गदिमांनी त्यांच्या ‘माहेर’ ह्या कवितेतून नदीच्या उगमापासून सागराला मिळेपर्यंत आणि तिथून पुन्हा वाफ आणि ढगांच्या माध्यमातून पुन्हा तिच्या माहेराला येण्याच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. त्र्यंबकेश्वर पासून उगम पावणारी गोदावरी नदी तिच्या १४६५ किमीच्या प्रवासानंतर आंधप्रदेशातील राजमुन्द्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते. सहा राज्यांतून प्रवास करणाऱ्या गोदावरीच्या आणि तिच्या उपनद्यांच्या मार्गात भारतीयांनी बरेच अडथळे निर्माण केले आहेत ज्या मुळे तिच्या अविरल आणि निर्मळ वाहण्यावर मर्यादा आल्या आहेत. ह्यासंदर्भात कृती करण्यासाठी जलपुरुष डॉ. राजेन्द्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन राजमुन्द्री येथील आद्यकवी ननांय्या विद्यापीठ येथे करण्यात आले होते.
गोदावरी ज्या सहा राज्यातून वाहते आणि तिचं खोरं ह्या राज्यांतून पसरलेलं आहे त्या सर्वं राज्यातील प्रतिनिधी ह्या चर्चासत्रासाठी आलेले होते. त्या सर्वांच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आज ही राष्ट्रीय नदी तिच्या प्रवाहात पूर्णपणे वाहत नाही, बऱ्याच ठिकाणी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या धरणांनी ह्या नदीतील बायोडायव्हर्सिटी कुंठित झाली आहे. आंध्रप्रदेशमधल्या डेल्टाच्या प्रदेशात वर्षानुवर्षे वाहत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने सुपीक जमिनीवर समुद्राचे आक्रमण होते आहे. नदीच्या तीरावर वसलेल्या राजमुन्द्री शहरात आज २०० फूट खोल बोअरला पाणी लागत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वंकष विचार करून नदीला ह्या शोषणातून मुक्त करण्यासाठी ‘गोदावरी राष्ट्रीय कुटुंबा’ची स्थापना करण्यात आली आहे. नदीतज्ज्ञ डॉ. परांजपे याचे प्रमुख असतील आणि इतर पाच विषयांसाठी अभ्यास व कृती गटांची स्थापना करण्यात आली आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, नदीच्या काठावर असणाऱ्या तीर्थक्षेत्रांनी, शहरांनी, औद्योगिक वसाहती आणि ग्रामीण भागांनी आपली जबाबदारी न ओळखता नदीत प्रदूषण करण्याची किंवा जे करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचीच भूमिका घेतली आहे. नदीपात्रात अतिक्रमण करून कॉम्प्लेक्स बांधले आहेत. पण ‘नदी विसरत नाही.’ पाणी आपला जाण्याचा मार्ग विसरत नाही. मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने जे रस्त्यावर/रेल्वे मार्गावर पाणी साठलं त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण मुंबई शहरातील नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या पाण्याचा आणि नद्यांच्या घोटलेला गळा हेच आहे. उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे आलेला पूर वाहून नेण्यासाठीची क्षमता नदीपात्रात असलेल्या अतिक्रमणामुळे कमी झाली होती. गोदावरी कन्व्हेशनमध्ये हीच गोष्ट अधोरेखित झाली.
आता पाऊस पडल्याने आपल्या घराच्या गॅलरीत सुखावलेले आपण पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या तापमानवाढीला आणि पाणीटंचाईला पुढच्या उन्हाळ्यापर्यंत विसरून जाऊ. कारण आता ट्रेन, रस्ते आणि मेट्रो सुरळीत चालावी ही आपली इच्छा असते. पण मुळात नदी आणि निसर्गाच्या अमर्याद शोषणाने ह्या दोन्ही टोकाच्या समस्या आपण निर्माण केल्या आहेत हे आपण विसरलो तरी निसर्ग विसरणार नाही.
गोदावरी ज्या सहा राज्यातून वाहते आणि तिचं खोरं ह्या राज्यांतून पसरलेलं आहे त्या सर्वं राज्यातील प्रतिनिधी ह्या चर्चासत्रासाठी आलेले होते. त्या सर्वांच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आज ही राष्ट्रीय नदी तिच्या प्रवाहात पूर्णपणे वाहत नाही, बऱ्याच ठिकाणी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या धरणांनी ह्या नदीतील बायोडायव्हर्सिटी कुंठित झाली आहे. आंध्रप्रदेशमधल्या डेल्टाच्या प्रदेशात वर्षानुवर्षे वाहत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने सुपीक जमिनीवर समुद्राचे आक्रमण होते आहे. नदीच्या तीरावर वसलेल्या राजमुन्द्री शहरात आज २०० फूट खोल बोअरला पाणी लागत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वंकष विचार करून नदीला ह्या शोषणातून मुक्त करण्यासाठी ‘गोदावरी राष्ट्रीय कुटुंबा’ची स्थापना करण्यात आली आहे. नदीतज्ज्ञ डॉ. परांजपे याचे प्रमुख असतील आणि इतर पाच विषयांसाठी अभ्यास व कृती गटांची स्थापना करण्यात आली आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, नदीच्या काठावर असणाऱ्या तीर्थक्षेत्रांनी, शहरांनी, औद्योगिक वसाहती आणि ग्रामीण भागांनी आपली जबाबदारी न ओळखता नदीत प्रदूषण करण्याची किंवा जे करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचीच भूमिका घेतली आहे. नदीपात्रात अतिक्रमण करून कॉम्प्लेक्स बांधले आहेत. पण ‘नदी विसरत नाही.’ पाणी आपला जाण्याचा मार्ग विसरत नाही. मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने जे रस्त्यावर/रेल्वे मार्गावर पाणी साठलं त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण मुंबई शहरातील नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या पाण्याचा आणि नद्यांच्या घोटलेला गळा हेच आहे. उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे आलेला पूर वाहून नेण्यासाठीची क्षमता नदीपात्रात असलेल्या अतिक्रमणामुळे कमी झाली होती. गोदावरी कन्व्हेशनमध्ये हीच गोष्ट अधोरेखित झाली.
आता पाऊस पडल्याने आपल्या घराच्या गॅलरीत सुखावलेले आपण पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या तापमानवाढीला आणि पाणीटंचाईला पुढच्या उन्हाळ्यापर्यंत विसरून जाऊ. कारण आता ट्रेन, रस्ते आणि मेट्रो सुरळीत चालावी ही आपली इच्छा असते. पण मुळात नदी आणि निसर्गाच्या अमर्याद शोषणाने ह्या दोन्ही टोकाच्या समस्या आपण निर्माण केल्या आहेत हे आपण विसरलो तरी निसर्ग विसरणार नाही.