दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सतरा ह्या दिवसाची संध्याकाळ दीर्घकाळ स्मरणात राहील, अशीच होती. त्या संध्याकाळी मी मैसूरच्या ‘रंगायन’ ह्या ब.व.कारन्थ यांनी कर्नाटक सरकारच्या सहकार्याने स्थापन केलेल्या रेपर्टरीमध्ये आमच्या ‘ध्वनिरन्ग’ ह्या हिंदी थियाट्रिकल गाण्यांच्या कोलाजचा प्रयोग सादर केला. प्रयोग नेहमीसारखाच उस्फुर्त आणि श्रोत्यांच्या प्रतिसादाने उत्तरोत्तर फुलत गेला. प्रयोग झाल्यावर दोन गृहस्थ आम्हाला भेटण्याकरता म्हणून बॅकस्टेजला आले. दोघेही मोडकीतोडकी हिंदी बोलत होते. स्वाभाविकच होतं ते. गेली तीस ते पस्तीस वर्षं मैसूरमध्ये कामनिमित्त स्थायिक झालेले ते दोघेजण कानडी हेलात हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी माझं नाव सांगताच दोघांचेही डोळे लकाकले आणि त्या दोघांनी आपला परिचय सांगत अस्खलित मराठीत ते म्हणाले, “मी माधव खरे आणि हे जयराम पाटील.”
दोघांची नावं ऐकल्याबरोबर मात्र मी उडालोच आणि मग आपलीच माणसं भेटल्यागत सरळ मराठीवर उतरलो. पुढचा दीड तास जी मैफल रंगली गप्पांची, त्याला तोड नव्हती. माधव खरे हा माणूस गेली तीस वर्षं तिथे स्थायिक आहे नोकरीच्यानिमित्ताने. पण मराठी साहित्य आणि विशेषतः नाटकाविषयी आजही आस्था बाळगून असलेला. खरं आश्चर्य तर जयराम पाटील ह्या गृहस्थाचं. हा तसा मूळ मुंबईकरच. सत्तरीच्या दशकात मुलुंड, ठाणे ते पार डोंबिवलीपर्यंत वस्ती करून राहिलेला. आमचा प्रयोग झाल्यावर त्यांनी पहिली आठवण सांगितली ती दादरच्या छबिलदासची. तिथे तीन रुपयांचं तिकीट काढून अमोल पालेकर, नाना, नसीर आणि दुबेजींच्या नाटकांची असंख्य पारायणं केल्याची आठवण सांगताना हा माणूस भलताच नॉस्टॅल्जिक झाला होता. आमच्या प्रयोगातल्या ‘महानिर्वाण’मधल्या माझ्या स्वगतानंतर ते ट्रान्समध्ये गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि डोळ्यासमोर आला कारन्थसाहेबांनी केलेला भाऊरावचा रोल. तेव्हा उगाचच अंगावर मूठभर मांस चढू लागल्याचं मला जाणवलं. त्यानंतर सलग दीड तास हा माणूस केवळ आणि केवळ ‘कारन्थजी’ ह्या एकाच विषयावर बोलत राहिला आणि मी मुग्ध होऊन ऐकत राहिलो. कारन्थसाहेबांनी पाहिलेलं स्वप्न. ते प्रत्यक्षात आणताना सगळ्याच पातळीवर घेतलेले अपार कष्ट. अभिनेत्यांसोबत काम करण्याच्या त्यांच्या पद्धती आणि बरंच काही…!
जुने वैभवाचे दिवस आठवत असताना सध्याच्या रेपर्टरीच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल बोलताना ह्या माणसाच्या मनातली खंत जाणवत होती. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचवेळेस समकालीन मराठी रंगभूमीविषयी असलेली आस्थाही डोकावत होती. विशेषतः अतुल पेठे यांच्या ‘सत्यशोधक’ ह्या नाटकाबद्दल खूप भरभरून बोलत होते जयराम पाटील. गप्पांच्या ओघात नाटकाव्यतिरिक्त ह्या माणसाचे इतरही अनेक पैलू असल्याचे जाणवत गेले. जयराम पाटील आणि त्यांच्या पत्नी रजनी पाटील, दोघेही पराकोटीचे प्राणिप्रेमी आहेत. त्यांच्या घरी असलेल्या सहा वेगवेगळ्या जातींचे कुत्रे आणि घराच्या आवारात मनमुराद फिरणार्या खारी पाहून आणि त्यांच्या पोटापाण्याची यांनी केलेली व्यवस्था पाहून रजनी पाटलांना मी म्हणालो की, तुमचं घर म्हणजे प्राणीसंग्रहालय आहे. त्या मुळातच कानडी असल्याने मराठी आणि हिंदी समजण्याचा प्रश्न नव्हता. मग प्राणीसंग्रहालय ह्या शब्दाचं इंग्रजीत ‘झू’ असं भाषांतर करून सांगितल्यावर त्या ज्या गडगडाटी हसल्या की विचारता सोय नाही. दर वर्षाच्या फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास हे जोडपं ‘बाय रोड’ भारतवारी करतं आणि वर्षातून तीनदा हेमलकसाला आवर्जून भेट देतं. प्रकाश आमटेंबद्दल अपरंपार आदर आहे ह्या दोघांच्या मनात. त्यांचा असा ठाम विश्वास आहे की आमटेसारखी माणसं आज अवतीभवती असल्याकारणानेच माणुसकीचा तोल साधला गेलाय. आपण म्हणतो तितका समाज काही अजुन रसातळाला गेलाय, असं त्यांना वाटत नाही. ह्या सगळ्या गप्पा चालू असताना पान चघळण्याची त्यांची सवय पाहून मला दामुकाका केंकरेंची आठवण येत होती.
माझ्यासाठी व्यक्तिगत अविस्मरणीय क्षण म्हणजे कारंतजींनी निर्माण केलेल्या आणि फुलवलेल्या दोन्ही रेपर्टरी म्हणजे ‘भारत भवन रंगमंडल, भोपाळ’ आणि ‘रंगायन’ ह्या वास्तूंना भेट देता आली. नुसतीच भेट नाही तर तिथे पर्फॉर्म करण्याची संधीसुद्धा लाभली. कारन्थजी या माणसाबद्दल मी काय बोलणार? त्यांनी उभं केलेलं कामच बोलतं त्यांच्याबद्दल. मला हा माणूस ‘रन्गऋषि’ वाटतो. कदाचित म्हणूनच सगळ्यांसाठी ते ‘बाबा’ कारन्थ होते. आपल्या जन्मभूमीपासून दूर जाऊन दुसर्या अपरिचित ठिकाणी नाट्यविश्व उभारणं आणि ते उभारून झाल्यावर तिथला कसलाही मोह न बाळगता ते तिथेच सोडून नव्या वाटा शोधायला निघून जाणे, हा ह्या माणसाचा जीवनक्रम होता… बाबुकोडी व्यंकटरमण कारन्थ!
दोघांची नावं ऐकल्याबरोबर मात्र मी उडालोच आणि मग आपलीच माणसं भेटल्यागत सरळ मराठीवर उतरलो. पुढचा दीड तास जी मैफल रंगली गप्पांची, त्याला तोड नव्हती. माधव खरे हा माणूस गेली तीस वर्षं तिथे स्थायिक आहे नोकरीच्यानिमित्ताने. पण मराठी साहित्य आणि विशेषतः नाटकाविषयी आजही आस्था बाळगून असलेला. खरं आश्चर्य तर जयराम पाटील ह्या गृहस्थाचं. हा तसा मूळ मुंबईकरच. सत्तरीच्या दशकात मुलुंड, ठाणे ते पार डोंबिवलीपर्यंत वस्ती करून राहिलेला. आमचा प्रयोग झाल्यावर त्यांनी पहिली आठवण सांगितली ती दादरच्या छबिलदासची. तिथे तीन रुपयांचं तिकीट काढून अमोल पालेकर, नाना, नसीर आणि दुबेजींच्या नाटकांची असंख्य पारायणं केल्याची आठवण सांगताना हा माणूस भलताच नॉस्टॅल्जिक झाला होता. आमच्या प्रयोगातल्या ‘महानिर्वाण’मधल्या माझ्या स्वगतानंतर ते ट्रान्समध्ये गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि डोळ्यासमोर आला कारन्थसाहेबांनी केलेला भाऊरावचा रोल. तेव्हा उगाचच अंगावर मूठभर मांस चढू लागल्याचं मला जाणवलं. त्यानंतर सलग दीड तास हा माणूस केवळ आणि केवळ ‘कारन्थजी’ ह्या एकाच विषयावर बोलत राहिला आणि मी मुग्ध होऊन ऐकत राहिलो. कारन्थसाहेबांनी पाहिलेलं स्वप्न. ते प्रत्यक्षात आणताना सगळ्याच पातळीवर घेतलेले अपार कष्ट. अभिनेत्यांसोबत काम करण्याच्या त्यांच्या पद्धती आणि बरंच काही…!
जुने वैभवाचे दिवस आठवत असताना सध्याच्या रेपर्टरीच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल बोलताना ह्या माणसाच्या मनातली खंत जाणवत होती. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचवेळेस समकालीन मराठी रंगभूमीविषयी असलेली आस्थाही डोकावत होती. विशेषतः अतुल पेठे यांच्या ‘सत्यशोधक’ ह्या नाटकाबद्दल खूप भरभरून बोलत होते जयराम पाटील. गप्पांच्या ओघात नाटकाव्यतिरिक्त ह्या माणसाचे इतरही अनेक पैलू असल्याचे जाणवत गेले. जयराम पाटील आणि त्यांच्या पत्नी रजनी पाटील, दोघेही पराकोटीचे प्राणिप्रेमी आहेत. त्यांच्या घरी असलेल्या सहा वेगवेगळ्या जातींचे कुत्रे आणि घराच्या आवारात मनमुराद फिरणार्या खारी पाहून आणि त्यांच्या पोटापाण्याची यांनी केलेली व्यवस्था पाहून रजनी पाटलांना मी म्हणालो की, तुमचं घर म्हणजे प्राणीसंग्रहालय आहे. त्या मुळातच कानडी असल्याने मराठी आणि हिंदी समजण्याचा प्रश्न नव्हता. मग प्राणीसंग्रहालय ह्या शब्दाचं इंग्रजीत ‘झू’ असं भाषांतर करून सांगितल्यावर त्या ज्या गडगडाटी हसल्या की विचारता सोय नाही. दर वर्षाच्या फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास हे जोडपं ‘बाय रोड’ भारतवारी करतं आणि वर्षातून तीनदा हेमलकसाला आवर्जून भेट देतं. प्रकाश आमटेंबद्दल अपरंपार आदर आहे ह्या दोघांच्या मनात. त्यांचा असा ठाम विश्वास आहे की आमटेसारखी माणसं आज अवतीभवती असल्याकारणानेच माणुसकीचा तोल साधला गेलाय. आपण म्हणतो तितका समाज काही अजुन रसातळाला गेलाय, असं त्यांना वाटत नाही. ह्या सगळ्या गप्पा चालू असताना पान चघळण्याची त्यांची सवय पाहून मला दामुकाका केंकरेंची आठवण येत होती.
माझ्यासाठी व्यक्तिगत अविस्मरणीय क्षण म्हणजे कारंतजींनी निर्माण केलेल्या आणि फुलवलेल्या दोन्ही रेपर्टरी म्हणजे ‘भारत भवन रंगमंडल, भोपाळ’ आणि ‘रंगायन’ ह्या वास्तूंना भेट देता आली. नुसतीच भेट नाही तर तिथे पर्फॉर्म करण्याची संधीसुद्धा लाभली. कारन्थजी या माणसाबद्दल मी काय बोलणार? त्यांनी उभं केलेलं कामच बोलतं त्यांच्याबद्दल. मला हा माणूस ‘रन्गऋषि’ वाटतो. कदाचित म्हणूनच सगळ्यांसाठी ते ‘बाबा’ कारन्थ होते. आपल्या जन्मभूमीपासून दूर जाऊन दुसर्या अपरिचित ठिकाणी नाट्यविश्व उभारणं आणि ते उभारून झाल्यावर तिथला कसलाही मोह न बाळगता ते तिथेच सोडून नव्या वाटा शोधायला निघून जाणे, हा ह्या माणसाचा जीवनक्रम होता… बाबुकोडी व्यंकटरमण कारन्थ!