लग्न हे दोन जीवांच्या एकमेकांवरील प्रेमाचे समाजमान्य स्वरूप आहे. कुटुंब व्यवस्थेला आधार देणारे आणि नात्यांमधील प्रेमाच्या बांधिलकीचे ते सुस्वरूप आहे. ही बांधिलकी आपणहून स्विकारलेली असल्याने त्याचे बंधन होणार नाही याची जबाबदारी कुटुंबातील सर्वांचीच असते.
लग्न विधी जर आपण नीट पाहिला अथवा अभ्यासला तर त्यात अनेक संस्काराची मालिका दिसून येते (अर्थात यात देश, वेश, भाषा, प्रांत, धर्म, जात इत्यादीनुसार वेगवेगळे रितीरिवाज व परंपरा दिसून येतात, पण सध्या तरी त्या सार्या बाजूला ठेऊन आपण मुलतः साधारण साधर्म्य या अनुषंगाने विचार करू.)
अग्नी, प्रजापती, किंवा कोणातरी सर्वमान्य वरिष्ठाला साक्षीदार ठेऊन या लग्नाच्या संस्कारात पती आणि पत्नीला काही नियम व त्यांची कर्तव्ये समजावली जातात. त्या दोघांना तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींनाही त्यांच्या बदललेल्या व वाढलेल्या जबाबदारींची जाणीव करून दिली जाते. सहजीवन जगत असताना, धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारही गोष्टींचे पालन करताना दोघेही पती पत्नी एकमेकांच्या विचाराने, विश्वासाने कुटुंब व्यवस्थेला तडा न देता आणि समाजहिताचे निर्णय घेतील या दृष्टीने हे नियम सांगितले गेले आहेत. अर्थात काळानुरूप आणि पुरूषप्रधान किंवा स्त्रीप्रधान मान्यतेनुसार या नियमांत, संस्कारात, अधिकाधिक ‘उच्चतम’ बदल होणे हे अपेक्षित, स्वीकारार्ह, अपरिहार्य आहे. पण हेच बदल जर लोकरंजनारूप, फॅशन म्हणून, पैशाची महती दाखवावी म्हणून होत असतील तर ते नक्कीच निषेधार्ह आहे.
मनोमिलन सोहळा
एका कौटुंबिक संस्कारातील एक व्यक्ती, आपले कुटुंब, नातेवाईक, सहचर, गाव, प्रदेश इत्यादी कायमचे सोडून दुसर्या एखाद्या कौटुंबिक संस्कारातील कुटुंबात, नातेवाईकांत, सहचरांत, गावात, प्रदेशात, आपली नवी जबाबदारी नवी ओळख घेऊन सामावून घेतली जाते तेव्हा त्या दोन्ही कुटुंबातील लोकांनी अत्यंत आनंदाने साजरा करण्याचा, सर्वांचे मनोमिलन घडवून आणण्याचा हा सोहळा आहे. लग्न सोहळ्याच्या विधींमध्ये दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांची ज्येष्ठता-श्रेष्ठता, मान-पान, मानसन्मान, अधिकार, कर्तव्ये लक्षात घेऊन विधींची मांडणी केली गेली आहे. परंतू यात दोन्ही कुटुंबातील आर्थिक परिस्थितीच्या कमी-जास्त प्रमाणानुसार तसेच अहंकार, प्रतिष्ठा, मानसिकता, समाजभीती या गोष्टींचा अतिरेक शिरल्यामुळे रूसवेफुगवे, मान-अपमान, अडवणूक, दिखावा इत्यादी गोष्टींचा प्रभाव वाढतो आणि दोन्ही पैकी कोणत्यातरी एका कुटुंबावर त्याचा दबाव येतो. पुष्कळदा हा दबाव मुलीकडच्या कुटुंबावर असायचा आणि आजही असतो. प्रसंगी कर्ज काढून लग्नातील हौस फिटवल्याची अनेक उदाहरणे दिसतील. आयुष्यात एकदाच विवाहसोहळा होणार असल्याने वधू-वरसुध्दा या हौसमौजेसाठी उत्सुक असतात.
बदललेले ‘फॅशन’ट्रेन्ड
समाजातील सर्वच गोष्टींमधील बदलांच्या क्रांतीमुळे या विवाह संस्कारांचे स्वरूप आमुलाग्रपणे बदलत चालले असून त्याला संस्कार किंवा सोहळ्यापेक्षा फॅशन/ट्रेन्डचे अवाजवी महत्त्व येत आहे. थोरामोठ्यांनी केलेल्या गोष्टींचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानली जात आहे. हा फक्त श्रीमंतांनीच आणि थोरामोठ्यांनीच आपल्या मुलांसाठी करण्याचा हक्क आहे असे नाही परंतू त्या गोष्टींचे अंधानुकरण करताना त्या खरोखरच अनुकरणीय व उपयुक्त आहेत का याचे भान राखणे आवश्यक आहे. खरं तर अतिरेक आणि उपयुक्तता याची सीमारेषा प्रत्येकाच्या वैचारीक मतानुसार ठरते. त्यामुळे अशावेळी दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी विचारपुर्वक विवाहप्रसंगी करण्यात येणाऱ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे व लोकरंजन अथवा फॅशन या समजुतीला बळी न पडता कृती करणे आवश्यक आहे.
या कुटुंबाव्यतिरीक्त समाजातील इतर बाह्य व्यक्ती, संस्था, माध्यमे ही विवाह सोहळ्याकडे नफा कमावण्याचा ‘व्यवसाय’ म्हणून बघायला लागल्याने एकंदरीतच या विवाह सोहळ्याचे ‘मार्केटींग’ ते मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे पुर्वीचे विवाह संस्काराचे महत्त्व बाजूला पडून इतर ट्रेन्ड विवाह सोहळ्यात घुसलेले दिसतात आणि ते ‘मॅनेज’ केले जातात. Destination weddings, pre wedding photo shoot, Drone cameras video shooting, Expensive Invitation Cards, Bride & Groom’s Makeup teams, fashion designers, 3/4 Receptions at different places and Total wedding packages हे आणि इत्यादी हल्ली होत असलेल्या विवाह कार्यक्रमांतील ट्रेन्ड दिसून येतात.
महत्त्व कशाला द्यायचे, कशासाठी द्यायचे याचा सारासार विचार करून अगदी कमीतकमी खर्चातही विवाह होऊ शकतात व त्याची उदाहरणे समाजासमोर अधिक मांडणे गरजेचे आहे. विवाह हा नफा कमवण्याचा व्यवसाय नसून, जबाबदारींची जाणीव करून देणारा संस्कार आहे याची समाजाला नव्याने जाणीव करून देण्याची गरज असल्याचे नमूद करावेसे वाटते.
लग्न विधी जर आपण नीट पाहिला अथवा अभ्यासला तर त्यात अनेक संस्काराची मालिका दिसून येते (अर्थात यात देश, वेश, भाषा, प्रांत, धर्म, जात इत्यादीनुसार वेगवेगळे रितीरिवाज व परंपरा दिसून येतात, पण सध्या तरी त्या सार्या बाजूला ठेऊन आपण मुलतः साधारण साधर्म्य या अनुषंगाने विचार करू.)
अग्नी, प्रजापती, किंवा कोणातरी सर्वमान्य वरिष्ठाला साक्षीदार ठेऊन या लग्नाच्या संस्कारात पती आणि पत्नीला काही नियम व त्यांची कर्तव्ये समजावली जातात. त्या दोघांना तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींनाही त्यांच्या बदललेल्या व वाढलेल्या जबाबदारींची जाणीव करून दिली जाते. सहजीवन जगत असताना, धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारही गोष्टींचे पालन करताना दोघेही पती पत्नी एकमेकांच्या विचाराने, विश्वासाने कुटुंब व्यवस्थेला तडा न देता आणि समाजहिताचे निर्णय घेतील या दृष्टीने हे नियम सांगितले गेले आहेत. अर्थात काळानुरूप आणि पुरूषप्रधान किंवा स्त्रीप्रधान मान्यतेनुसार या नियमांत, संस्कारात, अधिकाधिक ‘उच्चतम’ बदल होणे हे अपेक्षित, स्वीकारार्ह, अपरिहार्य आहे. पण हेच बदल जर लोकरंजनारूप, फॅशन म्हणून, पैशाची महती दाखवावी म्हणून होत असतील तर ते नक्कीच निषेधार्ह आहे.
मनोमिलन सोहळा
एका कौटुंबिक संस्कारातील एक व्यक्ती, आपले कुटुंब, नातेवाईक, सहचर, गाव, प्रदेश इत्यादी कायमचे सोडून दुसर्या एखाद्या कौटुंबिक संस्कारातील कुटुंबात, नातेवाईकांत, सहचरांत, गावात, प्रदेशात, आपली नवी जबाबदारी नवी ओळख घेऊन सामावून घेतली जाते तेव्हा त्या दोन्ही कुटुंबातील लोकांनी अत्यंत आनंदाने साजरा करण्याचा, सर्वांचे मनोमिलन घडवून आणण्याचा हा सोहळा आहे. लग्न सोहळ्याच्या विधींमध्ये दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांची ज्येष्ठता-श्रेष्ठता, मान-पान, मानसन्मान, अधिकार, कर्तव्ये लक्षात घेऊन विधींची मांडणी केली गेली आहे. परंतू यात दोन्ही कुटुंबातील आर्थिक परिस्थितीच्या कमी-जास्त प्रमाणानुसार तसेच अहंकार, प्रतिष्ठा, मानसिकता, समाजभीती या गोष्टींचा अतिरेक शिरल्यामुळे रूसवेफुगवे, मान-अपमान, अडवणूक, दिखावा इत्यादी गोष्टींचा प्रभाव वाढतो आणि दोन्ही पैकी कोणत्यातरी एका कुटुंबावर त्याचा दबाव येतो. पुष्कळदा हा दबाव मुलीकडच्या कुटुंबावर असायचा आणि आजही असतो. प्रसंगी कर्ज काढून लग्नातील हौस फिटवल्याची अनेक उदाहरणे दिसतील. आयुष्यात एकदाच विवाहसोहळा होणार असल्याने वधू-वरसुध्दा या हौसमौजेसाठी उत्सुक असतात.
बदललेले ‘फॅशन’ट्रेन्ड
समाजातील सर्वच गोष्टींमधील बदलांच्या क्रांतीमुळे या विवाह संस्कारांचे स्वरूप आमुलाग्रपणे बदलत चालले असून त्याला संस्कार किंवा सोहळ्यापेक्षा फॅशन/ट्रेन्डचे अवाजवी महत्त्व येत आहे. थोरामोठ्यांनी केलेल्या गोष्टींचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानली जात आहे. हा फक्त श्रीमंतांनीच आणि थोरामोठ्यांनीच आपल्या मुलांसाठी करण्याचा हक्क आहे असे नाही परंतू त्या गोष्टींचे अंधानुकरण करताना त्या खरोखरच अनुकरणीय व उपयुक्त आहेत का याचे भान राखणे आवश्यक आहे. खरं तर अतिरेक आणि उपयुक्तता याची सीमारेषा प्रत्येकाच्या वैचारीक मतानुसार ठरते. त्यामुळे अशावेळी दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी विचारपुर्वक विवाहप्रसंगी करण्यात येणाऱ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे व लोकरंजन अथवा फॅशन या समजुतीला बळी न पडता कृती करणे आवश्यक आहे.
या कुटुंबाव्यतिरीक्त समाजातील इतर बाह्य व्यक्ती, संस्था, माध्यमे ही विवाह सोहळ्याकडे नफा कमावण्याचा ‘व्यवसाय’ म्हणून बघायला लागल्याने एकंदरीतच या विवाह सोहळ्याचे ‘मार्केटींग’ ते मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे पुर्वीचे विवाह संस्काराचे महत्त्व बाजूला पडून इतर ट्रेन्ड विवाह सोहळ्यात घुसलेले दिसतात आणि ते ‘मॅनेज’ केले जातात. Destination weddings, pre wedding photo shoot, Drone cameras video shooting, Expensive Invitation Cards, Bride & Groom’s Makeup teams, fashion designers, 3/4 Receptions at different places and Total wedding packages हे आणि इत्यादी हल्ली होत असलेल्या विवाह कार्यक्रमांतील ट्रेन्ड दिसून येतात.
महत्त्व कशाला द्यायचे, कशासाठी द्यायचे याचा सारासार विचार करून अगदी कमीतकमी खर्चातही विवाह होऊ शकतात व त्याची उदाहरणे समाजासमोर अधिक मांडणे गरजेचे आहे. विवाह हा नफा कमवण्याचा व्यवसाय नसून, जबाबदारींची जाणीव करून देणारा संस्कार आहे याची समाजाला नव्याने जाणीव करून देण्याची गरज असल्याचे नमूद करावेसे वाटते.
1 Comment
पुर्वी लग्नासाठी विशिष्ठ ठराविक मुहूर्त व दिवस असायचे. हल्ली तर केव्हाही लग्ने लावली जातात. अगदी पावसाळ्यात, अधिक महिन्यात, मंगल कार्यासाठी निषिद्ध मानल्या गेलेल्या पौष महिन्यात… हाॅल मिळेल तो दिवस लग्नाचा आणि मुहूर्ताचे काही विचारूच नका. पत्रिकेत लिहीलेल्या अचूक मुहूर्तावर लागलेली फार कमी. उधळपट्टी व दिखावा जास्त.