बुधवार, दिनांक २९ एप्रिल २०२०, साधारणतः दुपारची वेळ, सोशल मिडिया वर इरफान खान यांच्या दु:खद निधनाची बातमी झळकली आणि क्षणभर ह्रदयाचा ठोकाच चुकला. नक्कीच कुणीतरी खोडसाळपणा केला असेल वाटले परंतु वृत्तवाहिन्यांनी जेव्हा या घटनेची पुष्टी केली तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटले. निश्र्चितच इरफान खान ना कुणी नात्यागोत्यातला होता ना आपल्या गावचा. मात्र लाखो करोडो सिनेरसिकांना आपलासा वाटणारा हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला हे मानायला मन तयार होत नव्हते. खरेतर लॉकडाउन असताना पहिले इरफानच्या मातोश्री आणि लगेचच इरफानला आपल्यातून हिरावून नेतांना नियतीने निष्ठूरतेचा कळस गाठला होता. मात्र शेवटी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे ठरले.
जयपूर, राजस्थानला पठाण कुटुंबात जन्मलेल्या इरफानचा जीवनप्रवास जितका रोमांचक आहे तितकाच त्याच्या जिद्दीचा परिचय देणारा आहे. लहानपणी वडीलांसोबत शिकार करतांना प्राण्यांचे जाणारे हकनाक बळी पाहतांना तो हळहळला आणि याचीच जाणीव त्याने जन्मभर राखली. अभ्यासात फारसे न रमणारी ही स्वारी मैदानात मात्र बहरून जायची. विशेषतः क्रिकेटवर त्याचे मनापासून प्रेम होते आणि यामुळेच तो सि.के. नायडू स्पर्धेकरीता पात्र झाला होता. अखेर आर्थिक चणचण भासल्याने त्याने क्रिकेटचा नाद सोडला आणि आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला. याकरिता इरफानने दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला परंतु आईचा याला विरोध होता कारण आपला मुलगा नाचगाणे करणार याची तिला भिती वाटायची. अखेर इरफानने आपल्या आईची समजूत काढली आणि याक्षेत्रात आपल्यामुळे कुणालाही मान खाली घालावी लागणार नाही असे वचन दिले आणि त्याने ते शेवटपर्यंत पाळले सुद्धा.
इकडे इरफान आपल्या ध्येयासाठी दिवसरात्र एक करत होता आणि तिकडे अडचणी त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हत्या. अभिनयाचे धडे गिरवत असतानाच त्याच्या वडीलांचे निधन झाले आणि घरून येणारा पैशाचा ओघ आटला. अखेर कसेबसे मिळणाऱ्या तुटपुंज्या शिष्यवृत्तीवर इरफानने दिवस काढणे सुरू केले आणि आपले नशीब आजमावयाला मायापुरी मुंबईत पाऊल ठेवले. इथेही पोट भरण्यासाठी मग वाट्टेल ते परिश्रम करतांना कधी एसी रिपेअरींग तर कधी मिळेल ते काम करत दिवस ढकलणे चालू होते. अखेर १९८८ ला “सलाम बॉम्बे” मध्ये एका छोट्या भुमिकेत त्याने बॉलिवूड मध्ये चंचुप्रवेश केला. सुरवातीला कधी नाटकांमध्ये, कधी दुरदर्शनच्या मालिकेत तर कधी मिळेल त्या चित्रपटात इरफानने आपल्या अभिनयाची जादू दाखवणे सुरू केले मात्र चांगले काम करूनही तो आपली छाप पाडाण्यात फारसा यशस्वी ठरला नव्हता. १९८७ से २००० पर्यंतचा काळात प्रचंड मेहनत घेऊनही त्याच्या पदरी निराशाच हाती लागत होती. अखेर २००१ साल उजाडले आणि त्याच्या कारकीर्दीला चालणा मिळाली ती ब्रिटिश फिल्म ‘वरीअर’ने.
इथुनच इरफानची अभिनय एक्स्प्रेस सुसाट निघाली आणि मग त्याने मागे वळून बघितले नाही. आपल्या अभिनयात नैसर्गिक सुंदरता आणि संवाद फेकतांना जी सहजता होती त्याने प्रेक्षकांना अक्षरक्ष: वेडावून टाकले होते उगाच आरडाओरड नाही, वेडेवाकडे हातवारे नाही की कोणतीही कृत्रिम लकब नाही. ना स्टाईलची पर्वा ना कोणत्याही विशेष भुमिकेचा ठप्पा त्यावर बसला होता. मुख्य म्हणजे मिळेल त्या भुमिकेत जीव ओतून इरफान त्या भुमिकेशी तो इतका समरस व्हायचा की अख्खा पडदा व्यापून टाकायचा. खरेतर समकालीन आमीर, शाहरुख आणि सलमानची चलती असतानासुद्धा इरफानने आपली विशेष ओळख निर्माण करण्यात कमालीचा यशस्वी ठरला होता. मात्र बॉलिवूडच्या डबक्याला सर्वस्वी मानून त्यात आकंठ बुडून राहण्यापेक्षा इरफानने सातासमुद्रापार आपल्या अभिनयाची पताका फडकवली. बॉलिवूड सोबतच अमेरिकन आणि ब्रिटिश फिल्म मध्ये आपल्या सशक्त अभिनयाने कित्येक चित्रपट गाजवले आणि अनेक पुरस्कारांचा तो मानी ठरला.
२००३ च्या “हासिल”मधुन नकारात्मक भुमिका साकारताना आपल्या दमदार अभिनयाने त्याने सर्वांना दखल घ्यायला भाग पाडले तर २००४ च्या “मकबुल”मध्ये त्याच्या अभिनयाला चकाकी आली. २००६ च्या “दि नेमसेक”ने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आणि अनेक पुरस्कारांचा तो धनी ठरला. २०१० ला पानसिंग तोमर साकारताना त्याने नॅशनल फिल्मचा बेस्ट अॅक्टर अवार्ड प्राप्त केला. २०१२ हॉलिवूडच्या “लाईफ ऑफ पाय”मध्ये त्याला लिड रोल मिळाला आणि त्याच्या उत्कृष्ट संवादफेक, बोलक्या डोळ्यांनी अभिनयाची परिसिमा गाठत त्याने हॉलिवूडला आपले दिवाने बनविले. २०१३ ला मानविय नात्यांवर आधारित चित्रपट “लंच बॉक्स”ने त्याच्या अभिनयाचा डंका देशविदेशात गाजला. २०१५ ला क्राईम थ्रिलर “तलवार”मध्ये इरफानने पोलिस ऑफिसरची भुमिका जीवंत केली तर त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या पीकू मध्ये अमिताभ, दिपिका सारख्या दिग्गजांसमोर इरफानची एंट्री भाव खाऊन जात होती. २०१७ च्या “हिंदी मिडीयम” साठी त्याला बेस्ट अॅक्टर फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. याचाच सिक्वेन्स २०२० ला इंग्लिश मिडीयम म्हणून आला होता जो त्याचा अखेरचा चित्रपट ठरला.
आपल्या ३० वर्षांच्या सिनेकारकिर्दीत त्याने नॅशनल फिल्म अवार्ड, एशियन फिल्म अवार्ड, चार वेळा फिल्मफेअर अवॉर्ड असे एकंदरीत ३२ अवार्ड मिळवले तर त्याला २०११ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१८ला इरफानला त्याला न्युरोएंडोक्राईन ट्युमरने विळखा घातला आणि अखेरपर्यंत तो यातून तो बाहेर पडू शकला नाही. त्यातच मंगळवारी म्हणजेच २८ एप्रिलला त्याच्या आतड्याला संक्रमणाची लागण झाल्याने इस्पितळात दाखल केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी नियतीने डाव साधला आणि जीवनभर पडदा गाजवणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराला पडद्याआड केले. त्याच्या मृत्यूच्या अवघे ४ दिवसांपूर्वीच त्याची आईसुद्धा हे जग सोडून गेली होती आणि याच वेदनेत “मुझे अम्मी बुला रही” असे पुटपुटत त्याने अखेरचा श्वास घेतला.
आपल्या “दि किलर” अभिनयाने “सलाम बॉम्बे” ते “न्युयाॅर्क” गाठणारा हा कलाकार “हिंदी मिडीयम” असो की “अंग्रेजी मिडीयम” असो भाव खाऊन जायचा. आपले लक्ष्य “हासिल” करण्यात “क्रेझी ४” असणारा इरफान कधी “गुंडे” कधी “हैदर” तर कधी “तलवार” असायचा. “पानसिंग तोमर” साकारताना त्याने “साहब बिबी और गॅंगस्टर”ची कधी पर्वा केली नाही तर “लंच बॉक्स” असो की “लाईफ ऑफ पाय” असो सगळ्या भुमिका “थॅंक यू” म्हणत पार पाडल्या. “दि वरीयर” आणि “करिब करिब सिंगल” असणारा हा पठ्ठ्या “लाईफ इन मेट्रो” जगत होता. “एक माईटी हार्ट” असलेल्या या “मदारी”ने आपला “कारवा” “स्लम डॉग मिलेनिअर” ते “ज्युरासिक वर्ल्ड” पर्यंत “ब्लॅकमेल” न करता पोहचवला होता. “संडे” असो की मंडे, “राईट या रॉंग” किंबहुना “डेडलाईन सिर्फ २४ घंटे” असो आपल्या कसदार अभिनयाचे पाणी त्याने “बाजीराव मस्तानी” ते “दि अमेझींग स्पायडरमॅन” पर्यंत सर्वांना दाखवून दिले होते. “मुंबई मेरी जान” मानणाऱ्या या नटाचा एक “किस्सा” न्युरोएंडोक्राईन ट्युमर या “रोग” मध्ये परिवर्तीत झाला आणि एरवी “सात खुन माफ” करणाऱ्या नियतीने आपल्यालातून “नॉक आऊट” केले आहे. “दि डे” ज्या दिवशी इरफानने या जगातून एक्झिट घेतली त्यावेळी आपण “युं होता तो क्या होता” बस एवढेच म्हणू शकत आहे.
आज इरफान आपल्यात नाही, काळाने हिरावून नेलेला हा हिरा भलेही आपल्या दृष्टीआड झाला असेल, मात्र त्याचा दमदार अभिनय, सहजसुंदर संवादफेक, भेदक नजर आणि त्याची अभिनयाची मोहिनी नेहमीच आपल्या मनात एक पक्के घरटं करुन राहील यात शंका वाटत नाही. अखेर मृत्यू म्हणजे काय हे इरफानच्या शब्दात सांगायचे झाले तर
वैसे तो दुनियांमे आते है सभी मरने के लिए
पर असल मौत उसकी है जिसका जमाना अफसोस करें
तमाम चाहत्यांतर्फे साहबजादे इरफान अली खानला भावपूर्ण श्रद्धांजली.
जयपूर, राजस्थानला पठाण कुटुंबात जन्मलेल्या इरफानचा जीवनप्रवास जितका रोमांचक आहे तितकाच त्याच्या जिद्दीचा परिचय देणारा आहे. लहानपणी वडीलांसोबत शिकार करतांना प्राण्यांचे जाणारे हकनाक बळी पाहतांना तो हळहळला आणि याचीच जाणीव त्याने जन्मभर राखली. अभ्यासात फारसे न रमणारी ही स्वारी मैदानात मात्र बहरून जायची. विशेषतः क्रिकेटवर त्याचे मनापासून प्रेम होते आणि यामुळेच तो सि.के. नायडू स्पर्धेकरीता पात्र झाला होता. अखेर आर्थिक चणचण भासल्याने त्याने क्रिकेटचा नाद सोडला आणि आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला. याकरिता इरफानने दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला परंतु आईचा याला विरोध होता कारण आपला मुलगा नाचगाणे करणार याची तिला भिती वाटायची. अखेर इरफानने आपल्या आईची समजूत काढली आणि याक्षेत्रात आपल्यामुळे कुणालाही मान खाली घालावी लागणार नाही असे वचन दिले आणि त्याने ते शेवटपर्यंत पाळले सुद्धा.
इकडे इरफान आपल्या ध्येयासाठी दिवसरात्र एक करत होता आणि तिकडे अडचणी त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हत्या. अभिनयाचे धडे गिरवत असतानाच त्याच्या वडीलांचे निधन झाले आणि घरून येणारा पैशाचा ओघ आटला. अखेर कसेबसे मिळणाऱ्या तुटपुंज्या शिष्यवृत्तीवर इरफानने दिवस काढणे सुरू केले आणि आपले नशीब आजमावयाला मायापुरी मुंबईत पाऊल ठेवले. इथेही पोट भरण्यासाठी मग वाट्टेल ते परिश्रम करतांना कधी एसी रिपेअरींग तर कधी मिळेल ते काम करत दिवस ढकलणे चालू होते. अखेर १९८८ ला “सलाम बॉम्बे” मध्ये एका छोट्या भुमिकेत त्याने बॉलिवूड मध्ये चंचुप्रवेश केला. सुरवातीला कधी नाटकांमध्ये, कधी दुरदर्शनच्या मालिकेत तर कधी मिळेल त्या चित्रपटात इरफानने आपल्या अभिनयाची जादू दाखवणे सुरू केले मात्र चांगले काम करूनही तो आपली छाप पाडाण्यात फारसा यशस्वी ठरला नव्हता. १९८७ से २००० पर्यंतचा काळात प्रचंड मेहनत घेऊनही त्याच्या पदरी निराशाच हाती लागत होती. अखेर २००१ साल उजाडले आणि त्याच्या कारकीर्दीला चालणा मिळाली ती ब्रिटिश फिल्म ‘वरीअर’ने.
इथुनच इरफानची अभिनय एक्स्प्रेस सुसाट निघाली आणि मग त्याने मागे वळून बघितले नाही. आपल्या अभिनयात नैसर्गिक सुंदरता आणि संवाद फेकतांना जी सहजता होती त्याने प्रेक्षकांना अक्षरक्ष: वेडावून टाकले होते उगाच आरडाओरड नाही, वेडेवाकडे हातवारे नाही की कोणतीही कृत्रिम लकब नाही. ना स्टाईलची पर्वा ना कोणत्याही विशेष भुमिकेचा ठप्पा त्यावर बसला होता. मुख्य म्हणजे मिळेल त्या भुमिकेत जीव ओतून इरफान त्या भुमिकेशी तो इतका समरस व्हायचा की अख्खा पडदा व्यापून टाकायचा. खरेतर समकालीन आमीर, शाहरुख आणि सलमानची चलती असतानासुद्धा इरफानने आपली विशेष ओळख निर्माण करण्यात कमालीचा यशस्वी ठरला होता. मात्र बॉलिवूडच्या डबक्याला सर्वस्वी मानून त्यात आकंठ बुडून राहण्यापेक्षा इरफानने सातासमुद्रापार आपल्या अभिनयाची पताका फडकवली. बॉलिवूड सोबतच अमेरिकन आणि ब्रिटिश फिल्म मध्ये आपल्या सशक्त अभिनयाने कित्येक चित्रपट गाजवले आणि अनेक पुरस्कारांचा तो मानी ठरला.
२००३ च्या “हासिल”मधुन नकारात्मक भुमिका साकारताना आपल्या दमदार अभिनयाने त्याने सर्वांना दखल घ्यायला भाग पाडले तर २००४ च्या “मकबुल”मध्ये त्याच्या अभिनयाला चकाकी आली. २००६ च्या “दि नेमसेक”ने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आणि अनेक पुरस्कारांचा तो धनी ठरला. २०१० ला पानसिंग तोमर साकारताना त्याने नॅशनल फिल्मचा बेस्ट अॅक्टर अवार्ड प्राप्त केला. २०१२ हॉलिवूडच्या “लाईफ ऑफ पाय”मध्ये त्याला लिड रोल मिळाला आणि त्याच्या उत्कृष्ट संवादफेक, बोलक्या डोळ्यांनी अभिनयाची परिसिमा गाठत त्याने हॉलिवूडला आपले दिवाने बनविले. २०१३ ला मानविय नात्यांवर आधारित चित्रपट “लंच बॉक्स”ने त्याच्या अभिनयाचा डंका देशविदेशात गाजला. २०१५ ला क्राईम थ्रिलर “तलवार”मध्ये इरफानने पोलिस ऑफिसरची भुमिका जीवंत केली तर त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या पीकू मध्ये अमिताभ, दिपिका सारख्या दिग्गजांसमोर इरफानची एंट्री भाव खाऊन जात होती. २०१७ च्या “हिंदी मिडीयम” साठी त्याला बेस्ट अॅक्टर फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. याचाच सिक्वेन्स २०२० ला इंग्लिश मिडीयम म्हणून आला होता जो त्याचा अखेरचा चित्रपट ठरला.
आपल्या ३० वर्षांच्या सिनेकारकिर्दीत त्याने नॅशनल फिल्म अवार्ड, एशियन फिल्म अवार्ड, चार वेळा फिल्मफेअर अवॉर्ड असे एकंदरीत ३२ अवार्ड मिळवले तर त्याला २०११ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१८ला इरफानला त्याला न्युरोएंडोक्राईन ट्युमरने विळखा घातला आणि अखेरपर्यंत तो यातून तो बाहेर पडू शकला नाही. त्यातच मंगळवारी म्हणजेच २८ एप्रिलला त्याच्या आतड्याला संक्रमणाची लागण झाल्याने इस्पितळात दाखल केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी नियतीने डाव साधला आणि जीवनभर पडदा गाजवणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराला पडद्याआड केले. त्याच्या मृत्यूच्या अवघे ४ दिवसांपूर्वीच त्याची आईसुद्धा हे जग सोडून गेली होती आणि याच वेदनेत “मुझे अम्मी बुला रही” असे पुटपुटत त्याने अखेरचा श्वास घेतला.
आपल्या “दि किलर” अभिनयाने “सलाम बॉम्बे” ते “न्युयाॅर्क” गाठणारा हा कलाकार “हिंदी मिडीयम” असो की “अंग्रेजी मिडीयम” असो भाव खाऊन जायचा. आपले लक्ष्य “हासिल” करण्यात “क्रेझी ४” असणारा इरफान कधी “गुंडे” कधी “हैदर” तर कधी “तलवार” असायचा. “पानसिंग तोमर” साकारताना त्याने “साहब बिबी और गॅंगस्टर”ची कधी पर्वा केली नाही तर “लंच बॉक्स” असो की “लाईफ ऑफ पाय” असो सगळ्या भुमिका “थॅंक यू” म्हणत पार पाडल्या. “दि वरीयर” आणि “करिब करिब सिंगल” असणारा हा पठ्ठ्या “लाईफ इन मेट्रो” जगत होता. “एक माईटी हार्ट” असलेल्या या “मदारी”ने आपला “कारवा” “स्लम डॉग मिलेनिअर” ते “ज्युरासिक वर्ल्ड” पर्यंत “ब्लॅकमेल” न करता पोहचवला होता. “संडे” असो की मंडे, “राईट या रॉंग” किंबहुना “डेडलाईन सिर्फ २४ घंटे” असो आपल्या कसदार अभिनयाचे पाणी त्याने “बाजीराव मस्तानी” ते “दि अमेझींग स्पायडरमॅन” पर्यंत सर्वांना दाखवून दिले होते. “मुंबई मेरी जान” मानणाऱ्या या नटाचा एक “किस्सा” न्युरोएंडोक्राईन ट्युमर या “रोग” मध्ये परिवर्तीत झाला आणि एरवी “सात खुन माफ” करणाऱ्या नियतीने आपल्यालातून “नॉक आऊट” केले आहे. “दि डे” ज्या दिवशी इरफानने या जगातून एक्झिट घेतली त्यावेळी आपण “युं होता तो क्या होता” बस एवढेच म्हणू शकत आहे.
आज इरफान आपल्यात नाही, काळाने हिरावून नेलेला हा हिरा भलेही आपल्या दृष्टीआड झाला असेल, मात्र त्याचा दमदार अभिनय, सहजसुंदर संवादफेक, भेदक नजर आणि त्याची अभिनयाची मोहिनी नेहमीच आपल्या मनात एक पक्के घरटं करुन राहील यात शंका वाटत नाही. अखेर मृत्यू म्हणजे काय हे इरफानच्या शब्दात सांगायचे झाले तर
वैसे तो दुनियांमे आते है सभी मरने के लिए
पर असल मौत उसकी है जिसका जमाना अफसोस करें
तमाम चाहत्यांतर्फे साहबजादे इरफान अली खानला भावपूर्ण श्रद्धांजली.