दरवर्षी पेक्षा यावर्षी उन्हाळा जास्त जाणवत आहे. पूर्वी होळी झाल्यावर हळूहळू उन्हाळा वाढत असे. मात्र, गेली काही वर्षे दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. यावर्षी तर होळी होण्याअगोदरच उष्णतेची लाट आली आणि पारा ४५अंशांपर्यंत गेला आणि अचानक वाढलेल्या ह्या उन्हामुळे सर्वांना त्रास झाला. सध्या सगळीकडे उन्हाचा तडाखा वाढल्याने विविध आजार वाढत आहेत. त्यात प्रामुख्याने डोळे येणे, कावीळ, उष्माघात कांजण्या, नागीण, असे प्रकार दिसत आहेत. आता हे सर्व वाढण्याचे कारण म्हणजे उन्हाचा त्रास झाल्याने व शरीरातील गरमी वाढल्याने होत आहेत.
उन्हाळा सुरू झाला की, थंड पदार्थ खाण्याकडे कल वाढतो. त्यात आइस्क्रीम, कोल्डड्रिंक्स, सरबते, गारपाणी, सगळ्यात बर्फ टाकला जातो. पण हे आपल्यासाठी चांगले नाही. कारण आपण त्यामुळे अनेक आजारांना स्वतः आमंत्रण देतो. आपल्याला ह्या कडक उन्हापासून बचाव करायचा असेल तर काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे. ह्या दिवसात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे जास्त पाणी पिणे आवश्यक असले तरी ते साधे पाणी प्यावे किंवा माठातील पाणी प्यावे.फळांचे ज्यूस प्यावेत पण बर्फ न टाकता. उसाचा रस प्यावा पण त्यात बर्फ टाकू नये. त्याने आपल्याला थंडावा मिळतो. निसर्गाने आपल्याला त्या त्या मोसमानुसार फळे- भाज्या दिल्यात पण आपण त्यात आपल्या चवींसाठी बदल केले; तेच नेमके घातक आहेत. ह्या दिवसात जांभळे, ताडगोळे, रांजण, जांब, शहाळ्याचे पाणी , संत्री, मोसंबी, कलिंगड, ह्यासारखी फळे खावीत. ज्यातून शरीराला आवश्यक गोष्टी मिळतात. जेवणातही जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. पचायला हलके असेल ते जेवणात ठेवावे. तोंडली, काकडी, दुधी, गाजर , भेंडी, पालेभाज्या यांचा वापर करावा. कडधान्य जड असतात. ती खाऊ नयेत. मूग -मटकी चालते; पण चवळी, चणे, छोले, वाल हे पचायला जड असतात. मला आठवते; आमच्या लहानपणी ह्या दिवसात घरात पालेभाजी असायची आणि भातासोबत रोज कढी असायची. कधी कोंकम, आंबा, चिंच, ताक याची. कधी भाजलेला पापड, असे जेवण असे. आता त्याचे महत्त्व पटते. पण आजच्या तरुण पिढीचा कल बदललेला आहे. हॉटेलमधील मसालेदार ग्रेव्हीचे जेवण सर्वाना आवडते आणि नेमके तेच आपल्यासाठी घातक असते.
ह्या दिवसात तळलेले पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे तहान तहान होत राहते. निसर्गाने आपल्याला त्याचा बदलत्या ऋतूननुसार भाज्या -फळे उपलब्ध केलेली आहेत. त्याला आपण समजून घेतले तर बरेच आजार टाळता येऊ शकतात. त्या-त्या सीजन नुसार भाज्या- फळे खाल्ली;तर त्याचा त्रास होत नाही. कोंकणात तर ह्या दिवसात खूप मजा असते. काजू ,फणस ,आंबा यासारखी फळे असतात तर ताडगोळे रांजण ,जांब, अननस ,आवळे असे अनेक प्रकार खायला मिळतात. आम्ही तर खूप मजा केली आहे लहानपणी. कोंकमाच्या झाडावर चढायचे, त्याची हिरवी कच्ची कोकम खायची. मग ते पिवळे दात घेऊन बसायचे. मला आठवते, भोकाराची फळे ह्या दिवसात असतात .आंबा,भोकर असे लोणचे आई घाली. ते बरणीत भरले कि २ दिवसात आम्हाला खायला आवडे. त्याची पीठ पेरून होणारी भाजी आणि भाकरी मस्त लागत असे. ह्या दिवसात शेवग्याच्या शेंगाही खूप असतात. त्याही खाव्यात. त्यातून खूप फायदा होतो. मोठ्या प्रमाणात त्यातून कॅल्शियम आपल्याला मिळत असते पण आजकाल ची मुले हेच खात नाहीत. शेवग्याचा शेंगा कशातही घातल्या तरी छान लागतात शेंगा थोड्या जून झाल्या तरी त्या उकडून त्याचा गर काढून त्याचे भरीत छान होते. ह्या दिवसात करवंदे मिळतात. तिचे लोणचे छान होते. चटणी छान लागते पिकलेली खातो तसे कच्चीही खावीत. ह्या दिवसात बाहेरची कोल्डड्रिंक्स पिण्यापेक्षा कोकम सरबत, आंबा पन्हे मग ते कच्च्या कैरीचे असुदेत किंवा उकडलेल्या कैरीचे, आवळ्याचे सरबत, कलिंगडाचे ज्यूस, मोसंबीच्या ज्यूस, संत्र्याचे ज्यूस प्यावेत. ह्या दिवसात आपल्याला सी व्हिटॅमिन मिळणे अतिशय महत्त्वाचे असते.उन्हाळ्यात शक्यतो आपली कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावीत. उन्हात फिरून कामे करू नयेत. जावेच लागले उन्हाच्या वेळेत तर डोक्याला रुमाल, डोळ्यांवर गॉगल, लावून पाण्याची बाटली सोबत घेऊन जावे. दर १५मिनिटांनी पाण्याचे २ घोट तरी पाणी प्यावे. घरी आल्यावर पातळ ताक प्यावे. त्यात जिरे पावडर घातली तर अजून चांगले. पण ताक गोडसर, ताजे असावे आणि पातळ ताक प्यावे. लिंबू सरबत प्यावे. त्यात सब्जा भिजवून घालावा त्याने उष्णतेचा त्रास होत नाही. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी आणि मधुमेहींनी तर ह्या उन्हाळ्यात खूप काळजी घेतली पाहिजे. तरुण पिढीने काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. या दिवसात पेहराव करतानाही पातळ आणि सुती कपडे वापरावेत. कुणाला काय वाटेल ह्या पेक्षा आपल्याला काय गरजेचे आहे ते महत्त्वाचे असते. शक्यतो पांढरे कपडे, सुती कपडे वापरले तर उन्हाळ्याचा त्रास होत नाही. ह्या दिवसात गडद रंगाचे कपडे वापरू नयेत फिक्कट रंगाचे कपडे वापरावेत. उन्हाळा चांगला जाण्यासाठी आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी हलका सकस आहार घेऊन राहिले तर समजणारही नाही, उन्हाळा आहे म्हणून! सोबत रानमेव्याचा आस्वाद घ्या मग उन्हाळा चांगला जाईल. ह्या दिवसात नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांनी चिकन जास्त खाऊ नये. अंडी खाऊ नयेत ;तर छोटी मासळी खावी. शक्यतो त्यांनीही पालेभाजीवर भर द्यावा. ह्या दिवसात गावठी टोमॅटो ही छान मिळतात .त्याचे सार प्यावे , त्याची भाजी खावी. काकडीचा वापर जेवणात करावा. नुसती काकडी खावी. ती तहानही भागवते आणि ह्या दिवसात पचनक्रियेसाठी ती उपयोगी आहे न घाबरता योग्य काळजी घ्या आणि उन्हाळा दूर करून आपले आरोग्य चांगले ठेवा!
उन्हाळा सुरू झाला की, थंड पदार्थ खाण्याकडे कल वाढतो. त्यात आइस्क्रीम, कोल्डड्रिंक्स, सरबते, गारपाणी, सगळ्यात बर्फ टाकला जातो. पण हे आपल्यासाठी चांगले नाही. कारण आपण त्यामुळे अनेक आजारांना स्वतः आमंत्रण देतो. आपल्याला ह्या कडक उन्हापासून बचाव करायचा असेल तर काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे. ह्या दिवसात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे जास्त पाणी पिणे आवश्यक असले तरी ते साधे पाणी प्यावे किंवा माठातील पाणी प्यावे.फळांचे ज्यूस प्यावेत पण बर्फ न टाकता. उसाचा रस प्यावा पण त्यात बर्फ टाकू नये. त्याने आपल्याला थंडावा मिळतो. निसर्गाने आपल्याला त्या त्या मोसमानुसार फळे- भाज्या दिल्यात पण आपण त्यात आपल्या चवींसाठी बदल केले; तेच नेमके घातक आहेत. ह्या दिवसात जांभळे, ताडगोळे, रांजण, जांब, शहाळ्याचे पाणी , संत्री, मोसंबी, कलिंगड, ह्यासारखी फळे खावीत. ज्यातून शरीराला आवश्यक गोष्टी मिळतात. जेवणातही जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. पचायला हलके असेल ते जेवणात ठेवावे. तोंडली, काकडी, दुधी, गाजर , भेंडी, पालेभाज्या यांचा वापर करावा. कडधान्य जड असतात. ती खाऊ नयेत. मूग -मटकी चालते; पण चवळी, चणे, छोले, वाल हे पचायला जड असतात. मला आठवते; आमच्या लहानपणी ह्या दिवसात घरात पालेभाजी असायची आणि भातासोबत रोज कढी असायची. कधी कोंकम, आंबा, चिंच, ताक याची. कधी भाजलेला पापड, असे जेवण असे. आता त्याचे महत्त्व पटते. पण आजच्या तरुण पिढीचा कल बदललेला आहे. हॉटेलमधील मसालेदार ग्रेव्हीचे जेवण सर्वाना आवडते आणि नेमके तेच आपल्यासाठी घातक असते.
ह्या दिवसात तळलेले पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे तहान तहान होत राहते. निसर्गाने आपल्याला त्याचा बदलत्या ऋतूननुसार भाज्या -फळे उपलब्ध केलेली आहेत. त्याला आपण समजून घेतले तर बरेच आजार टाळता येऊ शकतात. त्या-त्या सीजन नुसार भाज्या- फळे खाल्ली;तर त्याचा त्रास होत नाही. कोंकणात तर ह्या दिवसात खूप मजा असते. काजू ,फणस ,आंबा यासारखी फळे असतात तर ताडगोळे रांजण ,जांब, अननस ,आवळे असे अनेक प्रकार खायला मिळतात. आम्ही तर खूप मजा केली आहे लहानपणी. कोंकमाच्या झाडावर चढायचे, त्याची हिरवी कच्ची कोकम खायची. मग ते पिवळे दात घेऊन बसायचे. मला आठवते, भोकाराची फळे ह्या दिवसात असतात .आंबा,भोकर असे लोणचे आई घाली. ते बरणीत भरले कि २ दिवसात आम्हाला खायला आवडे. त्याची पीठ पेरून होणारी भाजी आणि भाकरी मस्त लागत असे. ह्या दिवसात शेवग्याच्या शेंगाही खूप असतात. त्याही खाव्यात. त्यातून खूप फायदा होतो. मोठ्या प्रमाणात त्यातून कॅल्शियम आपल्याला मिळत असते पण आजकाल ची मुले हेच खात नाहीत. शेवग्याचा शेंगा कशातही घातल्या तरी छान लागतात शेंगा थोड्या जून झाल्या तरी त्या उकडून त्याचा गर काढून त्याचे भरीत छान होते. ह्या दिवसात करवंदे मिळतात. तिचे लोणचे छान होते. चटणी छान लागते पिकलेली खातो तसे कच्चीही खावीत. ह्या दिवसात बाहेरची कोल्डड्रिंक्स पिण्यापेक्षा कोकम सरबत, आंबा पन्हे मग ते कच्च्या कैरीचे असुदेत किंवा उकडलेल्या कैरीचे, आवळ्याचे सरबत, कलिंगडाचे ज्यूस, मोसंबीच्या ज्यूस, संत्र्याचे ज्यूस प्यावेत. ह्या दिवसात आपल्याला सी व्हिटॅमिन मिळणे अतिशय महत्त्वाचे असते.उन्हाळ्यात शक्यतो आपली कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावीत. उन्हात फिरून कामे करू नयेत. जावेच लागले उन्हाच्या वेळेत तर डोक्याला रुमाल, डोळ्यांवर गॉगल, लावून पाण्याची बाटली सोबत घेऊन जावे. दर १५मिनिटांनी पाण्याचे २ घोट तरी पाणी प्यावे. घरी आल्यावर पातळ ताक प्यावे. त्यात जिरे पावडर घातली तर अजून चांगले. पण ताक गोडसर, ताजे असावे आणि पातळ ताक प्यावे. लिंबू सरबत प्यावे. त्यात सब्जा भिजवून घालावा त्याने उष्णतेचा त्रास होत नाही. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी आणि मधुमेहींनी तर ह्या उन्हाळ्यात खूप काळजी घेतली पाहिजे. तरुण पिढीने काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. या दिवसात पेहराव करतानाही पातळ आणि सुती कपडे वापरावेत. कुणाला काय वाटेल ह्या पेक्षा आपल्याला काय गरजेचे आहे ते महत्त्वाचे असते. शक्यतो पांढरे कपडे, सुती कपडे वापरले तर उन्हाळ्याचा त्रास होत नाही. ह्या दिवसात गडद रंगाचे कपडे वापरू नयेत फिक्कट रंगाचे कपडे वापरावेत. उन्हाळा चांगला जाण्यासाठी आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी हलका सकस आहार घेऊन राहिले तर समजणारही नाही, उन्हाळा आहे म्हणून! सोबत रानमेव्याचा आस्वाद घ्या मग उन्हाळा चांगला जाईल. ह्या दिवसात नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांनी चिकन जास्त खाऊ नये. अंडी खाऊ नयेत ;तर छोटी मासळी खावी. शक्यतो त्यांनीही पालेभाजीवर भर द्यावा. ह्या दिवसात गावठी टोमॅटो ही छान मिळतात .त्याचे सार प्यावे , त्याची भाजी खावी. काकडीचा वापर जेवणात करावा. नुसती काकडी खावी. ती तहानही भागवते आणि ह्या दिवसात पचनक्रियेसाठी ती उपयोगी आहे न घाबरता योग्य काळजी घ्या आणि उन्हाळा दूर करून आपले आरोग्य चांगले ठेवा!
पालकाची पातळ भाजी
साहित्य : पालक जुडी एक, बेसन अर्धी वाटी, ७-८ हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, २ चमचे तेल, ४-५ आमसूल, २ चमचे साखर, मीठ, मोहरी, हिंग, हळद.
कृती : पालक निवडून वाफवा. त्यात बेसन घालून पाने घोटा. तेलाची खमंग फोडणी करा. त्यात लसूण, मिरची, हिंग, हळद टाकून घोटलेला पालक घाला. नंतर आमसुले, मीठ, साखर घालून मिश्रण सरसरीत होईल इतपत पाणी घालून भाजी करा.
पालक मूग भाजी
साहित्य : पालक एक जुडी, मोड आलेले मूग एक वाटी, हिरव्या मिरच्या ४ ते ५, एक चमचा साखर, आमचूर व बटर, मीठ.
कृती : निवडलेला पालक आणि मिरची एकत्र वाफवून घ्या. मूग स्वतंत्र वाफवा. वाफवलेला पालक मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बारीक केलेला पालक, मूग, मीठ, साखर, आमचूर एकत्र करून शिजवा. बटर घालून गॅस बंद करा.
चवळीची/माठाची भाजी
साहित्य : १ जुडी चवळी/ माठाची भाजी, १ मध्यम कांदा, कांदा नको असल्यास ७-८ लसूण पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, चवीपुरता गूळ, मीठ, फोडणीचे साहित्य.
कृती : भाजी निवडून घेऊन स्वच्छ धुवून कोवळ्या काड्या बारीक चिरा, फोडणी करून त्यात लसूण व कांदा घाला. मग तयात चिरलेली भाजी फोडणीस टाका. चांगली वाफ आणून मऊ शिजवून घ्या.
दही पालक
साहित्य : पालक एक जुडी, १ वाटी घट्ट दही, साखर चमचा, प्रत्येकी अर्धा चमचा मिरपूड-दालचिनी, मीठ.
कृती : पालक निवडून बारीक चिरा. फ्राईंग पॅनमध्ये टाकून पक्के झाकण ठेऊन पाच मिनिटे शिजवा. नंतर दही, मीठ, साखर, मिरपूड, दालचिनी घालून खदखदेपर्यंत गॅस चालू ठेवा. (दही पालक गरम असताना चवदार लागतो.)
तुरीच्या ओल्या दाण्याची उसळ
साहित्य : तुरीचे ओले दाणे पाव किलो, कांदा, टोमॅटो प्रत्येकी एक, ४-५ लसूण पाकळ्या.अर्धा लिंबाएवढा गूळ, मीठ, फोडणीचे साहित्य, हिंग, मोहरी, हळद, दोन मध्यम बटाटे, थोडी कोथिंबीर, थोडी धनेपूड.
कृती : दाणे निवडून धुवावेत. थोडे पाणी घालून बटाटे उकडून घ्यावेत. कांदा, लसूण, टोमॅटो बारीक चिरावे. चांगले परतून घ्यावे व भाजी करावी.
मुगाची कोरडी उसळ
साहित्य : भिजवलेले/ मोडाचे मूग २ वाट्या, १ कांदा, १ टोमॅटो, १ चमचा कांदा मसाला किंवा गोडा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा ते पाऊण चमचा मीठ, १ चमचा साखर, थोडे ओले खोबरे, कोथिंबीर.
कृती : मोडाचे मूग कमी पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. नंतर हिंग, मोहरी, कढीपत्ता फोडणी करून त्यात टोमॅटो, कांदा टाकून परतावा. त्यावरच मसाले, मीठ, साखर, खोबरे घालावे. त्यावर मूग टाकून चांगले परतावेत. पाणी राहू देऊ नये, उतरल्यावर त्यावर खोबरं, कोथिंबीर घालावी.
ओल्या काजूची उसळ
साहित्य : अर्धा किलो काजूगर, नारळ, मिरची, गूळ, साखर, जिऱ्याची पूड, १ चमचा मीठ, फोडणीचे साहित्य.
कृती : प्रथम ओले काजू पाण्यात घालून सोलावेत. नंतर तेलात मोहरी, हळद, हिंग यांची फोडणी करून त्यात मिरच्याचे तुकडे टाकावेत. ते परतून त्यात काजू घालावेत. जरासे पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. झाकण ठेवून जरासे शिजवून घेतल्यावर त्यात खोवलेले खोबरे घालावे. खाली उतरवून चवीप्रमाणे गूळ किंवा साखर घालावे. तेलाऐवजी तुपाची फोडणी करून त्यात जिरे घालून फोडणी केली तर ती उसळ उपवासालाही चालते.
कैरीचा पुलाव
साहित्य : २ वाट्या दिल्ली राईस, अर्धी वाटी पंढरपुरी डाळे, अर्धी वाटी भाजून सोललेले दाणे ८-१० मिरच्यांचे तुकडे, ८-१० कडिलिंबाची पाने, २ चमचे वाटलेली मोहरी, १ चमचा कैरीचा कीस, २ चमचे मीठ, ४ चमचे तेलाची फोडणी साहित्य, ३ वाट्या.
कृती : प्रथम फोडणी करून ठेवा. फोडणीत हिंग, मोहरी, हळद घाला. चांगले परतून घ्या. हे सर्व मिश्रण पूर्ण गार करा. कूकरमध्ये मऊ मोकळा करून घ्या व एका परातीत उपसून भात गार करून घ्या. कैरीचा कीस व वाटलेली मोहरी चांगली कालवून घ्या. ती व मीठ भाताला लावून घ्या. तळून ठेवलेले डाळे, दाणे व इतर सर्व साहित्य भातावर घालून कालवा.
नारळाची कढी
साहित्य : २ वाटी ओले खाबरे, २ चमचे तांदूळ, ४ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, १ आल्याचा तुकडा, ३ लसूण पाकळ्या, १ चमचा हळद, थोडे कढीलिंब, मीठ, २ चमचे तेल.
कृती : तांदूळ भिजत घालावे. खोबरे व तांदूळ वाटावे. आलं, लसूण, मिरच्या वाटाव्या. तेल तापवून जिरे, हळद व कढीलिंब घालावा. जरा परतून वाटलेले खोबरे व मीठ घालावे. अधूनमधून ढवळावे. उकळी आली की गॅस बंद करावा.
द्राक्ष-अननसाचे रायते
साहित्य : दोन मध्यम वाट्या घट्ट गोडसर दही, चार लहान चमचे साखर, अर्ध्या लिंबाचा रस, चवीला मीठ, लाल मिरची पूड आणि जिरे पूड (जिरे भाजून त्याची पूड केली तरी चालेल), १ वाटी द्राक्षाचे तुकडे, १ वाटी डाळिंबाचे दाणे (आपल्या आवडीची किंवा बाजारात उपलब्ध असलेली फळेही तुम्ही वापरू शकता.)
कृती : दही घुसळून तिखट, मीठ, साखर, जिरेपूड आणि लिंबाचा रस घालावा. अननसाच्या फोडी मिसळून एकजीव करावे. द्राक्षाच्या फोडी किंवा डाळिंबाचे दाणे मिसळून सर्व्ह करावे. रायते थंडगार करून सर्व्ह करावे.
कच्च्या टोमॅटोची भाजी
साहित्य : कच्चे टोमॅटो पाव किलो, चणाडाळ पाव वाटी, १ लहान कांदा, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ चवीप्रमाणे, २ चमचे साखर किंवा गूळ, तेल २ चमचे.
कृती : प्रथम चणाडाळ उकडून घ्या. कांदा बारीक चिरा, टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. प्रथम पातेल्यात तेल तापवून कांदा, टोमॅटो, चणाडाळ घाला. मीठ व मसाला घाला. नीट परता व भाजी बुडेल इतकेच पाणी घालून मंद आचेवर शिजू द्या. टोमॅटोची फोडी शिजली की गूळ घालून एक उकळी येऊ द्या मग गॅस बंद करा.
साहित्य : पालक जुडी एक, बेसन अर्धी वाटी, ७-८ हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, २ चमचे तेल, ४-५ आमसूल, २ चमचे साखर, मीठ, मोहरी, हिंग, हळद.
कृती : पालक निवडून वाफवा. त्यात बेसन घालून पाने घोटा. तेलाची खमंग फोडणी करा. त्यात लसूण, मिरची, हिंग, हळद टाकून घोटलेला पालक घाला. नंतर आमसुले, मीठ, साखर घालून मिश्रण सरसरीत होईल इतपत पाणी घालून भाजी करा.
पालक मूग भाजी
साहित्य : पालक एक जुडी, मोड आलेले मूग एक वाटी, हिरव्या मिरच्या ४ ते ५, एक चमचा साखर, आमचूर व बटर, मीठ.
कृती : निवडलेला पालक आणि मिरची एकत्र वाफवून घ्या. मूग स्वतंत्र वाफवा. वाफवलेला पालक मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बारीक केलेला पालक, मूग, मीठ, साखर, आमचूर एकत्र करून शिजवा. बटर घालून गॅस बंद करा.
चवळीची/माठाची भाजी
साहित्य : १ जुडी चवळी/ माठाची भाजी, १ मध्यम कांदा, कांदा नको असल्यास ७-८ लसूण पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, चवीपुरता गूळ, मीठ, फोडणीचे साहित्य.
कृती : भाजी निवडून घेऊन स्वच्छ धुवून कोवळ्या काड्या बारीक चिरा, फोडणी करून त्यात लसूण व कांदा घाला. मग तयात चिरलेली भाजी फोडणीस टाका. चांगली वाफ आणून मऊ शिजवून घ्या.
दही पालक
साहित्य : पालक एक जुडी, १ वाटी घट्ट दही, साखर चमचा, प्रत्येकी अर्धा चमचा मिरपूड-दालचिनी, मीठ.
कृती : पालक निवडून बारीक चिरा. फ्राईंग पॅनमध्ये टाकून पक्के झाकण ठेऊन पाच मिनिटे शिजवा. नंतर दही, मीठ, साखर, मिरपूड, दालचिनी घालून खदखदेपर्यंत गॅस चालू ठेवा. (दही पालक गरम असताना चवदार लागतो.)
तुरीच्या ओल्या दाण्याची उसळ
साहित्य : तुरीचे ओले दाणे पाव किलो, कांदा, टोमॅटो प्रत्येकी एक, ४-५ लसूण पाकळ्या.अर्धा लिंबाएवढा गूळ, मीठ, फोडणीचे साहित्य, हिंग, मोहरी, हळद, दोन मध्यम बटाटे, थोडी कोथिंबीर, थोडी धनेपूड.
कृती : दाणे निवडून धुवावेत. थोडे पाणी घालून बटाटे उकडून घ्यावेत. कांदा, लसूण, टोमॅटो बारीक चिरावे. चांगले परतून घ्यावे व भाजी करावी.
मुगाची कोरडी उसळ
साहित्य : भिजवलेले/ मोडाचे मूग २ वाट्या, १ कांदा, १ टोमॅटो, १ चमचा कांदा मसाला किंवा गोडा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा ते पाऊण चमचा मीठ, १ चमचा साखर, थोडे ओले खोबरे, कोथिंबीर.
कृती : मोडाचे मूग कमी पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. नंतर हिंग, मोहरी, कढीपत्ता फोडणी करून त्यात टोमॅटो, कांदा टाकून परतावा. त्यावरच मसाले, मीठ, साखर, खोबरे घालावे. त्यावर मूग टाकून चांगले परतावेत. पाणी राहू देऊ नये, उतरल्यावर त्यावर खोबरं, कोथिंबीर घालावी.
ओल्या काजूची उसळ
साहित्य : अर्धा किलो काजूगर, नारळ, मिरची, गूळ, साखर, जिऱ्याची पूड, १ चमचा मीठ, फोडणीचे साहित्य.
कृती : प्रथम ओले काजू पाण्यात घालून सोलावेत. नंतर तेलात मोहरी, हळद, हिंग यांची फोडणी करून त्यात मिरच्याचे तुकडे टाकावेत. ते परतून त्यात काजू घालावेत. जरासे पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. झाकण ठेवून जरासे शिजवून घेतल्यावर त्यात खोवलेले खोबरे घालावे. खाली उतरवून चवीप्रमाणे गूळ किंवा साखर घालावे. तेलाऐवजी तुपाची फोडणी करून त्यात जिरे घालून फोडणी केली तर ती उसळ उपवासालाही चालते.
कैरीचा पुलाव
साहित्य : २ वाट्या दिल्ली राईस, अर्धी वाटी पंढरपुरी डाळे, अर्धी वाटी भाजून सोललेले दाणे ८-१० मिरच्यांचे तुकडे, ८-१० कडिलिंबाची पाने, २ चमचे वाटलेली मोहरी, १ चमचा कैरीचा कीस, २ चमचे मीठ, ४ चमचे तेलाची फोडणी साहित्य, ३ वाट्या.
कृती : प्रथम फोडणी करून ठेवा. फोडणीत हिंग, मोहरी, हळद घाला. चांगले परतून घ्या. हे सर्व मिश्रण पूर्ण गार करा. कूकरमध्ये मऊ मोकळा करून घ्या व एका परातीत उपसून भात गार करून घ्या. कैरीचा कीस व वाटलेली मोहरी चांगली कालवून घ्या. ती व मीठ भाताला लावून घ्या. तळून ठेवलेले डाळे, दाणे व इतर सर्व साहित्य भातावर घालून कालवा.
नारळाची कढी
साहित्य : २ वाटी ओले खाबरे, २ चमचे तांदूळ, ४ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, १ आल्याचा तुकडा, ३ लसूण पाकळ्या, १ चमचा हळद, थोडे कढीलिंब, मीठ, २ चमचे तेल.
कृती : तांदूळ भिजत घालावे. खोबरे व तांदूळ वाटावे. आलं, लसूण, मिरच्या वाटाव्या. तेल तापवून जिरे, हळद व कढीलिंब घालावा. जरा परतून वाटलेले खोबरे व मीठ घालावे. अधूनमधून ढवळावे. उकळी आली की गॅस बंद करावा.
द्राक्ष-अननसाचे रायते
साहित्य : दोन मध्यम वाट्या घट्ट गोडसर दही, चार लहान चमचे साखर, अर्ध्या लिंबाचा रस, चवीला मीठ, लाल मिरची पूड आणि जिरे पूड (जिरे भाजून त्याची पूड केली तरी चालेल), १ वाटी द्राक्षाचे तुकडे, १ वाटी डाळिंबाचे दाणे (आपल्या आवडीची किंवा बाजारात उपलब्ध असलेली फळेही तुम्ही वापरू शकता.)
कृती : दही घुसळून तिखट, मीठ, साखर, जिरेपूड आणि लिंबाचा रस घालावा. अननसाच्या फोडी मिसळून एकजीव करावे. द्राक्षाच्या फोडी किंवा डाळिंबाचे दाणे मिसळून सर्व्ह करावे. रायते थंडगार करून सर्व्ह करावे.
कच्च्या टोमॅटोची भाजी
साहित्य : कच्चे टोमॅटो पाव किलो, चणाडाळ पाव वाटी, १ लहान कांदा, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ चवीप्रमाणे, २ चमचे साखर किंवा गूळ, तेल २ चमचे.
कृती : प्रथम चणाडाळ उकडून घ्या. कांदा बारीक चिरा, टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. प्रथम पातेल्यात तेल तापवून कांदा, टोमॅटो, चणाडाळ घाला. मीठ व मसाला घाला. नीट परता व भाजी बुडेल इतकेच पाणी घालून मंद आचेवर शिजू द्या. टोमॅटोची फोडी शिजली की गूळ घालून एक उकळी येऊ द्या मग गॅस बंद करा.