडे व वस्तुनिष्ठपणे नियोजन करा. प्लॅन ए व प्लॅन बी, जरूरी वाटल्यास प्लॅन सी असे पर्याय समोर, शक्य झाल्यास कागदावर मांडून त्यावर विचार करा. अगदी अचूक असे काही नसते. प्रत्येकाच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार मतमतांतरे असतात. त्यामुळे योग्य अयोग्य असा विचार न करता, काय काय शक्य आहे त्यातील अधिक-उण्या शक्यतांचा ताळेबंद करून त्याबाबत आपले आईवडील, पालक, शिक्षक, मार्गदर्शक, शिक्षक, ज्येष्ठ व अनुभवी मित्र, समुपदेशक, सल्लागार, माहितीतज्ज्ञ, समवयस्क मित्रमैत्रिणी यांच्याशी चर्चा करा.
SWOT अशी इंग्रजी मध्ये एक संज्ञा आहे. Strengths म्हणजे आपल्यातील उत्तम क्षमता, Weakness म्हणजे आपल्यातील कमतरता, Opportunities म्हणजे प्लॅन्स A, B अथवा C प्रमाणे पुढे उपलब्ध असणाऱ्या संधी आणि Threats म्हणजे ज्या कारणांमुळे धोके निर्माण होऊ शकतात त्यांची पूर्व चाचपणी, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण घेणार असलेले निर्णय यांचा आलेखच कागदावर मांडा. शक्य असल्यास प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन माहिती घ्या. माहिती नीट समजून घ्या, न समजल्यास पुन्हा प्रश्न विचारण्यात कमीपणा वाटू देऊ नका. आपल्यासाठी वेळ देणे ही आपल्या भविष्यासाठीची गुंतवणूक आहे असे समजा. कुठल्याही सांगोवांगी कानावर आलेल्या माहितीची खातरजमा करा. ह्या सगळ्यामुळे आत्मविश्वासाने ठामपणे निर्णय पक्का करणे शक्य होईल. कदाचित मनासारखे निकाल नाहीच मिळाले तर खचून न जाता वेगवेगळ्या प्लॅन्सवर चटकन अंमलबजावणी करणे शक्य होईल. निर्णय घेणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे यात ‘वेळ’ हा खूप महत्त्वाचा घटक आहे, जो आपण आधीपासूनच दिला तर ऐनवेळी होणारी फसगत टाळण्यात मदत होऊ शकते.