दाक्षिणात्य सिनेमात पाऊस हा एक व्यक्तिरेखा म्हणून वावरत असते. हिंदी सिनेमातल्यासारखे मात्र पाऊस झुळझुळीत आरस्पानी सौंदर्य ह्याचा अनुभव देणारा असतो. तसेच काही ह्या मुंबईच्या पावसाबाबत म्हणता येईल. सुरुवातीला तो हिंदी सिनेमातल्या सारखा असतो तर नंतर तो दक्षिणेतल्या सिनेमातल्या सारखा अंगावर येणारा असतो. पावसाची ही दोन रूपे मुंबईलाही दोन रूपे देतात. स्वप्नातली मायानगरी मुंबई आणि घाणीचे लोंढे वाहून नेणारी मुंबई. दोन्हीतले एक रूप हवेहवेस तर दुसरे नकोसे. तरीही पहिल्या पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा तितकीच हुरहुर लावते, हे मात्र निश्चित.
सोचो जरा… मेरे यारा,
बादल वो आये… हाये, गर्मी बढाये… हाये
पाने भी लाये… हाये, उस की मर्जी
गुलजार यांच्या गाण्यातल्या या ओळी आपल्याला पावसाच्या ढगांचे रंगढंग कसे हतबल करतात ह्याचे वर्णन करतात. मळभ दाटून आले की, पाऊस येणार याची दवंडी पिटणारे ढग अक्षरशः अनेकदा आपली दिशाभूल करत राहतात. ‘आला आला रे’… म्हणावे अशी स्थिती असताना अचानक ढग स्वच्छ होऊन पांगापांग करतात. मग ‘येरे येरे पावसा’…ची मनधरणी करायला लागते. खरे तर पाऊस आपल्याला त्याच्या मर्जीने वागायला भाग पाडतो. पावसाची प्रतीक्षा फक्त चातकच नाही तर जमिनीवरच्या प्रत्येक सजीवाला त्याची आस असते. मग तो हाडामासांचा माणूस असो नाही तर निष्पर्ण वृक्ष. त्यामुळेच इतर कोणत्याही ऋतूपेक्षा पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा प्रचंड उत्सुकता वाटायला लावणारी असते.
पाण्यामुळे चित्तवृत्ती प्रफुल्लीत होत असल्यानेच प्रत्येकाला पावसाची कमालीची आस असते. पावसाच्या रूपाने अंगावर पाण्याचे थेंब थेट पडल्याने प्रसन्न वाटण्याची शास्त्रीय कारणे काही का असेनात पण पाऊस यावा, असे वाटण्याची कारणे मात्र प्रत्येकाच्या स्वभावानुरूप बदलत असतात. तशी आस धरणीला असे वाटणे ही कवीकल्पना असली तर त्यात तथ्य असावे असे वाटण्यालाही जागा आहे. त्याचे कारण म्हणजे पाऊस पडताच धरणीमाता अशी काही सुगंधित होते की जणू एखाद्याच्या प्रेमाने गंधित होऊन जावे. उन्हाच्या तडाख्याने तडकलेल्या जमिनीवर पहिल्या पावसाचे थेंब पडताच सगळा परिसर जणू उत्फुलतेने नाचायला लागतो.
सात जून म्हटले की पाऊस येणार, हे कधीच चुकणारे नव्हते. तेव्हा त्याची अशी वाट पहायला लागत नव्हती. पण गेल्या काही वर्षांत पाऊस आगमनाची वेळ पाळत नाही. माणसांसारखा तोही चुकार झाला आहे. वेळापत्रकात स्वतःला बांधून घेणे त्यालाही आवडेनासे झाले आहे. म्हणून मग त्याच्या आगमनाची हतबल होत वाट पाहणे आपल्या हातात राहिले आहे. पावसाची वाट पाहणे आता फक्त भारतापुरते राहिलेले नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरात हीच स्थिती आहे. पण मुंबईकर पावसाची जरा जास्तच वाट पाहतो.
सगळ्या जगात तीन ऋतू असतील असे म्हणता येईल, पण मुंबईत मात्र दोनच उन्हाळा आणि पावसाळा. घामाच्या धारांनी थबथबलेला मे महिना कधी एकदा सरतो आणि कधी एकदा पाऊस पडतो असे मुंबईकरांना होऊन जाते ते त्यामुळेच. मग मॉन्सून कधी येणार याचा अंदाज मुंबईतल्या वर्तमानपत्रांत पडायला लागतो. मॉन्सून उशिरा येणार असा अंदाज जर हवामान खात्याने व्यक्त केला की, मुंबईकर जणू पेरणीचे कसे करायचे बुवा… अशा थाटात खंतावत राहतो. तर, यंदा पावसाचे प्रमाण कमी किंवा जास्त होणार ह्या अंदाजावर आपले चार महिने कसे असणार याचा अदमास घेत राहतो. जर पाऊस कमी होणार असे म्हटले तो ‘अल निनो’चा प्रभाव आहे की नाही, हे समजून घेण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा, आता काही उकाड्यापासून सुटका नाही, ह्या कल्पनेने घाबरून जातो. तर पाऊस जास्त होणार असा अंदाज व्यक्त होताच किती वेळा आपल्याला लोकलच्या गर्दीत, भिजलेल्या अवस्थेत, रूळांवर किंवा रस्त्यांवर पाणी साठल्याने अडकून पडावे लागेल, ह्या कल्पनांची रेखाचित्र तयार करत असतो. त्यातही त्याला फार काळजी वाटत नसते. पाऊस खूप पडला आणि लोकल्स एखादवेळी बंद पडल्या तर बरेच होईल, असा महत्त्वाचा विचार येऊन तरळत जातो. जसा शाळेत जाणारा एखादा चिमुरडा
सांगा सांग भोलनाथ पाऊस पडेल का,
शाळेभोवती पाणी साचून सुटी मिळेल का?
असा निष्पाप प्रश्न ज्या कल्पना रंगवून विचारेल, तसाच मुंबईकर लोकल बंद पडून ऑफिसला जाता येणार, त्या दिवशी काय करायचे, असे स्वप्न अशा पावसांच्या अंदाजांची बांधबाध सुरू झाली की करायला लागतो.
मुंबई सारख्या शहरात पावसाची खूप अजब रूपे पाहायला मिळतात. ह्या शहरातल्या माणसाला पाऊस येण्याचे जितके अप्रूप असते, तसे अन्य कुठल्या शहरात असेल असे वाटत नाही. कारण गावाकडे जूनमधल्या मान्सूनने हजेरी लावण्यापूर्वी अवकाळी पावसाने अनेकदा झोडपून काढलेले असते. त्यामुळे पहिल्या पावसाची जास्त ओढ लागते ती मुंबईकरांना. कारण एरव्ही दिल्ली, कोलकाता, कोची, ईशान्यातल्या एखाद्या शहरात अचानक भेट देणारा पाऊस हा नेहमीचा झालेला असतो. मुंबईत मात्र तसे नसते. इथे पाऊस कडकडीत उन्हाळ्यात पडेल, अशी अजिबात शंका नसतो. त्यामुळे मुंबई परिसरात राहणार्यांना पावसाची प्रतीक्षा तीव्र असते. इथल्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे तर कधी एकदा पाऊस येतो, असे होऊन जाते.
मुंबईकरांचा पाऊसच वेगळा.. असे म्हटले तर खोटे वाटू नये. महाराष्ट्रातल्या सगळ्याच शहरात अवकाळी पाऊस पडतो. कधी कधी गाराही. यंदा तर काही शहरातून पावसाने एक्झिट घेतलीच नाही. काही ठिकाणी तर गारांसह पाऊस पडला. वादळीवारे, जोरदार पावसाने नुकसानही केले. पण मुंबईत मात्र अवकाळी पाऊस पडणे जरा अवघडच. विशी-पंचविशीतल्या मुंबईकराने गारा पाहिल्या असण्याची शक्यताही नाहीच. अचानक आलेल्या पावसाने उडवलेली भंबेरी मुंबईकरांना आवडते, पण त्याला तशी संधी भरून आलेले आभाळ फार वेळा देत नाही. त्यामुळेच त्याला पहिल्या पावसाचे खूप अप्रूप असते.
पाऊस आला की, मस्त खिडकीतून तो पाहत, चहा-कॉफीचा आस्वाद घेत राहावा. जोडीला मक्याची भाजलेली कणसे नाहीतर गरमागरम कांदा भजीवर मनसोक्त ताव मारावा असे वाटते. पावसाळी पिकनिक काढून कोणत्या धबधब्याखाली यंदा स्वर्गसुखाचा आनंद घ्यायचा याचे बेत रचले जातात. ते कसेही करून तडीला नेण्याची तयारीही. पावसाळ्यातील पिकनिकचा वेगळाच माहौल असतो. पहिल्या पावसात दणकून भिजणार्यांप्रमाणे शनिवार-रविवारचेही नियोजन केले जाते. कुठल्याशा धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो मुंबईकर अनेक वाटा धुंडाळत असतात.
कुठल्याही शहरात पावसाच्या आगमनाचा आनंद इतका होत नसेल जितका तो मुंबईत असतो. कारण मुंबईतला पाऊस असतोही देखणा. व्हिटोरियन इमारतीच्या परिसरात कंटाळवाण्या ऑफिसात काम करणार्या माणसालाही त्याचे देखणेपण मोहून टाकते. नरिमन पॉइंटवर पहिल्या पावसात भिजण्यासाठी जशी टवाळकी करणारी तरुणाई असते, तशी हातात डब्याची बॅग सांभाळत त्याचे स्वागत करणारी मंडळीही कमी नसतात. नरिमन पाँइंटकडे उसळणार्या लाटा अनिमिष नेत्रांनी पाहण्याचे वा त्यात भिजण्याची उत्सुकता कधीही कमी होणारी नसते.
गेट वे ऑफ इंडिया असो नाही तर वरळी सी लिंकसारखा आधुनिक अविष्कार त्या ठिकाणी पाऊस अनुभवायला हवाच, अशी मनीषा बाळगणे हे मुंबईकराच्या श्वासइतके सहज असते. मुंबईतला हा पाऊस किती अप्रतिम असू शकतो ह्याचे वर्णन करण्यासाठी ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणे पुरेसे आहे. पावसावरचे हे गाणे खूपच लोकप्रिय आहे. ‘मंझिल’ ह्या चित्रपटात ह्या गाण्याची दोन व्हर्जन्स आहेत. किशोरकुमारने गायलेले गाणे लोकप्रिय आहे. पण कोणी जर लता मंगेशकर ह्यांनी गायलेले गाणे ऐकले असेल, तर तेही तितकेच अप्रतिम आहे. त्याहीपेक्षा ते गाणे पाहणे. अमिताभ बच्चन आणि मौशमी चटर्जी ह्यांच्यावर ते चित्रीत झालेय. मुंबई स्टेशनपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंतचा गाण्यातला मुसळधार पावसातला त्यांचा पायी प्रवास आपल्याला धुंद करून टाकणारा आहे. ओव्हल मैदानातून त्यांचे लालबुंद पाण्यातून चालत जाणे, ताज हॉटेलसमोरच्या कठड्याजवळ उभे राहून पाऊस आणि समुद्रांच्या लाटांचे तुषार अंगावर घेणे हे सगळेच मुंबईतला पाऊस किती हवाहवासा असू शकतो, हे सांगणारा. त्याहीपेक्षा मुंबईतल्या पावसात भिजण्यात काय मजा असू शकते ह्याची झलक दाखवणारा. मुंबईतल्या पावसाचे इतके रोमॅन्टिक रूप खचितच कुठल्या सिनेमात पाहायला मिळाले असेल. छत्री, रेनकोटचे बंधन न बाळगता मनसोक्त पावसाच्या धुंदीचा आनंद प्रियकर-प्रेयसीने घेण्याचा प्रसंग औरच!
मुंबईतल्या ह्या अशा पावसाचे रूप पहायला फार मिळत नाही. मुंबईकरांचा अखंड वेळ हा धावपळीत जात असतो. अख्खं शहर ओस पडेल, इतक्या संख्येने लोक कामावर जाण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडतात. बस, रिक्षा, गाड्या, लोकल, आता मोनोरेल, मेट्रो अशा असंख्य वाहनांमध्ये खच्चून भरलेल्या माणसांना पाऊस हवाहवासा वाटत असतो. पण पावसाचं सौंदर्य न्याहाळात बसायला त्यांना कुठे वेळ असतो? थोडाफार आस्वाद घेतला जातो, पण तो तेवढाच. काही दिवसांतच मोहून टाकणारे रूप बदलून जात असते. अशावेळी केव्हातरी मनसोक्त पावसात बेधुंद भिजण्याची मजा काही वेगळीच असते.
निसर्गाच्या सान्निध्यातील पावसाची मजा लुटण्यार्यांची संख्या कमी नसते. बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क, ठाण्यातील येऊर अशा काही जागा ठरलेल्या. नॅशनल पार्कमधील कान्हेरी गुंफांकडील कड्यांतून लोटणार्या धबधब्यांत भिजण्यासाठी तुफान गर्दी लोटते ती त्याचसाठी. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणार्या कर्जत, शहापूर, माळशेज घाटांमधील नवनव्या धबधब्यांचा शोध घेणारे वीर काही कमी नसतात. अशा ठिकाणी जाऊन कुटुंबिय, मित्रांबरोबर मजा करण्यासाठी येणार्यांची रीघ काही कमी होणारी नसते.
मुंबईच्या गल्लीबोळात दाटीवाटीने राहणार्या माणसाला पाऊस संकट वाटणारच. पूर्वी सात जूनची पावसाची हजेरी कधी चुकायची नाही. मग घरावरच्या छपरावर निळ्या प्लास्टिकच आवरण घालून त्याच्या बंदोबस्ताची तयारी व्हायची. घरात पाणी येणारच हे समजून लोखंडी कॉटवर सामान बसू शकेल, अशी तयारी आधीपासून होते. तरीही पाऊस आपली मनमानी करतोच. कोसळायला लागला की त्याला उसंत नसते. मग धावपळीलाही अंत नसतो. गाड्यांमध्ये अडकून पडणे असतेच, जोडीला घाणेरड्या पाण्यातून माग काढणेही. परळसारख्या भागातल्या सखलपणात पाणी साचून राहणे कायमचे. मग मुंबईत पावसाचा अंदाज घेण्यासाठी परळ, हिंदमाता परिसरात पाणी साचल्याचे दाखले देणेही.
चाळींप्रमाणेच टॉवरमध्येही पावसाच्या पाण्यापासून संरक्षणासाठी चांगलीच तयारी असते. घरात पाणी शिरू नये म्हणून प्लास्टिक लावण्यासाठीची तयारी पावसापूर्वीच सुरू होते. थोड्या जुन्या झालेल्या बिल्डिंगची डागडुजीही पावसापूर्वी सुरू होते ती त्याच कारणासाठी.
बघता बघता हवाहवासा पाऊस कधी जीवघेणा होतो हे समजत देखील नाही. मग ज्या पावसात भिजून चिंब होण्याचा मोह होतो त्याच पावसाचा अचानक तिटकारा येऊ लागतो. गल्लीबोळात तुंबलेली गटारे, त्यातून बाहेर आलेला कचरा, सडलेल्या कचर्याची दुर्गंधी आणि कोणत्याही क्षणी वाहतूक ठप्प होऊन सगळी मुंबईच ठप्प होऊन जाते. त्यावेळी पाऊस ही कवीकल्पनाच असती तर किती बरे झाले असते असे वाटून जाते. कुठे कुठे पाऊस न पडल्याने येणार्या शेतपिकाच्या नुकसानीच्या बातम्या वाचून तिकडे का नाही पडत, असाही विचार मनात येऊन जातो. 26 जुलैच्या पावसाने भीषणतेचा अनुभव दिला. हा अनुभव इतका हादरून टाकायला लावणारा होता की, पावसाचा जोर वाढला कीप्रत्येक मुंबईकराच्या पोटात खड्डा पडतो. पुन्हा तशी आपत्ती येईलच, याची खात्री नाही, कारण त्या घटनेपासून कोणीच काही धडा घेतलेला नाही. फक्त इंचभर पाऊस पडला की, घराचे वेध लागलेला मुंबईकर मिळेल त्या वाहनाने परतण्याच्या तयारीला लागतो. वर्षानुवर्ष पाण्याचे खड्डे कुठे तयार होतात, कुठल्या भागात पाणी साचते, रूळ कुठे पाण्याखाली जातात, कोणते सबवे पाण्याखाली जातात, हे माहिती असून कोणीही ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत. मुंबईकरांच्या वाट्याला नव्या नव्या सुविधा आल्या आहेत. पण कचरा, घाण आणि खड्ड्यातून त्याची सुटका झालेली नाही. ती ज्या दिवशी होईल तेव्हा मुंबईतल्या पावसाचा कंटाळा येणार नाही.
दाक्षिणात्य सिनेमात विशेषतः तो मल्याळी आणि तमिळ सिनेमात पाऊस हा एक व्यक्तिरेखा म्हणून वावरत असते. हिंदी सिनेमातल्यासारखे मात्र पाऊस झुळझुळीत आरस्पानी सौंदर्य ह्याचा अनुभव देणारा असतो. तसेच काही ह्या मुंबईच्या पावसाबाबत म्हणता येईल. सुरुवातीला तो हिंदी सिनेमातल्या सारखा असतो तर नंतर तो दक्षिणेतल्या सिनेमातल्या सारखा अंगावर येणारा असतो. पावसाची ही दोन रूपे मुंबईलाही दोन रूपे देतात. स्वप्नातली मायानगरी मुंबई आणि घाणीचे लोंढे वाहून नेणारी मुंबई.. दोन्हीतले एक रूप हवेहवेस तर दुसरे नकोसे तरीही पहिल्या पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा तितकीच हुरहूर लावते, हे मात्र निश्चित.
सोचो जरा… मेरे यारा,
बादल वो आये… हाये, गर्मी बढाये… हाये
पाने भी लाये… हाये, उस की मर्जी
गुलजार यांच्या गाण्यातल्या या ओळी आपल्याला पावसाच्या ढगांचे रंगढंग कसे हतबल करतात ह्याचे वर्णन करतात. मळभ दाटून आले की, पाऊस येणार याची दवंडी पिटणारे ढग अक्षरशः अनेकदा आपली दिशाभूल करत राहतात. ‘आला आला रे’… म्हणावे अशी स्थिती असताना अचानक ढग स्वच्छ होऊन पांगापांग करतात. मग ‘येरे येरे पावसा’…ची मनधरणी करायला लागते. खरे तर पाऊस आपल्याला त्याच्या मर्जीने वागायला भाग पाडतो. पावसाची प्रतीक्षा फक्त चातकच नाही तर जमिनीवरच्या प्रत्येक सजीवाला त्याची आस असते. मग तो हाडामासांचा माणूस असो नाही तर निष्पर्ण वृक्ष. त्यामुळेच इतर कोणत्याही ऋतूपेक्षा पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा प्रचंड उत्सुकता वाटायला लावणारी असते.
पाण्यामुळे चित्तवृत्ती प्रफुल्लीत होत असल्यानेच प्रत्येकाला पावसाची कमालीची आस असते. पावसाच्या रूपाने अंगावर पाण्याचे थेंब थेट पडल्याने प्रसन्न वाटण्याची शास्त्रीय कारणे काही का असेनात पण पाऊस यावा, असे वाटण्याची कारणे मात्र प्रत्येकाच्या स्वभावानुरूप बदलत असतात. तशी आस धरणीला असे वाटणे ही कवीकल्पना असली तर त्यात तथ्य असावे असे वाटण्यालाही जागा आहे. त्याचे कारण म्हणजे पाऊस पडताच धरणीमाता अशी काही सुगंधित होते की जणू एखाद्याच्या प्रेमाने गंधित होऊन जावे. उन्हाच्या तडाख्याने तडकलेल्या जमिनीवर पहिल्या पावसाचे थेंब पडताच सगळा परिसर जणू उत्फुलतेने नाचायला लागतो.
सात जून म्हटले की पाऊस येणार, हे कधीच चुकणारे नव्हते. तेव्हा त्याची अशी वाट पहायला लागत नव्हती. पण गेल्या काही वर्षांत पाऊस आगमनाची वेळ पाळत नाही. माणसांसारखा तोही चुकार झाला आहे. वेळापत्रकात स्वतःला बांधून घेणे त्यालाही आवडेनासे झाले आहे. म्हणून मग त्याच्या आगमनाची हतबल होत वाट पाहणे आपल्या हातात राहिले आहे. पावसाची वाट पाहणे आता फक्त भारतापुरते राहिलेले नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरात हीच स्थिती आहे. पण मुंबईकर पावसाची जरा जास्तच वाट पाहतो.
सगळ्या जगात तीन ऋतू असतील असे म्हणता येईल, पण मुंबईत मात्र दोनच उन्हाळा आणि पावसाळा. घामाच्या धारांनी थबथबलेला मे महिना कधी एकदा सरतो आणि कधी एकदा पाऊस पडतो असे मुंबईकरांना होऊन जाते ते त्यामुळेच. मग मॉन्सून कधी येणार याचा अंदाज मुंबईतल्या वर्तमानपत्रांत पडायला लागतो. मॉन्सून उशिरा येणार असा अंदाज जर हवामान खात्याने व्यक्त केला की, मुंबईकर जणू पेरणीचे कसे करायचे बुवा… अशा थाटात खंतावत राहतो. तर, यंदा पावसाचे प्रमाण कमी किंवा जास्त होणार ह्या अंदाजावर आपले चार महिने कसे असणार याचा अदमास घेत राहतो. जर पाऊस कमी होणार असे म्हटले तो ‘अल निनो’चा प्रभाव आहे की नाही, हे समजून घेण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा, आता काही उकाड्यापासून सुटका नाही, ह्या कल्पनेने घाबरून जातो. तर पाऊस जास्त होणार असा अंदाज व्यक्त होताच किती वेळा आपल्याला लोकलच्या गर्दीत, भिजलेल्या अवस्थेत, रूळांवर किंवा रस्त्यांवर पाणी साठल्याने अडकून पडावे लागेल, ह्या कल्पनांची रेखाचित्र तयार करत असतो. त्यातही त्याला फार काळजी वाटत नसते. पाऊस खूप पडला आणि लोकल्स एखादवेळी बंद पडल्या तर बरेच होईल, असा महत्त्वाचा विचार येऊन तरळत जातो. जसा शाळेत जाणारा एखादा चिमुरडा
सांगा सांग भोलनाथ पाऊस पडेल का,
शाळेभोवती पाणी साचून सुटी मिळेल का?
असा निष्पाप प्रश्न ज्या कल्पना रंगवून विचारेल, तसाच मुंबईकर लोकल बंद पडून ऑफिसला जाता येणार, त्या दिवशी काय करायचे, असे स्वप्न अशा पावसांच्या अंदाजांची बांधबाध सुरू झाली की करायला लागतो.
मुंबई सारख्या शहरात पावसाची खूप अजब रूपे पाहायला मिळतात. ह्या शहरातल्या माणसाला पाऊस येण्याचे जितके अप्रूप असते, तसे अन्य कुठल्या शहरात असेल असे वाटत नाही. कारण गावाकडे जूनमधल्या मान्सूनने हजेरी लावण्यापूर्वी अवकाळी पावसाने अनेकदा झोडपून काढलेले असते. त्यामुळे पहिल्या पावसाची जास्त ओढ लागते ती मुंबईकरांना. कारण एरव्ही दिल्ली, कोलकाता, कोची, ईशान्यातल्या एखाद्या शहरात अचानक भेट देणारा पाऊस हा नेहमीचा झालेला असतो. मुंबईत मात्र तसे नसते. इथे पाऊस कडकडीत उन्हाळ्यात पडेल, अशी अजिबात शंका नसतो. त्यामुळे मुंबई परिसरात राहणार्यांना पावसाची प्रतीक्षा तीव्र असते. इथल्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे तर कधी एकदा पाऊस येतो, असे होऊन जाते.
मुंबईकरांचा पाऊसच वेगळा.. असे म्हटले तर खोटे वाटू नये. महाराष्ट्रातल्या सगळ्याच शहरात अवकाळी पाऊस पडतो. कधी कधी गाराही. यंदा तर काही शहरातून पावसाने एक्झिट घेतलीच नाही. काही ठिकाणी तर गारांसह पाऊस पडला. वादळीवारे, जोरदार पावसाने नुकसानही केले. पण मुंबईत मात्र अवकाळी पाऊस पडणे जरा अवघडच. विशी-पंचविशीतल्या मुंबईकराने गारा पाहिल्या असण्याची शक्यताही नाहीच. अचानक आलेल्या पावसाने उडवलेली भंबेरी मुंबईकरांना आवडते, पण त्याला तशी संधी भरून आलेले आभाळ फार वेळा देत नाही. त्यामुळेच त्याला पहिल्या पावसाचे खूप अप्रूप असते.
पाऊस आला की, मस्त खिडकीतून तो पाहत, चहा-कॉफीचा आस्वाद घेत राहावा. जोडीला मक्याची भाजलेली कणसे नाहीतर गरमागरम कांदा भजीवर मनसोक्त ताव मारावा असे वाटते. पावसाळी पिकनिक काढून कोणत्या धबधब्याखाली यंदा स्वर्गसुखाचा आनंद घ्यायचा याचे बेत रचले जातात. ते कसेही करून तडीला नेण्याची तयारीही. पावसाळ्यातील पिकनिकचा वेगळाच माहौल असतो. पहिल्या पावसात दणकून भिजणार्यांप्रमाणे शनिवार-रविवारचेही नियोजन केले जाते. कुठल्याशा धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो मुंबईकर अनेक वाटा धुंडाळत असतात.
कुठल्याही शहरात पावसाच्या आगमनाचा आनंद इतका होत नसेल जितका तो मुंबईत असतो. कारण मुंबईतला पाऊस असतोही देखणा. व्हिटोरियन इमारतीच्या परिसरात कंटाळवाण्या ऑफिसात काम करणार्या माणसालाही त्याचे देखणेपण मोहून टाकते. नरिमन पॉइंटवर पहिल्या पावसात भिजण्यासाठी जशी टवाळकी करणारी तरुणाई असते, तशी हातात डब्याची बॅग सांभाळत त्याचे स्वागत करणारी मंडळीही कमी नसतात. नरिमन पाँइंटकडे उसळणार्या लाटा अनिमिष नेत्रांनी पाहण्याचे वा त्यात भिजण्याची उत्सुकता कधीही कमी होणारी नसते.
गेट वे ऑफ इंडिया असो नाही तर वरळी सी लिंकसारखा आधुनिक अविष्कार त्या ठिकाणी पाऊस अनुभवायला हवाच, अशी मनीषा बाळगणे हे मुंबईकराच्या श्वासइतके सहज असते. मुंबईतला हा पाऊस किती अप्रतिम असू शकतो ह्याचे वर्णन करण्यासाठी ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणे पुरेसे आहे. पावसावरचे हे गाणे खूपच लोकप्रिय आहे. ‘मंझिल’ ह्या चित्रपटात ह्या गाण्याची दोन व्हर्जन्स आहेत. किशोरकुमारने गायलेले गाणे लोकप्रिय आहे. पण कोणी जर लता मंगेशकर ह्यांनी गायलेले गाणे ऐकले असेल, तर तेही तितकेच अप्रतिम आहे. त्याहीपेक्षा ते गाणे पाहणे. अमिताभ बच्चन आणि मौशमी चटर्जी ह्यांच्यावर ते चित्रीत झालेय. मुंबई स्टेशनपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंतचा गाण्यातला मुसळधार पावसातला त्यांचा पायी प्रवास आपल्याला धुंद करून टाकणारा आहे. ओव्हल मैदानातून त्यांचे लालबुंद पाण्यातून चालत जाणे, ताज हॉटेलसमोरच्या कठड्याजवळ उभे राहून पाऊस आणि समुद्रांच्या लाटांचे तुषार अंगावर घेणे हे सगळेच मुंबईतला पाऊस किती हवाहवासा असू शकतो, हे सांगणारा. त्याहीपेक्षा मुंबईतल्या पावसात भिजण्यात काय मजा असू शकते ह्याची झलक दाखवणारा. मुंबईतल्या पावसाचे इतके रोमॅन्टिक रूप खचितच कुठल्या सिनेमात पाहायला मिळाले असेल. छत्री, रेनकोटचे बंधन न बाळगता मनसोक्त पावसाच्या धुंदीचा आनंद प्रियकर-प्रेयसीने घेण्याचा प्रसंग औरच!
मुंबईतल्या ह्या अशा पावसाचे रूप पहायला फार मिळत नाही. मुंबईकरांचा अखंड वेळ हा धावपळीत जात असतो. अख्खं शहर ओस पडेल, इतक्या संख्येने लोक कामावर जाण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडतात. बस, रिक्षा, गाड्या, लोकल, आता मोनोरेल, मेट्रो अशा असंख्य वाहनांमध्ये खच्चून भरलेल्या माणसांना पाऊस हवाहवासा वाटत असतो. पण पावसाचं सौंदर्य न्याहाळात बसायला त्यांना कुठे वेळ असतो? थोडाफार आस्वाद घेतला जातो, पण तो तेवढाच. काही दिवसांतच मोहून टाकणारे रूप बदलून जात असते. अशावेळी केव्हातरी मनसोक्त पावसात बेधुंद भिजण्याची मजा काही वेगळीच असते.
निसर्गाच्या सान्निध्यातील पावसाची मजा लुटण्यार्यांची संख्या कमी नसते. बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क, ठाण्यातील येऊर अशा काही जागा ठरलेल्या. नॅशनल पार्कमधील कान्हेरी गुंफांकडील कड्यांतून लोटणार्या धबधब्यांत भिजण्यासाठी तुफान गर्दी लोटते ती त्याचसाठी. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणार्या कर्जत, शहापूर, माळशेज घाटांमधील नवनव्या धबधब्यांचा शोध घेणारे वीर काही कमी नसतात. अशा ठिकाणी जाऊन कुटुंबिय, मित्रांबरोबर मजा करण्यासाठी येणार्यांची रीघ काही कमी होणारी नसते.
मुंबईच्या गल्लीबोळात दाटीवाटीने राहणार्या माणसाला पाऊस संकट वाटणारच. पूर्वी सात जूनची पावसाची हजेरी कधी चुकायची नाही. मग घरावरच्या छपरावर निळ्या प्लास्टिकच आवरण घालून त्याच्या बंदोबस्ताची तयारी व्हायची. घरात पाणी येणारच हे समजून लोखंडी कॉटवर सामान बसू शकेल, अशी तयारी आधीपासून होते. तरीही पाऊस आपली मनमानी करतोच. कोसळायला लागला की त्याला उसंत नसते. मग धावपळीलाही अंत नसतो. गाड्यांमध्ये अडकून पडणे असतेच, जोडीला घाणेरड्या पाण्यातून माग काढणेही. परळसारख्या भागातल्या सखलपणात पाणी साचून राहणे कायमचे. मग मुंबईत पावसाचा अंदाज घेण्यासाठी परळ, हिंदमाता परिसरात पाणी साचल्याचे दाखले देणेही.
चाळींप्रमाणेच टॉवरमध्येही पावसाच्या पाण्यापासून संरक्षणासाठी चांगलीच तयारी असते. घरात पाणी शिरू नये म्हणून प्लास्टिक लावण्यासाठीची तयारी पावसापूर्वीच सुरू होते. थोड्या जुन्या झालेल्या बिल्डिंगची डागडुजीही पावसापूर्वी सुरू होते ती त्याच कारणासाठी.
बघता बघता हवाहवासा पाऊस कधी जीवघेणा होतो हे समजत देखील नाही. मग ज्या पावसात भिजून चिंब होण्याचा मोह होतो त्याच पावसाचा अचानक तिटकारा येऊ लागतो. गल्लीबोळात तुंबलेली गटारे, त्यातून बाहेर आलेला कचरा, सडलेल्या कचर्याची दुर्गंधी आणि कोणत्याही क्षणी वाहतूक ठप्प होऊन सगळी मुंबईच ठप्प होऊन जाते. त्यावेळी पाऊस ही कवीकल्पनाच असती तर किती बरे झाले असते असे वाटून जाते. कुठे कुठे पाऊस न पडल्याने येणार्या शेतपिकाच्या नुकसानीच्या बातम्या वाचून तिकडे का नाही पडत, असाही विचार मनात येऊन जातो. 26 जुलैच्या पावसाने भीषणतेचा अनुभव दिला. हा अनुभव इतका हादरून टाकायला लावणारा होता की, पावसाचा जोर वाढला कीप्रत्येक मुंबईकराच्या पोटात खड्डा पडतो. पुन्हा तशी आपत्ती येईलच, याची खात्री नाही, कारण त्या घटनेपासून कोणीच काही धडा घेतलेला नाही. फक्त इंचभर पाऊस पडला की, घराचे वेध लागलेला मुंबईकर मिळेल त्या वाहनाने परतण्याच्या तयारीला लागतो. वर्षानुवर्ष पाण्याचे खड्डे कुठे तयार होतात, कुठल्या भागात पाणी साचते, रूळ कुठे पाण्याखाली जातात, कोणते सबवे पाण्याखाली जातात, हे माहिती असून कोणीही ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत. मुंबईकरांच्या वाट्याला नव्या नव्या सुविधा आल्या आहेत. पण कचरा, घाण आणि खड्ड्यातून त्याची सुटका झालेली नाही. ती ज्या दिवशी होईल तेव्हा मुंबईतल्या पावसाचा कंटाळा येणार नाही.
दाक्षिणात्य सिनेमात विशेषतः तो मल्याळी आणि तमिळ सिनेमात पाऊस हा एक व्यक्तिरेखा म्हणून वावरत असते. हिंदी सिनेमातल्यासारखे मात्र पाऊस झुळझुळीत आरस्पानी सौंदर्य ह्याचा अनुभव देणारा असतो. तसेच काही ह्या मुंबईच्या पावसाबाबत म्हणता येईल. सुरुवातीला तो हिंदी सिनेमातल्या सारखा असतो तर नंतर तो दक्षिणेतल्या सिनेमातल्या सारखा अंगावर येणारा असतो. पावसाची ही दोन रूपे मुंबईलाही दोन रूपे देतात. स्वप्नातली मायानगरी मुंबई आणि घाणीचे लोंढे वाहून नेणारी मुंबई.. दोन्हीतले एक रूप हवेहवेस तर दुसरे नकोसे तरीही पहिल्या पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा तितकीच हुरहूर लावते, हे मात्र निश्चित.
(पूर्व प्रसिद्ध जुलै, २०१४ ऋतुगंध मासिक)