“परिस्थितीचे आकलन करून आणि वेळेची गरज ओळखून आपल्या व्यवसायात कालसापेक्ष बदल केले; तर व्यवसायात स्थैर्य प्राप्त करणे कठीण नसते. आपली दृष्टी थोडी काळाचा वेध घेणारी असायला हवी. हे ज्याला जमते; त्याला व्यवसायासाठी कुठल्या प्रांताचे अथवा ‘अमराठी’ असणे गरजेचे नसते. मराठी माणूससुद्धा व्यवसायात घोडदौड करू शकतो.”
गेली ३७ वर्षे, म्हणजे साधारणतः १९८०-८१पासून मुंबईच्या गुजराती उद्योजकबहुल पश्चिम उपनगरात प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय यशस्वीपणे करणारे आणि बाजारपेठेत आपल्या ‘सुपर ऑप्टिकल इंडस्ट्रीज’ तसेच ‘जे. एन्. इनोव्हेशन्स’ ह्या कंपनीची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, प्रदीप कापदुले हे मराठी युवा उद्योजक आपल्या व्यावसायिक यशाचे मर्म सांगताना माहिती देत होते.
चष्म्याच्या फ्रेम्स आणि त्याप्रकारचे उपयोगी साहित्य बनविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या वडिलांनी म्हणजे सोनुभाऊ बी. कापदुले ह्यांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्याकाळी अतिशय बिकट परिस्थितीत कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मोर्डे या छोट्याश्या गावातून मुंबई मध्ये नोकरी करण्यासाठी आलेल्या सोनुभाऊ यांनी नोकरी सांभाळूनच एकीकडे या चष्म्याच्या फ्रेम्स बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. जम बसू लागल्यावर वेगवेगळ्या ब्रॅण्ड कंपन्यांकडे स्वतःच जाऊन फ्रेम्स च्या ऑर्डर्स मिळवण्यासाठी खूप मेहनत केली. त्या मेहनतीला हळूहळू यश मिळत गेले व सुपर ऑप्टिकल इंडस्ट्रीजचा जन्म झाला. पुढे प्रदीपजींनी आपले शिक्षण पूर्ण करता करताच वडिलांना त्यांच्या कामात मदत करायला सुरुवात केली. आपले संभाषण चातुर्य, व्यवसायकौशल्याने ह्या व्यवसायाला आधुनिक यंत्रणा आणि विपणनाची अचूक जोड देऊन प्रदीपजींनी व्यवसायाचा विस्तार केला.
ते सांगतात की, “सुरुवातीच्या त्या काळात मुक्त आर्थिक व्यवस्थेमुळे भारताची बाजारपेठ सर्वांसाठी खुली झाली आणि चिनी कंपन्यांनी भारतात जोरदार मुसंडी मारली. चिनी माल स्वस्तात मिळू लागल्याने भारतातल्या अनेक कंपन्या त्यावेळी बंद पडल्या. चष्म्यासंबंधी उत्पादन करणाऱ्या आमच्यासारख्या अनेक उद्योजकांना ह्याचा फटका बसला होता. “पण त्याचवेळी दूरदृष्टी दाखवून त्यांनी मोल्डिंगच्या व्यवसायाला प्रारंभ केलेला होता. त्या निर्णयाबाबत ते सांगतात की, “प्रत्येक उद्योगाला विशिष्ट काळानंतर मंदीला किंवा संकटाला सामोरे जावेच लागते. त्यामुळे आधीपासूनच आपल्याला तशी तयारी ठेवावी लागते. हे समजून जर आपण पूर्वतयारी केली; तर जो जोरदार फटका बसण्याची शक्यता असते; त्याची तीव्रता कमी राहते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सुचना-सल्ल्यानुसार आम्ही त्या काळात नेमकं हेच केलं. चष्मे, गाॅगल्स यांच्या फ्रेम्स बनवण्यासोबतच चष्म्याचे कव्हर बनवायला सुरुवात केली. म्हणजे आमच्या उद्योगातच वेगळ्या शाखांचे उत्पादन सुरू केले.”
आता तर कॉंटॅक्ट लेन्सपासून चष्म्यासंबंधी लागणारी अनेक उत्पादने, मॉल्समध्ये लागणारे डिस्प्ले, त्यांचे फिक्च्शर्स वगैरे घटकसुद्धा प्रदीपजींची कंपनी बनवते. ते आवर्जून एक गोष्ट सांगतात की, “ह्या क्षेत्रात ‘मार्केट स्टडी’ अतिशय महत्त्वाचा असतो. तो आम्ही नेहमी करत असतो. ग्राहकाला नेमकं काय हवंय ते माहीत करून आपण उत्पादन केले तर नुकसान होण्याचा धोका कमी राहतो.”
“गरजेप्रमाणे तंत्रज्ञान आयात केल्याने गुणवत्तापूर्ण उत्पादन कमीत कमी वेळात ग्राहकांपर्यंत नेण्याचा आमचा लौकिक आम्ही कायम ठेवू शकलो. त्यामुळे कॉर्पोरेट स्तरावर टिकून राहण्यात यश मिळाले.” आपल्या धोरणाच्या अचूकतेविषयी अभिमानाने माहिती देतांना प्रदीपजी सांगतात की, “नवी धोरणे अवलंबत असताना आधीच्या पिढीसोबत मतभेद होऊ शकतात. कारण त्यांची मते, अनुभव वेगळे असतात आणि पिढी बदलल्यामुळे आपले अनुभव वेगळे असतात. पूर्वी फेस टू फेस मार्केटिंग होत असे. आता ऑनलाईनचा जमाना आहे. हे ज्येष्ठ मंडळींच्या पचनी पडायला थोडाफार वेळ लागतो. पण हिंमत न हारता आपण नव्या पद्धतींचा फायदा दाखवून दिला की, परिवर्तन होतच असते. त्यामुळे पंधरा वर्षांपूर्वी ऑनलाईनची व्यवस्था केल्याचा फायदा सर्वानाच आज जाणवतो आहे. दहा वर्षांपूर्वी आमची www.superopticase.com ही वेबसाईट सुरू केल्याचा आज आम्हाला व्यावसायिक फायदा मिळतो आहे.”
व्यवसाय ही एक शाळा आहे आणि दरदिवशी तुम्हाला नवनवे काही ना काही शिकायला मिळते. त्या शिक्षणाचा अचूक वापर व्यवसायात करता यायला हवा. व्यवसाय म्हटला की स्पर्धा आलीच. मग अशावेळी आपल्या अनुभवांचा तिथे खुबीने वापर करता येतो आणि व्यवसाय पुढे नेता येतो. प्रदीपजींचे अनुभवाचे हे बोल नव्या उद्योजकांना नक्कीच मार्गदर्शक ठरणारे आहेत. परिस्थितीची गरज, वेळेची मागणी ओळखून गणिते आखली की व्यवसायात वजाबाकी करावी लागत नाही; ह्या तत्त्वाचा पुरेपूर वापर ते कसा करतात; हे खरोखरच समजून घेण्यासारखे आहे. एक तर स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी आजही त्यांना काही प्रमाणात कच्च्या मालाची आयात करावी लागते पण ‘मेक इन इंडिया’ या धोरणानुसार जास्तीत जास्त उत्पादन आपल्या इथेच तयार करण्यावर त्यांचा विशेष भर असतो. तसेच कंपनीमध्ये प्लास्टिकचे रिसायकलिंग केले जातेच; पण भविष्यात प्लास्टिक हद्दपार झाले तर काम अडून राहता कामा नये म्हणून आत्तापासूनच कापडी पाऊच, पत्र्याच्या डब्या असे पर्याय तयार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ग्राहकांकडून त्याचे उत्तम स्वागत होत आहे.
आपल्या व्यावसायिक अनुभवाच्या बळावर मराठी तरुणांना ते काय सल्ला देऊ इच्छितात, असे विचारल्यावर ते उत्साहाने उत्तरतात की, “मराठी तरूण यशस्वी उद्योजक होऊ शकतो, धाडस करण्याची आणि भविष्याचा वेध घेण्याची वृत्ती असायला हवी. संकटे येत असतातच. त्यांना हुशारीने सामोरे जायला हवे. आताचेच पाहा ना, नोटाबंदी लागू झाली, जीएसटीसारखा नवा निर्णय लागू झाला, ह्याचा परिणाम नक्कीच झाला. पण आता पुन्हा सर्वंकाही सुरळीत होत आहे. जराजराशा बदलांनी खचून जाता उपयोगाचे नाही. समस्येतून मार्ग काढत पुढे जायला शिकायला हवे. हे ज्याला जमते; तो खरा उद्योजक!”
प्रदीपजींनी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून ते उपयोगात आणले आहे. रोजच नवे काही शिकण्याचा त्यांचा ध्यास आहे. आपल्या कंपन्यांमध्ये अनेकविध उत्पादने तयार व्हायला हवीत; ही त्यांची मनीषा आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यायची त्यांची तयारीसुद्धा आहे. त्यांच्या दोन्ही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचा-यांच्या वैयक्तिक अडचणी, त्यांना नवीन तंत्रज्ञान, कौशल्य, ज्ञान शिकण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात प्रोत्साहन देतात, मदत करतात. उद्योग व्यवसायातून मिळालेल्या यशामागच्या सामाजिक जबाबदारीचे भानही त्यांनी कायम लक्षात ठेवले आहे.
आजवर त्यांनी जे यश आणि जो लौकिक प्राप्त केलाय त्याचे सर्वं श्रेय ते सर्व प्रथम आपले देव आणि गुरू समान वडील, कुटुंबातील सर्व सदस्य जसे की आई, भाऊ, बहिणी, भाऊजी या साऱ्यांचा वेळोवेळी मिळणारा पाठिंबा, मार्गदर्शन, प्रेम आणि बायकोची मोलाची साथ तसेच नेहमी हुरूप वाढविणारे स्नेही, पाठीराखे, सहकारी कर्मचारी आणि ग्राहकांना देतात. काळाच्या पुढचा विचार करून आपली व्यावसायिक ध्येयधोरणे आखत परिस्थितीला वश करण्याची कला अवगत केलेल्या ह्या मराठमोळया उद्योजकाचा सर्वांनीच आदर्श घेऊन आपापल्या व्यवसायउद्योगात प्रगती साधायला हवी.
गेली ३७ वर्षे, म्हणजे साधारणतः १९८०-८१पासून मुंबईच्या गुजराती उद्योजकबहुल पश्चिम उपनगरात प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय यशस्वीपणे करणारे आणि बाजारपेठेत आपल्या ‘सुपर ऑप्टिकल इंडस्ट्रीज’ तसेच ‘जे. एन्. इनोव्हेशन्स’ ह्या कंपनीची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, प्रदीप कापदुले हे मराठी युवा उद्योजक आपल्या व्यावसायिक यशाचे मर्म सांगताना माहिती देत होते.
चष्म्याच्या फ्रेम्स आणि त्याप्रकारचे उपयोगी साहित्य बनविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या वडिलांनी म्हणजे सोनुभाऊ बी. कापदुले ह्यांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्याकाळी अतिशय बिकट परिस्थितीत कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मोर्डे या छोट्याश्या गावातून मुंबई मध्ये नोकरी करण्यासाठी आलेल्या सोनुभाऊ यांनी नोकरी सांभाळूनच एकीकडे या चष्म्याच्या फ्रेम्स बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. जम बसू लागल्यावर वेगवेगळ्या ब्रॅण्ड कंपन्यांकडे स्वतःच जाऊन फ्रेम्स च्या ऑर्डर्स मिळवण्यासाठी खूप मेहनत केली. त्या मेहनतीला हळूहळू यश मिळत गेले व सुपर ऑप्टिकल इंडस्ट्रीजचा जन्म झाला. पुढे प्रदीपजींनी आपले शिक्षण पूर्ण करता करताच वडिलांना त्यांच्या कामात मदत करायला सुरुवात केली. आपले संभाषण चातुर्य, व्यवसायकौशल्याने ह्या व्यवसायाला आधुनिक यंत्रणा आणि विपणनाची अचूक जोड देऊन प्रदीपजींनी व्यवसायाचा विस्तार केला.
ते सांगतात की, “सुरुवातीच्या त्या काळात मुक्त आर्थिक व्यवस्थेमुळे भारताची बाजारपेठ सर्वांसाठी खुली झाली आणि चिनी कंपन्यांनी भारतात जोरदार मुसंडी मारली. चिनी माल स्वस्तात मिळू लागल्याने भारतातल्या अनेक कंपन्या त्यावेळी बंद पडल्या. चष्म्यासंबंधी उत्पादन करणाऱ्या आमच्यासारख्या अनेक उद्योजकांना ह्याचा फटका बसला होता. “पण त्याचवेळी दूरदृष्टी दाखवून त्यांनी मोल्डिंगच्या व्यवसायाला प्रारंभ केलेला होता. त्या निर्णयाबाबत ते सांगतात की, “प्रत्येक उद्योगाला विशिष्ट काळानंतर मंदीला किंवा संकटाला सामोरे जावेच लागते. त्यामुळे आधीपासूनच आपल्याला तशी तयारी ठेवावी लागते. हे समजून जर आपण पूर्वतयारी केली; तर जो जोरदार फटका बसण्याची शक्यता असते; त्याची तीव्रता कमी राहते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सुचना-सल्ल्यानुसार आम्ही त्या काळात नेमकं हेच केलं. चष्मे, गाॅगल्स यांच्या फ्रेम्स बनवण्यासोबतच चष्म्याचे कव्हर बनवायला सुरुवात केली. म्हणजे आमच्या उद्योगातच वेगळ्या शाखांचे उत्पादन सुरू केले.”
आता तर कॉंटॅक्ट लेन्सपासून चष्म्यासंबंधी लागणारी अनेक उत्पादने, मॉल्समध्ये लागणारे डिस्प्ले, त्यांचे फिक्च्शर्स वगैरे घटकसुद्धा प्रदीपजींची कंपनी बनवते. ते आवर्जून एक गोष्ट सांगतात की, “ह्या क्षेत्रात ‘मार्केट स्टडी’ अतिशय महत्त्वाचा असतो. तो आम्ही नेहमी करत असतो. ग्राहकाला नेमकं काय हवंय ते माहीत करून आपण उत्पादन केले तर नुकसान होण्याचा धोका कमी राहतो.”
“गरजेप्रमाणे तंत्रज्ञान आयात केल्याने गुणवत्तापूर्ण उत्पादन कमीत कमी वेळात ग्राहकांपर्यंत नेण्याचा आमचा लौकिक आम्ही कायम ठेवू शकलो. त्यामुळे कॉर्पोरेट स्तरावर टिकून राहण्यात यश मिळाले.” आपल्या धोरणाच्या अचूकतेविषयी अभिमानाने माहिती देतांना प्रदीपजी सांगतात की, “नवी धोरणे अवलंबत असताना आधीच्या पिढीसोबत मतभेद होऊ शकतात. कारण त्यांची मते, अनुभव वेगळे असतात आणि पिढी बदलल्यामुळे आपले अनुभव वेगळे असतात. पूर्वी फेस टू फेस मार्केटिंग होत असे. आता ऑनलाईनचा जमाना आहे. हे ज्येष्ठ मंडळींच्या पचनी पडायला थोडाफार वेळ लागतो. पण हिंमत न हारता आपण नव्या पद्धतींचा फायदा दाखवून दिला की, परिवर्तन होतच असते. त्यामुळे पंधरा वर्षांपूर्वी ऑनलाईनची व्यवस्था केल्याचा फायदा सर्वानाच आज जाणवतो आहे. दहा वर्षांपूर्वी आमची www.superopticase.com ही वेबसाईट सुरू केल्याचा आज आम्हाला व्यावसायिक फायदा मिळतो आहे.”
व्यवसाय ही एक शाळा आहे आणि दरदिवशी तुम्हाला नवनवे काही ना काही शिकायला मिळते. त्या शिक्षणाचा अचूक वापर व्यवसायात करता यायला हवा. व्यवसाय म्हटला की स्पर्धा आलीच. मग अशावेळी आपल्या अनुभवांचा तिथे खुबीने वापर करता येतो आणि व्यवसाय पुढे नेता येतो. प्रदीपजींचे अनुभवाचे हे बोल नव्या उद्योजकांना नक्कीच मार्गदर्शक ठरणारे आहेत. परिस्थितीची गरज, वेळेची मागणी ओळखून गणिते आखली की व्यवसायात वजाबाकी करावी लागत नाही; ह्या तत्त्वाचा पुरेपूर वापर ते कसा करतात; हे खरोखरच समजून घेण्यासारखे आहे. एक तर स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी आजही त्यांना काही प्रमाणात कच्च्या मालाची आयात करावी लागते पण ‘मेक इन इंडिया’ या धोरणानुसार जास्तीत जास्त उत्पादन आपल्या इथेच तयार करण्यावर त्यांचा विशेष भर असतो. तसेच कंपनीमध्ये प्लास्टिकचे रिसायकलिंग केले जातेच; पण भविष्यात प्लास्टिक हद्दपार झाले तर काम अडून राहता कामा नये म्हणून आत्तापासूनच कापडी पाऊच, पत्र्याच्या डब्या असे पर्याय तयार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ग्राहकांकडून त्याचे उत्तम स्वागत होत आहे.
आपल्या व्यावसायिक अनुभवाच्या बळावर मराठी तरुणांना ते काय सल्ला देऊ इच्छितात, असे विचारल्यावर ते उत्साहाने उत्तरतात की, “मराठी तरूण यशस्वी उद्योजक होऊ शकतो, धाडस करण्याची आणि भविष्याचा वेध घेण्याची वृत्ती असायला हवी. संकटे येत असतातच. त्यांना हुशारीने सामोरे जायला हवे. आताचेच पाहा ना, नोटाबंदी लागू झाली, जीएसटीसारखा नवा निर्णय लागू झाला, ह्याचा परिणाम नक्कीच झाला. पण आता पुन्हा सर्वंकाही सुरळीत होत आहे. जराजराशा बदलांनी खचून जाता उपयोगाचे नाही. समस्येतून मार्ग काढत पुढे जायला शिकायला हवे. हे ज्याला जमते; तो खरा उद्योजक!”
प्रदीपजींनी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून ते उपयोगात आणले आहे. रोजच नवे काही शिकण्याचा त्यांचा ध्यास आहे. आपल्या कंपन्यांमध्ये अनेकविध उत्पादने तयार व्हायला हवीत; ही त्यांची मनीषा आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यायची त्यांची तयारीसुद्धा आहे. त्यांच्या दोन्ही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचा-यांच्या वैयक्तिक अडचणी, त्यांना नवीन तंत्रज्ञान, कौशल्य, ज्ञान शिकण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात प्रोत्साहन देतात, मदत करतात. उद्योग व्यवसायातून मिळालेल्या यशामागच्या सामाजिक जबाबदारीचे भानही त्यांनी कायम लक्षात ठेवले आहे.
आजवर त्यांनी जे यश आणि जो लौकिक प्राप्त केलाय त्याचे सर्वं श्रेय ते सर्व प्रथम आपले देव आणि गुरू समान वडील, कुटुंबातील सर्व सदस्य जसे की आई, भाऊ, बहिणी, भाऊजी या साऱ्यांचा वेळोवेळी मिळणारा पाठिंबा, मार्गदर्शन, प्रेम आणि बायकोची मोलाची साथ तसेच नेहमी हुरूप वाढविणारे स्नेही, पाठीराखे, सहकारी कर्मचारी आणि ग्राहकांना देतात. काळाच्या पुढचा विचार करून आपली व्यावसायिक ध्येयधोरणे आखत परिस्थितीला वश करण्याची कला अवगत केलेल्या ह्या मराठमोळया उद्योजकाचा सर्वांनीच आदर्श घेऊन आपापल्या व्यवसायउद्योगात प्रगती साधायला हवी.