पावसानं सकाळपासून चांगलाच जोर धरला होता. तिसऱ्या मजल्यावरच्या अजून तावदानं न बसवलेल्या खिडकीतून मीहीर कधीपासूनचा बाहेर पहात उभा होता. सीमेंट विटांचा ओला कुबट संमिश्र वास नाकात भरत त्याची नजर एकटक पावसावर स्थिरावली होती. अजून कितीवेळ पाऊस कोसळत राहणार याचा काडीमात्रही अंदाज येणार नाही असं आषाढाचं आभाळ गच्च भरून राहिलं होतं. दहाचा सुमार असेल पण सायंकाळ झाल्यासारखं वाटत होतं. शहरापासून काहीशी दूर असलेली ही साइट. एकूण बिल्डींगचं बांधकाम जवळपास पूर्ण झालं होतं. प्लास्टरची कामं चालू होती. इंटेरिअर, कलरींग वगैरे अजून बाकी होतं. दसऱ्यापर्यंत कामं उरकणं भाग होतं. जाहिरातीवरच लाखोंचा खर्च करावा लागणार होता. प्लंबींगचं बील कालच पेड केलेलं. खाली रस्त्यालगत तुडुंब वाहत असलेल्या गटाराच्या पाण्याप्रमाणं खर्चाचा आकडा फुगतच चालला होता. होतं नव्हतं ते सगळं गहाण ठेवून हे पाऊल उचलंलं होतं. सिव्हील कंस्ट्रक्शनचा उणापुरा चार पाच वर्षांचा अनुभव गाठीशी. त्यातून आलेल्या अनुभवाच्या शिदोरीवर बिल्डर व्हायचं स्वप्न पाहिलेलं. पण जागा घेण्यापासून आजपर्यंतचा प्रवास हा अगदीच सोपा नव्हता. स्थानिक प्रशासन, राजकारण, व्यवसायिक कुरघोड्या याचा प्रचंड त्रास सोसावा लागला होता.
“साला.. एक लाखाचे आठ लाख करुन देणारा हा बरकती धंदा हाय.. तू धाडस तर कर.. पैशात लोळशील.. नक्की जमेल तुला..” असं सुरुवातीला सांगणारा सिंघानिया आता “पार वाट लागली राव कन्स्ट्रक्शन धंद्याची ह्या तीन वर्षांत.. गिर्हाइक पैशाचं काढायला मागत नाय.. जुने लोक घाईला आले.. नवीन धंदा करणारा येडाच म्हणायचा.. आपण तर साला बघेल नायतर सरळ धंदा बंद करेल..”
ह्या दोन तीन वर्षांत खरंच परिस्थिती बीकट झालेली. जीएसटीनं अचानक वाढलेल्या किमती.. लोखंडसळीचे अस्थिर दर… वाळुचा तुटवडा. खडी डबरचा अपुरा आणि अनियमित पुरवठा.. कामाला होणारा विलंब आणि वाढत चाललेलं ब्यांकांचं व्याज.
डिएसकेसारखा माणूस जिथं आर्थिक डबघाईला येतो तिथं आपली काय कथा? रिकव्हरीसाठी माफक फायदा काढून ब्लॉक्स विकण्याशिवाय पर्याय नव्हता. विचारात असतानाच नाकात खमंग वास दरवळला. “साहेब.. या नाष्टा करायला..” प्लास्टरच्या कामावर असलेला जानबा आणि इतर दोघंतिघं मजूर ओल्या जमिनीवर विटा मांडून त्यावर बसलेले. समोर दोन विटा मांडून त्यावर डबे ठेवलेले.
अळूच्या वड्या… मीहीरचा फेवरेट पदार्थ.. औपचारिकता म्हणून विचारुन जानबानं खायला सुरुवातही केलेली. त्यानं जर खरंच अजून आग्रह केला असता तर मीहीरनं खाल्लंही असतं. अगदी आताही वाटत होतं की एखादी वडी सहजच उचलून अलगद खावी. अगदी लहाणपणी खायचो तसं. पण ते त्याला प्रशस्त वाटेना. गावी असताना लहानपणी आई महिन्यातून एकदा तरी अळुच्या वड्या करायचीच. परसदारी अळुचं बेटच माजलेलं. सगळं गाव पानं खुडून न्यायचं. कारण हे अळू कधी घशात खवखवत नव्हतं. शिवाय पोटालाही कधी बाधलं नाही. लग्नानंतर नोकरीमुळं इकडंच बस्तान बसलं. भाड्याचं घर असलं तरी भलंमोठं अंगण होतं समोर. तुळशीसोबतच नळाचं पाणी वाहणाऱ्या एका कोपऱ्यात आईनं घरच्या अळूचे मोजून चार गड्डे लावलेले. आज त्याचा विस्तार चांगलाच वाढलेला.
“काहीही झालं तरी बाजारातली पानं कधी आणू नकोस” नम्रताला तिनं सांगून ठेवलं होतं. “अक्षरशः गटाराच्या पाण्यावर उगवलं जातं अळू शहरात” नम्रताही अगदी आईच्या तोडीस तोड वड्या करायची. …सकाळी साइटवर निघताना आजही तिचा चेहरा नाराज होता. तिच्या विचारानं मनात उगाच कालवाकालव झाली.. जानबा खात असलेल्या वड्यांचाही त्याला विसर पडला. लक्ष परत कोसळणाऱ्या पावसावर स्थिरावलं. आपलं वागणं कुठंतरी चुकतंय.. तिच्या जागी ती योग्य आहे. बायको म्हणुन आपल्या कर्तव्यात ती कुठंही कसूर करत नाही. पण आपलंच का असं होतंय?. रोज ठरवतो आज तिला नाराज नाही करायचं.. पण…!!
“साहेब.. आज तेवढं पगाराचं बगा.. पोराचं आडमीशन थटलंय..” जानबा डबा बंद करत बोलला.
“अं.. हो.. करतो संध्याकाळ पर्यंत.” अशा भर पावसात एटीएमवरून पैसे नेमके कुठून काढायचे ह्या विचाराने तो किंचित वैतागला. बँकेत असलेली रक्कम झपाट्याने कमी कमी होत चाललेली. दसऱ्यापर्यंत किल्ला लढवावा लागणार होता.
नम्रताचा हातभार नसता तर ?? ती आहे म्हणूनच तगलोय आपण. तिनं सहज हौस म्हणून केलेला ब्युटीपार्लरचा कोर्स.. जोडीला मेहंदी आणि रुखवतातल्या वस्तू बणवायचं कसब. ऐन जुलै महिन्यातही लग्न तिथींनी हात दिलेला. रोजचे हजार-पाचशे घरी येत होते. घरखर्चाचं केवढं तरी टेन्शन कमी झालेलं. राजूच्या शाळेचा सगळा खर्च तिनं यावर्षी शिरावर घेतलेला. तिलाही जाणीव होती की सगळं किडुकमिडुक जरी आज गहाण पडलं असलं तरी दसऱ्यानंतर दिवस पालटणार होते. तेवढा तिचा मीहीरवर विश्वास होता. पण धंद्याची फसणारी गणितं. मार्केटची झालेली वाताहात, दसऱ्यापर्यंत स्थिती खरंच सुधारणार का? याचा घोर मीहीरला होता. कारण अजून एकाही ब्लॉकचं साधं बुकींगही झालं नव्हतं. जाहिराती सोडणं आता अत्यंत गरजेचं होतं आणि जाहिराती सोडूनही नाहीच प्रतिसाद भेटला तर?
सुरुवातीला असणारा उत्साह ढेपाळू लागला होता. इतक्यात मोबाईल वाजला. नम्रताचा फोन..
“ह्यालो.. कसे आहात?”
“मी ठीक आहे की.. का गं.. असं का विचारतेस ?”
“काही नाही हो.. असंच विचारतेय.. तुमची अचानक आठवण आली.. त्यामुळं “बोलण्यात एक लाडीक अंदाज होता तिच्या.
“असं का?..”
“होना… बाहेर कीती छान पाऊस पडतोय ना.?”
“हो ना” मीहीर तिचा हलकाफुलका मूड पाहून मनोमन सुखावला.
“तुम्हाला आठवतंय.. मागच्या वर्षी आपण महाबळेश्वरच्या पावसात भिजलेलो”
क्षणात मीहीरच्या नजरेसमोर गेल्यावर्षीचा महाबळेश्वरचा धोधो पाऊस आणि त्यानंतर हॉटेल हर्टबीट्सच्या अलीशान सुटमधला एकांत आठवला. “खरंतर याही वर्षी गेलो असतो.. पण तुला तर माहितीच आहे ना माझी अवस्था” मीहीर बोलून गेला.
“पाऊस एन्जॉय करायला महाबळेश्वरच कशाला हवं.. तुम्ही मनात आणलं तर इथंही तेच फील येऊ शकतं की” नम्रता खोडकरपणे बोलत होती.
“येऊ का आत्ता घरी बोल.. !” उगाच तिला बरं वाटावं म्हणून तो बोलला.
“जेव्हा हवं तेव्हा टाळाटाळ करायची आणि नको तेव्हा लाडात यायचं “नम्रताचा सुर आता गंभीर होता.
“अगं खरंच.. चेष्टा नाही करत” आता मीहीर गंमतीच्या स्वरात बोलला.
“तुम्ही? आणि कोसळत्या पावसात? इतक्या दूर? आणि तेही माझ्यासाठी? नशीबच म्हणायचं माझं.”
“अगं खरंच.. अजूनही तितकंच प्रेम आहे माझं तुझ्यावर” तिची मस्करी करायला मीहीरला मजा वाटत होती.
“एक सांगू.. तुमच्यापेक्षा दुप्पट माझं प्रेम तुमच्यावर आहे”
“ते माहीत आहे गं मला.. तू आहेस म्हणून मी आहे” मीहीरचा सुर आता गंभीर होता.
“नशीब माझं.. तेवढं तरी कबूल करताय.. बरं डब्याला काय देऊ ते सांगा.. सकाळी लवकर गेलात. हा पाऊस पण थांबायची लक्षणं नाहीत. डबेवाल्याजवळ देते तेवढा कलेक्ट करा.”
“बरं.. चालेल.. एक काम करशील? अळूच्या वड्या बनव ना गरमागरम.” मुद्दामच मीहीरनं खडा टाकला.
“काय वेडबीड तर नाही ना लागलं? अहो आताच राजूला शाळेत सोडून आलेय.. दुकानात निघायला आधीच उशीर झालाय.. आता अजून अळूच्या वड्यांचा सरंजाम कधी मांडू? आणि डाळीचं पीठही आणावं लागेल आता पावसात जाऊन”
“हेच का प्रेम? कधी नव्हे तो नवरा काहीतरी मागतो तर त्यालाही नकार..”
“हो का.. मग बायकोही काहीतरी मागत असते रोज त्याचाही कधीतरी विचार करायचा ना नवऱ्यानं” नम्रतानं बरोबर शब्दांत पकडलेलं आता मीहीरला.
“आलीस का मुद्द्यावर!.. बरं ठीक आहे.. जर तू आज वड्या पाठवल्यास तर तुझी डिमांड मी आज नक्की पुरी करणार”
“तुम्ही ना असं वागता की गरज फक्त मलाच आहे” ती काहीशा चीडचीडीनं बोलली.. “आज मोजून वीस दीवस होतील.. इतकंही आखडू नये माणसानं. डबा पाठवतेय.. जी डाळ भाजी बनवेन ती खाऊन घ्या.” तिनं काहीशा रागातच फोन ठेऊन दिला पलीकडून.
पाऊस कोसळतच होता. कुणावर तरी रागावल्यासारखा. एक निश्वास सोडून मीहीर जवळच्याच एका बाकड्यावर स्थिरावला. बारा वाजत आलेले. नम्रताचं चिडणं साहजिकच होतं. अलीकडं तिच्याशी पहिल्यासारखा रममाण होऊ शकत नव्हता तो. रात्रीच्या एकांतात तिचा अधीर स्पर्श सर्वांगावर व्हायचा पण मनात असूनही मीहीर निश्चल पडून राहायचा.
दिवसभराची दगदग.. कामाचा व्याप.. आणि महत्त्वाचं म्हणजे टेन्शन. कर्ज आणि खर्चाचा प्रचंड बोजा. खरंतर दसऱ्यानंतर परिस्थिती पालटण्याचे खूप चान्सेस होते. पण मनावर एक अनामिक भीती पहारा देऊन होती आणि ह्या ताणतणावाची असंख्य भुतं रात्री बेडवर पडल्यावर भोवतीनं नाचायची. अलीकडं मध्यरात्री मधेच जाग यायची. मग पहाटेपर्यंत डोळा लागायचा नाही.
नम्रतानं अंगावर टाकलेला हात तो अलगद उचलून बाजूला ठेवायचा. रात्रभर तिच्या अस्वस्थ हालचाली त्याला जाणवत राहायच्या.
….विचारात अर्धा तास गेला असेल इतक्यात डबेवाला आला आणि डबा देऊन गेला. हात धुवून त्यानं डबा उघडला आणि पाहातच राहिला तो.. चक्क गरमागरम अळूच्या वड्या.. हिरव्या.. सोनेरी चमचमत्या.. सोबत चपाती आणि नेहमीचा डाळ-भात-भाजीही.. क्षणभर त्याला नम्रताचं वाईट वाटलं. एवढ्या गडबडीतही तिनं त्याची मागणी पूर्ण केलेली. आपण मात्र तिच्याशी ब्लॅकमेल केल्यासारखे वागतोय.
आजही माहिती होतं की तिला हा वड्यांचा पसारा अचानक मांडणं शक्य नव्हतं तरी आपण तिला तसं सांगितलं आणि तिनं मात्र आपल्याला आवडतात म्हणून झटपट बनवून डबा पाठवून दिलाय. डाळीचं पीठही नव्हतं घरात. खूपच गडबड झाली असेल तिची पण बीचारीनं त्यातूनही आपली अपेक्षा पूर्ण केलीय. इतक्यात मोबाईल वाजला.
नम्रता…
“ह्यालो.. जेवलात?”
” अं.. हो.. जेवतोय” पहिला घास मोडत तो बोलला.
“कशा झाल्यात वड्या? “तिचा हसरा.. खट्याळ स्वर”
“wow… अप्रतिम! सुरेख.. नेहमीप्रमाणेच.. Thanx a lot..”
“नुसतं कोरडं थँन्क्स नको.. शब्द विसरु नका..”
“हो गं बाई.. नाही विसरत” चेहऱ्यावर मंद स्मित होतं आता त्याच्या.
जेवण उरकलं. चार वाजत आलेले..
“साहेब “जानबाची हाक ऐकू आली.
“काय रे…”
“चार वाजल्यात. च्या मागवा की पोरास्नी”
“अरे? अशा पावसात कुठं मिळणार चहा..?” खरंतर त्यालाही तलफ झालेली. “पलीकडच्या चौकात एक हाटेल हाय.. मी येतो की घेऊन”
“अरे पण हा असला पाऊस?…
“म्हणून का तलफ मारायची का? अशा पडत्या पावसात तर च्या लैच ग्वाड लागतो. आन् साहेब.. पाऊस.. ऊन.. थंडी.. वारा.. तेंच ती काम करत्यात आपुन आपलं करावं.. पाऊस तर पडतच राहणार.? पण म्हणून आपुन आपला जीव का मारायचा?..” चहा पिऊन झाला तरी जानबाची वाक्ये मनात घोळत राहिली. खरंच तर होतं.. हातात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कोणत्याही सबबींचं आवरण न घालता उपभोगता आला पाहिजे.
…रात्रीची जेवणं उरकली.
नम्रताला दिलेला शब्द मीहीरनं अचुक पाळला. बाहेर कोसळता पाऊस आणि आत प्रणयाची बेधुंद वर्षा होत राहिली. सकाळी सचैल न्हालेली नम्रता जेव्हा चहा घेऊन आली तेव्हा पावसानंतर धरणीवर उन्हं पडावीत आणि सगळा आसमंत तजेलदार व्हावा तसा तिचा चेहरा टवटवीत दिसत होता.
राजूची आज सकाळची शाळा होती. तो कधीचाच शाळेत गेलेला. नम्रताची आपल्याच तंद्रीत आवराआवर चाललेली. चहा पीता-पीता तो तिच्या चैतन्यमयी हालचाली न्याहाळत राहिला. जे होईल ते होऊ दे.. पण आपलं टेन्शन आपण हिच्यावर नको काढायला.. उद्याची काळजी करण्याच्या नादात हाती असलेले छोटे छोटे आनंदाचे क्षण नको निसटायला.
एवढ्यात शेजारच्या ऊमा वहिनी आल्या.. “नम्रता.. अगं तेवढी वाटी देतेस का?”
“हो.. आलेच.. “कीचनमधे जात नम्रतानं सांगितलं.
“बरं मग कशा काय झालेल्या कालच्या अळूच्या वड्या?” अचानक वहीनीनी मीहीरला विचारल्यानं तोही जरा गांगरलाच.
“अं.. खूप मस्त होत्या.. पण तुम्हाला कसं माहिती.. ही बोलली का?”
“घ्या आता.. अहो मीच बनवल्या होत्या..”
“काय सांगता.. तुम्ही बनवलेल्या? “मीहीरच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता.
“हो तर.. काल पानं नेलेली तुमच्या अंगणातली.. मी म्हटलं द्याव्या चार वड्या शेजारधर्म म्हणून.. नेमका त्यावेळी नम्रता तुमचाच डबा भरत होती.. तिनं सगळ्याच गरमागरम वड्या डब्यात दिलेल्या.. तुम्हाला आवडल्या ना?”
तोच कीचनमधून नम्रता आली.” म्हणजे काय?? यांना प्रचंड आवडल्या… काय करणार वहिनी… यांना खूप आवडतात ना.. म्हणून मग दिल्या सगळ्याच..” नम्रतानं शिरा भरलेला डबा हसत हसत वहिनींच्या हाती दिला.
“म्हणजे त्या वड्या तुम्ही बनवल्या होत्या वहिनी? ..तरी म्हटलं इतक्या झटपट वड्या झाल्याच कशा तयार? “मीहीरचा चेहरा बावळटासारखा झालेला.
“पण तुमच्या वड्यांनी माझा मात्र खूप फायदा झालाय बरं का वहीनी.. “नम्रता मीहीरकडे पाहत अजूनही हसत होती.
“म्हणजे? “वहिनीना काही कळेना..
“सांगेन कधीतरी..”
आता वहिनी बावळटासारखे खांदे उडवून निघून गेल्या.. त्या गेल्या तशा मीहीरनं उठून नम्रताची वेणी पकडली.
“हे सरळ सरळ चीटींग आहे हं नमा..” तिला जवळ ओढत तो म्हणाला.
“हे बघा तुम्हाला वड्या हव्या होत्या.. त्या तुम्हाला मिळाल्याशी मतलब.. कालचा दिवसच माझा होता. म्हणून तर ध्यानीमनी नसताना वहिनींच्या अळूच्या वड्या माझ्या उपयोगी पडल्या.. खरं प्रेम असेल ना तर देव देखील असा मदतीला धावतो..”
“हो का.. मग आता बघू तुझ्या मदतीला कोण धावतं ते” असं म्हणत मीहीरनं तिला घट्ट विळखा घातला..
बाहेर पावसाला सुरुवात झाली आणि आत दोघांच्या चेष्टामस्करीला बहर आला..
“साला.. एक लाखाचे आठ लाख करुन देणारा हा बरकती धंदा हाय.. तू धाडस तर कर.. पैशात लोळशील.. नक्की जमेल तुला..” असं सुरुवातीला सांगणारा सिंघानिया आता “पार वाट लागली राव कन्स्ट्रक्शन धंद्याची ह्या तीन वर्षांत.. गिर्हाइक पैशाचं काढायला मागत नाय.. जुने लोक घाईला आले.. नवीन धंदा करणारा येडाच म्हणायचा.. आपण तर साला बघेल नायतर सरळ धंदा बंद करेल..”
ह्या दोन तीन वर्षांत खरंच परिस्थिती बीकट झालेली. जीएसटीनं अचानक वाढलेल्या किमती.. लोखंडसळीचे अस्थिर दर… वाळुचा तुटवडा. खडी डबरचा अपुरा आणि अनियमित पुरवठा.. कामाला होणारा विलंब आणि वाढत चाललेलं ब्यांकांचं व्याज.
डिएसकेसारखा माणूस जिथं आर्थिक डबघाईला येतो तिथं आपली काय कथा? रिकव्हरीसाठी माफक फायदा काढून ब्लॉक्स विकण्याशिवाय पर्याय नव्हता. विचारात असतानाच नाकात खमंग वास दरवळला. “साहेब.. या नाष्टा करायला..” प्लास्टरच्या कामावर असलेला जानबा आणि इतर दोघंतिघं मजूर ओल्या जमिनीवर विटा मांडून त्यावर बसलेले. समोर दोन विटा मांडून त्यावर डबे ठेवलेले.
अळूच्या वड्या… मीहीरचा फेवरेट पदार्थ.. औपचारिकता म्हणून विचारुन जानबानं खायला सुरुवातही केलेली. त्यानं जर खरंच अजून आग्रह केला असता तर मीहीरनं खाल्लंही असतं. अगदी आताही वाटत होतं की एखादी वडी सहजच उचलून अलगद खावी. अगदी लहाणपणी खायचो तसं. पण ते त्याला प्रशस्त वाटेना. गावी असताना लहानपणी आई महिन्यातून एकदा तरी अळुच्या वड्या करायचीच. परसदारी अळुचं बेटच माजलेलं. सगळं गाव पानं खुडून न्यायचं. कारण हे अळू कधी घशात खवखवत नव्हतं. शिवाय पोटालाही कधी बाधलं नाही. लग्नानंतर नोकरीमुळं इकडंच बस्तान बसलं. भाड्याचं घर असलं तरी भलंमोठं अंगण होतं समोर. तुळशीसोबतच नळाचं पाणी वाहणाऱ्या एका कोपऱ्यात आईनं घरच्या अळूचे मोजून चार गड्डे लावलेले. आज त्याचा विस्तार चांगलाच वाढलेला.
“काहीही झालं तरी बाजारातली पानं कधी आणू नकोस” नम्रताला तिनं सांगून ठेवलं होतं. “अक्षरशः गटाराच्या पाण्यावर उगवलं जातं अळू शहरात” नम्रताही अगदी आईच्या तोडीस तोड वड्या करायची. …सकाळी साइटवर निघताना आजही तिचा चेहरा नाराज होता. तिच्या विचारानं मनात उगाच कालवाकालव झाली.. जानबा खात असलेल्या वड्यांचाही त्याला विसर पडला. लक्ष परत कोसळणाऱ्या पावसावर स्थिरावलं. आपलं वागणं कुठंतरी चुकतंय.. तिच्या जागी ती योग्य आहे. बायको म्हणुन आपल्या कर्तव्यात ती कुठंही कसूर करत नाही. पण आपलंच का असं होतंय?. रोज ठरवतो आज तिला नाराज नाही करायचं.. पण…!!
“साहेब.. आज तेवढं पगाराचं बगा.. पोराचं आडमीशन थटलंय..” जानबा डबा बंद करत बोलला.
“अं.. हो.. करतो संध्याकाळ पर्यंत.” अशा भर पावसात एटीएमवरून पैसे नेमके कुठून काढायचे ह्या विचाराने तो किंचित वैतागला. बँकेत असलेली रक्कम झपाट्याने कमी कमी होत चाललेली. दसऱ्यापर्यंत किल्ला लढवावा लागणार होता.
नम्रताचा हातभार नसता तर ?? ती आहे म्हणूनच तगलोय आपण. तिनं सहज हौस म्हणून केलेला ब्युटीपार्लरचा कोर्स.. जोडीला मेहंदी आणि रुखवतातल्या वस्तू बणवायचं कसब. ऐन जुलै महिन्यातही लग्न तिथींनी हात दिलेला. रोजचे हजार-पाचशे घरी येत होते. घरखर्चाचं केवढं तरी टेन्शन कमी झालेलं. राजूच्या शाळेचा सगळा खर्च तिनं यावर्षी शिरावर घेतलेला. तिलाही जाणीव होती की सगळं किडुकमिडुक जरी आज गहाण पडलं असलं तरी दसऱ्यानंतर दिवस पालटणार होते. तेवढा तिचा मीहीरवर विश्वास होता. पण धंद्याची फसणारी गणितं. मार्केटची झालेली वाताहात, दसऱ्यापर्यंत स्थिती खरंच सुधारणार का? याचा घोर मीहीरला होता. कारण अजून एकाही ब्लॉकचं साधं बुकींगही झालं नव्हतं. जाहिराती सोडणं आता अत्यंत गरजेचं होतं आणि जाहिराती सोडूनही नाहीच प्रतिसाद भेटला तर?
सुरुवातीला असणारा उत्साह ढेपाळू लागला होता. इतक्यात मोबाईल वाजला. नम्रताचा फोन..
“ह्यालो.. कसे आहात?”
“मी ठीक आहे की.. का गं.. असं का विचारतेस ?”
“काही नाही हो.. असंच विचारतेय.. तुमची अचानक आठवण आली.. त्यामुळं “बोलण्यात एक लाडीक अंदाज होता तिच्या.
“असं का?..”
“होना… बाहेर कीती छान पाऊस पडतोय ना.?”
“हो ना” मीहीर तिचा हलकाफुलका मूड पाहून मनोमन सुखावला.
“तुम्हाला आठवतंय.. मागच्या वर्षी आपण महाबळेश्वरच्या पावसात भिजलेलो”
क्षणात मीहीरच्या नजरेसमोर गेल्यावर्षीचा महाबळेश्वरचा धोधो पाऊस आणि त्यानंतर हॉटेल हर्टबीट्सच्या अलीशान सुटमधला एकांत आठवला. “खरंतर याही वर्षी गेलो असतो.. पण तुला तर माहितीच आहे ना माझी अवस्था” मीहीर बोलून गेला.
“पाऊस एन्जॉय करायला महाबळेश्वरच कशाला हवं.. तुम्ही मनात आणलं तर इथंही तेच फील येऊ शकतं की” नम्रता खोडकरपणे बोलत होती.
“येऊ का आत्ता घरी बोल.. !” उगाच तिला बरं वाटावं म्हणून तो बोलला.
“जेव्हा हवं तेव्हा टाळाटाळ करायची आणि नको तेव्हा लाडात यायचं “नम्रताचा सुर आता गंभीर होता.
“अगं खरंच.. चेष्टा नाही करत” आता मीहीर गंमतीच्या स्वरात बोलला.
“तुम्ही? आणि कोसळत्या पावसात? इतक्या दूर? आणि तेही माझ्यासाठी? नशीबच म्हणायचं माझं.”
“अगं खरंच.. अजूनही तितकंच प्रेम आहे माझं तुझ्यावर” तिची मस्करी करायला मीहीरला मजा वाटत होती.
“एक सांगू.. तुमच्यापेक्षा दुप्पट माझं प्रेम तुमच्यावर आहे”
“ते माहीत आहे गं मला.. तू आहेस म्हणून मी आहे” मीहीरचा सुर आता गंभीर होता.
“नशीब माझं.. तेवढं तरी कबूल करताय.. बरं डब्याला काय देऊ ते सांगा.. सकाळी लवकर गेलात. हा पाऊस पण थांबायची लक्षणं नाहीत. डबेवाल्याजवळ देते तेवढा कलेक्ट करा.”
“बरं.. चालेल.. एक काम करशील? अळूच्या वड्या बनव ना गरमागरम.” मुद्दामच मीहीरनं खडा टाकला.
“काय वेडबीड तर नाही ना लागलं? अहो आताच राजूला शाळेत सोडून आलेय.. दुकानात निघायला आधीच उशीर झालाय.. आता अजून अळूच्या वड्यांचा सरंजाम कधी मांडू? आणि डाळीचं पीठही आणावं लागेल आता पावसात जाऊन”
“हेच का प्रेम? कधी नव्हे तो नवरा काहीतरी मागतो तर त्यालाही नकार..”
“हो का.. मग बायकोही काहीतरी मागत असते रोज त्याचाही कधीतरी विचार करायचा ना नवऱ्यानं” नम्रतानं बरोबर शब्दांत पकडलेलं आता मीहीरला.
“आलीस का मुद्द्यावर!.. बरं ठीक आहे.. जर तू आज वड्या पाठवल्यास तर तुझी डिमांड मी आज नक्की पुरी करणार”
“तुम्ही ना असं वागता की गरज फक्त मलाच आहे” ती काहीशा चीडचीडीनं बोलली.. “आज मोजून वीस दीवस होतील.. इतकंही आखडू नये माणसानं. डबा पाठवतेय.. जी डाळ भाजी बनवेन ती खाऊन घ्या.” तिनं काहीशा रागातच फोन ठेऊन दिला पलीकडून.
पाऊस कोसळतच होता. कुणावर तरी रागावल्यासारखा. एक निश्वास सोडून मीहीर जवळच्याच एका बाकड्यावर स्थिरावला. बारा वाजत आलेले. नम्रताचं चिडणं साहजिकच होतं. अलीकडं तिच्याशी पहिल्यासारखा रममाण होऊ शकत नव्हता तो. रात्रीच्या एकांतात तिचा अधीर स्पर्श सर्वांगावर व्हायचा पण मनात असूनही मीहीर निश्चल पडून राहायचा.
दिवसभराची दगदग.. कामाचा व्याप.. आणि महत्त्वाचं म्हणजे टेन्शन. कर्ज आणि खर्चाचा प्रचंड बोजा. खरंतर दसऱ्यानंतर परिस्थिती पालटण्याचे खूप चान्सेस होते. पण मनावर एक अनामिक भीती पहारा देऊन होती आणि ह्या ताणतणावाची असंख्य भुतं रात्री बेडवर पडल्यावर भोवतीनं नाचायची. अलीकडं मध्यरात्री मधेच जाग यायची. मग पहाटेपर्यंत डोळा लागायचा नाही.
नम्रतानं अंगावर टाकलेला हात तो अलगद उचलून बाजूला ठेवायचा. रात्रभर तिच्या अस्वस्थ हालचाली त्याला जाणवत राहायच्या.
….विचारात अर्धा तास गेला असेल इतक्यात डबेवाला आला आणि डबा देऊन गेला. हात धुवून त्यानं डबा उघडला आणि पाहातच राहिला तो.. चक्क गरमागरम अळूच्या वड्या.. हिरव्या.. सोनेरी चमचमत्या.. सोबत चपाती आणि नेहमीचा डाळ-भात-भाजीही.. क्षणभर त्याला नम्रताचं वाईट वाटलं. एवढ्या गडबडीतही तिनं त्याची मागणी पूर्ण केलेली. आपण मात्र तिच्याशी ब्लॅकमेल केल्यासारखे वागतोय.
आजही माहिती होतं की तिला हा वड्यांचा पसारा अचानक मांडणं शक्य नव्हतं तरी आपण तिला तसं सांगितलं आणि तिनं मात्र आपल्याला आवडतात म्हणून झटपट बनवून डबा पाठवून दिलाय. डाळीचं पीठही नव्हतं घरात. खूपच गडबड झाली असेल तिची पण बीचारीनं त्यातूनही आपली अपेक्षा पूर्ण केलीय. इतक्यात मोबाईल वाजला.
नम्रता…
“ह्यालो.. जेवलात?”
” अं.. हो.. जेवतोय” पहिला घास मोडत तो बोलला.
“कशा झाल्यात वड्या? “तिचा हसरा.. खट्याळ स्वर”
“wow… अप्रतिम! सुरेख.. नेहमीप्रमाणेच.. Thanx a lot..”
“नुसतं कोरडं थँन्क्स नको.. शब्द विसरु नका..”
“हो गं बाई.. नाही विसरत” चेहऱ्यावर मंद स्मित होतं आता त्याच्या.
जेवण उरकलं. चार वाजत आलेले..
“साहेब “जानबाची हाक ऐकू आली.
“काय रे…”
“चार वाजल्यात. च्या मागवा की पोरास्नी”
“अरे? अशा पावसात कुठं मिळणार चहा..?” खरंतर त्यालाही तलफ झालेली. “पलीकडच्या चौकात एक हाटेल हाय.. मी येतो की घेऊन”
“अरे पण हा असला पाऊस?…
“म्हणून का तलफ मारायची का? अशा पडत्या पावसात तर च्या लैच ग्वाड लागतो. आन् साहेब.. पाऊस.. ऊन.. थंडी.. वारा.. तेंच ती काम करत्यात आपुन आपलं करावं.. पाऊस तर पडतच राहणार.? पण म्हणून आपुन आपला जीव का मारायचा?..” चहा पिऊन झाला तरी जानबाची वाक्ये मनात घोळत राहिली. खरंच तर होतं.. हातात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कोणत्याही सबबींचं आवरण न घालता उपभोगता आला पाहिजे.
…रात्रीची जेवणं उरकली.
नम्रताला दिलेला शब्द मीहीरनं अचुक पाळला. बाहेर कोसळता पाऊस आणि आत प्रणयाची बेधुंद वर्षा होत राहिली. सकाळी सचैल न्हालेली नम्रता जेव्हा चहा घेऊन आली तेव्हा पावसानंतर धरणीवर उन्हं पडावीत आणि सगळा आसमंत तजेलदार व्हावा तसा तिचा चेहरा टवटवीत दिसत होता.
राजूची आज सकाळची शाळा होती. तो कधीचाच शाळेत गेलेला. नम्रताची आपल्याच तंद्रीत आवराआवर चाललेली. चहा पीता-पीता तो तिच्या चैतन्यमयी हालचाली न्याहाळत राहिला. जे होईल ते होऊ दे.. पण आपलं टेन्शन आपण हिच्यावर नको काढायला.. उद्याची काळजी करण्याच्या नादात हाती असलेले छोटे छोटे आनंदाचे क्षण नको निसटायला.
एवढ्यात शेजारच्या ऊमा वहिनी आल्या.. “नम्रता.. अगं तेवढी वाटी देतेस का?”
“हो.. आलेच.. “कीचनमधे जात नम्रतानं सांगितलं.
“बरं मग कशा काय झालेल्या कालच्या अळूच्या वड्या?” अचानक वहीनीनी मीहीरला विचारल्यानं तोही जरा गांगरलाच.
“अं.. खूप मस्त होत्या.. पण तुम्हाला कसं माहिती.. ही बोलली का?”
“घ्या आता.. अहो मीच बनवल्या होत्या..”
“काय सांगता.. तुम्ही बनवलेल्या? “मीहीरच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता.
“हो तर.. काल पानं नेलेली तुमच्या अंगणातली.. मी म्हटलं द्याव्या चार वड्या शेजारधर्म म्हणून.. नेमका त्यावेळी नम्रता तुमचाच डबा भरत होती.. तिनं सगळ्याच गरमागरम वड्या डब्यात दिलेल्या.. तुम्हाला आवडल्या ना?”
तोच कीचनमधून नम्रता आली.” म्हणजे काय?? यांना प्रचंड आवडल्या… काय करणार वहिनी… यांना खूप आवडतात ना.. म्हणून मग दिल्या सगळ्याच..” नम्रतानं शिरा भरलेला डबा हसत हसत वहिनींच्या हाती दिला.
“म्हणजे त्या वड्या तुम्ही बनवल्या होत्या वहिनी? ..तरी म्हटलं इतक्या झटपट वड्या झाल्याच कशा तयार? “मीहीरचा चेहरा बावळटासारखा झालेला.
“पण तुमच्या वड्यांनी माझा मात्र खूप फायदा झालाय बरं का वहीनी.. “नम्रता मीहीरकडे पाहत अजूनही हसत होती.
“म्हणजे? “वहिनीना काही कळेना..
“सांगेन कधीतरी..”
आता वहिनी बावळटासारखे खांदे उडवून निघून गेल्या.. त्या गेल्या तशा मीहीरनं उठून नम्रताची वेणी पकडली.
“हे सरळ सरळ चीटींग आहे हं नमा..” तिला जवळ ओढत तो म्हणाला.
“हे बघा तुम्हाला वड्या हव्या होत्या.. त्या तुम्हाला मिळाल्याशी मतलब.. कालचा दिवसच माझा होता. म्हणून तर ध्यानीमनी नसताना वहिनींच्या अळूच्या वड्या माझ्या उपयोगी पडल्या.. खरं प्रेम असेल ना तर देव देखील असा मदतीला धावतो..”
“हो का.. मग आता बघू तुझ्या मदतीला कोण धावतं ते” असं म्हणत मीहीरनं तिला घट्ट विळखा घातला..
बाहेर पावसाला सुरुवात झाली आणि आत दोघांच्या चेष्टामस्करीला बहर आला..
4 Comments
Mast bhau
खूप सुंदर , वाचताना त्या प्रसंगात स्वतः डुबन जाण जेव्हा होत त्या वेळी लिखाण किती अप्रतिम आहे याला दुजोरी मिळते
सुंदर लेखन
Khupach sundar