एका राज्यात एक सुकीर्ति शर्मा नावाचा माणूस राहत होता. त्याच्याकडे अनेकजण मदत मागायला, सल्ला विचारायला येत असत. तो सुद्धा त्याला जसे आणि जे जमेल तशी मदत करत असे, माहिती देत असे. त्याच्या माहितीचा, मदतीचा खूप लोकांनी फायदा करून घेतला. तो लोकांवर सहजपणे विश्वास ठेवत असे आणि त्याच्यावर अनेक लोकांचा विश्वास होता.
हळूहळू त्याच्याबद्दलची माहिती त्या राज्याच्या राजाच्या कानावर गेली. राज्यातील अनेक लोक राजदरबारात गार्हाणी, तक्रारी घेऊन न्याय मागण्यासाठी येत असत. सुकीर्तिला राजदरबारात घेतले तर ह्या सार्या लोकांवर आपली चांगली छाप राहील, असे ठरवून राजाने सुकीर्तिला राजदरबारात मानाचे पद दिले. जबाबदारी दिली.
सुरुवातीला सुकीर्तिला खूपच आनंद वाटला. तो उत्साहाने काम करू लागला. आपल्या कामामुळे राजाचे नाव मोठे होत आहे याचे त्याला समाधान वाटे. जेवढे राज्य मोठे तेवढे तेथील प्रश्न बिकट आणि सर्वांचे सारखे समाधान करणे बिकट, हे राजाला ठाऊक होते. म्हणूनच तो सुकीर्तिला समोर करून जनतेच्या प्रश्नांना बगल देऊ पाहत होता. राज्यकारभार करताना राजकारण व समाजकारण हे दोन्ही करणे अपेक्षित असते. राजाला समाजकारणातील स्तुती अपेक्षित असताना राजकारणातील निंदा मात्र नको होती. हळूहळू त्याने सुकीर्तिला काही बाबतीत त्याने काय करायचे, काय शिकवायचे हे सांगायला सुरुवात केली. सुकीर्तिला ते पटत नसे. पण राजाच्या दरबारात तो नकार कसा देणार? राजाने एवढा विश्वास ठेवून मानाचे पद दिले आहे मग त्याला नाही कसे सांगणार ?
हळूहळू सुकीर्तिची मनःस्थिती द्विधा होत गेली. त्यामुळे त्याला पूर्वीसारखे काम करता येईना. समाधान ही मिळत नसे. सुकीर्तिने सांगितलेल्या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडू लागला. ते सुकीर्तिला दोष देऊ लागले. राजदरबार सोडून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी जावे असे सुकीर्तिच्या मनात येऊ लागले. पण आता मूळ ठिकाणी सुध्दा तो काय करणार ह्याबद्द्ल त्याला साशंकता निर्माण होऊ लागली. तो राजाला म्हणाला, ‘तुम्ही म्हणता म्हणून मी तसे वागतो पण मला ते पटत नाही.’ राजाने त्याला सांगितले की, ‘राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. त्यांना सर्वांना तुला खूष ठेवावेच लागेल. त्यासाठी जे काही करायचे ते तू कर. हे करणे हाच राज्यकारभाराचा एक भाग आहे. राज्य टिकवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. मला केवळ एका सुकीर्तिला नाही; तर सगळ्याच राज्याला सांभाळायचे आहे. त्यामुळे त्यांना असे गुंतवून ठेवायला हवे की, ते इतर कशाचा विचार करू शकणार नाहीत व तू सांगितलेले सारे काही त्यांना पटेल.’
सुकीर्ति काही बोलू शकला नाही. पण त्याचे मन मात्र त्याला बजावत होते की हे बरोबर नाही. बंड करणे त्याला एकट्याला शक्य नव्हते. लोकांना खरे सांगावे तर लोक त्याच्यावर आता कसा विश्वास ठेवणार? तो लोकांना गुंतवून कसे ठेवता येईल यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शोधू लागला व त्यासाठी त्याने राजाकडून सर्वतोपरी मदत मिळावी म्हणून मागणी केली. राजाने होकार दिला. पैसा, संरक्षण, सवलती, अनुदान, दानधर्म, बांधकामे, स्पर्धा, महोत्सव, प्रदर्शने, पुरस्कार, समारंभ, सोहळे, इत्यादी साऱ्या गोष्टींचा वापर लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी वाढू लागला. किंबहुना हे सारे करणे हेच प्राथमिक कर्तव्य झाले. याचा परिणाम राजखजिना रिकामा होण्याकडे होऊ लागला. राजाने मग लोकांना अधिक कर भरण्यासाठी आणि लोकसहभागातून कामे पूर्ण करण्यासाठी आवाहन केले.
दोन्ही गोष्टी आधी लोकांना पटल्या. पण अधिक कर देऊनही किंवा लोकसहभाग देऊनही आपले प्रश्न काही सुटत नाही हे जेव्हा लोकांना समजू लागले, तेव्हा त्यांनी सुकीर्तिला याबद्दल विचारले. सुकीर्तिला आतली गोष्ट आणि बाहेरची परिस्थिती दोन्हीही माहीत होत्या. जे चालले आहे ते त्याच्या मनाविरुद्ध असूनही ते करावेच लागत असल्याने तो काही काही वेगवेगळ्या गोष्टी सांगत लोकांना फसवू लागला. सुकीर्तिची हळूहळू दुष्कीर्ति होऊ लागली व त्याच्या बद्दलच्या अनेक तक्रारी राजाकडे वाढू लागल्या.
राज्याचा न्यायकारभार बघणाऱ्या आणि राजाशी एकनिष्ठ असणाऱ्या राजदरबातील दंडाधिकाऱ्याने मग सुकीर्तिच्या विरोधातील तक्रारीची भर राजदरबारात सुनावणी करण्याचे ठरवले. सुकीर्ति पुन्हा राजाकडे गेला व म्हणाला, ‘तुम्ही म्हणता त्याच प्रमाणे मी वागतो. मग आता ही शिक्षा मला का ? ‘राजा हसला व म्हणाला, ‘माणूस म्हणून तू खूप प्रामाणिक आहेस. पण तू तो प्रामाणिकपणा जेव्हा स्वतःच्या पुरता वापरत होतास तेव्हा तू सुकीर्ति होतास. तो प्रामाणिकपणा तू जेव्हा माझ्यासाठी म्हणून वापरलास ते योग्यच होते; पण त्याचा वापर करून तू लोकांना फसवलेस तेव्हा तुझी दुष्कीर्ति झाली. सुकीर्ति म्हणाला, ‘पण महाराज, मी हे तुमच्यासाठीच केले.’ यावर राजा म्हणाला, ‘मी तुला मागेच सांगितले होते, मला केवळ एका सुकीर्त नाही; तर सगळ्याच राज्याला सांभाळायचे आहे. राज्य माझ्या विरोधात जाऊ नये म्हणून मला तुलाच त्यागावे लागेल. त्याला माझा नाईलाज आहे. अन्यथा राज्यात अराजक माजेल. त्यामुळे तू राज्याबाहेर निघून जा. अन्यथा लोकांचा रोष व शिक्षेला तयार राहा.’
तुम्ही सुकीर्तिच्या ठिकाणी आहात… तुम्ही काय कराल?
हळूहळू त्याच्याबद्दलची माहिती त्या राज्याच्या राजाच्या कानावर गेली. राज्यातील अनेक लोक राजदरबारात गार्हाणी, तक्रारी घेऊन न्याय मागण्यासाठी येत असत. सुकीर्तिला राजदरबारात घेतले तर ह्या सार्या लोकांवर आपली चांगली छाप राहील, असे ठरवून राजाने सुकीर्तिला राजदरबारात मानाचे पद दिले. जबाबदारी दिली.
सुरुवातीला सुकीर्तिला खूपच आनंद वाटला. तो उत्साहाने काम करू लागला. आपल्या कामामुळे राजाचे नाव मोठे होत आहे याचे त्याला समाधान वाटे. जेवढे राज्य मोठे तेवढे तेथील प्रश्न बिकट आणि सर्वांचे सारखे समाधान करणे बिकट, हे राजाला ठाऊक होते. म्हणूनच तो सुकीर्तिला समोर करून जनतेच्या प्रश्नांना बगल देऊ पाहत होता. राज्यकारभार करताना राजकारण व समाजकारण हे दोन्ही करणे अपेक्षित असते. राजाला समाजकारणातील स्तुती अपेक्षित असताना राजकारणातील निंदा मात्र नको होती. हळूहळू त्याने सुकीर्तिला काही बाबतीत त्याने काय करायचे, काय शिकवायचे हे सांगायला सुरुवात केली. सुकीर्तिला ते पटत नसे. पण राजाच्या दरबारात तो नकार कसा देणार? राजाने एवढा विश्वास ठेवून मानाचे पद दिले आहे मग त्याला नाही कसे सांगणार ?
हळूहळू सुकीर्तिची मनःस्थिती द्विधा होत गेली. त्यामुळे त्याला पूर्वीसारखे काम करता येईना. समाधान ही मिळत नसे. सुकीर्तिने सांगितलेल्या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडू लागला. ते सुकीर्तिला दोष देऊ लागले. राजदरबार सोडून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी जावे असे सुकीर्तिच्या मनात येऊ लागले. पण आता मूळ ठिकाणी सुध्दा तो काय करणार ह्याबद्द्ल त्याला साशंकता निर्माण होऊ लागली. तो राजाला म्हणाला, ‘तुम्ही म्हणता म्हणून मी तसे वागतो पण मला ते पटत नाही.’ राजाने त्याला सांगितले की, ‘राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. त्यांना सर्वांना तुला खूष ठेवावेच लागेल. त्यासाठी जे काही करायचे ते तू कर. हे करणे हाच राज्यकारभाराचा एक भाग आहे. राज्य टिकवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. मला केवळ एका सुकीर्तिला नाही; तर सगळ्याच राज्याला सांभाळायचे आहे. त्यामुळे त्यांना असे गुंतवून ठेवायला हवे की, ते इतर कशाचा विचार करू शकणार नाहीत व तू सांगितलेले सारे काही त्यांना पटेल.’
सुकीर्ति काही बोलू शकला नाही. पण त्याचे मन मात्र त्याला बजावत होते की हे बरोबर नाही. बंड करणे त्याला एकट्याला शक्य नव्हते. लोकांना खरे सांगावे तर लोक त्याच्यावर आता कसा विश्वास ठेवणार? तो लोकांना गुंतवून कसे ठेवता येईल यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शोधू लागला व त्यासाठी त्याने राजाकडून सर्वतोपरी मदत मिळावी म्हणून मागणी केली. राजाने होकार दिला. पैसा, संरक्षण, सवलती, अनुदान, दानधर्म, बांधकामे, स्पर्धा, महोत्सव, प्रदर्शने, पुरस्कार, समारंभ, सोहळे, इत्यादी साऱ्या गोष्टींचा वापर लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी वाढू लागला. किंबहुना हे सारे करणे हेच प्राथमिक कर्तव्य झाले. याचा परिणाम राजखजिना रिकामा होण्याकडे होऊ लागला. राजाने मग लोकांना अधिक कर भरण्यासाठी आणि लोकसहभागातून कामे पूर्ण करण्यासाठी आवाहन केले.
दोन्ही गोष्टी आधी लोकांना पटल्या. पण अधिक कर देऊनही किंवा लोकसहभाग देऊनही आपले प्रश्न काही सुटत नाही हे जेव्हा लोकांना समजू लागले, तेव्हा त्यांनी सुकीर्तिला याबद्दल विचारले. सुकीर्तिला आतली गोष्ट आणि बाहेरची परिस्थिती दोन्हीही माहीत होत्या. जे चालले आहे ते त्याच्या मनाविरुद्ध असूनही ते करावेच लागत असल्याने तो काही काही वेगवेगळ्या गोष्टी सांगत लोकांना फसवू लागला. सुकीर्तिची हळूहळू दुष्कीर्ति होऊ लागली व त्याच्या बद्दलच्या अनेक तक्रारी राजाकडे वाढू लागल्या.
राज्याचा न्यायकारभार बघणाऱ्या आणि राजाशी एकनिष्ठ असणाऱ्या राजदरबातील दंडाधिकाऱ्याने मग सुकीर्तिच्या विरोधातील तक्रारीची भर राजदरबारात सुनावणी करण्याचे ठरवले. सुकीर्ति पुन्हा राजाकडे गेला व म्हणाला, ‘तुम्ही म्हणता त्याच प्रमाणे मी वागतो. मग आता ही शिक्षा मला का ? ‘राजा हसला व म्हणाला, ‘माणूस म्हणून तू खूप प्रामाणिक आहेस. पण तू तो प्रामाणिकपणा जेव्हा स्वतःच्या पुरता वापरत होतास तेव्हा तू सुकीर्ति होतास. तो प्रामाणिकपणा तू जेव्हा माझ्यासाठी म्हणून वापरलास ते योग्यच होते; पण त्याचा वापर करून तू लोकांना फसवलेस तेव्हा तुझी दुष्कीर्ति झाली. सुकीर्ति म्हणाला, ‘पण महाराज, मी हे तुमच्यासाठीच केले.’ यावर राजा म्हणाला, ‘मी तुला मागेच सांगितले होते, मला केवळ एका सुकीर्त नाही; तर सगळ्याच राज्याला सांभाळायचे आहे. राज्य माझ्या विरोधात जाऊ नये म्हणून मला तुलाच त्यागावे लागेल. त्याला माझा नाईलाज आहे. अन्यथा राज्यात अराजक माजेल. त्यामुळे तू राज्याबाहेर निघून जा. अन्यथा लोकांचा रोष व शिक्षेला तयार राहा.’
तुम्ही सुकीर्तिच्या ठिकाणी आहात… तुम्ही काय कराल?