संदीपला ऑफिसमधून निघायला रात्रीचे दहा वाजले. करीरोड स्टेशनवरची गर्दी आता ओसरली होती. तुरळक ये जा सुरू होती. अंबरनाथ गाडी इंडिकेटरवर दिसत होती. काही वेळातच गाडी आली आणि संदीप फर्स्ट क्लासमध्ये चढला. त्याला लागलीच बसायला जागाही मिळाली. त्याच्या बाजूचा प्रवासी मोबाइलमध्ये व्हॉट्सअप बघण्यात तल्लीन झाला होता. संदीपने एक उसासा सोडला. चेहर्यावरचा घाम पुसला. गाडीने वेग पकडला तसा वार्याचा प्रवाह सुरू झाला. संदीपला आता हायसं वाटलं. तेवढ्यात शेजारचा प्रवासी मोबाईलमध्ये पाहून स्वतःशीच जोरात हसला. संदीपने त्याच्या मोबाईलमध्ये नजर घातली. तसा बाजूचा प्रवासी संदीपकडे पाहून परत जोरात हसू लागला. संदीप क्षणभर वरमला.
‘सॉरी’ तो म्हणाला.
‘अरे सॉरी कशाला’ तो हसतच म्हणाला.
‘नाही… मी तुमच्या मोबाईलमध्ये पहिलं न म्हणून’ संदीप ओशाळला होता.
‘अरे त्यात काय एवढं? अहो बिनधास्त पाहू शकता. माझा मित्र आहे न प्रकाश त्याने बनवलेला ग्रुप आहे आमचा. नाव पण काय ठेवलं पाहा ग्रुपचं ‘मैत्र जिवाचे’. अहो… हा प्रकाश आहे न, तो आहे पत्रकार. कुठे कुठे फिरत असतो. भरपूर मित्र आहेत त्याचे. अगदी अमेरिका, कॅनडा इथपासून ते भारतात आणि महाराष्ट्रात अनेक मित्र त्याने गोळा केलेत. हा कलंदर कुठेही फिरत असतो आणि वस्तू गोळा कराव्यात तशी माणसे गोळा करत असतो. आम्हीही त्याच्या प्रेमात पडलो’ ते हसले. ‘बाय द वे… मी कुणाल शिरोडकर…’ त्यांनी संदीपपुढे हात केला.
‘मी संदीप हजारे…’ संदीपनेही आपला हात पुढे केला.
‘मी अंबरनाथला राहतो… आपण कुठे राहता?’ कुणालने हातात हात मिळवत विचारले.
‘मी मुलुंडला’ संदीप म्हणाला.
‘ठीक आहे, म्हणजे तुम्ही लवकर उतरणार तर, काही हरकत नाही तो पर्यन्त तुमची कंपनी मिळेल’ यावर संदीप काही बोलला नाही. कुणाल पन्नास पंचावन्नचा तर संदीप तिशी पस्तीशीचा. क्षणभर दोघे शांत होते. ‘हा कोणी लेखक आहे संदीप म्हणून तोही या ग्रुपवर आहे. चांगला लिहितो. मी वाचतो त्याचं आणि रिप्लायही करतो’ कुणाल मोबाईल दाखवून बोलत होता. संदीप काही बोलला नाही. ‘तंत्रज्ञान किती प्रगत झालंय नाही?. ह्यामुळे सर्वं जग एकत्र आलंय. कोणीही जगातल्या कुठल्याही कोपर्यातून कुणालाही संपर्क करू शकतो. पाहू शकतो. ह्या व्हॉट्सअपमुळे कोणीही आपली मतं आपले विचार शेअर करू शकतो. हो की नाही? तुम्हाला काय वाटतं ?’ कुणालने संदीपशी खूप ओळख असल्यासारखं विचारलं. ‘हो पण व्यक्तीस्वातंत्र्य अति झाल्यासारखंही झालंय’ संदीपनेही पटकन त्याचे मत दिले.
‘खरं आहे काही अंशी. त्याचा दुरुपयोग होता कामा नये. पण म्हणून काय तंत्रज्ञान विकसित व्हायचं थोडचं थांबणार आहे? मी ठरवलंय आपण आपल्याला पाहिजे ते घ्यायचं. नको त्या गोष्टी सोडून द्यायच्या. प्रकाशही तेच म्हणतो. आपल्याला हे आयुध मिळालंय. एकत्र भेटणं होत नाही तर निदान ह्या माध्यमातून एकत्र तरी राहू’ कुणाल आतून बोलत होता.
‘हो ना, आता ग्रुपही खूप झालेत. काही झालं की पटकन कळतं’ संदीपला पुढे विषय न्यायचा होता.
‘अरे ही केतकी बघा’ कुणालने मोबाईलवर तिचा फोटो दाखवत म्हटले. ही अमेरिकेत डॉक्टर आहे. तिथल्या कुठल्याशा कॉलेजमध्ये तिचे लेक्चर आयोजित केले होते. खूप रिस्पॉन्स मिळाला तिला. मी तिला ओळखतही नाही. तिची व्हिडीओ क्लिप पहिली आणि अभिमान वाटला. आता कोण ही केतकी, पण एक महिला अमेरिकेत जाऊन डॉक्टर होते आणि तिथल्या कॉलेजमध्ये तिचे लेक्चर होते. हे कधी तरी कळलं असंत का? पण यामुळे हे साध्य झालं’ मोबाईल दाखवत कुणाल बोलत होता.
‘खरं आहे. पण खूपसे मेसेज फॉरवर्डेड असतात. कधी कधी कंटाळा येतो. मी तर वाचतही नाही.’ संदीपने प्रामाणिकपणे कबूल केले.
‘नाही हं. मी मात्र आवर्जून वाचतो आणि आनंद घेतो’ कुणाल संगत होता. ‘त्या बंड्याचे आणि गुरुजींचे जोक मस्त असतात. खास करून शेवटचं वाक्य गुरुजी कोमात… बंड्या जोमात…’ दोघेही जोरात हसले.
‘हो आणि पुणेकराना तर बदनामच केलंय ह्या व्हॉट्सअपने.. . आतातर सरदारजींची जागा पुणेवाल्यांनी घेतलीय’ दोघेही टाळ्या देऊन जोरजोरात हसले.
‘बघा, म्हणजे तुम्ही हे जोक वाचता तर…’ कुणालने संदीपला बरोबर पकडले.
‘हो, छोटे छोटे वाचायला मजा येते…’ संदीपही लगेच उत्तरला.
‘पुणेकरांबद्दल असं बोलू नका हं… काय हो पु.ल. पण पुण्याचे ना. केवढी मोठी देणगी दिली आहे त्यांनी मराठी साहित्याला. आजही त्यांचं कितीतरी साहित्य नेटवर आणि व्हॉट्सअपवर येते. आजच्या पिढीलाही त्याची ओढ आहे.’ कुणाल तळमळीने बोलत होता.
‘हो ना… आजही त्यांच्या कथा कविता तेवढ्याच टवटवीत वाटतात.’ संदीपही कुणालच्या मताशी सहमत होता.
‘बघा… आजच पु.लं.ची एक सुंदर कविता मैत्र वर आलीय. दोन चार ओळी बोलूनच दाखवतो.’ कुणाल मोबाईलमध्ये बघून बोलत होता आणि त्याने सरळ कविता वाचायला सुरुवातच केली. ‘शून्यातून विश्व, की विश्वातून शून्य… टू रूम किचनचा एखादा फ्लॅट… दोन एकरचं फार्म हाऊस… एखादी चार चाकी गाडी आणि भौतिक वस्तूंच प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो… अमक्या तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं… म्हणजे होतंय काय, की सुख मिळेल, ह्या आशेनं माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय, पण सुखी काही दिसत नाही…, शेवटी पु.लं. म्हणतात, इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळ माणसं जवळ येणार नसतील, दु:ख सांगायला, मन हलकं करायला जागाच उरणार नसेल, तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की… विश्वातून शून्य?… किती साधी आणि सरळ पण आशयघन कविता पु.लं. नी केलीय. जगण्याचं सार एका कवितेत आलंय’ ‘खरंच, पु लं ग्रेट होते’ कुणाल खिडकीबाहेर पाहत हरवून गेला होता.
‘हो… म्हणूनच ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व झालं आहे. सामान्यांच्या जगण्यावर मोरपिसासारखी विनोदाची मुलायम पखरण केली त्यांनी’ संदीपही हरवून गेला होता.
‘संदीप नावाचा कोणी लेखक अशाच छोट्या छोट्या पण आशयघन कथा लिहितो आणि आनंद देतो’ कुणालच्या ह्या बोलण्यावर त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही. मग मात्र कुणाल पुढे बोलत राहिला.
‘माझ्या मते व्हॉट्सअप हे माध्यम क्रिएटिव्ह लोकांसाठी संजीवनी आहे. बघा नं, एखादा प्रसंग जगाच्या पाठीवर घडतो, त्याची बातमी क्षणार्धात सगळीकडे पसरते. व्हिडिओ व्हायरल होतात. त्यावर जोक्स होतात. प्रतिक्रिया उमटतात. टीका टिप्पणी होते. पडसाद देखील लगेच उमटतात. आपण म्हणतो न कधी कधी, ह्या लोकांना हे सुचतं कसं. ही सगळी मानवाच्या मेंदूची कमाल आहे. देवाने मनुष्य प्राण्याला अचाट बुद्धिमत्ता दिली आहे. त्याचा तो सर्वार्थाने उपयोग करून घेतोय’
‘खरं सांगू का? मानवाची निर्मितीच मुळी एक क्रिएटीविटी आहे. प्रत्येक व्यक्तिमत्त्व वेगळे. त्यात काही ना काही गुणधर्म उपजत असतात. त्यातूनच क्रिएटीविटी जन्माला येते’ संदीपनेही कुणालच्या मुद्याला दुजोरा दिला.
‘त्यातूनच माणूस मूलतः सोशल. त्यामुळे व्हॉटसअपवर ग्रुप तयार होतात. कारण त्याला एकत्र राहायचं आहे’ एक एक स्टेशन पुढे जात होतं तसतशी चर्चा अधिक रंगत होती.
‘ग्रुपवरुन आठवलं… पूर्वी आपण फक्त लग्न कार्यात भेटायचो… आता कितीतरी ग्रुप झालेत ना. नवर्याचा, बायकोचा, तिच्या माहेरचा, सासरचा, शाळेतल्या मित्रांचा, कॉलेजमधल्या मित्रांचा, ऑफिसमधल्या कलीगचा, बॉसचा वेगळा, कवितांचा कट्टा वेगळा, दारूड्यांचा वेगळा, गप्पांचा कट्टा वेगळा, असंख्य ग्रुप’ कुणाल म्हणाला.
‘हो आणि अॅडमीनला टार्गेट करायचं’ संदीप खिडकीतून वाकून कुठलं स्टेशन आलंय पाहत बोलला.
‘अरे हो तुम्हाला लवकर उतरायचंय ना… मी विसरलोच गप्पांच्या नादात’ कुणाल म्हणाला.
‘काही हरकत नाही… बोला तुम्ही मला थोडा वेळ आहे. तुम्हाला वेळ कधी मिळतो हे वाचायला. ऑफिसमध्ये काही काम नसतं वाटतं’ संदीप म्हणाला.
‘अहो वेळ मिळत नाही… काढावा लागतो मिस्टर’ कुणाल एखाद गहन वाक्य बोलल्याच्या आवेशात बोलला. ‘मी लंच टाइममध्ये थोडा वेळ ठेवतो त्यासाठी… आणि रात्री ट्रेन पकडली की तेच काम… आपल्या आवडत्या गोष्टीत आनंद घ्यायचा’ कुणाल म्हणाला.
‘अगदी बरोबर.. आपल्या आवडत्या गोष्टीत आनंद मिळवणं महत्त्वाचं… ’ उठता उठता संदीप म्हणाला. ‘नाहुर येतंय, पुढे गेलं पाहिजे’
‘हो निघा, प्रत्येकजण आपलं स्टेशन आलं की उतरणारच, जीवनातल कटू सत्य आहे ते. पण बरं वाटलं तुम्ही भेटलात. माझी वायफळ बडबडही ऐकून घेतलीत’ कुणाल हसत बोलला.
संदीप लोकलच्या दाराशी आला. मागे वळून कुणालकडे पाहत होता. तो परत मोबाईलमध्ये गढून गेला होता आणि स्वतःशीच हातवारे करत हसत होता. संदीपला त्याचं अप्रूप वाटलं. नाहुर गेल्यावर बरीच जागा झाली. संदीप अजूनही त्याच विचारात होता. मागे वळून वळून कुणालकडे पाहत होता. आता केवळ दोन मिनिटात मुलुंड स्टेशन येणार होतं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक; तो झटकन कुणालजवळ परत आला. कुणालने त्याला पहिलं. संदीपने त्याचे खांदे धरले आणि त्याला उभं केलं. काही कळायच्या आत संदीपने त्याला घट्ट मिठी मारली.
‘जीवनातलं निखळ सत्य तुम्ही आज मला सांगितलंत, आपला आनंद शोधला पाहिजे’ संदीप म्हणाला.
‘येस मित्रा, जवळच असतो तो. आपण उगाच त्याला हरवून बसतो’ कुणाल त्याचे खांदे धरत बोलला.
‘मगापासून संदीप ह्या लेखकाचा जो तुम्ही उल्लेख करत आहात तो मीच. मीही प्रकाशचा मित्र. त्याच्यामुळेच आपली भेट झाली आणि कुणीतरी आपलं लेखन एवढ्या तळमळीने वाचून त्याचा आनंद घेतंय याचा आनंद तुम्ही मला दिलात. हॅट्स ऑफ प्रकाश, हॅट्स ऑफ मैत्र जिवाचे’ संदीप म्हणाला आणि दोघांनी परत एकदा आलिंगन दिलं.
गाडी मुलुंड स्टेशनमध्ये शिरत होती. संदीप झटकन बाहेर पडला. गाडी थांबताच उतरला. गाडी सुरू झाली. संदीपने बाहेरून कुणालकडे पाहून हात केला. कुणालही बराच वेळ टाटा करीत राहिला. गाडीने हळू हळू स्पीड पकडला होता.
‘सॉरी’ तो म्हणाला.
‘अरे सॉरी कशाला’ तो हसतच म्हणाला.
‘नाही… मी तुमच्या मोबाईलमध्ये पहिलं न म्हणून’ संदीप ओशाळला होता.
‘अरे त्यात काय एवढं? अहो बिनधास्त पाहू शकता. माझा मित्र आहे न प्रकाश त्याने बनवलेला ग्रुप आहे आमचा. नाव पण काय ठेवलं पाहा ग्रुपचं ‘मैत्र जिवाचे’. अहो… हा प्रकाश आहे न, तो आहे पत्रकार. कुठे कुठे फिरत असतो. भरपूर मित्र आहेत त्याचे. अगदी अमेरिका, कॅनडा इथपासून ते भारतात आणि महाराष्ट्रात अनेक मित्र त्याने गोळा केलेत. हा कलंदर कुठेही फिरत असतो आणि वस्तू गोळा कराव्यात तशी माणसे गोळा करत असतो. आम्हीही त्याच्या प्रेमात पडलो’ ते हसले. ‘बाय द वे… मी कुणाल शिरोडकर…’ त्यांनी संदीपपुढे हात केला.
‘मी संदीप हजारे…’ संदीपनेही आपला हात पुढे केला.
‘मी अंबरनाथला राहतो… आपण कुठे राहता?’ कुणालने हातात हात मिळवत विचारले.
‘मी मुलुंडला’ संदीप म्हणाला.
‘ठीक आहे, म्हणजे तुम्ही लवकर उतरणार तर, काही हरकत नाही तो पर्यन्त तुमची कंपनी मिळेल’ यावर संदीप काही बोलला नाही. कुणाल पन्नास पंचावन्नचा तर संदीप तिशी पस्तीशीचा. क्षणभर दोघे शांत होते. ‘हा कोणी लेखक आहे संदीप म्हणून तोही या ग्रुपवर आहे. चांगला लिहितो. मी वाचतो त्याचं आणि रिप्लायही करतो’ कुणाल मोबाईल दाखवून बोलत होता. संदीप काही बोलला नाही. ‘तंत्रज्ञान किती प्रगत झालंय नाही?. ह्यामुळे सर्वं जग एकत्र आलंय. कोणीही जगातल्या कुठल्याही कोपर्यातून कुणालाही संपर्क करू शकतो. पाहू शकतो. ह्या व्हॉट्सअपमुळे कोणीही आपली मतं आपले विचार शेअर करू शकतो. हो की नाही? तुम्हाला काय वाटतं ?’ कुणालने संदीपशी खूप ओळख असल्यासारखं विचारलं. ‘हो पण व्यक्तीस्वातंत्र्य अति झाल्यासारखंही झालंय’ संदीपनेही पटकन त्याचे मत दिले.
‘खरं आहे काही अंशी. त्याचा दुरुपयोग होता कामा नये. पण म्हणून काय तंत्रज्ञान विकसित व्हायचं थोडचं थांबणार आहे? मी ठरवलंय आपण आपल्याला पाहिजे ते घ्यायचं. नको त्या गोष्टी सोडून द्यायच्या. प्रकाशही तेच म्हणतो. आपल्याला हे आयुध मिळालंय. एकत्र भेटणं होत नाही तर निदान ह्या माध्यमातून एकत्र तरी राहू’ कुणाल आतून बोलत होता.
‘हो ना, आता ग्रुपही खूप झालेत. काही झालं की पटकन कळतं’ संदीपला पुढे विषय न्यायचा होता.
‘अरे ही केतकी बघा’ कुणालने मोबाईलवर तिचा फोटो दाखवत म्हटले. ही अमेरिकेत डॉक्टर आहे. तिथल्या कुठल्याशा कॉलेजमध्ये तिचे लेक्चर आयोजित केले होते. खूप रिस्पॉन्स मिळाला तिला. मी तिला ओळखतही नाही. तिची व्हिडीओ क्लिप पहिली आणि अभिमान वाटला. आता कोण ही केतकी, पण एक महिला अमेरिकेत जाऊन डॉक्टर होते आणि तिथल्या कॉलेजमध्ये तिचे लेक्चर होते. हे कधी तरी कळलं असंत का? पण यामुळे हे साध्य झालं’ मोबाईल दाखवत कुणाल बोलत होता.
‘खरं आहे. पण खूपसे मेसेज फॉरवर्डेड असतात. कधी कधी कंटाळा येतो. मी तर वाचतही नाही.’ संदीपने प्रामाणिकपणे कबूल केले.
‘नाही हं. मी मात्र आवर्जून वाचतो आणि आनंद घेतो’ कुणाल संगत होता. ‘त्या बंड्याचे आणि गुरुजींचे जोक मस्त असतात. खास करून शेवटचं वाक्य गुरुजी कोमात… बंड्या जोमात…’ दोघेही जोरात हसले.
‘हो आणि पुणेकराना तर बदनामच केलंय ह्या व्हॉट्सअपने.. . आतातर सरदारजींची जागा पुणेवाल्यांनी घेतलीय’ दोघेही टाळ्या देऊन जोरजोरात हसले.
‘बघा, म्हणजे तुम्ही हे जोक वाचता तर…’ कुणालने संदीपला बरोबर पकडले.
‘हो, छोटे छोटे वाचायला मजा येते…’ संदीपही लगेच उत्तरला.
‘पुणेकरांबद्दल असं बोलू नका हं… काय हो पु.ल. पण पुण्याचे ना. केवढी मोठी देणगी दिली आहे त्यांनी मराठी साहित्याला. आजही त्यांचं कितीतरी साहित्य नेटवर आणि व्हॉट्सअपवर येते. आजच्या पिढीलाही त्याची ओढ आहे.’ कुणाल तळमळीने बोलत होता.
‘हो ना… आजही त्यांच्या कथा कविता तेवढ्याच टवटवीत वाटतात.’ संदीपही कुणालच्या मताशी सहमत होता.
‘बघा… आजच पु.लं.ची एक सुंदर कविता मैत्र वर आलीय. दोन चार ओळी बोलूनच दाखवतो.’ कुणाल मोबाईलमध्ये बघून बोलत होता आणि त्याने सरळ कविता वाचायला सुरुवातच केली. ‘शून्यातून विश्व, की विश्वातून शून्य… टू रूम किचनचा एखादा फ्लॅट… दोन एकरचं फार्म हाऊस… एखादी चार चाकी गाडी आणि भौतिक वस्तूंच प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो… अमक्या तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं… म्हणजे होतंय काय, की सुख मिळेल, ह्या आशेनं माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय, पण सुखी काही दिसत नाही…, शेवटी पु.लं. म्हणतात, इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळ माणसं जवळ येणार नसतील, दु:ख सांगायला, मन हलकं करायला जागाच उरणार नसेल, तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की… विश्वातून शून्य?… किती साधी आणि सरळ पण आशयघन कविता पु.लं. नी केलीय. जगण्याचं सार एका कवितेत आलंय’ ‘खरंच, पु लं ग्रेट होते’ कुणाल खिडकीबाहेर पाहत हरवून गेला होता.
‘हो… म्हणूनच ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व झालं आहे. सामान्यांच्या जगण्यावर मोरपिसासारखी विनोदाची मुलायम पखरण केली त्यांनी’ संदीपही हरवून गेला होता.
‘संदीप नावाचा कोणी लेखक अशाच छोट्या छोट्या पण आशयघन कथा लिहितो आणि आनंद देतो’ कुणालच्या ह्या बोलण्यावर त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही. मग मात्र कुणाल पुढे बोलत राहिला.
‘माझ्या मते व्हॉट्सअप हे माध्यम क्रिएटिव्ह लोकांसाठी संजीवनी आहे. बघा नं, एखादा प्रसंग जगाच्या पाठीवर घडतो, त्याची बातमी क्षणार्धात सगळीकडे पसरते. व्हिडिओ व्हायरल होतात. त्यावर जोक्स होतात. प्रतिक्रिया उमटतात. टीका टिप्पणी होते. पडसाद देखील लगेच उमटतात. आपण म्हणतो न कधी कधी, ह्या लोकांना हे सुचतं कसं. ही सगळी मानवाच्या मेंदूची कमाल आहे. देवाने मनुष्य प्राण्याला अचाट बुद्धिमत्ता दिली आहे. त्याचा तो सर्वार्थाने उपयोग करून घेतोय’
‘खरं सांगू का? मानवाची निर्मितीच मुळी एक क्रिएटीविटी आहे. प्रत्येक व्यक्तिमत्त्व वेगळे. त्यात काही ना काही गुणधर्म उपजत असतात. त्यातूनच क्रिएटीविटी जन्माला येते’ संदीपनेही कुणालच्या मुद्याला दुजोरा दिला.
‘त्यातूनच माणूस मूलतः सोशल. त्यामुळे व्हॉटसअपवर ग्रुप तयार होतात. कारण त्याला एकत्र राहायचं आहे’ एक एक स्टेशन पुढे जात होतं तसतशी चर्चा अधिक रंगत होती.
‘ग्रुपवरुन आठवलं… पूर्वी आपण फक्त लग्न कार्यात भेटायचो… आता कितीतरी ग्रुप झालेत ना. नवर्याचा, बायकोचा, तिच्या माहेरचा, सासरचा, शाळेतल्या मित्रांचा, कॉलेजमधल्या मित्रांचा, ऑफिसमधल्या कलीगचा, बॉसचा वेगळा, कवितांचा कट्टा वेगळा, दारूड्यांचा वेगळा, गप्पांचा कट्टा वेगळा, असंख्य ग्रुप’ कुणाल म्हणाला.
‘हो आणि अॅडमीनला टार्गेट करायचं’ संदीप खिडकीतून वाकून कुठलं स्टेशन आलंय पाहत बोलला.
‘अरे हो तुम्हाला लवकर उतरायचंय ना… मी विसरलोच गप्पांच्या नादात’ कुणाल म्हणाला.
‘काही हरकत नाही… बोला तुम्ही मला थोडा वेळ आहे. तुम्हाला वेळ कधी मिळतो हे वाचायला. ऑफिसमध्ये काही काम नसतं वाटतं’ संदीप म्हणाला.
‘अहो वेळ मिळत नाही… काढावा लागतो मिस्टर’ कुणाल एखाद गहन वाक्य बोलल्याच्या आवेशात बोलला. ‘मी लंच टाइममध्ये थोडा वेळ ठेवतो त्यासाठी… आणि रात्री ट्रेन पकडली की तेच काम… आपल्या आवडत्या गोष्टीत आनंद घ्यायचा’ कुणाल म्हणाला.
‘अगदी बरोबर.. आपल्या आवडत्या गोष्टीत आनंद मिळवणं महत्त्वाचं… ’ उठता उठता संदीप म्हणाला. ‘नाहुर येतंय, पुढे गेलं पाहिजे’
‘हो निघा, प्रत्येकजण आपलं स्टेशन आलं की उतरणारच, जीवनातल कटू सत्य आहे ते. पण बरं वाटलं तुम्ही भेटलात. माझी वायफळ बडबडही ऐकून घेतलीत’ कुणाल हसत बोलला.
संदीप लोकलच्या दाराशी आला. मागे वळून कुणालकडे पाहत होता. तो परत मोबाईलमध्ये गढून गेला होता आणि स्वतःशीच हातवारे करत हसत होता. संदीपला त्याचं अप्रूप वाटलं. नाहुर गेल्यावर बरीच जागा झाली. संदीप अजूनही त्याच विचारात होता. मागे वळून वळून कुणालकडे पाहत होता. आता केवळ दोन मिनिटात मुलुंड स्टेशन येणार होतं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक; तो झटकन कुणालजवळ परत आला. कुणालने त्याला पहिलं. संदीपने त्याचे खांदे धरले आणि त्याला उभं केलं. काही कळायच्या आत संदीपने त्याला घट्ट मिठी मारली.
‘जीवनातलं निखळ सत्य तुम्ही आज मला सांगितलंत, आपला आनंद शोधला पाहिजे’ संदीप म्हणाला.
‘येस मित्रा, जवळच असतो तो. आपण उगाच त्याला हरवून बसतो’ कुणाल त्याचे खांदे धरत बोलला.
‘मगापासून संदीप ह्या लेखकाचा जो तुम्ही उल्लेख करत आहात तो मीच. मीही प्रकाशचा मित्र. त्याच्यामुळेच आपली भेट झाली आणि कुणीतरी आपलं लेखन एवढ्या तळमळीने वाचून त्याचा आनंद घेतंय याचा आनंद तुम्ही मला दिलात. हॅट्स ऑफ प्रकाश, हॅट्स ऑफ मैत्र जिवाचे’ संदीप म्हणाला आणि दोघांनी परत एकदा आलिंगन दिलं.
गाडी मुलुंड स्टेशनमध्ये शिरत होती. संदीप झटकन बाहेर पडला. गाडी थांबताच उतरला. गाडी सुरू झाली. संदीपने बाहेरून कुणालकडे पाहून हात केला. कुणालही बराच वेळ टाटा करीत राहिला. गाडीने हळू हळू स्पीड पकडला होता.