भारतात राजेशाही अस्तित्वात होती, तेव्हा एखाद्याच्या कामगिरीवर खुश होऊन राजा त्याला आपल्या गळ्यातला कंठा काढून देत असे. शत्रूच्या तावडीत सापडलेल्या राणीला स्वतःला वाचवण्यासाठी हिर्याच्या अंगठीत दडवलेली विषाची कुपी उपयोगी पडायची. असे अनेक संदर्भ असलेल्या कथा आपण आपल्या लहानपणापासून ऐकलेल्या आहेत. त्यातला अन्य तपशील सोडला तर राजाच्या गळ्यातला कंठा आणि राणीच्या बोटातली हिर्याची अंगठी ही गोष्ट अनेक काळ लक्षात राहिली. कारण आपल्या आजूबाजूला वावरणारे पुरूष कधीही मोत्यांच्या माळा वापरत नसत, ना महिला हिर्यांच्या अंगठ्या. पण अशा राजा-राणीच्या कथांमधून दागिन्यांची पहिली ओळख आपल्याला झाली.
माणसाला स्वतःला सजवण्याची आवड तो जन्माला आल्यापासूनची. अंगावर दागिने घालणं त्यामुळे तितकंच प्राचीन अगदी फुलांच्या माळा माळणं हेही त्यात आलंच. पण आवडीत बदल आणि स्थित्यंतर झालं नाही तर तो मानवी स्वभाव कसला. धातू, दगड अशा पारंपरिक गोष्टींपासून सुरू झालेला दागिन्यांचा इतिहास आज मोठ्या रोमांचक अशा वळणावर येऊन पोहोचला आहे. दागिने बनवण्यासाठी आज वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो. मौल्यवान खडे, धातू, मोती-माणकं, ह्यापासून घडवलेले दागिने प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहेत.
जगभरातल्या अलंकारांच्या ठेवणीवर युरोपियन प्रभाव असल्याचं मानलं जातं, मात्र भारतातल्या दागिन्यांना स्वतःचा इतिहास, परंपरा आहे. जगभरातील अलंकार हा विषय अभ्यासायचा म्हटलं तर त्यात आशियाई त्यातही भारतीयांच्या दागिन्यांना विशेष स्थान द्यावं लागतं. भारतात मुळातच अलंकार हा विषय अभ्यासण्यासारखा आहे. कारण इथे तुम्ही कोणत्या प्रकारचे दागिने घालतात त्यावरून तुमची सामाजिक पत ठरते. त्याची कारणं आपल्याला इतिहासात सापडतात. राजे महाराजांनी आपली प्रतिष्ठा आणि मोठेपणा राखण्यासाठी दागिने हे फक्त राजघराण्याची मक्तेदारी असावी ह्यासाठी चक्क कायदेही करून घेतले होते. केवळ राजघराण्यातील आणि उच्चभ्रू वर्गातल्या लोकांना पायात सोनं घालण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. हे सगळं इथल्या समाजाच्या मानसिकतेवर इतकं परिणाम करणारं ठरलं की आजही समाजाच्या तळागाळापर्यंत सोन्या-चांदीचे दागिने पोहोचले असले तरी शाही किंवा राजघराण्यातील दागिन्यांचं विशेष असं महत्त्व अबाधित आहे.
नवरत्न अंगठीसारखी गोष्ट कधीकाळी फक्त राजाच्या हाती दिसायची. आज ती अनेकजण घालतात, तरी तिचा वापर सहजपणे केला जात नाही. नऊ खड्यांनी सजलेली अंगठी आणि तिच्याशी जोडले गेलेले समज आजही कायम आहेत. भारतात हिरे व्यापार हा प्राचीन काळापासून आहे. पण आजही भारतातील हिरे व्यापाराशी संबंधित अनेक बाबी समजणं ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. शेवटी इथेही तेच आहे, की भारतात दागिने हा नेहमीच सामाजिक स्तर दाखवून देण्यासाठी उपयोगी पडायचा. त्यामुळेच हिरे जे फक्त राजघराण्यांची मालमत्ता होते आज ही स्टेट्स ऑफ सिम्बॉल ठरले आहेत. शाही असं विशेषण जोडलेल्या दागिन्यांचा रूबाब पाहता हे सगळं लक्षात येऊ शकतं. सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडच्या ह्या दागिन्यांमध्ये वापरलेले धातू, हिरे-माणके पाहून भारतातील दागिन्यांची प्रतिष्ठा आणि सामाजिक स्तर दाखवण्यासाठी कसा उपयोग झाला ह्याचा अंदाज येऊ शकतो.
भारतात सोनं ही मोठी अप्रूपाची गोष्ट आहे. त्याखालोखाल क्रमांक लागतो तो चांदीचा. भारतातल्या काही राज्यांमध्ये चांदीला महत्त्व आहे. राजस्थानसारख्या राज्यात चांदीच्या दागिन्यांची परंपरा विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. कर्नाटकमध्येही तसंच काहीसं दिसतं. ह्या दोन्ही राज्यांमध्ये राजे, संस्थानिक ह्यांची सत्ता होती, ह्या राजघराण्यात सोनं, हिरे, माणके मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याने सर्वसामान्य लोक चांदीचे अलंकार मोठ्या प्रमाणावर वापरत. आजही राजस्थानी महिला सोन्याऐवजी चांदीचे अलंकार मोठ्या प्रमाणावर वापरतात. हा अपवाद वगळता सोन्याचे दागिने देशभरात वापरले जातात. जन्माला आलेल्या बाळाचे कान टोचण्यापासून ते मेलेल्या माणसाला जाळतानाही त्याच्या अंगावर गुंजभर का होईना सोनं ठेवण्याची आपली रीत अशी कायम आहे.
कालानुरूप राजे, संस्थानिक ह्यांचं स्थान अबाधित राहिलं तसाच देशभरात नवा उच्चभ्रू श्रीमंत वर्ग उदयास आला. त्यामुळे दागिन्यांची परंपरा नसलेल्या ह्या वर्गाने आधुनिक दागिने आपलेसे केले. ह्यात हिरे, प्लॅटिनमसारख्या धातूमध्ये बनवलेले अलंकार होते. पण हा बदल पुन्हा एकदा परंपरा आणि प्रतिष्ठा अशा टप्प्यावर पोहोचला आहे.
भारतीय समाजात सोन्याविषयीचं जे प्रेम आहे त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे घराघरांतल्या लग्नात मुलीच्या लग्नासाठी दागिने ही गोष्ट फक्त घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. भारतात मुलीला तिचं स्त्री धन म्हणून सोनं ठेवता येतं, शिवाय अन्य मालमत्तांपेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक करणं कधीही फायद्याचं ठरतं. सोन्याचे दर हे कमी होण्याऐवजी वाढत जाणं, हेही सोन्याचा हव्यास वाढण्याचं कारण ठरलं आहे. त्यामुळेच पूर्वी ज्या लग्नांमध्ये पाच-दहा तोळ्यावर हिशेब संपत होता तो आता तीस-चाळीस तोळ्यांवर पोहोचला आहे.
आता तर सोनं, हिरे, मोती, चांदी अशा वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये प्लॅटिनमसारखा धातूही वापरला जात आहे. पण भारतीय मात्र अलंकारांच्या बाबतीत पारंपरिकच आहेत. इतकंच कशाला बीबीसीसारख्या नामवंत न्यूज चॅनलवर जिथे सर्व न्यूज अँकर पाश्चात्य वेशात असतात, कमीत कमी दागिने वापरतात, तिथे एक भारतीय न्यूज अँकर कानात, गळ्यात, हातात, बोटात सोन्याचे पिवळे धम्मक दागिने वापरताना दिसते. हॉलिवूडच्या सेलिब्रिटीजही एरव्ही केवळ हिरे किंवा व्हाइट गोल्ड वापरत आता पिवळ्या सोन्याचे दागिने वापरू लागले आहेत. हे सगळं परिवर्तन एका दिवसात घडलेलं नाही.
भारतातही दागिन्यांची भलीमोठी रेंज सगळ्यांसाठी उपलब्ध झाली आहे. ह्यात चित्रपटांचा प्रभावही लक्षात घेण्यासारखा आहे. ‘अनकही’सारख्या चित्रपटासाठी जुन्या काळातले दागिने बनवले गेले, ‘जोधा अकबर’मुळे राजस्थानी प्रकारचे दागिने, अगदी मराठी मालिकांमधल्या दागिन्यांना विशेष मागणी येऊ लागली आहे. पेशवाई काळातील दागिने पुन्हा एकदा लोकांना आवडू लागलेत. रोजच्या वापरासाठी, लग्नसमारंभासाठी, पार्टीसाठी अशा वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या प्रकारची दागिने घडवले जात आहेत. कुंदन, जडाव, ह्याचबरोबर डिझायनर कलेक्शन अशा असंख्य प्रकारांतून दागिने निवडणं सोपं झालं आहे. बांगड्या, हार, अंगठ्या अशा मर्यादित प्रकाराबरोबर बाजूबंद, कडे, गोफ, कंबरपट्टा, केसात घालायची फुलं, अशा दागिन्यांची खरेदी होऊ लागली आहे.
अमिताभ बच्चन किंवा हृतिक रोशनसारखे कलाकार आता दागिन्यांच्या जाहिरातीत उतरले आहेत. ह्यामुळे पुरूषांमध्येही दागिने हा नवा ट्रेंड होऊ पाहतोय. कानात हिरे घालणं, भीकबाळी, ब्रेसलेट हे सगळं ह्याच लाटेतून होत आहे. शेरवाणीवर मोत्याची माळ हा त्याचंच पुढचं पाऊल ठरेल. पुरुषांचे दागिने त्यामुळेच चर्चेचा विषय आहेत. काहींना तर सोन्याचा इतका मोह आहे, की ते सोन्याचा शर्ट घालून फिरत आहेत.
सोन्याचे दागिने हे अन्य दागिन्यांच्या तुलनेत अधिक पसंतीचे ठरले तरी हिर्यांची आवडही वाढत आहे. हिर्यांच्या दागिन्यांना उठाव मिळावा ह्यासाठी केलेल्या जाहिरातीतून हिरे हे तुमच्या प्रिय व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असं ठसवलं जातं. त्यामुळे आपल्या प्रेयसी किंवा पत्नीला सोन्याऐवजी हिर्यांचे दागिने देण्याचा कल वाढला आहे. तरीही सोन्याप्रमाणे हिरे कसे खरेदी करावेत, ह्याविषयीचं अज्ञान सोन्याच्याच दागिन्याला सर्वाधिक मागणी असण्यास उपयोगी पडतं.
हिर्यांचे दागिने हे लोकप्रिय झाले आहेत ह्यात वादच नाही. पण त्यामुळे आता प्लॅटिनम दागिन्यांसाठी भारतात मार्केट बनवण्याची वाट काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परदेशात प्लॅटिनमचे दागिने पसंद केले जातात, पण भारतात पिवळ्याधम्मक सोन्याची आवड कमी होण्याची चिन्हं नाहीत. त्यामुळेच व्हाइट गोल्डही फार पसंत केलं जात नाही. प्लॅटिनम जरी सगळ्यात मौल्यवान धातू मानला जात असला तरी भारतात त्याचं मार्केट अजून तरी फार वाढलेलं नाही. त्यामुळेच प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या जाहिराती भारतीय मानसिकतेला हात घालण्याची शक्कल लढवण्यात आली आहे. आपल्या प्रिय व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी हिराच हवा, ही गोष्ट जशी भारतीयांना पटली त्याचप्रमाणे प्लॅटिनमबाबत केलं जात आहे. नात्यांना एकत्र बांधून ठेवणारा धातू म्हणून त्याची होणारी जाहिरात अजून तरी भारतीयांच्या हृदयाचा ठाव घेत नसली तरी भविष्यात काय होईल सांगता येत नाही.
भारतीय समाज परंपरेला मानणारा आहे. इथे स्थित्यंतरं झाली तरी पुन्हा एकदा परंपरेकडे वळण्याची रीत आहे. त्यामुळेच अलंकार हे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा भाग असल्याने ते आपल्या जगण्याचा भाग आहेत. पण त्याचबरोबर परंपरेला मानण्याचाही.
माणसाला स्वतःला सजवण्याची आवड तो जन्माला आल्यापासूनची. अंगावर दागिने घालणं त्यामुळे तितकंच प्राचीन अगदी फुलांच्या माळा माळणं हेही त्यात आलंच. पण आवडीत बदल आणि स्थित्यंतर झालं नाही तर तो मानवी स्वभाव कसला. धातू, दगड अशा पारंपरिक गोष्टींपासून सुरू झालेला दागिन्यांचा इतिहास आज मोठ्या रोमांचक अशा वळणावर येऊन पोहोचला आहे. दागिने बनवण्यासाठी आज वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो. मौल्यवान खडे, धातू, मोती-माणकं, ह्यापासून घडवलेले दागिने प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहेत.
जगभरातल्या अलंकारांच्या ठेवणीवर युरोपियन प्रभाव असल्याचं मानलं जातं, मात्र भारतातल्या दागिन्यांना स्वतःचा इतिहास, परंपरा आहे. जगभरातील अलंकार हा विषय अभ्यासायचा म्हटलं तर त्यात आशियाई त्यातही भारतीयांच्या दागिन्यांना विशेष स्थान द्यावं लागतं. भारतात मुळातच अलंकार हा विषय अभ्यासण्यासारखा आहे. कारण इथे तुम्ही कोणत्या प्रकारचे दागिने घालतात त्यावरून तुमची सामाजिक पत ठरते. त्याची कारणं आपल्याला इतिहासात सापडतात. राजे महाराजांनी आपली प्रतिष्ठा आणि मोठेपणा राखण्यासाठी दागिने हे फक्त राजघराण्याची मक्तेदारी असावी ह्यासाठी चक्क कायदेही करून घेतले होते. केवळ राजघराण्यातील आणि उच्चभ्रू वर्गातल्या लोकांना पायात सोनं घालण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. हे सगळं इथल्या समाजाच्या मानसिकतेवर इतकं परिणाम करणारं ठरलं की आजही समाजाच्या तळागाळापर्यंत सोन्या-चांदीचे दागिने पोहोचले असले तरी शाही किंवा राजघराण्यातील दागिन्यांचं विशेष असं महत्त्व अबाधित आहे.
नवरत्न अंगठीसारखी गोष्ट कधीकाळी फक्त राजाच्या हाती दिसायची. आज ती अनेकजण घालतात, तरी तिचा वापर सहजपणे केला जात नाही. नऊ खड्यांनी सजलेली अंगठी आणि तिच्याशी जोडले गेलेले समज आजही कायम आहेत. भारतात हिरे व्यापार हा प्राचीन काळापासून आहे. पण आजही भारतातील हिरे व्यापाराशी संबंधित अनेक बाबी समजणं ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. शेवटी इथेही तेच आहे, की भारतात दागिने हा नेहमीच सामाजिक स्तर दाखवून देण्यासाठी उपयोगी पडायचा. त्यामुळेच हिरे जे फक्त राजघराण्यांची मालमत्ता होते आज ही स्टेट्स ऑफ सिम्बॉल ठरले आहेत. शाही असं विशेषण जोडलेल्या दागिन्यांचा रूबाब पाहता हे सगळं लक्षात येऊ शकतं. सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडच्या ह्या दागिन्यांमध्ये वापरलेले धातू, हिरे-माणके पाहून भारतातील दागिन्यांची प्रतिष्ठा आणि सामाजिक स्तर दाखवण्यासाठी कसा उपयोग झाला ह्याचा अंदाज येऊ शकतो.
भारतात सोनं ही मोठी अप्रूपाची गोष्ट आहे. त्याखालोखाल क्रमांक लागतो तो चांदीचा. भारतातल्या काही राज्यांमध्ये चांदीला महत्त्व आहे. राजस्थानसारख्या राज्यात चांदीच्या दागिन्यांची परंपरा विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. कर्नाटकमध्येही तसंच काहीसं दिसतं. ह्या दोन्ही राज्यांमध्ये राजे, संस्थानिक ह्यांची सत्ता होती, ह्या राजघराण्यात सोनं, हिरे, माणके मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याने सर्वसामान्य लोक चांदीचे अलंकार मोठ्या प्रमाणावर वापरत. आजही राजस्थानी महिला सोन्याऐवजी चांदीचे अलंकार मोठ्या प्रमाणावर वापरतात. हा अपवाद वगळता सोन्याचे दागिने देशभरात वापरले जातात. जन्माला आलेल्या बाळाचे कान टोचण्यापासून ते मेलेल्या माणसाला जाळतानाही त्याच्या अंगावर गुंजभर का होईना सोनं ठेवण्याची आपली रीत अशी कायम आहे.
कालानुरूप राजे, संस्थानिक ह्यांचं स्थान अबाधित राहिलं तसाच देशभरात नवा उच्चभ्रू श्रीमंत वर्ग उदयास आला. त्यामुळे दागिन्यांची परंपरा नसलेल्या ह्या वर्गाने आधुनिक दागिने आपलेसे केले. ह्यात हिरे, प्लॅटिनमसारख्या धातूमध्ये बनवलेले अलंकार होते. पण हा बदल पुन्हा एकदा परंपरा आणि प्रतिष्ठा अशा टप्प्यावर पोहोचला आहे.
भारतीय समाजात सोन्याविषयीचं जे प्रेम आहे त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे घराघरांतल्या लग्नात मुलीच्या लग्नासाठी दागिने ही गोष्ट फक्त घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. भारतात मुलीला तिचं स्त्री धन म्हणून सोनं ठेवता येतं, शिवाय अन्य मालमत्तांपेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक करणं कधीही फायद्याचं ठरतं. सोन्याचे दर हे कमी होण्याऐवजी वाढत जाणं, हेही सोन्याचा हव्यास वाढण्याचं कारण ठरलं आहे. त्यामुळेच पूर्वी ज्या लग्नांमध्ये पाच-दहा तोळ्यावर हिशेब संपत होता तो आता तीस-चाळीस तोळ्यांवर पोहोचला आहे.
आता तर सोनं, हिरे, मोती, चांदी अशा वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये प्लॅटिनमसारखा धातूही वापरला जात आहे. पण भारतीय मात्र अलंकारांच्या बाबतीत पारंपरिकच आहेत. इतकंच कशाला बीबीसीसारख्या नामवंत न्यूज चॅनलवर जिथे सर्व न्यूज अँकर पाश्चात्य वेशात असतात, कमीत कमी दागिने वापरतात, तिथे एक भारतीय न्यूज अँकर कानात, गळ्यात, हातात, बोटात सोन्याचे पिवळे धम्मक दागिने वापरताना दिसते. हॉलिवूडच्या सेलिब्रिटीजही एरव्ही केवळ हिरे किंवा व्हाइट गोल्ड वापरत आता पिवळ्या सोन्याचे दागिने वापरू लागले आहेत. हे सगळं परिवर्तन एका दिवसात घडलेलं नाही.
भारतातही दागिन्यांची भलीमोठी रेंज सगळ्यांसाठी उपलब्ध झाली आहे. ह्यात चित्रपटांचा प्रभावही लक्षात घेण्यासारखा आहे. ‘अनकही’सारख्या चित्रपटासाठी जुन्या काळातले दागिने बनवले गेले, ‘जोधा अकबर’मुळे राजस्थानी प्रकारचे दागिने, अगदी मराठी मालिकांमधल्या दागिन्यांना विशेष मागणी येऊ लागली आहे. पेशवाई काळातील दागिने पुन्हा एकदा लोकांना आवडू लागलेत. रोजच्या वापरासाठी, लग्नसमारंभासाठी, पार्टीसाठी अशा वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या प्रकारची दागिने घडवले जात आहेत. कुंदन, जडाव, ह्याचबरोबर डिझायनर कलेक्शन अशा असंख्य प्रकारांतून दागिने निवडणं सोपं झालं आहे. बांगड्या, हार, अंगठ्या अशा मर्यादित प्रकाराबरोबर बाजूबंद, कडे, गोफ, कंबरपट्टा, केसात घालायची फुलं, अशा दागिन्यांची खरेदी होऊ लागली आहे.
अमिताभ बच्चन किंवा हृतिक रोशनसारखे कलाकार आता दागिन्यांच्या जाहिरातीत उतरले आहेत. ह्यामुळे पुरूषांमध्येही दागिने हा नवा ट्रेंड होऊ पाहतोय. कानात हिरे घालणं, भीकबाळी, ब्रेसलेट हे सगळं ह्याच लाटेतून होत आहे. शेरवाणीवर मोत्याची माळ हा त्याचंच पुढचं पाऊल ठरेल. पुरुषांचे दागिने त्यामुळेच चर्चेचा विषय आहेत. काहींना तर सोन्याचा इतका मोह आहे, की ते सोन्याचा शर्ट घालून फिरत आहेत.
सोन्याचे दागिने हे अन्य दागिन्यांच्या तुलनेत अधिक पसंतीचे ठरले तरी हिर्यांची आवडही वाढत आहे. हिर्यांच्या दागिन्यांना उठाव मिळावा ह्यासाठी केलेल्या जाहिरातीतून हिरे हे तुमच्या प्रिय व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असं ठसवलं जातं. त्यामुळे आपल्या प्रेयसी किंवा पत्नीला सोन्याऐवजी हिर्यांचे दागिने देण्याचा कल वाढला आहे. तरीही सोन्याप्रमाणे हिरे कसे खरेदी करावेत, ह्याविषयीचं अज्ञान सोन्याच्याच दागिन्याला सर्वाधिक मागणी असण्यास उपयोगी पडतं.
हिर्यांचे दागिने हे लोकप्रिय झाले आहेत ह्यात वादच नाही. पण त्यामुळे आता प्लॅटिनम दागिन्यांसाठी भारतात मार्केट बनवण्याची वाट काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परदेशात प्लॅटिनमचे दागिने पसंद केले जातात, पण भारतात पिवळ्याधम्मक सोन्याची आवड कमी होण्याची चिन्हं नाहीत. त्यामुळेच व्हाइट गोल्डही फार पसंत केलं जात नाही. प्लॅटिनम जरी सगळ्यात मौल्यवान धातू मानला जात असला तरी भारतात त्याचं मार्केट अजून तरी फार वाढलेलं नाही. त्यामुळेच प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या जाहिराती भारतीय मानसिकतेला हात घालण्याची शक्कल लढवण्यात आली आहे. आपल्या प्रिय व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी हिराच हवा, ही गोष्ट जशी भारतीयांना पटली त्याचप्रमाणे प्लॅटिनमबाबत केलं जात आहे. नात्यांना एकत्र बांधून ठेवणारा धातू म्हणून त्याची होणारी जाहिरात अजून तरी भारतीयांच्या हृदयाचा ठाव घेत नसली तरी भविष्यात काय होईल सांगता येत नाही.
भारतीय समाज परंपरेला मानणारा आहे. इथे स्थित्यंतरं झाली तरी पुन्हा एकदा परंपरेकडे वळण्याची रीत आहे. त्यामुळेच अलंकार हे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा भाग असल्याने ते आपल्या जगण्याचा भाग आहेत. पण त्याचबरोबर परंपरेला मानण्याचाही.
(पूर्व प्रसिद्ध दिवाळी विशेषांक, २०१४ ऋतुगंध मासिक)