जल. सर्व विश्वाला व्यापून राहिलेले पंचमहाभूतांतील एक तत्त्व. आपल्या रोजच्या जगण्यातील ‘जीवन’. जल म्हटले की त्याच्याशी संबंधित स्रोत, संचय, संपदा, संधारण, सिंचन, संरक्षण, स्वच्छता, साक्षरता, व्यवस्थापन, गुणवत्ता, पुनर्भरण, पुनर्वापर, पुरवठा अश्या अनेक बाबींची आठवण होते आणि महत्त्वाचे म्हणजे यातील प्रत्येक स्वतंत्र बाब ही इतर उरलेल्या बाबींइतकीच महत्त्वाची असते. संजीवनी मंत्राप्रमाणे.
माझे एक काका नेहमी म्हणायचे, पाणी कधीही नष्ट होत नाही, पण ते आपले रूप बदलते. पाण्याची वाफ होते, वाफेतून ढग तयार होतात, ढगांतून पाऊस पडतो, ते जल वेगवेगळ्या मार्गातून प्रवाही बनून वाहते, वाटेत येणाऱ्या प्रत्येक खाच-खळग्यांना भरून तृप्त करून पुढे जाते. ओहळ, झरे, नदी, नाले, विहिरी, तलाव, धबधबे यातून पुढे सरकत ते समुद्राला जाऊन मिळते. ह्या प्रवासात कधीतरी ते जमिनीत जिरते, पुन्हा उगम पावते. झाडे, वृक्ष, वेली, पाने इतर जलपर्णी पाणी शोषून घेतात व पुन्हा निसर्गात सोडतात. प्राणी, पशु-पक्षी, मानवादी जीवजंतू पाणी प्राशन करतात व पुन्हा निसर्गात सोडतात. अंतिमतः ते जल पुन्हा पाणी अथवा वाफ बनून निसर्गात सामील होते. हे जलचक्र आहे आणि ह्या चक्रामुळे, ह्या पृथ्वीवर जीवनचक्र आहे. म्हणजेच ह्या जीवनचक्राचे अस्तित्व याच जलचक्रामुळे आहे. ह्या जलचक्राच्या कोणत्याही एका टप्प्यावर ते थांबले अथवा नष्ट झाले तर संपूर्ण जीवनचक्रसुद्धा नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जेव्हा आपण वृक्ष, जंगले तोडून त्याठिकाणी सिमेंटची जंगले उभी करतो तेव्हा ह्या जलचक्राला आपण नष्टच करीत आहोत आणि ह्या जीवनचक्रालाही.
वर उल्लेख केलेल्या बाबींचा क्रम आपण लक्षात घेतला तर जलासंबंधी एक अनोखी साखळी आपल्याला दिसून येते. जलस्रोत, त्याचा संचय, त्याची संपदा म्हणून घेतलेली काळजी, त्याचे केलेले ‘योग्य धारण’, त्याचे सिंचन, त्याचे संरक्षण, त्याची स्वच्छता, त्याविषयीची साक्षरता, त्याचे व्यवस्थापन, त्याची जपली जाणारी गुणवत्ता, त्याची पुनर्भरण, पुनर्वापर आणि पुरवठा. ह्या सगळ्या गोष्टींवर specialization म्हणजेच विशेषज्ञता अथवा विशेष ज्ञान असणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे यातील प्रत्येक बाबीला आपण सांभाळू शकतो. परंतु दुर्दैवाने असे दिसून येते की, आपण ह्या सर्व बाबी तर सोडाच पण दैनंदिन जीवनातील पाण्याच्या बाबतीतही अतिशय निष्काळजीपणा दाखवतो. त्याचेच परिमाण आता मानव हळूहळू भोगत आहे. पण तरीही दुर्लक्षच करीत आहे. निसर्गतः उपलब्ध असलेले पाणी आज पिण्यासाठी आपण बाटलीबंद स्वरूपात विकत घेत आहोत. ह्या नैसर्गिक संपदेवर मालकी हक्क दाखवीत भविष्यात वैश्विक युद्ध होण्याचे अंदाज सुद्धा आपण वाचत असतोच पण आपण आपली जबाबदारी पार पडतोय का याचा क्षणभरही विचार करीत नाहीत.
पुरेसा पाऊस पडूनही दुष्काळाचा प्रश्न दरवर्षी आ वासून उभा राहतोच आहे. त्याचवेळी लाखो लिटर पिण्यायोग्य, वापर करण्यायोग्य पाणी आपण वाया घालवत असतोच. जलाशय, जलसाठे, बांध-बंधारे, धरणे यांचे नियोजन, निर्माण व व्यवस्थापन हा येणाऱ्या काळातील एक महत्त्वाचा मुद्दा तर आहेच पण रोजच्या वापरातील जल साक्षरता आणि बचत ही तितकीच महत्त्वाची आहे; हे ह्या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते. अनेक स्वयंसेवी संस्था आपापल्या परीने पाणी प्रश्नावर लोकोपयोगी कामे लोकसहभागांतून करीत आहेतच पण आपण एक माणूस म्हणून वैयत्तिक पातळीवर काय करू शकतो याचा विचार करणे हे अतिशय गरजेचे आहे. आज निसर्गातून अर्धा भांडे पाणी तरी मी निर्माण करू शकत नसलो तरी अर्धा भांडे पाणी जरूर वाचवू शकतो, जिथे जलाची काळजी घेतली जात आहे, निसर्गाची काळजी घेतली जात आहे त्या लोकोपयोगी प्रकल्पात मी माझ्यापरीने सहभाग नोंदवू शकतो ही विचारसरणी रुजली जाणे महत्त्वाचे आहे.
आता ह्या ठिकाणी काहीजण हे पाणी बचतीचे उपदेश मोठ्यामोठ्या शहरातील व्यावसायिक वापरकर्त्यांना द्या, कंपन्या, हॉटेल्स, ऑफिसेस, रिसॉर्ट्स, मनोरंजनाची ठिकाणे, पंचतारांकित वास्तू, अति व नव-श्रीमंत लोकांना द्या असे मला सांगतील, याची मला जाणीव आहे. परंतु ‘आधी केले, मग सांगितले’ ह्या उक्तीनुसार चालणारी माणसे असा विचार करणार नाहीत. तसेच सामूहिक जबाबदारी, सामाजिक जवाबदारी समजून वागणारी माणसे ह्या साऱ्याचे भान जरूर बाळगत असतील, असे मी मानतो. दुर्दैवाने जर असे भान ते बाळगत नसतील तर आता हीच वेळ आहे की त्यांना ह्या जबाबदारीचे भान लक्षात आणून दिले गेले पाहिजे. त्यासाठी ही जलमोहीम लोकचळवळ बनली पाहिजे. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ ह्या दोन्ही समाजामध्ये जी दरी वाढत चालली आहे ती मिटवण्यासाठी आपण कोणती भूमिका आपल्या वैयक्तिक आणि सामुदायिक पातळीवर पार पडणार आहोत याचा जरूर विचार व्हावा, ह्यासाठी हा लेखप्रपंच!
चला, ‘जीवना’ची जाणीव देऊ या!
माझे एक काका नेहमी म्हणायचे, पाणी कधीही नष्ट होत नाही, पण ते आपले रूप बदलते. पाण्याची वाफ होते, वाफेतून ढग तयार होतात, ढगांतून पाऊस पडतो, ते जल वेगवेगळ्या मार्गातून प्रवाही बनून वाहते, वाटेत येणाऱ्या प्रत्येक खाच-खळग्यांना भरून तृप्त करून पुढे जाते. ओहळ, झरे, नदी, नाले, विहिरी, तलाव, धबधबे यातून पुढे सरकत ते समुद्राला जाऊन मिळते. ह्या प्रवासात कधीतरी ते जमिनीत जिरते, पुन्हा उगम पावते. झाडे, वृक्ष, वेली, पाने इतर जलपर्णी पाणी शोषून घेतात व पुन्हा निसर्गात सोडतात. प्राणी, पशु-पक्षी, मानवादी जीवजंतू पाणी प्राशन करतात व पुन्हा निसर्गात सोडतात. अंतिमतः ते जल पुन्हा पाणी अथवा वाफ बनून निसर्गात सामील होते. हे जलचक्र आहे आणि ह्या चक्रामुळे, ह्या पृथ्वीवर जीवनचक्र आहे. म्हणजेच ह्या जीवनचक्राचे अस्तित्व याच जलचक्रामुळे आहे. ह्या जलचक्राच्या कोणत्याही एका टप्प्यावर ते थांबले अथवा नष्ट झाले तर संपूर्ण जीवनचक्रसुद्धा नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जेव्हा आपण वृक्ष, जंगले तोडून त्याठिकाणी सिमेंटची जंगले उभी करतो तेव्हा ह्या जलचक्राला आपण नष्टच करीत आहोत आणि ह्या जीवनचक्रालाही.
वर उल्लेख केलेल्या बाबींचा क्रम आपण लक्षात घेतला तर जलासंबंधी एक अनोखी साखळी आपल्याला दिसून येते. जलस्रोत, त्याचा संचय, त्याची संपदा म्हणून घेतलेली काळजी, त्याचे केलेले ‘योग्य धारण’, त्याचे सिंचन, त्याचे संरक्षण, त्याची स्वच्छता, त्याविषयीची साक्षरता, त्याचे व्यवस्थापन, त्याची जपली जाणारी गुणवत्ता, त्याची पुनर्भरण, पुनर्वापर आणि पुरवठा. ह्या सगळ्या गोष्टींवर specialization म्हणजेच विशेषज्ञता अथवा विशेष ज्ञान असणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे यातील प्रत्येक बाबीला आपण सांभाळू शकतो. परंतु दुर्दैवाने असे दिसून येते की, आपण ह्या सर्व बाबी तर सोडाच पण दैनंदिन जीवनातील पाण्याच्या बाबतीतही अतिशय निष्काळजीपणा दाखवतो. त्याचेच परिमाण आता मानव हळूहळू भोगत आहे. पण तरीही दुर्लक्षच करीत आहे. निसर्गतः उपलब्ध असलेले पाणी आज पिण्यासाठी आपण बाटलीबंद स्वरूपात विकत घेत आहोत. ह्या नैसर्गिक संपदेवर मालकी हक्क दाखवीत भविष्यात वैश्विक युद्ध होण्याचे अंदाज सुद्धा आपण वाचत असतोच पण आपण आपली जबाबदारी पार पडतोय का याचा क्षणभरही विचार करीत नाहीत.
पुरेसा पाऊस पडूनही दुष्काळाचा प्रश्न दरवर्षी आ वासून उभा राहतोच आहे. त्याचवेळी लाखो लिटर पिण्यायोग्य, वापर करण्यायोग्य पाणी आपण वाया घालवत असतोच. जलाशय, जलसाठे, बांध-बंधारे, धरणे यांचे नियोजन, निर्माण व व्यवस्थापन हा येणाऱ्या काळातील एक महत्त्वाचा मुद्दा तर आहेच पण रोजच्या वापरातील जल साक्षरता आणि बचत ही तितकीच महत्त्वाची आहे; हे ह्या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते. अनेक स्वयंसेवी संस्था आपापल्या परीने पाणी प्रश्नावर लोकोपयोगी कामे लोकसहभागांतून करीत आहेतच पण आपण एक माणूस म्हणून वैयत्तिक पातळीवर काय करू शकतो याचा विचार करणे हे अतिशय गरजेचे आहे. आज निसर्गातून अर्धा भांडे पाणी तरी मी निर्माण करू शकत नसलो तरी अर्धा भांडे पाणी जरूर वाचवू शकतो, जिथे जलाची काळजी घेतली जात आहे, निसर्गाची काळजी घेतली जात आहे त्या लोकोपयोगी प्रकल्पात मी माझ्यापरीने सहभाग नोंदवू शकतो ही विचारसरणी रुजली जाणे महत्त्वाचे आहे.
आता ह्या ठिकाणी काहीजण हे पाणी बचतीचे उपदेश मोठ्यामोठ्या शहरातील व्यावसायिक वापरकर्त्यांना द्या, कंपन्या, हॉटेल्स, ऑफिसेस, रिसॉर्ट्स, मनोरंजनाची ठिकाणे, पंचतारांकित वास्तू, अति व नव-श्रीमंत लोकांना द्या असे मला सांगतील, याची मला जाणीव आहे. परंतु ‘आधी केले, मग सांगितले’ ह्या उक्तीनुसार चालणारी माणसे असा विचार करणार नाहीत. तसेच सामूहिक जबाबदारी, सामाजिक जवाबदारी समजून वागणारी माणसे ह्या साऱ्याचे भान जरूर बाळगत असतील, असे मी मानतो. दुर्दैवाने जर असे भान ते बाळगत नसतील तर आता हीच वेळ आहे की त्यांना ह्या जबाबदारीचे भान लक्षात आणून दिले गेले पाहिजे. त्यासाठी ही जलमोहीम लोकचळवळ बनली पाहिजे. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ ह्या दोन्ही समाजामध्ये जी दरी वाढत चालली आहे ती मिटवण्यासाठी आपण कोणती भूमिका आपल्या वैयक्तिक आणि सामुदायिक पातळीवर पार पडणार आहोत याचा जरूर विचार व्हावा, ह्यासाठी हा लेखप्रपंच!
चला, ‘जीवना’ची जाणीव देऊ या!
1 Comment
नक्कीच पाणी जपून वापरने आता काळाची गरज बनली आहे ,आणि हे सर्वाना कळतय पण वळत नाही .हीच तर सर्वात मोठी खंत आहे.