सप्तस्वरांमध्ये ‘ग’ हे अद्याक्षर गंधाराच्या रूपात दिसतं, ‘ण’मधून निषाद आणि ‘श’ मधून सर्व स्वरांचा राजा ‘षड्ज’ दिसला की ‘नाद’ हा प्राणपुरुष असलेल्या संगीताची इथे ‘गणेशमय’ अनुभवाची प्राप्ती होते.
जशी दृष्टी तशी सृष्टी ही प्रख्यात म्हण आहे. आपली श्रद्धा मनापासूनची असेल आणि गणेशाच्या उपासनेत आपलं मन लीन झालेलं असेल तर आपल्याला पानात, फुलात, फळात, झाडात, धुरात, ढगात व जगात केव्हाही, कुठेही, कोणत्याही आकारातून गणेशाचं दर्शन होईल. तसंच 14 विद्या आणि 64 कलेच्या आधिष्ठात्याचं दर्शन जगात सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या संगीत कलेतही दिसून येतं. सप्तस्वरांमध्ये ‘ग’ हे अद्याक्षर गंधाराच्या रूपात दिसतं, ‘ण’मधून निषाद आणि ‘श’ मधून सर्व स्वरांचा राजा ‘षड्ज’ दिसला की ‘नाद’ हा प्राणपुरुष असलेल्या संगीताची इथे ‘गणेशमय’ अनुभवाची प्राप्ती होते.
संगीतामधलं शास्त्र ही मानवनिर्मित गोष्ट आहे. पण संगीत हे निसर्गनिर्मित आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही सुशोभितच असते. त्यामुळे नादब्रह्मातला नाद जो स्वयं सुशोभित असतो त्यालाच स्वर म्हणतात. म्हणून नादमय स्वर हा ईश्वरीय असतो, पवित्र असतो, ईश्वराचं रूप असतो. त्यातून स्वरातून ईश्वर आणि ईश्वरातून स्वर हा अनुभव संवेदनशील व्यक्तीला काही नवा नाही. ह्या भुवनातली समय आणि बिंदू म्हणजे लय आणि स्वर किंवा गती आणि स्थिती ही तत्त्वं म्हणजे प्राकृतिक संगीत.
संगीत जे निसर्गात सर्वत्र अनुभवायला मिळतं म्हणून ईश्वरप्रदत्त संगीत हे त्रिकालाबाधित आहे, अविरत फिरणार्या समयचक्रामुळे ते अखंड आहे, सत्य आहे. त्यामुळे संगीताच्या प्रत्येक उपासकाला अखंडपणे बाप्पाचं दर्शन होत असतं. संगीत मग ते गाताना, सादर करताना, गुणगुणताना, ऐकताना किंवा कुठेही असो, त्यातून परमात्म्याचा साक्षात्कार आणि ओतप्रोत आत्मानंदच मिळत असतो. त्यामुळे संगीत ही कला म्हणून नंतर असेल पण आधी ती दोन गोष्टींना जोडणारी प्राकृतिक भाषा आहे. इथे समय आणि नाद हे एकत्र आले तरच संगीताची उत्पत्ती होऊ शकते. दोन हृदयांत निखळ संवाद घडवून आणणारी ही भाषा आहे. किंवा एकांतात आपले आपल्या आत्म्याशी अनुसंधान घडवणारी माणसाला मिळालेली ही एक विलक्षण गोष्ट आहे.
कवी संत कबीरनं नाद आणि बिंदू यांना ह्या संसार सागरातली नौका म्हटलंय तर प्रभुनामाला ह्या नौकेचा कर्णधार म्हटलेलं आहे. परमात्म्याच्या गुणांना गाणं हेच जीवनसार असंही म्हटलंय. अशा अनेक रूपकांनी आत्मानुसंधात नादाला साहाय्यकारी म्हणून निरुपित केलेलं आहे. अशाप्रकारे नादाच्या प्रारंभिक साधनेत शब्द, गीत, लय, ताल, वाद्ययंत्र इत्यादींच्या समावेशाची अपेक्षा असते आणि हे सारं आपल्या सोबत घेऊन चालणार्या मानव जातीला संगीतजीवीच म्हणावी लागेल. ह्या चराचरात मनुष्याला ही विद्या आणि बुद्धी प्रदान करणारा आदि ईश्वर गणराया, त्याला जसे दूर्वांकुर, शमी, मंदार हे प्रिय आहेत, तसेच भक्ताने संगीतातून केलेली भक्तीही अतिप्रिय आहे. तो विनायक सिद्धिगणेश, नादविश्वाच्या सूक्ष्म कलेतही ज्याचा वास आहे तो गणपती. संगीताची जिथे उत्पत्ती होते तिथे अवतीर्ण होणारा गणेशा, हृदया हृदयात नाद पोचवून त्यांना प्रफुल्लित करणारा गणराजा हा सर्वांचा तारक आहे तसा तो सर्वांचा संगीसखाही आहे.
माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारांतून संगीत हा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. रोजच्या जीवनशैलीत साधारण माणूस संगीताच्या इतक्या सूक्ष्म अनुभवापर्यंत जात असतोच असे नाही. म्हणून माणसाला आपल्या जगण्याचा आनंद घेण्यासाठी त्याच्या जवळ संगीताचं एक साधं सोपं रूप असतं, ते आहे गाणं. प्रत्येक माणूस गाणं गात असतोच. गाण्याच्या माध्यमातून स्वत:शी कितीतरी वेळा बोलत असतो. इथेही स्वत:च्या आंतरात्म्याशी एकरूप होऊन संवाद साधण्यासाठी आणि पर्यायानं ईश्वराशी संवाद साधण्यासाठी गाण्यासारखं दुसरं सुलभ साधन माणसाकडे नसावं. गाणी ही माणसाच्या मनात कायमसाठी साठून राहत असतात. म्हणून ह्या गाण्यांच्या रूपानं प्रत्येकाच्या हृदयात गणेशाचं स्थान अबाधितपणे विराजित आहे. विचारांच्या स्वप्नात आपण थोड्या वेळापुरते जरी गेलो की आपल्याला गाणं भेटत असतं. हृदयाच्या गाभार्यातल्या गाण्याच्या अकारातून ब्रह्मा, उकारातून विष्णू आणि मकारातून महेश वास करत असतात आणि हे त्रिदेवांचं ओंकर रूप म्हणजेच गजानन. किंवा संत ज्ञानोबांनी वर्णिल्यानुसार अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारी असा लम्बोदर गणेश.
गाण्याची साधी सुखद आठवण जेव्हा होते तेव्हा त्यातल्या खोल जागी बाप्पाचं स्थान असतं आणि त्याचमुळे गाण्यामधून ब्रह्मानंदाची जाणीव किंवा प्राप्ती होत असते व हेच त्याचं रहस्य म्हणता येईल. केवळ गाणं गुणगुणतानाच नव्हे तर मौनातून किंवा खिन्न स्थितीतही मनाला गाण्याचा मिळणारा आधार याचं कारण दुसरं कुठलं नसून त्यातलं गणेशाचं अस्तित्व हेच असणार. सुन्न झालेल्या माणसाच्या मनात आपोआप सूर उमटायला लागतात. नकळत हे सूर त्याच्या मनात असलेल्या त्रासदायक किंवा वेदनीय विषयापासून दूर नेत असतात. हे मानस उपचार स्वत:चे स्वत:वर आपण करवून घेत असतो आणि ह्या उपचाराची परिणती हाच ह्याचा गुण आणि याचं कारण दुसरं कुठचं नसून पुन्हा एकदा त्यातला गणेशरूपी अंश हेच आहे.
मनावर परिणाम करणार्या गाण्याच्या अनेक छटा असतात. विविध रसांतून आपण त्यांचा उपभोग घेत असतो. ज्याप्रमाणं मूर्तिकार हे गणेश प्रतिमांना धार्मिक किंवा आध्यात्मिक विचारांव्यतिरिक्त माणसाच्या विविध अवस्थेतल्या, भ्ाूमिकेतल्या किंवा स्वभावातल्या, रूपातल्या दाखवत असतात तरी अनेकविध रूपांत दिसणार्या प्रतिमांमधून तिचं श्रद्धास्थान किंचितही ढळत नाही. मनात भाव असणार्यांना कोणत्याही रूपातली मूर्ती साजरी आणि गोजिरीच दिसते. तसंच निरनिराळ्या स्वभावाच्या गाण्यांमधूनही त्यांचे रंग, मूड्स, ताल कोणतेही असोत तिथे ते गाणं सुंदरच वाटतं. अर्थात ह्या गोष्टी मात्र अनेकदा ज्याच्या त्याच्या अभिरुचीवर बर्याचशा अवलंबून असतात. पण गाण्यांत गणपती बाप्पाला मध्यवर्ती मानून त्या आधारावर स्वरताल आणि शब्दांच्या साहाय्याने निरनिराळ्या संस्कृतीच्या परंपरेचं, चालीरीतींचं, भक्तिभावांचं दर्शन आणि ज्ञानही मिळत असतं.
आज साधारण संगीतातूनच नाही तर भक्ती संगीतातूनही फक्त ‘एंटरटेनमेन्ट फॅक्टर’ अधिक पाहिला जातो, म्हणजे ऐकवला जातो आणि ऐकलाही जातो. गाण्यांमधलं सौंदर्य, त्यातले स्वरभाव, शब्द इत्यादींकडे जरासं निक्षून, संवेदनशीलतेनं आणि भावपूर्णतेनं पाहिलं आणि ती कळू लागली तर ती आपल्याला उधाण भरती आलेल्या सागरासारखा उदंड आनंद देतात. जो हा आनंद मिळवणं जाणतो तो कायमचा ईश्वराच्या सान्निध्यात असतो. नाना प्रकारच्या आत्मिक आनंदाच्या अनुभुतीची प्राप्ती आपल्याला गाण्यातून होऊ शकते ती त्यामध्ये वास करणार्या साक्षात्कारी गणराजामुळे.
जशी दृष्टी तशी सृष्टी ही प्रख्यात म्हण आहे. आपली श्रद्धा मनापासूनची असेल आणि गणेशाच्या उपासनेत आपलं मन लीन झालेलं असेल तर आपल्याला पानात, फुलात, फळात, झाडात, धुरात, ढगात व जगात केव्हाही, कुठेही, कोणत्याही आकारातून गणेशाचं दर्शन होईल. तसंच 14 विद्या आणि 64 कलेच्या आधिष्ठात्याचं दर्शन जगात सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या संगीत कलेतही दिसून येतं. सप्तस्वरांमध्ये ‘ग’ हे अद्याक्षर गंधाराच्या रूपात दिसतं, ‘ण’मधून निषाद आणि ‘श’ मधून सर्व स्वरांचा राजा ‘षड्ज’ दिसला की ‘नाद’ हा प्राणपुरुष असलेल्या संगीताची इथे ‘गणेशमय’ अनुभवाची प्राप्ती होते.
संगीतामधलं शास्त्र ही मानवनिर्मित गोष्ट आहे. पण संगीत हे निसर्गनिर्मित आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही सुशोभितच असते. त्यामुळे नादब्रह्मातला नाद जो स्वयं सुशोभित असतो त्यालाच स्वर म्हणतात. म्हणून नादमय स्वर हा ईश्वरीय असतो, पवित्र असतो, ईश्वराचं रूप असतो. त्यातून स्वरातून ईश्वर आणि ईश्वरातून स्वर हा अनुभव संवेदनशील व्यक्तीला काही नवा नाही. ह्या भुवनातली समय आणि बिंदू म्हणजे लय आणि स्वर किंवा गती आणि स्थिती ही तत्त्वं म्हणजे प्राकृतिक संगीत.
संगीत जे निसर्गात सर्वत्र अनुभवायला मिळतं म्हणून ईश्वरप्रदत्त संगीत हे त्रिकालाबाधित आहे, अविरत फिरणार्या समयचक्रामुळे ते अखंड आहे, सत्य आहे. त्यामुळे संगीताच्या प्रत्येक उपासकाला अखंडपणे बाप्पाचं दर्शन होत असतं. संगीत मग ते गाताना, सादर करताना, गुणगुणताना, ऐकताना किंवा कुठेही असो, त्यातून परमात्म्याचा साक्षात्कार आणि ओतप्रोत आत्मानंदच मिळत असतो. त्यामुळे संगीत ही कला म्हणून नंतर असेल पण आधी ती दोन गोष्टींना जोडणारी प्राकृतिक भाषा आहे. इथे समय आणि नाद हे एकत्र आले तरच संगीताची उत्पत्ती होऊ शकते. दोन हृदयांत निखळ संवाद घडवून आणणारी ही भाषा आहे. किंवा एकांतात आपले आपल्या आत्म्याशी अनुसंधान घडवणारी माणसाला मिळालेली ही एक विलक्षण गोष्ट आहे.
कवी संत कबीरनं नाद आणि बिंदू यांना ह्या संसार सागरातली नौका म्हटलंय तर प्रभुनामाला ह्या नौकेचा कर्णधार म्हटलेलं आहे. परमात्म्याच्या गुणांना गाणं हेच जीवनसार असंही म्हटलंय. अशा अनेक रूपकांनी आत्मानुसंधात नादाला साहाय्यकारी म्हणून निरुपित केलेलं आहे. अशाप्रकारे नादाच्या प्रारंभिक साधनेत शब्द, गीत, लय, ताल, वाद्ययंत्र इत्यादींच्या समावेशाची अपेक्षा असते आणि हे सारं आपल्या सोबत घेऊन चालणार्या मानव जातीला संगीतजीवीच म्हणावी लागेल. ह्या चराचरात मनुष्याला ही विद्या आणि बुद्धी प्रदान करणारा आदि ईश्वर गणराया, त्याला जसे दूर्वांकुर, शमी, मंदार हे प्रिय आहेत, तसेच भक्ताने संगीतातून केलेली भक्तीही अतिप्रिय आहे. तो विनायक सिद्धिगणेश, नादविश्वाच्या सूक्ष्म कलेतही ज्याचा वास आहे तो गणपती. संगीताची जिथे उत्पत्ती होते तिथे अवतीर्ण होणारा गणेशा, हृदया हृदयात नाद पोचवून त्यांना प्रफुल्लित करणारा गणराजा हा सर्वांचा तारक आहे तसा तो सर्वांचा संगीसखाही आहे.
माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारांतून संगीत हा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. रोजच्या जीवनशैलीत साधारण माणूस संगीताच्या इतक्या सूक्ष्म अनुभवापर्यंत जात असतोच असे नाही. म्हणून माणसाला आपल्या जगण्याचा आनंद घेण्यासाठी त्याच्या जवळ संगीताचं एक साधं सोपं रूप असतं, ते आहे गाणं. प्रत्येक माणूस गाणं गात असतोच. गाण्याच्या माध्यमातून स्वत:शी कितीतरी वेळा बोलत असतो. इथेही स्वत:च्या आंतरात्म्याशी एकरूप होऊन संवाद साधण्यासाठी आणि पर्यायानं ईश्वराशी संवाद साधण्यासाठी गाण्यासारखं दुसरं सुलभ साधन माणसाकडे नसावं. गाणी ही माणसाच्या मनात कायमसाठी साठून राहत असतात. म्हणून ह्या गाण्यांच्या रूपानं प्रत्येकाच्या हृदयात गणेशाचं स्थान अबाधितपणे विराजित आहे. विचारांच्या स्वप्नात आपण थोड्या वेळापुरते जरी गेलो की आपल्याला गाणं भेटत असतं. हृदयाच्या गाभार्यातल्या गाण्याच्या अकारातून ब्रह्मा, उकारातून विष्णू आणि मकारातून महेश वास करत असतात आणि हे त्रिदेवांचं ओंकर रूप म्हणजेच गजानन. किंवा संत ज्ञानोबांनी वर्णिल्यानुसार अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारी असा लम्बोदर गणेश.
गाण्याची साधी सुखद आठवण जेव्हा होते तेव्हा त्यातल्या खोल जागी बाप्पाचं स्थान असतं आणि त्याचमुळे गाण्यामधून ब्रह्मानंदाची जाणीव किंवा प्राप्ती होत असते व हेच त्याचं रहस्य म्हणता येईल. केवळ गाणं गुणगुणतानाच नव्हे तर मौनातून किंवा खिन्न स्थितीतही मनाला गाण्याचा मिळणारा आधार याचं कारण दुसरं कुठलं नसून त्यातलं गणेशाचं अस्तित्व हेच असणार. सुन्न झालेल्या माणसाच्या मनात आपोआप सूर उमटायला लागतात. नकळत हे सूर त्याच्या मनात असलेल्या त्रासदायक किंवा वेदनीय विषयापासून दूर नेत असतात. हे मानस उपचार स्वत:चे स्वत:वर आपण करवून घेत असतो आणि ह्या उपचाराची परिणती हाच ह्याचा गुण आणि याचं कारण दुसरं कुठचं नसून पुन्हा एकदा त्यातला गणेशरूपी अंश हेच आहे.
मनावर परिणाम करणार्या गाण्याच्या अनेक छटा असतात. विविध रसांतून आपण त्यांचा उपभोग घेत असतो. ज्याप्रमाणं मूर्तिकार हे गणेश प्रतिमांना धार्मिक किंवा आध्यात्मिक विचारांव्यतिरिक्त माणसाच्या विविध अवस्थेतल्या, भ्ाूमिकेतल्या किंवा स्वभावातल्या, रूपातल्या दाखवत असतात तरी अनेकविध रूपांत दिसणार्या प्रतिमांमधून तिचं श्रद्धास्थान किंचितही ढळत नाही. मनात भाव असणार्यांना कोणत्याही रूपातली मूर्ती साजरी आणि गोजिरीच दिसते. तसंच निरनिराळ्या स्वभावाच्या गाण्यांमधूनही त्यांचे रंग, मूड्स, ताल कोणतेही असोत तिथे ते गाणं सुंदरच वाटतं. अर्थात ह्या गोष्टी मात्र अनेकदा ज्याच्या त्याच्या अभिरुचीवर बर्याचशा अवलंबून असतात. पण गाण्यांत गणपती बाप्पाला मध्यवर्ती मानून त्या आधारावर स्वरताल आणि शब्दांच्या साहाय्याने निरनिराळ्या संस्कृतीच्या परंपरेचं, चालीरीतींचं, भक्तिभावांचं दर्शन आणि ज्ञानही मिळत असतं.
आज साधारण संगीतातूनच नाही तर भक्ती संगीतातूनही फक्त ‘एंटरटेनमेन्ट फॅक्टर’ अधिक पाहिला जातो, म्हणजे ऐकवला जातो आणि ऐकलाही जातो. गाण्यांमधलं सौंदर्य, त्यातले स्वरभाव, शब्द इत्यादींकडे जरासं निक्षून, संवेदनशीलतेनं आणि भावपूर्णतेनं पाहिलं आणि ती कळू लागली तर ती आपल्याला उधाण भरती आलेल्या सागरासारखा उदंड आनंद देतात. जो हा आनंद मिळवणं जाणतो तो कायमचा ईश्वराच्या सान्निध्यात असतो. नाना प्रकारच्या आत्मिक आनंदाच्या अनुभुतीची प्राप्ती आपल्याला गाण्यातून होऊ शकते ती त्यामध्ये वास करणार्या साक्षात्कारी गणराजामुळे.
(पूर्व प्रसिद्ध ऋतुगंध मासिक)