हिंदी सिनेमात पावसाची गाणी कशासाठी असतात… या प्रश्नाचं उत्तर असतं, हिरॉइनला भिजलेलं दाखवण्यासाठी. अर्थात हे म्हणणं खोटं वाटू नये, अशी हजारो उदाहरणं सापडतील. पण तसं खरंच आहे का, तर नाही. हिंदी सिनेमात अशी असंख्य गाणी आहेत, ज्या गाण्यात पाऊस आहे, पण तो हिरॉइनला भिजवत नाही. आठवणीतल्या पावसाच्या असंख्य गाण्यातलं एखादं आपल्याही आवडीचं असतं. शिवाय त्या गाण्यात नुसता पाऊस नसतो, ती एक व्यक्तिरेखा असते. त्या पावसाची काही स्वभाव वैशिष्ट्य असतात. तो कधी कधी ओढ लावणारा सखा असतो, तर कधी वाट पाहायला लावणारा प्रियकर… हिंदी चित्रपटांतला पाऊस लोभस आहे. हिरॉइनला न भिजवताही तो ग्लॅमरस आहे.
‘ओ सजना बरखा बरखा बहार आई… रस की फुहार लाई…’ इतकं अप्रतिम पावसाचं गाणं दुसरं कोणतं असेल? ‘तूम जो मिल गई हो तो ये लगता के जहा मिल गया…’ या गाजलेल्या गाण्यात टॅक्सीत बसलेले दोघे आणि बाहेर पडत असलेल्या पावसाचं दृश्य आहे. या गाण्यात मध्येच होणारा विजेचा कडकडाट ही या गाण्याला कॉम्प्लिमेंट करणारा आहे. ‘कश्मिर की कली’मधलं, ‘दीवाना हुआ बादल, सावन की घटा छाई ये देख के दिल झूमा, ली प्यार ने अंगडाई’, हे गाणं पावसामुळे उत्साही होणारा प्रेमी कसा असेल ते सांगतो. झिलमिल सितारोंका आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा, या जीवनमृत्यूमधल्या गाण्यात उबदार घराच्या कल्पनेत पाऊसही हवाय, हे सांगत राहतो.
‘सावन का महिना पवन करे सोर, जियारारे झूमे ऐसे जैसे मनवा नाचे मोर’, ‘मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा’ किंवा ‘ओ घुमड घुमड कर आयी रे घटा…’ अशी आगमनाची वर्दी देणारा पाऊस हिरॉइनला भिजवत नाही पण रसिकमनाला चिंब करून टाकणारा आहे. ‘छोटीसी कहानी से बारीशो के पानी से…’, या गाण्याइतकं धुंद करणारं पावसाचं गाणं ऐकलंय का कधी? गुलजार यांच्या इजाजत चित्रपटातलं हे गाणं टायटल सादर होताना बॅकग्राऊंडला वाजतं. किशोरकुमारचं ‘मंझिल’मधलं ‘रिमझिम गिरे सावन…’, यापेक्षा लोकप्रिय पाऊसगाण्याचं मोठं उदाहरण कोणतं असेल…
यश चोप्रा आणि राज कपूर यांच्या सिनेमातून पावसातली गाणी हा विषयही वजा करता येत नाही. पण ‘विजय’ या चित्रपटातील ‘बादल पे चल के आ, सावन मे ढल के आ’, या गाण्यात हिरॉइनला न भिजवणारा पाऊसही छानच असतो. ‘बॅण्डिट क्वीन’ नावाचा फुलनदेवीच्या आयुष्यावरचा सिनेमा. यात एक पावसावरचं अप्रतिम गाणं आहे. अर्थात, त्यात पाऊस नाही. फुलनच्या आयुष्यातल्या एकमात्र सुखाचा क्षण चित्रित करताना बॅकग्राउण्डला हे गाणं वाजतं. उस्ताद नुसरत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं तब्बल आठ मिनिटांचं आहे. कामधंद्यासाठी गाव सोडून गेलेल्या पतीला उद्देशून गायल्या जाणार्या लोकगीताच्या ओळी आधी कोरसमध्ये येतात.
सावन आया रिमझिम सावरे
आये बादल कारे कारे
मतवारे प्यारे प्यारे
मोरे अंगना झूमके
घिर घिर आयी
देखो मस्त घटाये
फुर फुर आज उड़ाये आँचल
मोरा सर्द हवाये…
अशा शब्दांमधून पावसापूर्वीचं मस्त ढगाळ वातावरण अनुभवता येतं आणि नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात ‘मोरे सैया तो है परदेस मै क्या करू सावन को, सुना लागे सजन बिन देस…’ असं गाणं सुरू होताच पावसात आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह किती जीवघेणा असतो, याची जाणीव होते.
गुलजार यांनी लिहिलेल्या असंख्य गाण्यात पाऊस आहेच. त्यात ‘सत्या’मधलं ‘गिला गिला पानी’ आहेच पण ‘बादलोसे काट काट के’ हे भुपिंदर सिंग यांच्या गाण्यातही पाऊस आहे.
एक बार तूमको जब बरसते पाणीयोके पार देखा था
यू लगा था जैसे गुनगुनता एक आबशार देखा था
तबसे मेरी निंदमे बरसती रहती हो…
हे ऐकून पावसात भिजत वाट पाहणारी प्रेयसी आठवत असेल का… ‘युवा’मधलं ‘बादल जो आये…’ किंवा ‘साथिया’मधलं ‘उडी उडी’ गाणं आठवा.
पहिली पहिली बारीश की छिंटे
पहिली बारीश भिगे हम…
या गाण्यातल्या ओळींच्या आधी लटक्या रागाचं जे अल्लड चित्र डोळ्यासमोर उभं केलंय, त्याला तोड नाही. अलीकडच्या ‘दोस्ताना’मध्ये या सिनेमाच्या जातकुळीला अजिबात न शोभणारं एक गाणं आहे. शान या गायकाने त्याला खरंच चार चांद लावलेत.
‘कुछ कम रोशन है रोशनी
कुछ कम गिली है बारीशे…’
हे गाणं ऐकलं की नक्कीच पावसाळी संध्याकाळ उगाच उदास झाल्यासारखी वाटेल.
संजय लीला भन्साळीच्या ‘1942 अ लव स्टोरी’ सिनेमात पावसाचं अप्रतिम गाणं आहे. ‘रिमझिम रिमझिम…’ पिवळ्या साडीत गोड दिसणारी मनीषा कोईराला आणि अनिल कपूर यांना अजिबात न भिजवता हे गाणं चित्रित केलं आहे. तर अगदी अलीकडच्या ‘थोडा मॅजिक थोडा प्यार’मध्ये ‘सिधी सपाट जिंदगी…’ या गाण्यात, ‘कभी सोचा है क्या, बारीश क्यू भाये, क्यू गीत बेवजह, होंठो पे आये…’, असा आपल्याला साधा वाटलेला प्रश्नही आहे.
‘दस’ सिनेमात हरिहरनच्या आवाजातलं एक अप्रतिम गाणं आहे. ‘बंद आखो से तूम आज तूम को देखले’ या गाण्यात पाऊस आणि भावना या किती सारख्या असतात, हे सांगतात कवीचा अंदाज खूप शायराना झाला आहे.
ये किस लिए इन आखों मे
सिसक रही है बारीशे
आणि मग
बूंद बूंद छलके टपके
बरसे मेरा मन
भीग भीग जाये
भीगे होठो से सावन
अशा शब्दांमध्ये पाऊस पडतो. अर्थात, मठ्ठ चेहर्याचा सुनील शेट्टी आणि इशा देओल यांनी कितीही ठरवलं असतं तरी या शब्दांतल्या भावना खचितच त्यांना पडद्यावर दाखवता आल्या असत्या. हे गाणं लोकांच्या स्मरणात न राहण्याचं तेही एक कारण असावं.
‘फिर मिलेंगे’ या चित्रपटात ‘जिने के इशारे मिल गये’, हे गाणं शंकर-अहसान-लॉयच्या संगीतामुळे लक्षात राहतं. त्या गाण्यातल्या ओळीतला बारीश हा शब्द बरंच काही सांगून जाणारा आहे.
मेरी जिंदगी मे तेरी बारीश क्या हुई
मेरे रास्ते दरया बने बहने लगे….
‘जब वूई मेट’ या चित्रपटात उस्ताद राशीद खान यांच्या आवाजातलं एक अविस्मरणीय गीत आहे. त्याच्या मुखड्यातच ओळच आहे,
बरसे गा सावन झूम झूम के
दो दिल ऐसे मिलेंगे…
पावसाचा प्रसंगही या गाण्यात नाही, पण गाणं ऐकल्यावर पावसाच्या शिडकाव्याने प्रफुल्लित होणारं मन कसं असेल, याचा अंदाज येतो. अगदी अलीकडच्या ‘लुटेरा’ या चित्रपटातील अनेक गाणी गाजली. सिनेमातील ‘अनकही’ हे गीतही.
क्या कभी बहार भी पेशगी लाती है आनेवाले पतझर की
बारीशे नाराजगी भी जता है जाती है कभी कभी अंबर की
इतकी सुरेख उपमा खचितच कोणाला सूचली असेल. आभाळाने नाराजी व्यक्त करण्यासाठी पावसाला धाडलं असणार, या नुसत्या कल्पनेतच अप्रतिम काव्य आहे.
इस दर्द ए दिल की शिफारस
अब कर दे कोई यहा
की मिल जाये ईसे वोही बारीश
जो भिगा दे पुरी तरहा
या अगदी ताज्या यारीया या सिनेमातल्या गाण्यातला पाऊस तरुणाईच्या हृदयाचा ठाव घेणारा असतो. हवाहव्याशा वाटणार्या पावसाची अनेक गाणी आहेत. पण कोणालाही न भिजवता आपल्या चिंब करणारी गाणीही खूप आहेत. काही इथे आठवलीत काही तुम्हीही आठवण्याचा प्रयत्न करा.
‘ओ सजना बरखा बरखा बहार आई… रस की फुहार लाई…’ इतकं अप्रतिम पावसाचं गाणं दुसरं कोणतं असेल? ‘तूम जो मिल गई हो तो ये लगता के जहा मिल गया…’ या गाजलेल्या गाण्यात टॅक्सीत बसलेले दोघे आणि बाहेर पडत असलेल्या पावसाचं दृश्य आहे. या गाण्यात मध्येच होणारा विजेचा कडकडाट ही या गाण्याला कॉम्प्लिमेंट करणारा आहे. ‘कश्मिर की कली’मधलं, ‘दीवाना हुआ बादल, सावन की घटा छाई ये देख के दिल झूमा, ली प्यार ने अंगडाई’, हे गाणं पावसामुळे उत्साही होणारा प्रेमी कसा असेल ते सांगतो. झिलमिल सितारोंका आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा, या जीवनमृत्यूमधल्या गाण्यात उबदार घराच्या कल्पनेत पाऊसही हवाय, हे सांगत राहतो.
‘सावन का महिना पवन करे सोर, जियारारे झूमे ऐसे जैसे मनवा नाचे मोर’, ‘मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा’ किंवा ‘ओ घुमड घुमड कर आयी रे घटा…’ अशी आगमनाची वर्दी देणारा पाऊस हिरॉइनला भिजवत नाही पण रसिकमनाला चिंब करून टाकणारा आहे. ‘छोटीसी कहानी से बारीशो के पानी से…’, या गाण्याइतकं धुंद करणारं पावसाचं गाणं ऐकलंय का कधी? गुलजार यांच्या इजाजत चित्रपटातलं हे गाणं टायटल सादर होताना बॅकग्राऊंडला वाजतं. किशोरकुमारचं ‘मंझिल’मधलं ‘रिमझिम गिरे सावन…’, यापेक्षा लोकप्रिय पाऊसगाण्याचं मोठं उदाहरण कोणतं असेल…
यश चोप्रा आणि राज कपूर यांच्या सिनेमातून पावसातली गाणी हा विषयही वजा करता येत नाही. पण ‘विजय’ या चित्रपटातील ‘बादल पे चल के आ, सावन मे ढल के आ’, या गाण्यात हिरॉइनला न भिजवणारा पाऊसही छानच असतो. ‘बॅण्डिट क्वीन’ नावाचा फुलनदेवीच्या आयुष्यावरचा सिनेमा. यात एक पावसावरचं अप्रतिम गाणं आहे. अर्थात, त्यात पाऊस नाही. फुलनच्या आयुष्यातल्या एकमात्र सुखाचा क्षण चित्रित करताना बॅकग्राउण्डला हे गाणं वाजतं. उस्ताद नुसरत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं तब्बल आठ मिनिटांचं आहे. कामधंद्यासाठी गाव सोडून गेलेल्या पतीला उद्देशून गायल्या जाणार्या लोकगीताच्या ओळी आधी कोरसमध्ये येतात.
सावन आया रिमझिम सावरे
आये बादल कारे कारे
मतवारे प्यारे प्यारे
मोरे अंगना झूमके
घिर घिर आयी
देखो मस्त घटाये
फुर फुर आज उड़ाये आँचल
मोरा सर्द हवाये…
अशा शब्दांमधून पावसापूर्वीचं मस्त ढगाळ वातावरण अनुभवता येतं आणि नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात ‘मोरे सैया तो है परदेस मै क्या करू सावन को, सुना लागे सजन बिन देस…’ असं गाणं सुरू होताच पावसात आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह किती जीवघेणा असतो, याची जाणीव होते.
गुलजार यांनी लिहिलेल्या असंख्य गाण्यात पाऊस आहेच. त्यात ‘सत्या’मधलं ‘गिला गिला पानी’ आहेच पण ‘बादलोसे काट काट के’ हे भुपिंदर सिंग यांच्या गाण्यातही पाऊस आहे.
एक बार तूमको जब बरसते पाणीयोके पार देखा था
यू लगा था जैसे गुनगुनता एक आबशार देखा था
तबसे मेरी निंदमे बरसती रहती हो…
हे ऐकून पावसात भिजत वाट पाहणारी प्रेयसी आठवत असेल का… ‘युवा’मधलं ‘बादल जो आये…’ किंवा ‘साथिया’मधलं ‘उडी उडी’ गाणं आठवा.
पहिली पहिली बारीश की छिंटे
पहिली बारीश भिगे हम…
या गाण्यातल्या ओळींच्या आधी लटक्या रागाचं जे अल्लड चित्र डोळ्यासमोर उभं केलंय, त्याला तोड नाही. अलीकडच्या ‘दोस्ताना’मध्ये या सिनेमाच्या जातकुळीला अजिबात न शोभणारं एक गाणं आहे. शान या गायकाने त्याला खरंच चार चांद लावलेत.
‘कुछ कम रोशन है रोशनी
कुछ कम गिली है बारीशे…’
हे गाणं ऐकलं की नक्कीच पावसाळी संध्याकाळ उगाच उदास झाल्यासारखी वाटेल.
संजय लीला भन्साळीच्या ‘1942 अ लव स्टोरी’ सिनेमात पावसाचं अप्रतिम गाणं आहे. ‘रिमझिम रिमझिम…’ पिवळ्या साडीत गोड दिसणारी मनीषा कोईराला आणि अनिल कपूर यांना अजिबात न भिजवता हे गाणं चित्रित केलं आहे. तर अगदी अलीकडच्या ‘थोडा मॅजिक थोडा प्यार’मध्ये ‘सिधी सपाट जिंदगी…’ या गाण्यात, ‘कभी सोचा है क्या, बारीश क्यू भाये, क्यू गीत बेवजह, होंठो पे आये…’, असा आपल्याला साधा वाटलेला प्रश्नही आहे.
‘दस’ सिनेमात हरिहरनच्या आवाजातलं एक अप्रतिम गाणं आहे. ‘बंद आखो से तूम आज तूम को देखले’ या गाण्यात पाऊस आणि भावना या किती सारख्या असतात, हे सांगतात कवीचा अंदाज खूप शायराना झाला आहे.
ये किस लिए इन आखों मे
सिसक रही है बारीशे
आणि मग
बूंद बूंद छलके टपके
बरसे मेरा मन
भीग भीग जाये
भीगे होठो से सावन
अशा शब्दांमध्ये पाऊस पडतो. अर्थात, मठ्ठ चेहर्याचा सुनील शेट्टी आणि इशा देओल यांनी कितीही ठरवलं असतं तरी या शब्दांतल्या भावना खचितच त्यांना पडद्यावर दाखवता आल्या असत्या. हे गाणं लोकांच्या स्मरणात न राहण्याचं तेही एक कारण असावं.
‘फिर मिलेंगे’ या चित्रपटात ‘जिने के इशारे मिल गये’, हे गाणं शंकर-अहसान-लॉयच्या संगीतामुळे लक्षात राहतं. त्या गाण्यातल्या ओळीतला बारीश हा शब्द बरंच काही सांगून जाणारा आहे.
मेरी जिंदगी मे तेरी बारीश क्या हुई
मेरे रास्ते दरया बने बहने लगे….
‘जब वूई मेट’ या चित्रपटात उस्ताद राशीद खान यांच्या आवाजातलं एक अविस्मरणीय गीत आहे. त्याच्या मुखड्यातच ओळच आहे,
बरसे गा सावन झूम झूम के
दो दिल ऐसे मिलेंगे…
पावसाचा प्रसंगही या गाण्यात नाही, पण गाणं ऐकल्यावर पावसाच्या शिडकाव्याने प्रफुल्लित होणारं मन कसं असेल, याचा अंदाज येतो. अगदी अलीकडच्या ‘लुटेरा’ या चित्रपटातील अनेक गाणी गाजली. सिनेमातील ‘अनकही’ हे गीतही.
क्या कभी बहार भी पेशगी लाती है आनेवाले पतझर की
बारीशे नाराजगी भी जता है जाती है कभी कभी अंबर की
इतकी सुरेख उपमा खचितच कोणाला सूचली असेल. आभाळाने नाराजी व्यक्त करण्यासाठी पावसाला धाडलं असणार, या नुसत्या कल्पनेतच अप्रतिम काव्य आहे.
इस दर्द ए दिल की शिफारस
अब कर दे कोई यहा
की मिल जाये ईसे वोही बारीश
जो भिगा दे पुरी तरहा
या अगदी ताज्या यारीया या सिनेमातल्या गाण्यातला पाऊस तरुणाईच्या हृदयाचा ठाव घेणारा असतो. हवाहव्याशा वाटणार्या पावसाची अनेक गाणी आहेत. पण कोणालाही न भिजवता आपल्या चिंब करणारी गाणीही खूप आहेत. काही इथे आठवलीत काही तुम्हीही आठवण्याचा प्रयत्न करा.
(पूर्व प्रसिद्ध जुलै, २०१४ ऋतुगंध मासिक)