अवघे विश्व फुटबॉलमय झाले असतांना तमाम भारतीयांसाठी क्रीडाजगतातून एक आनंदाची बातमी हाती आलेली आहे. टँपीअर-फिनलँड इथे पार पडलेल्या आयएएएफ जागतिक वीस वर्षांखालील महिला गटात भारताची गोल्डन गर्ल ‘हिमा दास’ हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेले आहे. भारतासाठी ‘ट्रँक अँड फिल्ड’ प्रकारात हे पहिलेच सुवर्णपदक असल्याने हे पदक आपणासाठी बहुमुल्य आहे. अगदी काही दिवसापूर्वीच भारताच्याच दीपा कर्माकर हिनेसुद्धा जागतिक स्तरावर आपली छाप सोडत सुवर्णपदक मिळवले होते.
खरेतर आपल्याकडे क्रिकेटला जी प्रसिद्धी आणि पाठबळ मिळते त्यापुढे इतर खेळ तुलनेत दुर्लक्षित झालेले आहेत. आपल्याकडील नैसर्गिक, भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता एखादा ऍथलीट जागतिक स्तरावर आपला डंका वाजवतो हे एकप्रकारचे आश्चर्यच आहे. मैदानांची कमतरता, अपुऱ्या सोयीसुविधा, दर्जेदार प्रशिक्षकांची कमतरता, सामाजिक प्रोत्साहन, आर्थिक, राजकीय पाठबळ ह्या सर्व बाबींचा विचार करता, हिमा दासने मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. यापूर्वी पी.टी. ऊषा, अंजु जॉर्ज, कर्णम मल्लेश्वरी, नेमबाज अंजली भागवत, फोगाट भगिनी, मेरी कोम, सानिया मिर्झा, साईना नेहवाल, पी सिंधु, साक्षी मलीक, ललीत बाबर आदी महिला खेळाडूंनी देशविदेशात भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे.
आसामची रहिवासी आणि अवघ्या वय वर्षे अठरा असलेल्या हिमा दासने आपल्या कारकिर्दीची सुरुवात फुटबॉलने केली होती. मात्र प्रशिक्षकांनी तिच्यातील टँलेंट ओळखून लगेच तिला ट्रँक अँड फिल्डमध्ये आणले. सुरुवातीला तिने राष्ट्रकुल स्पर्धेत आपली चमक दाखवली. मात्र तिला पदकापासून वंचित राहावे लागले होते. परंतु याची कसर तिने ह्या स्पर्धेत भरून काढली. ४०० मीटर अंतर केवळ ५१.४६ सेकंदात कापत तिने स्वर्णपदक घेतले. यापैकी अर्धे अंतर तुलनेत हळू गाठणाऱ्या हिमा दासने शेवटच्या शंभर मीटरमध्ये सुसाट धाव घेतली आणि आपल्या तिन्ही प्रतिस्पर्ध्यां लीलया हरवत अग्रक्रम गाठला. ह्या स्पर्धेत हिमा दासच्या पूर्वी सीमा पुनिया (कांस्यपदक थाळीफेक २००२), नवनीतकौर धिल्लन (कांस्यपदक थाळीफेक२०१४), निरज चोप्रा (कांस्यपदक भालाफेक २०१६) यांनी सुद्धा आपली चमक दाखवली आहे.
खरोखरच ह्या सर्वांनी आपल्या दैदिप्यमान कामगिरीने भारतीयांची मान जगात उंचावलेली आहे. ह्या सर्व खऱ्याखुऱ्या अर्थाने *भारत की बेटीयाँ* असून इशरत जहाँ सारख्या आंतंकीला आपली बेटी मानणाऱ्यांच्या थोबाडावर काळाने हाणलेली ही एक उत्तम चपराक आहे. *’यदा’ ‘यदाशी’ फेम ‘अवाढव्य’ पुढाऱ्यांनी* यापुढे हिमा दासचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला नक्कीच हरकत नाही. आर्थिक, राजकीय मदतीची जी तत्परता आतंंकी इशरत जहाँसाठी दाखवली गेली तितकी ह्या लेकींसाठी दाखवली गेली नाही याची खंत वाटते. भारताबद्दल पोटशूळ असणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय संघटनांनी भारत महिलांसाठी किती असुरक्षित देश आहे याचे रसभरीत वर्णन केले होते…हिमा दासने गाजवलेल्या कर्तृत्वाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे दात नक्कीच घशात गेले असतील. मुख्य म्हणजे राष्ट्रगीताच्या वेळी तिच्या चेहऱ्यावरून ओघळलेले अश्रू तिची राष्ट्रभक्ती, संस्कृती, संस्कार याची मूक साक्ष देते. नाहीतर आपल्याकडे जनतेच्या घामाच्या पैशावर जेएनयूछाप वयस्कर आणि थेरडे विद्यार्थी जी किळसवाणी सोंगे करतात आणि त्यांना दाद्रीचे हैद्राबादी कलावंत जी साथ देतात, त्यांच्यासाठी हा एक चांगला परिपाठ आहे. राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहायलाच पाहिजे काय; असा प्रश्न विचारणाऱ्यांनी हिमा दासचा कित्ता गिरवायला पाहिजे. हिमा दासची सुवर्ण कारकीर्द नुकतीच सुरू झालेली असून भविष्यात आपल्याला तिच्याकडून अशाच सुवर्ण कामगिरीची अपेक्षा राहील. आता गरज आहे ती अशाच अनेक हिमा दासना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पाठबळ देण्याची. तमाम भारतीयांतर्फे हिमा दासचे हार्दिक अभिनंदन!!
खरेतर आपल्याकडे क्रिकेटला जी प्रसिद्धी आणि पाठबळ मिळते त्यापुढे इतर खेळ तुलनेत दुर्लक्षित झालेले आहेत. आपल्याकडील नैसर्गिक, भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता एखादा ऍथलीट जागतिक स्तरावर आपला डंका वाजवतो हे एकप्रकारचे आश्चर्यच आहे. मैदानांची कमतरता, अपुऱ्या सोयीसुविधा, दर्जेदार प्रशिक्षकांची कमतरता, सामाजिक प्रोत्साहन, आर्थिक, राजकीय पाठबळ ह्या सर्व बाबींचा विचार करता, हिमा दासने मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. यापूर्वी पी.टी. ऊषा, अंजु जॉर्ज, कर्णम मल्लेश्वरी, नेमबाज अंजली भागवत, फोगाट भगिनी, मेरी कोम, सानिया मिर्झा, साईना नेहवाल, पी सिंधु, साक्षी मलीक, ललीत बाबर आदी महिला खेळाडूंनी देशविदेशात भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे.
आसामची रहिवासी आणि अवघ्या वय वर्षे अठरा असलेल्या हिमा दासने आपल्या कारकिर्दीची सुरुवात फुटबॉलने केली होती. मात्र प्रशिक्षकांनी तिच्यातील टँलेंट ओळखून लगेच तिला ट्रँक अँड फिल्डमध्ये आणले. सुरुवातीला तिने राष्ट्रकुल स्पर्धेत आपली चमक दाखवली. मात्र तिला पदकापासून वंचित राहावे लागले होते. परंतु याची कसर तिने ह्या स्पर्धेत भरून काढली. ४०० मीटर अंतर केवळ ५१.४६ सेकंदात कापत तिने स्वर्णपदक घेतले. यापैकी अर्धे अंतर तुलनेत हळू गाठणाऱ्या हिमा दासने शेवटच्या शंभर मीटरमध्ये सुसाट धाव घेतली आणि आपल्या तिन्ही प्रतिस्पर्ध्यां लीलया हरवत अग्रक्रम गाठला. ह्या स्पर्धेत हिमा दासच्या पूर्वी सीमा पुनिया (कांस्यपदक थाळीफेक २००२), नवनीतकौर धिल्लन (कांस्यपदक थाळीफेक२०१४), निरज चोप्रा (कांस्यपदक भालाफेक २०१६) यांनी सुद्धा आपली चमक दाखवली आहे.
खरोखरच ह्या सर्वांनी आपल्या दैदिप्यमान कामगिरीने भारतीयांची मान जगात उंचावलेली आहे. ह्या सर्व खऱ्याखुऱ्या अर्थाने *भारत की बेटीयाँ* असून इशरत जहाँ सारख्या आंतंकीला आपली बेटी मानणाऱ्यांच्या थोबाडावर काळाने हाणलेली ही एक उत्तम चपराक आहे. *’यदा’ ‘यदाशी’ फेम ‘अवाढव्य’ पुढाऱ्यांनी* यापुढे हिमा दासचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला नक्कीच हरकत नाही. आर्थिक, राजकीय मदतीची जी तत्परता आतंंकी इशरत जहाँसाठी दाखवली गेली तितकी ह्या लेकींसाठी दाखवली गेली नाही याची खंत वाटते. भारताबद्दल पोटशूळ असणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय संघटनांनी भारत महिलांसाठी किती असुरक्षित देश आहे याचे रसभरीत वर्णन केले होते…हिमा दासने गाजवलेल्या कर्तृत्वाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे दात नक्कीच घशात गेले असतील. मुख्य म्हणजे राष्ट्रगीताच्या वेळी तिच्या चेहऱ्यावरून ओघळलेले अश्रू तिची राष्ट्रभक्ती, संस्कृती, संस्कार याची मूक साक्ष देते. नाहीतर आपल्याकडे जनतेच्या घामाच्या पैशावर जेएनयूछाप वयस्कर आणि थेरडे विद्यार्थी जी किळसवाणी सोंगे करतात आणि त्यांना दाद्रीचे हैद्राबादी कलावंत जी साथ देतात, त्यांच्यासाठी हा एक चांगला परिपाठ आहे. राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहायलाच पाहिजे काय; असा प्रश्न विचारणाऱ्यांनी हिमा दासचा कित्ता गिरवायला पाहिजे. हिमा दासची सुवर्ण कारकीर्द नुकतीच सुरू झालेली असून भविष्यात आपल्याला तिच्याकडून अशाच सुवर्ण कामगिरीची अपेक्षा राहील. आता गरज आहे ती अशाच अनेक हिमा दासना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पाठबळ देण्याची. तमाम भारतीयांतर्फे हिमा दासचे हार्दिक अभिनंदन!!