प्रत्येक सण-व्रतांमागे अत्यंत भावपूर्ण… व सश्रद्ध पद्धतीने शरीर विज्ञान दडलेले आहे; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. या विचारधारणेने आपण जर विचार करु शकलो तर आपल्याला सहज लक्षात येईल की श्रीगणेशाला अर्पण केला जाणरा प्रसाद-पुष्प-पत्री-फुलं आदि किती सार्थ आहेत आणि आपल्या जीवनास कशा उपयोगी आहेत हे सिद्ध होईल.
हिंदू धर्मियांचे आस्था असणारे स्थान म्हणजेच परमेश्वरीय अगाध शक्ती! हा एकमेव धर्म आहे की ज्यामध्ये पानं-फळं-फुलं-पाषाण-धातू-काष्ट अर्थात जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी भगवंताचे अधिष्ठान मान्य केलेले आहे आणि त्या प्रत्येकाशी असलेला आपला स्नेहभाव आदरभाव जागृत ठेवून धार्मिक व वांशिक परंपरेने सण-व्रत-उत्सवाचे स्वागत करुन त्यातील विविधतेचे दर्शन आपणांस घडत असते.
‘नेमेचि येतो पावसाळा’ ही म्हण जरी सार्थ असली तरी ती उपहासात्मक दृष्टीने अथवा नैराश्यातून उत्पन्न झालेली नसून सकारात्मक दृष्टीने आहे व त्यातून पुन्हा-पुन्हा येणार्या पावसाचे स्वागतच आपण करतो. त्याहीपेक्षा अधिक दृढ-घट्ट-पक्की अशी हिंदू धर्मसंस्कृती आहे. तिच्यात अनेक प्रकारचे सण-व्रत-वैकल्ये साजरे केले जातात तसेच तेही किती सार्थ आहेत हे आपणांस अनुभवायला मिळते ते म्हणजे त्या सण-व्रतांच्या वेळी असणार्या नैसर्गिक वातावरणातून.
…जसे की गुढी पाडव्यापासून आपण ते अनुभवतो. भूतलावरील वृक्ष वेली आपली जुनी पानं सोडून नवीन पालवीने बहरुन येतात, त्याप्रमाणे वर्षाचा आरंभ देखील जुना कालगणनेचा एक भाग सोडून नवीन नाव धारण करुन नवीन संख्यामापनाने त्याची सुरुवात होते. जर आपण सखोल अभ्यासात्मक दृष्टीने बघितले तर त्यावेळी वासंतिक नवरात्राचा आरंभ होतो. आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये दोन प्रकट आणि दोन गुप्त नवरात्र मानले गेलेले आहे. त्यातील ‘शारदीय’ आणि ‘वासंतिक’ नवरात्र आणि आषाढ आणि माघ मासाच्या दरम्यान गुप्त नवरात्र मानले जातात. अर्थात, याही वेळी निसर्गाचा विचार केला तर ऋतूबदलाचा काळ असतो. निसर्ग नवीन रुप धारण करतो अर्थात, ‘‘नव’’रात्र. त्या काळातील महिन्याचा (मासाचा) एक तृतीयांश भाग अत्यंत परिणामकारक असतो. मग तो आरोग्याच्या दृष्टीने म्हणा नैसर्गिक बदलाचा म्हणा किंवा अन्य महत्त्वाच्या बदलाच्या दृष्टीने म्हणा…
भारतामध्ये प्रादेशिक रचनेनुसार भाषानुसार अनेक प्रकारचे वेगवेगळे सण-व्रत-उत्सव साजरे करण्यामागे एक महत्त्वाची भूमिका म्हणजे सामाजिक एकता-अखंडता व त्यामधील पूर्वापार असलेल्या घटनांशी संबंधित ऋणानुबंध! या सर्वांची रचना व त्यावेळच्या पूजनासाठी अथवा खाद्य-पदार्थांतील वापरल्या जाणार्या वस्तूंचा वापर हा त्या-त्या देवता व त्या देवतेचे अधिष्ठान, आवडीनिवडी याच्याशी संबधित दिसून येतात. पण प्रत्यक्ष परिणाम मात्र मानवी शरीरयष्टीवर दिसून येतो.
श्रीगणेशाला चौसष्ट कलांचा अधिपती मानलेले आहे. त्याविषयी अनेक प्रकारचे संदर्भ धर्मग्रंथ-पुराणांदिमध्ये उपलब्ध आहेत. वर उल्लेखित केल्याप्रमाणे प्रत्येक सण-व्रतांमागे अत्यंत भावपूर्ण… व सश्रद्ध पद्धतीने शरीर विज्ञान दडलेले आहे; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. या विचारधारणेने आपण जर विचार करु शकलो तर आपल्याला सहज लक्षात येईल की श्रीगणेशाला अर्पण केला जाणरा प्रसाद-पुष्प-पत्री-फुलं आदि किती सार्थ आहेत आणि आपल्या जीवनास कशा उपयोगी आहेत हे सहज सिद्ध होईल.
मोदक – या मध्ये गूळ, खोबरे, गव्हाचे अथवा तांदळाचे पीठ हे पदार्थ प्रामुख्याने वापरले जातात व स्वादासाठी वेलची वगैरे. गूळ शक्तिवर्धक -खोबरे तेलवर्धक- गहू किंवा तांदूळ सत्ववर्धक अशा प्रकारच्या पदार्थांचे मिश्रण मोदक तयार करताना वापरले जातात. अर्थात, वातप्रकोपाने निर्माण होणार्या विकारांपासून संरक्षण व्हावे, पाणी बदल -वातावरण बदलामुळे होणार्या विकारांपासून शरीर धर्माचे रक्षण केले जाते.
दुर्वा
हे दुर्वे अमृतसंपन्ने।
शतमुले शतांकुरे।
शतं हरति पापाणि।
शतं आयुष्य वर्धिनी॥
दुर्वांची उत्पत्ती ही समुद्रमंथनाचे वेळी देवांचे अमृतप्राशन प्रसंगी भूतलावर सांडलेल्या अमृतकणांपासून झालेली आहे. म्हणूनच तिला ‘अमृतसंपन्न’ अशा आशयाने संबोधले जाते. ‘शत’ या शब्दाचा शब्दश: अर्थ घेतला तर शंभर व संदर्भार्थ अर्थ घेतला तर तो ‘संपूर्ण’ असा होतो. अर्थातच दुर्वामध्ये अमृत कलांचा संपूर्ण प्रभाव असून तिचे मूळ आणि अंकूर यामध्ये ते भरपूर प्रमाणात आहे व त्याच्या सेवनाने, स्पर्शाने पाप अर्थात वाईटाचा नाश होतो व हे करणार्याचे आयुष्य वर्धन होते.
याच सद्भावनेने श्रीगणेशाचे पूजनाचे मनुष्यादी द्विपाद-चतुष्पाद प्राण्यांचे म्हणा अथवा अबाल वृद्धांचे पूर्वकृत वाईटाचा नाश होऊन त्याच्या जीवनास योग्य दिशेने गती प्राप्त व्हावी, हा मुख्य उद्देश आपल्या धर्मातील थोर शास्त्रज्ञ म्हणजेच कश्यप आदि ऋषींचा असावा असे वाटते. बोल-अबोल तसेच सज्ञान-अज्ञान प्राणीमात्रांच्या कल्याणासाठीच या सर्व सण-व्रत वैकल्यांमध्ये पत्र पुष्पासहित फळ-रस यांचा संबंध जोडलेला आढळून येतो.
आजच्या काळात समाज सुधारला आहे असे वाटते. कारण सुशिक्षितांचा टक्का वाढला आहे; परंतु खेदाची बाब ही वाटते की आताची नवोदित पिढी आपल्या मूळाच्या संदर्भीय अभ्यासापासून वंचित आहे. त्यांना या विषयाचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी प्रयास व्हायला हवा. नैसर्गिक प्रक्रियेच्या कालातीत नियमाप्रमाणे जे सहज उपलब्ध होते त्याच्याविषयी आस्था कमी होते असा एक ढोबळ अंदाज बांधण्यास काहीच हरकत नाही आणि हे तर आपल्या देशात सहज उपलब्ध असून मुबलकही आहे. त्यामुळेच की काय ही धर्मशिक्षणाबद्दल अनास्था. कारण इतर देशांतील असंख्य लोक आपल्या भारतीय रुढी परंपरेने चालत आलेल्या योग-आयुर्वेद-वेद आदिंचे अध्ययन करुन त्यांच्या त्यांच्या देशाला समृद्ध बनवत आहेत. त्या प्रमाणात जे मज पाशी असून मला ठाऊकच नसेल तर? त्यासाठी प्रत्येक गोष्टींचा सकारात्मक नजरेने विचार केला व आचरणात आणलं तर नक्कीच सर्व सुजाण भारतीय समृद्ध सशक्त बनतील!
याच विषयी स्वारस्याने प्रत्येकाने या वर्षीच्या गणेशोत्सवात श्रीगणेशास अत्यंत प्रिय वा मानवांस उपायकारक अशा 21 पानांची(पत्रीची)-फुलांची तसेच मोदकांच्या नैवेदयाच अपर्णाची व त्या प्रासादिक सेवणाची सुरुवात करुया! त्यातील प्रत्येक पान फुलं -प्रसाद माझ्या जीवनास योग्य मार्गावर घेऊन जाण्यास मदतच करणार आहे हा विश्वास दृढ करूया !!!
(पत्रीची माहिती नांवासह उपलब्ध असणारी अनेक धार्मिक पुस्तके दुकानात उपलब्ध आहेत. संदर्भासाठी त्यांचा वापर करावा.)
तांबड्या रंगाचे महत्त्व
देवतेची पवित्रके म्हणजे देवतेचे सूक्ष्मातीसूक्ष्म कण. ज्या वस्तूंमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा अधिक असते अशा वस्तू देवतेला वाहिल्या तर साहजिकच त्या देवतेचे तत्त्व मूर्तीत येऊन देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. या तत्त्वानुसार श्रीगणेशाच्या पूजेत तांबड्या रंगांच्या वस्तूंचा उपयोग करावा. तांबड्या रंगात गणेशतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे मूर्ती अल्पावधीत जागृत होण्यास साहाय्य होते. यासाठीच श्री गणेशाच्या पूजेत रक्तचंदन वापरतात.
विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते. श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत. या फुलांकडे गणेशतत्त्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत आणि विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार श्रीगणेशाला फुले वाहताना ती 8 किंवा 8 च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात वहावीत. शंकरपाळ्याच्या आकारात फुले वाहताना दोन लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन रहातील अशा पद्धतीने फुले वहावीत.
हिंदू धर्मियांचे आस्था असणारे स्थान म्हणजेच परमेश्वरीय अगाध शक्ती! हा एकमेव धर्म आहे की ज्यामध्ये पानं-फळं-फुलं-पाषाण-धातू-काष्ट अर्थात जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी भगवंताचे अधिष्ठान मान्य केलेले आहे आणि त्या प्रत्येकाशी असलेला आपला स्नेहभाव आदरभाव जागृत ठेवून धार्मिक व वांशिक परंपरेने सण-व्रत-उत्सवाचे स्वागत करुन त्यातील विविधतेचे दर्शन आपणांस घडत असते.
‘नेमेचि येतो पावसाळा’ ही म्हण जरी सार्थ असली तरी ती उपहासात्मक दृष्टीने अथवा नैराश्यातून उत्पन्न झालेली नसून सकारात्मक दृष्टीने आहे व त्यातून पुन्हा-पुन्हा येणार्या पावसाचे स्वागतच आपण करतो. त्याहीपेक्षा अधिक दृढ-घट्ट-पक्की अशी हिंदू धर्मसंस्कृती आहे. तिच्यात अनेक प्रकारचे सण-व्रत-वैकल्ये साजरे केले जातात तसेच तेही किती सार्थ आहेत हे आपणांस अनुभवायला मिळते ते म्हणजे त्या सण-व्रतांच्या वेळी असणार्या नैसर्गिक वातावरणातून.
…जसे की गुढी पाडव्यापासून आपण ते अनुभवतो. भूतलावरील वृक्ष वेली आपली जुनी पानं सोडून नवीन पालवीने बहरुन येतात, त्याप्रमाणे वर्षाचा आरंभ देखील जुना कालगणनेचा एक भाग सोडून नवीन नाव धारण करुन नवीन संख्यामापनाने त्याची सुरुवात होते. जर आपण सखोल अभ्यासात्मक दृष्टीने बघितले तर त्यावेळी वासंतिक नवरात्राचा आरंभ होतो. आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये दोन प्रकट आणि दोन गुप्त नवरात्र मानले गेलेले आहे. त्यातील ‘शारदीय’ आणि ‘वासंतिक’ नवरात्र आणि आषाढ आणि माघ मासाच्या दरम्यान गुप्त नवरात्र मानले जातात. अर्थात, याही वेळी निसर्गाचा विचार केला तर ऋतूबदलाचा काळ असतो. निसर्ग नवीन रुप धारण करतो अर्थात, ‘‘नव’’रात्र. त्या काळातील महिन्याचा (मासाचा) एक तृतीयांश भाग अत्यंत परिणामकारक असतो. मग तो आरोग्याच्या दृष्टीने म्हणा नैसर्गिक बदलाचा म्हणा किंवा अन्य महत्त्वाच्या बदलाच्या दृष्टीने म्हणा…
भारतामध्ये प्रादेशिक रचनेनुसार भाषानुसार अनेक प्रकारचे वेगवेगळे सण-व्रत-उत्सव साजरे करण्यामागे एक महत्त्वाची भूमिका म्हणजे सामाजिक एकता-अखंडता व त्यामधील पूर्वापार असलेल्या घटनांशी संबंधित ऋणानुबंध! या सर्वांची रचना व त्यावेळच्या पूजनासाठी अथवा खाद्य-पदार्थांतील वापरल्या जाणार्या वस्तूंचा वापर हा त्या-त्या देवता व त्या देवतेचे अधिष्ठान, आवडीनिवडी याच्याशी संबधित दिसून येतात. पण प्रत्यक्ष परिणाम मात्र मानवी शरीरयष्टीवर दिसून येतो.
श्रीगणेशाला चौसष्ट कलांचा अधिपती मानलेले आहे. त्याविषयी अनेक प्रकारचे संदर्भ धर्मग्रंथ-पुराणांदिमध्ये उपलब्ध आहेत. वर उल्लेखित केल्याप्रमाणे प्रत्येक सण-व्रतांमागे अत्यंत भावपूर्ण… व सश्रद्ध पद्धतीने शरीर विज्ञान दडलेले आहे; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. या विचारधारणेने आपण जर विचार करु शकलो तर आपल्याला सहज लक्षात येईल की श्रीगणेशाला अर्पण केला जाणरा प्रसाद-पुष्प-पत्री-फुलं आदि किती सार्थ आहेत आणि आपल्या जीवनास कशा उपयोगी आहेत हे सहज सिद्ध होईल.
मोदक – या मध्ये गूळ, खोबरे, गव्हाचे अथवा तांदळाचे पीठ हे पदार्थ प्रामुख्याने वापरले जातात व स्वादासाठी वेलची वगैरे. गूळ शक्तिवर्धक -खोबरे तेलवर्धक- गहू किंवा तांदूळ सत्ववर्धक अशा प्रकारच्या पदार्थांचे मिश्रण मोदक तयार करताना वापरले जातात. अर्थात, वातप्रकोपाने निर्माण होणार्या विकारांपासून संरक्षण व्हावे, पाणी बदल -वातावरण बदलामुळे होणार्या विकारांपासून शरीर धर्माचे रक्षण केले जाते.
दुर्वा
हे दुर्वे अमृतसंपन्ने।
शतमुले शतांकुरे।
शतं हरति पापाणि।
शतं आयुष्य वर्धिनी॥
दुर्वांची उत्पत्ती ही समुद्रमंथनाचे वेळी देवांचे अमृतप्राशन प्रसंगी भूतलावर सांडलेल्या अमृतकणांपासून झालेली आहे. म्हणूनच तिला ‘अमृतसंपन्न’ अशा आशयाने संबोधले जाते. ‘शत’ या शब्दाचा शब्दश: अर्थ घेतला तर शंभर व संदर्भार्थ अर्थ घेतला तर तो ‘संपूर्ण’ असा होतो. अर्थातच दुर्वामध्ये अमृत कलांचा संपूर्ण प्रभाव असून तिचे मूळ आणि अंकूर यामध्ये ते भरपूर प्रमाणात आहे व त्याच्या सेवनाने, स्पर्शाने पाप अर्थात वाईटाचा नाश होतो व हे करणार्याचे आयुष्य वर्धन होते.
याच सद्भावनेने श्रीगणेशाचे पूजनाचे मनुष्यादी द्विपाद-चतुष्पाद प्राण्यांचे म्हणा अथवा अबाल वृद्धांचे पूर्वकृत वाईटाचा नाश होऊन त्याच्या जीवनास योग्य दिशेने गती प्राप्त व्हावी, हा मुख्य उद्देश आपल्या धर्मातील थोर शास्त्रज्ञ म्हणजेच कश्यप आदि ऋषींचा असावा असे वाटते. बोल-अबोल तसेच सज्ञान-अज्ञान प्राणीमात्रांच्या कल्याणासाठीच या सर्व सण-व्रत वैकल्यांमध्ये पत्र पुष्पासहित फळ-रस यांचा संबंध जोडलेला आढळून येतो.
आजच्या काळात समाज सुधारला आहे असे वाटते. कारण सुशिक्षितांचा टक्का वाढला आहे; परंतु खेदाची बाब ही वाटते की आताची नवोदित पिढी आपल्या मूळाच्या संदर्भीय अभ्यासापासून वंचित आहे. त्यांना या विषयाचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी प्रयास व्हायला हवा. नैसर्गिक प्रक्रियेच्या कालातीत नियमाप्रमाणे जे सहज उपलब्ध होते त्याच्याविषयी आस्था कमी होते असा एक ढोबळ अंदाज बांधण्यास काहीच हरकत नाही आणि हे तर आपल्या देशात सहज उपलब्ध असून मुबलकही आहे. त्यामुळेच की काय ही धर्मशिक्षणाबद्दल अनास्था. कारण इतर देशांतील असंख्य लोक आपल्या भारतीय रुढी परंपरेने चालत आलेल्या योग-आयुर्वेद-वेद आदिंचे अध्ययन करुन त्यांच्या त्यांच्या देशाला समृद्ध बनवत आहेत. त्या प्रमाणात जे मज पाशी असून मला ठाऊकच नसेल तर? त्यासाठी प्रत्येक गोष्टींचा सकारात्मक नजरेने विचार केला व आचरणात आणलं तर नक्कीच सर्व सुजाण भारतीय समृद्ध सशक्त बनतील!
याच विषयी स्वारस्याने प्रत्येकाने या वर्षीच्या गणेशोत्सवात श्रीगणेशास अत्यंत प्रिय वा मानवांस उपायकारक अशा 21 पानांची(पत्रीची)-फुलांची तसेच मोदकांच्या नैवेदयाच अपर्णाची व त्या प्रासादिक सेवणाची सुरुवात करुया! त्यातील प्रत्येक पान फुलं -प्रसाद माझ्या जीवनास योग्य मार्गावर घेऊन जाण्यास मदतच करणार आहे हा विश्वास दृढ करूया !!!
(पत्रीची माहिती नांवासह उपलब्ध असणारी अनेक धार्मिक पुस्तके दुकानात उपलब्ध आहेत. संदर्भासाठी त्यांचा वापर करावा.)
तांबड्या रंगाचे महत्त्व
देवतेची पवित्रके म्हणजे देवतेचे सूक्ष्मातीसूक्ष्म कण. ज्या वस्तूंमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा अधिक असते अशा वस्तू देवतेला वाहिल्या तर साहजिकच त्या देवतेचे तत्त्व मूर्तीत येऊन देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. या तत्त्वानुसार श्रीगणेशाच्या पूजेत तांबड्या रंगांच्या वस्तूंचा उपयोग करावा. तांबड्या रंगात गणेशतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे मूर्ती अल्पावधीत जागृत होण्यास साहाय्य होते. यासाठीच श्री गणेशाच्या पूजेत रक्तचंदन वापरतात.
विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते. श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत. या फुलांकडे गणेशतत्त्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत आणि विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार श्रीगणेशाला फुले वाहताना ती 8 किंवा 8 च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात वहावीत. शंकरपाळ्याच्या आकारात फुले वाहताना दोन लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन रहातील अशा पद्धतीने फुले वहावीत.
(पूर्व प्रसिद्ध ऋतुगंध मासिक)