राष्ट्रकुल स्पर्धेतील कालचा शनिवार भारतासाठी सोनेरी शनिवार ठरला. भालाफेक, टेबल टेनिस, कुस्ती, बॉक्सिंग आशा विविध क्रीडाप्रकारात भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. पण या सर्वांमध्ये विशेष उल्लेखनीय ठरले ते सुपर मॉम मेरी कोम हिने महिला बॉक्सिंगच्या 50 किलो वजनी गटात पटकावलेले सुवर्णपदक. बाळंतपण, दुखापती आणि वाढतं वय या सर्वांवर मात करत मेरीने सोनेरी यशाला गवसणी घातली. पूर्वोत्तर भारतातील एका दुर्गम भागातील गावापासून जागतिक स्पर्धांमधील यशापर्यंतचा तिचा प्रवास प्रेरणादायी आहे.
एम. सी. मेरी कोम, विक्रमी पाचवेळा जगज्जेतेपद जिंकलेली, जुळ्या मुलांची आई असल्यावरही ऑलिंम्पिक ब्राँझ पदक जिंकलेली. तेही तिचे आव्हान खडतर व्हावे म्हणून जागतिक महासंघ, तसेच भारतातील पदाधिकारी प्रयत्न करीत होते. ह्या सर्व आव्हानास ठामपणे यशस्वीपणे सामना करताना तिने कधीही कोणावरही टीका केली नाही. इशान्य भारतातून अनेकदा ऐकू येणारा विरोधाचा सूर कधीही उमटला नाही. आपल्या विभागावर कायम अन्याय होतो, त्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जाते, अशी भूमिका घेण्याचा विचारही तिच्या मनात कधी आला नाही. आपल्या प्रश्नास राजकीय वळण लाभणार नाही याची खबरदारी ती घेत होती. आपले प्रश्न कोणतीही टीका कधीही न करता ती सोडवत होती. अनेक प्रतिकूल परिस्थितीत अक्षरशः तावून सुलाखून निघालेल्या मेरी कोमने क्रिकेटवेड्या देशात आपले एक स्थान निर्माण केले आहे. आपल्याला घडविणार्या मणिपूरचा निरोप घ्यावा असे कधीही तिला वाटले नाही. आपल्याला आपल्या मातीने, तेथील वातावरणाने खूप काही दिले. तेथील प्रतिकूल परिस्थितीतून ती घडली, त्याच भागाचे ऋण फेडण्याचा आपण अंशतः प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी मदत करा, असे ती आवाहन करते, पण कोणी आपल्याला पुरेशी साथ देत नाही, यासाठी ती टीकेचे ठोसे देत नाही. निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो, आपण फक्त मनापासून कष्ट करायला हवे हीच तिची भावना तीच ती मांडत असते.
पोषक वातावरणमणीपूर हा पहाडी भाग. डोंगराळ नव्हे पहाडी, थेट उभी चढण. समतोल काहीच नाही. कमालीच्या लढवय्या लोकांचा प्रदेश. आपल्या संस्कृतीबद्दल, प्रदेशाबद्दल, चालीरितींबद्दल, भाषेबद्दल कमालीचे स्वाभिमानी. शीघ्रकोपी. आपल्या भागातील आदिवासींप्रमाणे निसर्गाशी जवळीक राखणारे. त्याच्याशी रममाण होणारे. त्याला आपल्या जीवनाचा भाग करणारे. नृत्यात वाक्बगार. त्यांच्या नृत्यात नजाकत नसेल, पण ते ठेका धरायला लावणारे असते. त्याचा आस्वाद घेण्यापेक्षा त्याचा भाग होण्यासाठीच प्रेरीत करते. एकंदर त्याची प्रकृती विचारात घेतली, तर बॉक्सिंग हे त्याच प्रकारचे. त्यांना खेळायला प्रेरीत करणारे. मणिपूर हा काहीसा मागासलेला असला तरी त्यात महिलांना मागे ठेवले जात नाही. तिथे पुरुष महिला समानताच आहे, असे म्हणता येईल. मातृसत्ताक पद्धत आहे, त्यामुळे महिलांनी चूल-मुलात बंदीस्त व्हावे असा विचार तिथे पुरेसा नाही. उभा पहाड चढण्याची चालण्यापासून सवय लागलेल्या मेरी कोमने धावण्याच्या स्पर्धात भाग घेतला तर नवलही नाही. याचा तिला आनंद होत होता, पण पुरेसे समाधान मिळत नव्हते. आपल्याला नेमके काय करायचे आहे हे कळत नव्हते. तिच्या रक्तात बॉक्सिंग होते, पण त्याची जाण तिला नव्हती. ती करून दिली डिंको सिंगच्या यशाने.
डिंको हा मणिपुरी मुष्टीयोद्धा. केंद्राने क्रीडा गुणवत्तेचा शोध घ्यायला सुरुवात केल्यावर गवसलेला. आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणालाही अपेक्षित नसताना त्याने सुवर्णपदक जिंकले. तो जिंकू शकतो, तर आपण का नाही असा विचार मेरीने केला आणि ग्लोव्हज् परिधान केले. ठोसे देण्यास सुरुवात केली. हे सोपे नव्हते. आई वडील तयार नव्हते. बाबा तर, ‘बेटी आपण गरीब. तुला लागले तर आपण खर्च कसा करणार?’ असा प्रश्न विचारत होते. मेरी रोज हट्ट करीत होती. अखेर वडिलांनी हट्ट पूर्ण केला. मुलीला परवानगी दिली. काही महिन्यातच ही मुलगी चेन्नईच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मणिपूर संघात आली. ती स्पर्धा होती 2001 ची. जागतिक महिला स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला जाणार होता. त्यासाठी पंजाब, हरियाणाच्या तगड्या मुलीही आल्या होत्या. त्यात एक माणूस आणि बाकीच्या महिला असलेला संघ म्हणजे मणीपूर अशी टिप्पणी केली जात होती. त्यांना हिंदी, इंग्रजी फारसे येत नव्हते. त्यामुळे कोणाशी संवाद नव्हता. कोणी त्यांची दखलही घेत नव्हते, पण लढती सुरु झाल्या आणि चित्र बदलले. मणिपूर काय चीज आहे, हे कळू लागले. मेरी कोम कोण याची चर्चा होऊ लागली. तिची लढत कधी याची विचारणा होऊ लागली. लढतीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सुरुवातीच्या काही लढतीत मेरीची मॅच लागली.
याविषयी जय कवळी आठवण सांगतात, तेच त्या लढतीच्यावेळी रेफ्री होते. एक काटक मुलगी रिंगणात उतरली, त्यावेळी तिच्यात काही जोष जाणवला नव्हता. तिच्याबरोबरील खेळाडू तिला प्रोत्साहन देत होत्या, हे सोडले तर कोणाचे लक्ष नव्हते. रिंगणाच्या जवळ आली आणि तिने ज्या पद्धतीने त्यात पाऊल टाकले तो आत्मविश्वास पाहून हे काहीतरी वेगळे आहे हे मी ओळखले. माझा अंदाज खरा ठरला. तिने रिंगणात उतरल्यावर सर्वांना आपली दखल घ्यायला लावली. तिची चपळाई, तिचा रिंगमधील धडाका सर्वच काही विस्मयकारक होते. लढत संपल्यानंतर मी सर्वांना सांगितले, हिच्याकडे लक्ष ठेवा, ही खूप काही घडविणार आहे. माझा अंदाज खरा ठरला याचा मला अभिमान आहे. तिने काही महिन्यांतच जागतिक रौप्यपदक जिंकले. त्यानंतर तिला जागतिक विजेतेपद जिंकण्याची सवय लागली. मला कोणीही मेरी कोमबद्दल विचारले की मला अजूनही तिची तीच लढत डोळ्यासमोर येते. सध्या महाराष्ट्र राज्य मुष्टीयुद्ध संघटनेचे अध्यक्ष असलेले जय कवळी सांगत होते. तेव्हा रिंगमधील मेरी आणि रिंग बाहेरील मेरी यातील फरक सर्वांनी अनुभवला. आजही तोच फरक आहे. तो जाणवतो, समजून येतो तसेच भावतोही. तिच्या राष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या लढतीच्यावेळी मी रेफ्री होतो व तिचा पहिला मोठा सत्कारही महाराष्ट्र राज्य संघटनेने आयोजित केला व त्यात माझा सहभाग महत्त्वाचा होता, त्याचाही मला अभिमान आहे. जागतिक विजेतेपद जिंकणे अवघड असते, हे कोणीही सांगू शकेल. एकवेळ यश मिळविणे सोपे असते, पण ते सातत्याने मिळविणे त्यापेक्षाही जास्त अवघड असते. तोच जोश पाच स्पर्धांत राखणे किती अवघड असते. त्यासाठी चिकाटी हवी, खेळाचा दर्जा उच्च राखायला हवा. 2001 पासून 2018 पर्यंत ती त्याच उच्च दर्जाचा खेळ करीत आहे. तिला आपण सर्वांनी उभे राहून सलामच करायला हवा.
ती एक लढत
मेरीने मुष्टीयुद्ध कधी, कसे सुरू केले की त्याचा फटका कोणाला किती बसला, त्याचा प्रसाद कोणी खाल्ला याबद्दल विचारले ना की मेरी असो किंवा मणिपूरमधील कोणीही जे काही सांगतात ते त्यांच्या लहेजात ऐकणे हा औरच अनुभव असतो. तो काही देता येणार नाही, पण हा जो अनुभव आहे, तो मेरीबद्दल लिहिताना सांगायलाच हवा. मेरीने बॉक्सिंगचे ट्रेनिंग घेण्यास सुरुवात करून काही महिनेच झाले होते. ट्रेनिंग संपण्यास पाच वाजले होते. काळोख पडण्यास सुरुवात झाली होती. रस्त्यावर दिवे असण्याचा प्रश्नच नव्हता. घरी महत्त्वाचे काम होते, त्यामुळे मेरीने रिक्षा केली. तिथे आपल्याकडे जशी सायकल रिक्षा असायची ना, तशी रिक्षा. रिक्षावाल्यास पत्ता सांगितला. सरावाच्या विचारात गुंफली असतानाच काही वेळातच तिला हा रस्ता वेगळा असल्याचे कळले होते. त्याचा इरादा काय तो तिला कळला होता. तिने आपलाही विचार पक्का केला. आता फक्त ती वेळ येण्याची वाट बघत होती. आडवाटेला खूपशी झाडी, तसेच वस्तीपासून दूर त्याने रिक्षा थांबवली आणि त्याने आपल्या इप्सिताच्या दिशेने पाऊल उचलले. मेरी तयारच होती. तिने लोकांना जोरात ओरडून आवाज देतानाच त्याची पंचींग बॅग सुरू केली होती. काही वेळातच गर्दी जमली. त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मेरी आपल्या मार्गाने गेली.
मेरीला याबाबत विचारल्यावर तिने त्यात काय मोठेसे, आपणच आपले संरक्षण करायला हवे. बॉक्सिंगमुळे मी त्याचा सामना करू शकले, प्रत्येकाने थोडेफार का होईन याचे ट्रेनिंग घ्यायलाच हवे. माझी त्या मॅचची तयारी एकदा त्याचा विचार कळल्यावर सुरु झाली होती, त्यावेळी त्याला मी घाबरले असेच वाटत होते. तो पुढे आल्यावर मी काय थांबणार होते. मी सुरू केले बँग… बँग…बँग… लोक येण्यापूर्वी लढत फिनीश झाली होती. हा किस्सा येथेच संपत नाही. मणिपूरच्या लोकांना याबद्दल विचारले की ते जे सांगतात ते जास्त लक्षात राहण्यासारखे आहे. अजूनही थंडी पडली की त्याला तो दिवस आठवतो, एवढेच त्यांनी सांगितल्यावर आपल्यालाही हसू आवरत नाही. तरीही आपल्याला पुरेसे कळले नसावे असा विचार करून म्हणा किंवा त्यापेक्षाही आपल्या स्टारचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे, असा विचार असेल म्हणून ते अधिकच स्पष्टीकरण देतात. त्याचे सांधे अजूनही त्या माराने थंडीत चांगलेच दुखतात, असे आपल्याशी आवर्जून शेअर करतात.
अनेकांसाठी प्रेरणादायी मेरीचा हा लढा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तो अनेकांना त्या नेमक्या ठिकाणासह पाठ आहे. ती स्टार आहे, देशात तिच्याभोवती गर्दी होते. तिच्यावर येणार्या चित्रपटाची चर्चा होते, पण मणिपूरमध्ये ती देव झालेली नाही. ती स्टार आहे. ती तेथील प्रत्येकाचा आदर्श आहे, पण तिथे व्यक्तीपूजेला थारा नाही, त्यापेक्षाही मेरी अजून हवेत चालत नाही. तेथील रचनेचा परिणाम म्हणा किंवा काहीही, पण मेरी स्वतः स्टारसारखी वागत नाही. हे तिला तेथील वातावरणानेच शिकवले असावे. तिच्या परिसरातील घरांची रचनाच जणू यशानंतर जमिनीपासून दूर जाऊ नका असा संदेश देणारी.
उभ्या पहाडावरील घरेही रस्त्याला लागून असलेली. घरात प्रवेश करतो ते गच्चीतून. तिथेच आपले वाहन पार्क करायचे आणि घरात जायचे तर गॅलरीचा जिना उतरून. यशानंतर घरी येऊन होणारे कौतुक सोहळे, भेटीगाठी ह्या गच्चीतच होतात, पण त्याचवेळी ह्या सोहळ्यानंतर, कौतुकानंतर घरात पायर्या उतरून जावे लागते. अशा ह्या घरातून, वस्तीतून वाढलेली मेरी अजूनही स्वतःला स्टार समजत नाही.
आपल्याकडचे स्टार क्वचितच एखाद्या क्लब, ग्राऊंडवर किंवा रस्त्यावर मुक्तपणे भेटतील, पण मेरीचे तसे नाही. ती स्टार आहे. घराबाहेर पडल्यावर, कार्यक्रमात तिच्याभोवतीही चाहत्यांचा गराडा होतो, पण तरीही ती सहजपणे तेथील कार्यक्रमात सहभागी होते. त्यांच्यात मिसळत असते. त्यांच्याच जीवनाचा भाग होते. अनेकांनी आग्रह केल्यानंतरही राजकारणापासून दूर आहे, हो, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा नसताना जेंव्हा गावात असते तेव्हा पाठीशी मुलाला बांधून फिरत असते. आपल्यासाठी खूप काही त्याग केलेल्या सहचराला त्याच्या आवडीचे खाऊ-पिऊ घालते.
यशस्वी पत्नीमागे मेरीच्या यशात तिच्या पतीचा मोलाचा वाटा आहे. ह्याची जाणीव मेरीला आहे. के ओनिलर कॉम हे तिचे पती. ती अनेक कार्यक्रमांना त्यांना आवर्जून घेऊन येते, पण ते मात्र ह्या झगमगाटापासून स्वतःला दूरच ठेवण्याचा प्रयत्न करतात. मेरीच्या कार्यक्रमात समजा गेलात तर त्यांना कसे ओळखणार हा प्रश्न पडला असेल तर एक सोपे काम करायचे. स्टेजपासून दूर नजरेने शोध घ्यायचा. मुलांना सांभाळणारे कोणी इशान्य भारतातील दिसले की ते मेरीचे पती समजायचे. आता अगदीच ओळखता आले नाही, तर कार्यक्रमानंतर मेरी बरोबर फोटो काढण्यासाठी स्पर्धा होते. त्यावेळी मेरी ज्यांच्याकडे बघून तुम्ही या, असा आग्रह करीत असेल, पण जी व्यक्ती नको इथेच मी ठीक आहे, फार तर मुलांना देत असेल ती व्यक्ती म्हणजे मेरीचे पती अशी खूणगाठ बांधायला हरकत नाही.
मेरीचे जेवढे आपल्या पतीवर प्रेम आहे, त्यापेक्षाही जास्त त्यांचा आदर ती करते. आपल्यासाठी त्यांनी आपल्या कारकिर्दीचा त्याग केला, त्यावर पाणी सोडले. आपण घरापासून दूर असतो, त्यामुळे घराकडे लक्ष द्यावे लागणार हा विचार त्यांनी केला. आपल्या प्रियेसाठी मुलांचा सांभाळ केला. त्यासाठी काही नातेवाईकांची टोचून बोलणी खाल्ली. पण आपण काय करत आहोत, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे टीकेकडे ते दुर्लक्ष करीत राहिले. आंतरराष्ट्रीयच नव्हे तर ऑलिंम्पिकपदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते ठामपणे मेरीच्या पाठीशी उभे राहिले व त्याचवेळी आपली सावली कुठेही तिच्यावर पडणार नाही याची काळजी घेत होते. नव्हे, अजूनही घेत आहेत. जे काही मेरी कमावते तिच्या मेहनतीच्या जोरावर, तिचा लढा देत असते. त्यासाठी खूप प्रॅक्टीसही करते, असेच ते सांगतात. पण मेरी तर खूपच आपल्याविषयी बोलते, आपल्यालाच यशाचे श्रेय देते म्हटल्यावर हसतात. मी काय केले, पती कायम पत्नीला प्रोत्साहन देत असतो. सगळेच वडील आपल्या मुलांची काळजी घेतात, त्यांना वाढवतात. तुमच्याही वडिलांनी हे केलेच की, असेही प्रसंगी सांगतात. आपण जे काही करतो, त्याचा कुठेही बडेजाव नाही, की गर्व नाही. त्यांच्या कामाची जाणीव असलेले, त्यांना ओळखतात. मेरी जेव्हा त्यांच्याविषयी भरभरून बोलते, त्यावेळी त्यांचे महत्त्व कळते. यशस्वी महिलेच्या पाठीशी तिचा पती कसा उभा राहू शकतो याची पूर्णपणे कल्पना येते. माझे ऑलिम्पिकपदकाचे स्वप्न साकार होण्यासाठी त्यांनी आपल्या कारकिर्दीकडे दुर्लक्ष केले. त्याबद्दल अनेकदा त्यांना टोचून बोलणी खावी लागली. अगदी जे आम्हाला ओळखत नाहीत, त्यांचीच कशाला काही नातेवाईकही त्यांना बोलत होते. तू हे काय करतोस, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याची झळही मला पोहोचणार नाही याची काळजी घेतली. आता त्यांची मान खाली जाऊ नये यासाठीच मी कष्ट घेते, मेहनत करते आणि यश मिळवते. संधी मिळाली की त्यांना खाऊ-पिऊ घालते. त्यांना माझ्या हातचे खूप आवडते. तेवढे मी तर त्यांच्यासाठी करायलाच हवे. तीन मुलांची आई असलेल्या मेरीने ऑलिंम्पिक सुवर्णपदकासाठी प्रयत्न करायला हवे, अशी तिच्या मिस्टरांची प्रबळ इच्छा आहे व ती फलद्रुप करण्यासाठी मेरी प्रयत्न करणार हे नक्की.
एम. सी. मेरी कोम, विक्रमी पाचवेळा जगज्जेतेपद जिंकलेली, जुळ्या मुलांची आई असल्यावरही ऑलिंम्पिक ब्राँझ पदक जिंकलेली. तेही तिचे आव्हान खडतर व्हावे म्हणून जागतिक महासंघ, तसेच भारतातील पदाधिकारी प्रयत्न करीत होते. ह्या सर्व आव्हानास ठामपणे यशस्वीपणे सामना करताना तिने कधीही कोणावरही टीका केली नाही. इशान्य भारतातून अनेकदा ऐकू येणारा विरोधाचा सूर कधीही उमटला नाही. आपल्या विभागावर कायम अन्याय होतो, त्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जाते, अशी भूमिका घेण्याचा विचारही तिच्या मनात कधी आला नाही. आपल्या प्रश्नास राजकीय वळण लाभणार नाही याची खबरदारी ती घेत होती. आपले प्रश्न कोणतीही टीका कधीही न करता ती सोडवत होती. अनेक प्रतिकूल परिस्थितीत अक्षरशः तावून सुलाखून निघालेल्या मेरी कोमने क्रिकेटवेड्या देशात आपले एक स्थान निर्माण केले आहे. आपल्याला घडविणार्या मणिपूरचा निरोप घ्यावा असे कधीही तिला वाटले नाही. आपल्याला आपल्या मातीने, तेथील वातावरणाने खूप काही दिले. तेथील प्रतिकूल परिस्थितीतून ती घडली, त्याच भागाचे ऋण फेडण्याचा आपण अंशतः प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी मदत करा, असे ती आवाहन करते, पण कोणी आपल्याला पुरेशी साथ देत नाही, यासाठी ती टीकेचे ठोसे देत नाही. निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो, आपण फक्त मनापासून कष्ट करायला हवे हीच तिची भावना तीच ती मांडत असते.
पोषक वातावरणमणीपूर हा पहाडी भाग. डोंगराळ नव्हे पहाडी, थेट उभी चढण. समतोल काहीच नाही. कमालीच्या लढवय्या लोकांचा प्रदेश. आपल्या संस्कृतीबद्दल, प्रदेशाबद्दल, चालीरितींबद्दल, भाषेबद्दल कमालीचे स्वाभिमानी. शीघ्रकोपी. आपल्या भागातील आदिवासींप्रमाणे निसर्गाशी जवळीक राखणारे. त्याच्याशी रममाण होणारे. त्याला आपल्या जीवनाचा भाग करणारे. नृत्यात वाक्बगार. त्यांच्या नृत्यात नजाकत नसेल, पण ते ठेका धरायला लावणारे असते. त्याचा आस्वाद घेण्यापेक्षा त्याचा भाग होण्यासाठीच प्रेरीत करते. एकंदर त्याची प्रकृती विचारात घेतली, तर बॉक्सिंग हे त्याच प्रकारचे. त्यांना खेळायला प्रेरीत करणारे. मणिपूर हा काहीसा मागासलेला असला तरी त्यात महिलांना मागे ठेवले जात नाही. तिथे पुरुष महिला समानताच आहे, असे म्हणता येईल. मातृसत्ताक पद्धत आहे, त्यामुळे महिलांनी चूल-मुलात बंदीस्त व्हावे असा विचार तिथे पुरेसा नाही. उभा पहाड चढण्याची चालण्यापासून सवय लागलेल्या मेरी कोमने धावण्याच्या स्पर्धात भाग घेतला तर नवलही नाही. याचा तिला आनंद होत होता, पण पुरेसे समाधान मिळत नव्हते. आपल्याला नेमके काय करायचे आहे हे कळत नव्हते. तिच्या रक्तात बॉक्सिंग होते, पण त्याची जाण तिला नव्हती. ती करून दिली डिंको सिंगच्या यशाने.
डिंको हा मणिपुरी मुष्टीयोद्धा. केंद्राने क्रीडा गुणवत्तेचा शोध घ्यायला सुरुवात केल्यावर गवसलेला. आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणालाही अपेक्षित नसताना त्याने सुवर्णपदक जिंकले. तो जिंकू शकतो, तर आपण का नाही असा विचार मेरीने केला आणि ग्लोव्हज् परिधान केले. ठोसे देण्यास सुरुवात केली. हे सोपे नव्हते. आई वडील तयार नव्हते. बाबा तर, ‘बेटी आपण गरीब. तुला लागले तर आपण खर्च कसा करणार?’ असा प्रश्न विचारत होते. मेरी रोज हट्ट करीत होती. अखेर वडिलांनी हट्ट पूर्ण केला. मुलीला परवानगी दिली. काही महिन्यातच ही मुलगी चेन्नईच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मणिपूर संघात आली. ती स्पर्धा होती 2001 ची. जागतिक महिला स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला जाणार होता. त्यासाठी पंजाब, हरियाणाच्या तगड्या मुलीही आल्या होत्या. त्यात एक माणूस आणि बाकीच्या महिला असलेला संघ म्हणजे मणीपूर अशी टिप्पणी केली जात होती. त्यांना हिंदी, इंग्रजी फारसे येत नव्हते. त्यामुळे कोणाशी संवाद नव्हता. कोणी त्यांची दखलही घेत नव्हते, पण लढती सुरु झाल्या आणि चित्र बदलले. मणिपूर काय चीज आहे, हे कळू लागले. मेरी कोम कोण याची चर्चा होऊ लागली. तिची लढत कधी याची विचारणा होऊ लागली. लढतीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सुरुवातीच्या काही लढतीत मेरीची मॅच लागली.
याविषयी जय कवळी आठवण सांगतात, तेच त्या लढतीच्यावेळी रेफ्री होते. एक काटक मुलगी रिंगणात उतरली, त्यावेळी तिच्यात काही जोष जाणवला नव्हता. तिच्याबरोबरील खेळाडू तिला प्रोत्साहन देत होत्या, हे सोडले तर कोणाचे लक्ष नव्हते. रिंगणाच्या जवळ आली आणि तिने ज्या पद्धतीने त्यात पाऊल टाकले तो आत्मविश्वास पाहून हे काहीतरी वेगळे आहे हे मी ओळखले. माझा अंदाज खरा ठरला. तिने रिंगणात उतरल्यावर सर्वांना आपली दखल घ्यायला लावली. तिची चपळाई, तिचा रिंगमधील धडाका सर्वच काही विस्मयकारक होते. लढत संपल्यानंतर मी सर्वांना सांगितले, हिच्याकडे लक्ष ठेवा, ही खूप काही घडविणार आहे. माझा अंदाज खरा ठरला याचा मला अभिमान आहे. तिने काही महिन्यांतच जागतिक रौप्यपदक जिंकले. त्यानंतर तिला जागतिक विजेतेपद जिंकण्याची सवय लागली. मला कोणीही मेरी कोमबद्दल विचारले की मला अजूनही तिची तीच लढत डोळ्यासमोर येते. सध्या महाराष्ट्र राज्य मुष्टीयुद्ध संघटनेचे अध्यक्ष असलेले जय कवळी सांगत होते. तेव्हा रिंगमधील मेरी आणि रिंग बाहेरील मेरी यातील फरक सर्वांनी अनुभवला. आजही तोच फरक आहे. तो जाणवतो, समजून येतो तसेच भावतोही. तिच्या राष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या लढतीच्यावेळी मी रेफ्री होतो व तिचा पहिला मोठा सत्कारही महाराष्ट्र राज्य संघटनेने आयोजित केला व त्यात माझा सहभाग महत्त्वाचा होता, त्याचाही मला अभिमान आहे. जागतिक विजेतेपद जिंकणे अवघड असते, हे कोणीही सांगू शकेल. एकवेळ यश मिळविणे सोपे असते, पण ते सातत्याने मिळविणे त्यापेक्षाही जास्त अवघड असते. तोच जोश पाच स्पर्धांत राखणे किती अवघड असते. त्यासाठी चिकाटी हवी, खेळाचा दर्जा उच्च राखायला हवा. 2001 पासून 2018 पर्यंत ती त्याच उच्च दर्जाचा खेळ करीत आहे. तिला आपण सर्वांनी उभे राहून सलामच करायला हवा.
ती एक लढत
मेरीने मुष्टीयुद्ध कधी, कसे सुरू केले की त्याचा फटका कोणाला किती बसला, त्याचा प्रसाद कोणी खाल्ला याबद्दल विचारले ना की मेरी असो किंवा मणिपूरमधील कोणीही जे काही सांगतात ते त्यांच्या लहेजात ऐकणे हा औरच अनुभव असतो. तो काही देता येणार नाही, पण हा जो अनुभव आहे, तो मेरीबद्दल लिहिताना सांगायलाच हवा. मेरीने बॉक्सिंगचे ट्रेनिंग घेण्यास सुरुवात करून काही महिनेच झाले होते. ट्रेनिंग संपण्यास पाच वाजले होते. काळोख पडण्यास सुरुवात झाली होती. रस्त्यावर दिवे असण्याचा प्रश्नच नव्हता. घरी महत्त्वाचे काम होते, त्यामुळे मेरीने रिक्षा केली. तिथे आपल्याकडे जशी सायकल रिक्षा असायची ना, तशी रिक्षा. रिक्षावाल्यास पत्ता सांगितला. सरावाच्या विचारात गुंफली असतानाच काही वेळातच तिला हा रस्ता वेगळा असल्याचे कळले होते. त्याचा इरादा काय तो तिला कळला होता. तिने आपलाही विचार पक्का केला. आता फक्त ती वेळ येण्याची वाट बघत होती. आडवाटेला खूपशी झाडी, तसेच वस्तीपासून दूर त्याने रिक्षा थांबवली आणि त्याने आपल्या इप्सिताच्या दिशेने पाऊल उचलले. मेरी तयारच होती. तिने लोकांना जोरात ओरडून आवाज देतानाच त्याची पंचींग बॅग सुरू केली होती. काही वेळातच गर्दी जमली. त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मेरी आपल्या मार्गाने गेली.
मेरीला याबाबत विचारल्यावर तिने त्यात काय मोठेसे, आपणच आपले संरक्षण करायला हवे. बॉक्सिंगमुळे मी त्याचा सामना करू शकले, प्रत्येकाने थोडेफार का होईन याचे ट्रेनिंग घ्यायलाच हवे. माझी त्या मॅचची तयारी एकदा त्याचा विचार कळल्यावर सुरु झाली होती, त्यावेळी त्याला मी घाबरले असेच वाटत होते. तो पुढे आल्यावर मी काय थांबणार होते. मी सुरू केले बँग… बँग…बँग… लोक येण्यापूर्वी लढत फिनीश झाली होती. हा किस्सा येथेच संपत नाही. मणिपूरच्या लोकांना याबद्दल विचारले की ते जे सांगतात ते जास्त लक्षात राहण्यासारखे आहे. अजूनही थंडी पडली की त्याला तो दिवस आठवतो, एवढेच त्यांनी सांगितल्यावर आपल्यालाही हसू आवरत नाही. तरीही आपल्याला पुरेसे कळले नसावे असा विचार करून म्हणा किंवा त्यापेक्षाही आपल्या स्टारचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे, असा विचार असेल म्हणून ते अधिकच स्पष्टीकरण देतात. त्याचे सांधे अजूनही त्या माराने थंडीत चांगलेच दुखतात, असे आपल्याशी आवर्जून शेअर करतात.
अनेकांसाठी प्रेरणादायी मेरीचा हा लढा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तो अनेकांना त्या नेमक्या ठिकाणासह पाठ आहे. ती स्टार आहे, देशात तिच्याभोवती गर्दी होते. तिच्यावर येणार्या चित्रपटाची चर्चा होते, पण मणिपूरमध्ये ती देव झालेली नाही. ती स्टार आहे. ती तेथील प्रत्येकाचा आदर्श आहे, पण तिथे व्यक्तीपूजेला थारा नाही, त्यापेक्षाही मेरी अजून हवेत चालत नाही. तेथील रचनेचा परिणाम म्हणा किंवा काहीही, पण मेरी स्वतः स्टारसारखी वागत नाही. हे तिला तेथील वातावरणानेच शिकवले असावे. तिच्या परिसरातील घरांची रचनाच जणू यशानंतर जमिनीपासून दूर जाऊ नका असा संदेश देणारी.
उभ्या पहाडावरील घरेही रस्त्याला लागून असलेली. घरात प्रवेश करतो ते गच्चीतून. तिथेच आपले वाहन पार्क करायचे आणि घरात जायचे तर गॅलरीचा जिना उतरून. यशानंतर घरी येऊन होणारे कौतुक सोहळे, भेटीगाठी ह्या गच्चीतच होतात, पण त्याचवेळी ह्या सोहळ्यानंतर, कौतुकानंतर घरात पायर्या उतरून जावे लागते. अशा ह्या घरातून, वस्तीतून वाढलेली मेरी अजूनही स्वतःला स्टार समजत नाही.
आपल्याकडचे स्टार क्वचितच एखाद्या क्लब, ग्राऊंडवर किंवा रस्त्यावर मुक्तपणे भेटतील, पण मेरीचे तसे नाही. ती स्टार आहे. घराबाहेर पडल्यावर, कार्यक्रमात तिच्याभोवतीही चाहत्यांचा गराडा होतो, पण तरीही ती सहजपणे तेथील कार्यक्रमात सहभागी होते. त्यांच्यात मिसळत असते. त्यांच्याच जीवनाचा भाग होते. अनेकांनी आग्रह केल्यानंतरही राजकारणापासून दूर आहे, हो, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा नसताना जेंव्हा गावात असते तेव्हा पाठीशी मुलाला बांधून फिरत असते. आपल्यासाठी खूप काही त्याग केलेल्या सहचराला त्याच्या आवडीचे खाऊ-पिऊ घालते.
यशस्वी पत्नीमागे मेरीच्या यशात तिच्या पतीचा मोलाचा वाटा आहे. ह्याची जाणीव मेरीला आहे. के ओनिलर कॉम हे तिचे पती. ती अनेक कार्यक्रमांना त्यांना आवर्जून घेऊन येते, पण ते मात्र ह्या झगमगाटापासून स्वतःला दूरच ठेवण्याचा प्रयत्न करतात. मेरीच्या कार्यक्रमात समजा गेलात तर त्यांना कसे ओळखणार हा प्रश्न पडला असेल तर एक सोपे काम करायचे. स्टेजपासून दूर नजरेने शोध घ्यायचा. मुलांना सांभाळणारे कोणी इशान्य भारतातील दिसले की ते मेरीचे पती समजायचे. आता अगदीच ओळखता आले नाही, तर कार्यक्रमानंतर मेरी बरोबर फोटो काढण्यासाठी स्पर्धा होते. त्यावेळी मेरी ज्यांच्याकडे बघून तुम्ही या, असा आग्रह करीत असेल, पण जी व्यक्ती नको इथेच मी ठीक आहे, फार तर मुलांना देत असेल ती व्यक्ती म्हणजे मेरीचे पती अशी खूणगाठ बांधायला हरकत नाही.
मेरीचे जेवढे आपल्या पतीवर प्रेम आहे, त्यापेक्षाही जास्त त्यांचा आदर ती करते. आपल्यासाठी त्यांनी आपल्या कारकिर्दीचा त्याग केला, त्यावर पाणी सोडले. आपण घरापासून दूर असतो, त्यामुळे घराकडे लक्ष द्यावे लागणार हा विचार त्यांनी केला. आपल्या प्रियेसाठी मुलांचा सांभाळ केला. त्यासाठी काही नातेवाईकांची टोचून बोलणी खाल्ली. पण आपण काय करत आहोत, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे टीकेकडे ते दुर्लक्ष करीत राहिले. आंतरराष्ट्रीयच नव्हे तर ऑलिंम्पिकपदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते ठामपणे मेरीच्या पाठीशी उभे राहिले व त्याचवेळी आपली सावली कुठेही तिच्यावर पडणार नाही याची काळजी घेत होते. नव्हे, अजूनही घेत आहेत. जे काही मेरी कमावते तिच्या मेहनतीच्या जोरावर, तिचा लढा देत असते. त्यासाठी खूप प्रॅक्टीसही करते, असेच ते सांगतात. पण मेरी तर खूपच आपल्याविषयी बोलते, आपल्यालाच यशाचे श्रेय देते म्हटल्यावर हसतात. मी काय केले, पती कायम पत्नीला प्रोत्साहन देत असतो. सगळेच वडील आपल्या मुलांची काळजी घेतात, त्यांना वाढवतात. तुमच्याही वडिलांनी हे केलेच की, असेही प्रसंगी सांगतात. आपण जे काही करतो, त्याचा कुठेही बडेजाव नाही, की गर्व नाही. त्यांच्या कामाची जाणीव असलेले, त्यांना ओळखतात. मेरी जेव्हा त्यांच्याविषयी भरभरून बोलते, त्यावेळी त्यांचे महत्त्व कळते. यशस्वी महिलेच्या पाठीशी तिचा पती कसा उभा राहू शकतो याची पूर्णपणे कल्पना येते. माझे ऑलिम्पिकपदकाचे स्वप्न साकार होण्यासाठी त्यांनी आपल्या कारकिर्दीकडे दुर्लक्ष केले. त्याबद्दल अनेकदा त्यांना टोचून बोलणी खावी लागली. अगदी जे आम्हाला ओळखत नाहीत, त्यांचीच कशाला काही नातेवाईकही त्यांना बोलत होते. तू हे काय करतोस, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याची झळही मला पोहोचणार नाही याची काळजी घेतली. आता त्यांची मान खाली जाऊ नये यासाठीच मी कष्ट घेते, मेहनत करते आणि यश मिळवते. संधी मिळाली की त्यांना खाऊ-पिऊ घालते. त्यांना माझ्या हातचे खूप आवडते. तेवढे मी तर त्यांच्यासाठी करायलाच हवे. तीन मुलांची आई असलेल्या मेरीने ऑलिंम्पिक सुवर्णपदकासाठी प्रयत्न करायला हवे, अशी तिच्या मिस्टरांची प्रबळ इच्छा आहे व ती फलद्रुप करण्यासाठी मेरी प्रयत्न करणार हे नक्की.