अरामखुर्चीत बसलेले, हातात वर्तमानपत्र. खुर्चीशेजारच्या लाकडी टेबलवर चहाचा कप. धीरगंभीर चेहरा आणि चेहऱ्यावरून हेच गांभीर्य वातावरणात पसरलेलं. मुलगी कॉलेजला जात आहे. मुलगा अजून लोळत पडलाय. आईला वडील म्हणत आहेत,’ आपला सूर्य अजून उगवलाच नाही वाटतं?’
बाबांना नमस्कार करून घराबाहेर पडणारी मुलगी. ती गेल्यावर वर्तमानपत्र बाजूला ठेवून भावनिक होऊन आईकडे मुलीची चौकशी करणारे बाबा. पूर्वीचे बाबा आपल्या मुलांसोबत मूकसंवादाने जोडलेले असायचे. समोरासमोर सगळं उघड बोलणं कमीच. यामध्ये आई ही संवादाचा दुवा असायची. डोळे, हावभाव, एक आदरयुक्त धाक असायचा. बाबा म्हणजे कठोरच. आतून मायाळू असले तरी, एक वडीलधारी जबाबदारी पेलताना भावना दडवून ठेवून योग्य वागणूक आणि संस्काराचा पगडा सांभाळणं म्हणजे बाबा. ह्या सगळ्यात अगदीच चुकून जरी बाबांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं तरी मुलांचा उत्साह द्विगुणित व्हायचा.
तुलना तर करू नये. पण तरीही आईचं माहात्म्य हे आभाळभर आहे. अनके काव्य, ग्रंथ आईला अर्पित असतात. बाप काही ओळींमध्येच असतो. काटा रुतला, चिमटा घेतला, ठेच लागली कि आपसूक ‘आई गं’ निघतं ओठातून. आणि मोठ्या संकटांचं दर्शन घडलं की मग बाप आठवतो आणि ‘बाप रे’ निघतं. तसंच आहे. हा बाप जरी सतत सर्वत्र नसला तरी त्याचं असलेपण खूप असतं.
‘तू लढ; आहे मी.’ म्हणणारी पाठीवरची थाप म्हणजे बाप. आईच्या कुशीत शिरल्यावर आसमंत एकवटून आल्यासारखं होतं. तसंच आभाळ कोसळल्यावर बापाची पाठीवरची थाप ते पेलण्याची ताकद देते. आजचे वडील काळानुसार बरेच बदल घडवत मुलांच्या कलेने घेणारे आहेत. मूकसंवादाची जागा आता सरळ उघड बोलण्याने घेतली आहे. हा बाह्य बदल असला तरी आतून अजूनही वडील आहे तसेच आहेत. आपल्या पिल्लांची तळमळीने काळजी करणारे. मुलांसोबतची मोकळीक वाढली आहे आणि आजकाल बाबा आणि मुलं म्हणजे एक मैत्रीपूर्वक नातं आहे. आज कठोर पापुद्रे गळून पडले आणि एक बाबांचं वेगळंच रूप आजूबाजूला बघायला मिळतं. संसार, करिअर, जबाबदाऱ्या पेलत कितीही धावपळीत असला तरी बाबाचं मन मात्र आपल्या मुलांमध्येच असतं.
तळहात तो बाप
त्याची लढ म्हणून पाठीवरची थाप
आभाळभर माया ज्यात लपलेली
बापपण जपताना, मनात एक आई जपलेली
कठोर कोंदणातलं फडफडणारं मायाळू पाखरू
प्रिय असतं ज्याला आपलं लेकरू
असा तो बाप…
बाबांना नमस्कार करून घराबाहेर पडणारी मुलगी. ती गेल्यावर वर्तमानपत्र बाजूला ठेवून भावनिक होऊन आईकडे मुलीची चौकशी करणारे बाबा. पूर्वीचे बाबा आपल्या मुलांसोबत मूकसंवादाने जोडलेले असायचे. समोरासमोर सगळं उघड बोलणं कमीच. यामध्ये आई ही संवादाचा दुवा असायची. डोळे, हावभाव, एक आदरयुक्त धाक असायचा. बाबा म्हणजे कठोरच. आतून मायाळू असले तरी, एक वडीलधारी जबाबदारी पेलताना भावना दडवून ठेवून योग्य वागणूक आणि संस्काराचा पगडा सांभाळणं म्हणजे बाबा. ह्या सगळ्यात अगदीच चुकून जरी बाबांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं तरी मुलांचा उत्साह द्विगुणित व्हायचा.
तुलना तर करू नये. पण तरीही आईचं माहात्म्य हे आभाळभर आहे. अनके काव्य, ग्रंथ आईला अर्पित असतात. बाप काही ओळींमध्येच असतो. काटा रुतला, चिमटा घेतला, ठेच लागली कि आपसूक ‘आई गं’ निघतं ओठातून. आणि मोठ्या संकटांचं दर्शन घडलं की मग बाप आठवतो आणि ‘बाप रे’ निघतं. तसंच आहे. हा बाप जरी सतत सर्वत्र नसला तरी त्याचं असलेपण खूप असतं.
‘तू लढ; आहे मी.’ म्हणणारी पाठीवरची थाप म्हणजे बाप. आईच्या कुशीत शिरल्यावर आसमंत एकवटून आल्यासारखं होतं. तसंच आभाळ कोसळल्यावर बापाची पाठीवरची थाप ते पेलण्याची ताकद देते. आजचे वडील काळानुसार बरेच बदल घडवत मुलांच्या कलेने घेणारे आहेत. मूकसंवादाची जागा आता सरळ उघड बोलण्याने घेतली आहे. हा बाह्य बदल असला तरी आतून अजूनही वडील आहे तसेच आहेत. आपल्या पिल्लांची तळमळीने काळजी करणारे. मुलांसोबतची मोकळीक वाढली आहे आणि आजकाल बाबा आणि मुलं म्हणजे एक मैत्रीपूर्वक नातं आहे. आज कठोर पापुद्रे गळून पडले आणि एक बाबांचं वेगळंच रूप आजूबाजूला बघायला मिळतं. संसार, करिअर, जबाबदाऱ्या पेलत कितीही धावपळीत असला तरी बाबाचं मन मात्र आपल्या मुलांमध्येच असतं.
तळहात तो बाप
त्याची लढ म्हणून पाठीवरची थाप
आभाळभर माया ज्यात लपलेली
बापपण जपताना, मनात एक आई जपलेली
कठोर कोंदणातलं फडफडणारं मायाळू पाखरू
प्रिय असतं ज्याला आपलं लेकरू
असा तो बाप…