काही व्यक्ती एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठीच जन्माला येतात. त्याचं विधिलिखित हे त्यांच्या जन्माच्या आधीपासूनच लिहिलेलं असत. ऋषी जन्माला आला तो स्टार होण्यासाठीच… १७ / १८ वय गाठल्यावर ऋषीला फार वाट बघावी लागली नाही… ‘मेरा नाम जोकर’ झाल्यावर त्याचा आणि डिम्पलचा ‘बॉबी’ आला आणि ऋषीही एकदम स्टार झाला…
देखणं रूप, चेहऱ्यावरचे नितळ भाव, वारश्याने मिळालेली सिनेमात सहजपणे वावरण्याची कला, उत्स्फूर्त अभिनयाची उपजत अशी देणगी आणि जोडीला बेफाट असं नृत्यकौशल्य तसंच गिटार, व्हायोलिन, डफली असं कोणतंही वाद्य सहजपणे हाताळायची हातोटी… तो पडद्यावर येतो, एक कटाक्ष आपल्याकडे टाकतो आणि आपण त्याच्यावर भाळून कधी त्याच्याबरोबर वाहत जातो ते आपल्यालाही कळत नाही. सिनेमात एकच एक प्रकारच्या भूमिका करत राहता येत नाही. शिवाय अमिताभच्या अँग्री यंग मॅनचा तो काळ. खरंतर ऋषी झाकोळला गेलाही त्यामुळे बऱ्यापैकी. काळाबरोबर धावायचं म्हणून ऋषीनेही हाणामारीचे चित्रपट केले पण तो त्याचा पिंड नव्हता… ‘कभी कभी’ मधला विकी, ‘खेल खेल में’ मधला अजय ‘आनंद’, ‘झूठा कहीं का’ मधला अजय राय, ‘सरगम’मधला राजू… ह्या त्याच्या भूमिका… ‘हम किसी से कम नहीं’, ‘प्रेमरोग’, ‘सितमगर’, ‘बडे दिलवाला’, ‘कर्ज’, ‘सागर’, ‘चांदनी’, ‘बोल राधा बोल’ अशा प्रणयरम्य चित्रपटांचा तो खरा हिरो…. त्याचा अकबर तर कायमचा कोरला गेलाय सर्वांच्या मनावर…. तो अगदी सहज वावरायचा पडद्यावर आणि सर्वत्रच…. विशिष्ट प्रकारे अभिनय करणे वगैरे बहुधा त्याच्या गणतीत नव्हतंच… उत्स्फूर्तपणे जे काही उमटेल तोच त्याचा अभिनय…. पल्लेदार संवाद हा काही त्याचा प्रांत नव्हताच… पण डोळे आणि आवाज यांच्या सिंक्रोनायझेशनमधून खूप काही सांगून जायचा तो… पडद्यावर गाणी जिवंत करावीत तर ऋषीनेच…
नव्या पिढीलाही ऋषी आवडतो, भावतो यातच त्याचं यश आहे. वाढत्या वयाबरोबर ऋषीने नायिकेबरोबरचं नाचगाणं बाजूला ठेवून वयाला साजेशा भूमिका केल्या त्याही स्वतःच्या खास अंदाजातच… स्वतःची छाप ठेवूनच.. ‘पतियाला हाउस’, ‘अग्निपथ’, ‘१०२ नॉट आऊट’, ‘लक बाय चान्स’, ‘कपूर एन्ड सन्स’ असे कितीतरी… रोखठोक, पारदर्शी आणि परखड वागणं, बोलणं…. जो काही इतिहास आहे तो मोकळेपणाने स्वीकारणं हा त्याचा आणखी एक स्वभावविशेष…. ट्वीटरवर त्याने हे वेळोवेळी दाखवून दिलंच… त्याचं ते गोड हास्य, खानदानी रूप, लाघवी नजर आणि सहजसुंदर हालचाली….आता फक्त पडद्यावरच बघायच्या…
नाव ऋषी असलं तरी मेनकेला घायाळ करण्याचं कार्य देवाने त्याच्याकडे दिलेलं होतं आणि ते त्याने मोकळेपणाने पार पाडलं… अनेक नायिकांबरोबर त्याची जोडी जमली पण कुणाबरोबर लफडं झाल्याचं ऐकिवात नाही… त्याच्या आणि नीतूच्या जोडीवर प्रेक्षकही खूष होते… आजारी पडणं आणि जाणं यात बरं होणं हेही असतं हे मात्र ऋषी विसरला… एकदम गेलाच तो… एवढ्यात नाही पण काही काळाने आपणही म्हणायला लागू…. ऋषी कपूर ना ? ग्रेट होता यार तो….
होता ???? हो होता….
देखणं रूप, चेहऱ्यावरचे नितळ भाव, वारश्याने मिळालेली सिनेमात सहजपणे वावरण्याची कला, उत्स्फूर्त अभिनयाची उपजत अशी देणगी आणि जोडीला बेफाट असं नृत्यकौशल्य तसंच गिटार, व्हायोलिन, डफली असं कोणतंही वाद्य सहजपणे हाताळायची हातोटी… तो पडद्यावर येतो, एक कटाक्ष आपल्याकडे टाकतो आणि आपण त्याच्यावर भाळून कधी त्याच्याबरोबर वाहत जातो ते आपल्यालाही कळत नाही. सिनेमात एकच एक प्रकारच्या भूमिका करत राहता येत नाही. शिवाय अमिताभच्या अँग्री यंग मॅनचा तो काळ. खरंतर ऋषी झाकोळला गेलाही त्यामुळे बऱ्यापैकी. काळाबरोबर धावायचं म्हणून ऋषीनेही हाणामारीचे चित्रपट केले पण तो त्याचा पिंड नव्हता… ‘कभी कभी’ मधला विकी, ‘खेल खेल में’ मधला अजय ‘आनंद’, ‘झूठा कहीं का’ मधला अजय राय, ‘सरगम’मधला राजू… ह्या त्याच्या भूमिका… ‘हम किसी से कम नहीं’, ‘प्रेमरोग’, ‘सितमगर’, ‘बडे दिलवाला’, ‘कर्ज’, ‘सागर’, ‘चांदनी’, ‘बोल राधा बोल’ अशा प्रणयरम्य चित्रपटांचा तो खरा हिरो…. त्याचा अकबर तर कायमचा कोरला गेलाय सर्वांच्या मनावर…. तो अगदी सहज वावरायचा पडद्यावर आणि सर्वत्रच…. विशिष्ट प्रकारे अभिनय करणे वगैरे बहुधा त्याच्या गणतीत नव्हतंच… उत्स्फूर्तपणे जे काही उमटेल तोच त्याचा अभिनय…. पल्लेदार संवाद हा काही त्याचा प्रांत नव्हताच… पण डोळे आणि आवाज यांच्या सिंक्रोनायझेशनमधून खूप काही सांगून जायचा तो… पडद्यावर गाणी जिवंत करावीत तर ऋषीनेच…
नव्या पिढीलाही ऋषी आवडतो, भावतो यातच त्याचं यश आहे. वाढत्या वयाबरोबर ऋषीने नायिकेबरोबरचं नाचगाणं बाजूला ठेवून वयाला साजेशा भूमिका केल्या त्याही स्वतःच्या खास अंदाजातच… स्वतःची छाप ठेवूनच.. ‘पतियाला हाउस’, ‘अग्निपथ’, ‘१०२ नॉट आऊट’, ‘लक बाय चान्स’, ‘कपूर एन्ड सन्स’ असे कितीतरी… रोखठोक, पारदर्शी आणि परखड वागणं, बोलणं…. जो काही इतिहास आहे तो मोकळेपणाने स्वीकारणं हा त्याचा आणखी एक स्वभावविशेष…. ट्वीटरवर त्याने हे वेळोवेळी दाखवून दिलंच… त्याचं ते गोड हास्य, खानदानी रूप, लाघवी नजर आणि सहजसुंदर हालचाली….आता फक्त पडद्यावरच बघायच्या…
नाव ऋषी असलं तरी मेनकेला घायाळ करण्याचं कार्य देवाने त्याच्याकडे दिलेलं होतं आणि ते त्याने मोकळेपणाने पार पाडलं… अनेक नायिकांबरोबर त्याची जोडी जमली पण कुणाबरोबर लफडं झाल्याचं ऐकिवात नाही… त्याच्या आणि नीतूच्या जोडीवर प्रेक्षकही खूष होते… आजारी पडणं आणि जाणं यात बरं होणं हेही असतं हे मात्र ऋषी विसरला… एकदम गेलाच तो… एवढ्यात नाही पण काही काळाने आपणही म्हणायला लागू…. ऋषी कपूर ना ? ग्रेट होता यार तो….
होता ???? हो होता….