“जनतेसाठी काम करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. राष्ट्रऋण फेडण्यासारखे दुसरे सुखावह काम असूच शकत नाही. खासगी क्षेत्रात काम करत असतांना ह्या आनंदाला मर्यादा पडतात. तिथे वेतन, जीवनशैली वेगळ्या प्रकारची असते; हे मान्य केले तरीपण माझं व्यक्तिगत मत विचाराल तर; आज मी ज्या पोलीस सेवेत कार्यरत आहे; तिथे मला मिळणारं समाधान अलौकिक आहे.” आयआयटी खरगपूर येथून बी. टेक्.,एम. टेक्. ह्या पदव्या प्राप्त करून, जर्मनी-इटलीसारख्या देशांत तर भारतात गुरगांव, नॉइडा, बंगलोर अशा ठिकाणी खासगी क्षेत्रात काम केलेले राजतिलक रोशन प्रांजळ मत व्यक्त करतात. राजतिलक रोशन हे सध्या पालघर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
राजतिलक रोशन ह्यांनी पाच वर्षं खासगी सेवाक्षेत्रांत उच्च पदावर काम केले आहे. त्यांचे वडील, बहीण आणि बहिणीचे पतीसुद्धा डॉक्टर आहेत. त्यांना उच्च शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. मात्र घरांतून त्यांना पूर्णपणे निर्णयस्वातंत्र्य मिळाले आणि परिवार कायम खंबीरपणे पाठीशी राहतो; असं ते आवर्जून सांगतात. खासगी सेवाक्षेत्रांत कार्यरत असतानाच देशासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्पर्धापरीक्षांची तयारी केली आणि ते उत्तीर्ण झाले. निवांत चाललेले आयुष्य धावपळ आणि दगदगीचे झाले.
भारतीय पोलीस दलात सामील झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक पूर्णा पोलीस ठाण्यात जिल्हा उप अधीक्षक म्हणून झाली. अर्थात हे प्रोबेशन होते आणि त्यानंतर त्यांची नेमणूक उस्मानाबाद जिल्ह्यात झाली. “इथे पहिलीच केस एका तरुणीच्या हत्येसंदर्भात होती. फारसे पुरावे हाती नसतांनासुद्धा अवघ्या दहा दिवसांत ह्या गुह्याची कौशल्याने उकल करून आम्ही आरोपींना गजाआड केले. ह्या यशस्वी आणि वेगवान कामगिरीमुळे त्यावेळी आयजी साहेबांची शाबासकी मिळाली आणि आत्मविश्वास दुणावला. ही केस महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहे. एकप्रकारे मी हा माझा गौरवच मानतो.” असं ते सांगतात. तुळजापूर येथे पदभार सांभाळत असतांना रोशन ह्यांनी तेथील यात्रेच्या निधीमध्ये झालेल्या १ कोटी ६२ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची ९५ टक्के चौकशी एक महिन्यात पूर्ण करून काही राजकीय नेते-पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी ह्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता.
पालघर जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी विशेष काम सुरु केले आहे. ह्याचे प्रमाण ६६ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांवर नेण्यात त्यांना यश आले आहे. ह्या कामगिरीसंदर्भात बोलतांना ते सांगतात की, “हरवलेल्या व्यक्तींना शोधणे हे प्राधान्यक्रमाचे मानले गेले आहे. पालघर जिल्ह्यात मुले हरवण्याचे प्रमाण अधिक आहे. ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ६ कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे. अगदी १९९९ पासूनच्या काही प्रकरणांचा नव्याने तपास सुरु करण्यात आलेला आहे. काही जुनी प्रकरणे निकाली लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे.”
निरपराध नागरिकांवर खोटे गुन्हे नोंदविले जातात; ह्या प्रकाराबद्दल ते उद्विग्न होतात. ते म्हणतात की, “अशा प्रकारांमुळे पोलिसांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होते. ते अयोग्य आहे. अशी प्रवृत्ती पोलीसदलासाठी मारक आहे.” ते पुढे म्हणाले की, “सचोटीने काम करणाऱ्या तरुणांचा टक्का ह्या क्षेत्रात वाढायला हवा. आपल्या हातून देशसेवा घडते आणि नागरिकांवरील अन्याय दूर करण्याचे आपण माध्यम बनतो, हे समाधान बहुमोल आहे.” आज वाढत चाललेल्या सायबर गुह्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, “सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा जपून वापर करायला हवा. त्याच्या आहारी जाऊन वाहवत जाणे केव्हाही धोक्याचे आहे. ‘सावधपण सोडू नये’ ही संतांची शिकवण कायम ध्यानात ठेवायला हवी. सोशल मीडियावर आपला वेळ फुकट घालवत बसण्यापेक्षा आपले करियर घडविण्यात, समाजाचे ऋण फेडण्यात आणि देशहिताचे काम करण्यात वेळ सत्कारणी लावायला हवा. म्हणजे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्याससुद्धा हातभार लागेल.”
राजतिलक रोशन ह्यांनी पाच वर्षं खासगी सेवाक्षेत्रांत उच्च पदावर काम केले आहे. त्यांचे वडील, बहीण आणि बहिणीचे पतीसुद्धा डॉक्टर आहेत. त्यांना उच्च शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. मात्र घरांतून त्यांना पूर्णपणे निर्णयस्वातंत्र्य मिळाले आणि परिवार कायम खंबीरपणे पाठीशी राहतो; असं ते आवर्जून सांगतात. खासगी सेवाक्षेत्रांत कार्यरत असतानाच देशासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्पर्धापरीक्षांची तयारी केली आणि ते उत्तीर्ण झाले. निवांत चाललेले आयुष्य धावपळ आणि दगदगीचे झाले.
भारतीय पोलीस दलात सामील झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक पूर्णा पोलीस ठाण्यात जिल्हा उप अधीक्षक म्हणून झाली. अर्थात हे प्रोबेशन होते आणि त्यानंतर त्यांची नेमणूक उस्मानाबाद जिल्ह्यात झाली. “इथे पहिलीच केस एका तरुणीच्या हत्येसंदर्भात होती. फारसे पुरावे हाती नसतांनासुद्धा अवघ्या दहा दिवसांत ह्या गुह्याची कौशल्याने उकल करून आम्ही आरोपींना गजाआड केले. ह्या यशस्वी आणि वेगवान कामगिरीमुळे त्यावेळी आयजी साहेबांची शाबासकी मिळाली आणि आत्मविश्वास दुणावला. ही केस महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहे. एकप्रकारे मी हा माझा गौरवच मानतो.” असं ते सांगतात. तुळजापूर येथे पदभार सांभाळत असतांना रोशन ह्यांनी तेथील यात्रेच्या निधीमध्ये झालेल्या १ कोटी ६२ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची ९५ टक्के चौकशी एक महिन्यात पूर्ण करून काही राजकीय नेते-पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी ह्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता.
पालघर जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी विशेष काम सुरु केले आहे. ह्याचे प्रमाण ६६ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांवर नेण्यात त्यांना यश आले आहे. ह्या कामगिरीसंदर्भात बोलतांना ते सांगतात की, “हरवलेल्या व्यक्तींना शोधणे हे प्राधान्यक्रमाचे मानले गेले आहे. पालघर जिल्ह्यात मुले हरवण्याचे प्रमाण अधिक आहे. ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ६ कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे. अगदी १९९९ पासूनच्या काही प्रकरणांचा नव्याने तपास सुरु करण्यात आलेला आहे. काही जुनी प्रकरणे निकाली लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे.”
निरपराध नागरिकांवर खोटे गुन्हे नोंदविले जातात; ह्या प्रकाराबद्दल ते उद्विग्न होतात. ते म्हणतात की, “अशा प्रकारांमुळे पोलिसांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होते. ते अयोग्य आहे. अशी प्रवृत्ती पोलीसदलासाठी मारक आहे.” ते पुढे म्हणाले की, “सचोटीने काम करणाऱ्या तरुणांचा टक्का ह्या क्षेत्रात वाढायला हवा. आपल्या हातून देशसेवा घडते आणि नागरिकांवरील अन्याय दूर करण्याचे आपण माध्यम बनतो, हे समाधान बहुमोल आहे.” आज वाढत चाललेल्या सायबर गुह्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, “सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा जपून वापर करायला हवा. त्याच्या आहारी जाऊन वाहवत जाणे केव्हाही धोक्याचे आहे. ‘सावधपण सोडू नये’ ही संतांची शिकवण कायम ध्यानात ठेवायला हवी. सोशल मीडियावर आपला वेळ फुकट घालवत बसण्यापेक्षा आपले करियर घडविण्यात, समाजाचे ऋण फेडण्यात आणि देशहिताचे काम करण्यात वेळ सत्कारणी लावायला हवा. म्हणजे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्याससुद्धा हातभार लागेल.”