अधिकस्य अधिकम् फलम्… सौर वर्ष आणि चांद्रवर्ष यांचा ताळमेळ जुळवण्यासाठी दर तीन वर्षांनी किंवा काटेकोरपणे दर तेहतीस महिन्यांनी अधिक मास येतो. प्रत्येक मासामध्ये ठरावीक नित्यक्रम आखून दिलेला असल्यामुळे ह्या अधिक मासात काय करायचे याचे सोप्पे उत्तर ‘पुण्यसंचय’ असे धरले गेले आणि ‘पुण्य पर उपकार…’ आहे हे लक्षात घेऊन वैष्णव जन ‘पीड पराई जाणे रे’ चा मार्ग धरतात. असा ‘पीड पराई’ नुसताच जाणणारा नाही तर वर्षानुवर्षे त्या जखमेवर माणूसकीची मलमपट्टी लावण्याचे काम करणारा एक ‘अधिक’ आम्ही जाणतो. ऋतुगंधच्या मासिकात ह्या ‘अधिका’च्या कर्तृत्वाची माहिती आम्ही प्रसिद्ध केली होती. मात्र ‘ती’ जखम कमी जास्त स्वरूपात वाहतेच आहे. पण त्यामुळे हार न मानता आपले काम सतत चालू ठेवणाऱ्या ह्या कर्मवीराची आजपासून सुरू होणाऱ्या अधिक मासाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा भेट घडवीत आहोत.
आरोग्य, शिक्षण, अनाथांचे पुनर्वसन आणि महिला सक्षमीकरण… वरकरणी सरकारी भासणारा, परंतु प्रत्यक्षात काश्मिरातील एका स्वयंसेवी संस्थेचा हा अजेंडा. राज्यशास्त्राचा अभ्यास करणारा १९ वर्षांचा पुण्यातला एक तरुण काश्मीरमधली खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिथे जातो काय, तिथल्या अनाथ मुलांची परवड पाहून व्यथित होतो काय आणि तिथेच राहून या उद्ध्वस्त मुलांचे आयुष्य सावरण्यासाठी ‘बसेरा ए तबस्सुम’ अर्थात आनंद निवास उभारतो काय, हे सगळेच अनाकलनीय. तेथील दहशतवाद्यांचा दररोज सामना करत अनाथ मुलींचा सांभाळ म्हणजे जणू मृत्यूशी लपंडाव खेळण्यासारखेच. काश्मीरचा निसर्गरम्य प्रदेश भारताला हवा आहे, पण तेथील लोकांचे काय? ते देशवासीयांना आपलेसे वाटतात का, या प्रश्नाने अधिक कदम यांना भंडावून सोडले. काश्मीरमधील विदारक परिस्थिती अधिक कदम यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी येथील समाजाला आधार देण्याच्या उद्देशाने घराचा उंबरठा ओलांडला आणि त्याने काश्मिरात राहून अनाथ मुलांसाठी काम करण्यास प्रारंभ केला. खरंतर मुलगा एक-दोन वर्षांनी चांगला नोकरीधंद्याला लागेल, ह्या विचारात असलेल्या आई-बाबांना हे पचनी पडणं कठीण गेलं. पण अधिक आपल्या निर्णयावर ठाम होते. वाटेतले अनेक अडथळे त्यांनी निर्धाराने पार केले. कोणतंही पाठबळ नसूनही ह्या तरुणाने काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी आश्रम काढला, याच प्रयत्नांतून उभी राहिली संस्था ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ आणि आता तो त्यांना प्रगतीची दिशा दाखवत आहे.
एखाद्या कार्याला वाहून घेतलेली माणसं आजकाल मिळतात कुठे? प्रत्येकाला हवा असतो मोबदला. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून हमखास येणारा हा सूर. त्यातही तथ्य असेल म्हणा, म्हणजे समाजकार्यात झोकून दिलेल्यांची संख्या रोडावली असेल कदाचित पण, ती थांबलेली नक्कीच नाही. महाराष्ट्राचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याची संवेदनशीलता आजच्या पिढीतही आहे. अनेक तरुणांनी विविध सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलं आहे. मूळचे श्रीगोंदा येथील अधिक कदम हे त्यांपैकीच एक. घरदारच काय, पण राज्य सोडून काश्मीरमधील अनाथ मुलींना मायेचं छत देण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे.
अधिक यांचा जन्म शेतकरी कुटुंबातला. घरची परिस्थिती तशी बेताचीच. पण सारं सुरळीत चाललं होतं. अधिक राज्यशास्त्राचा अभ्यास करत होते. त्यादरम्यान १९९० मध्ये काश्मीर खोर्यातील अस्थिरता वाढली होती. यावेळी अधिक यांनी प्रत्यक्ष जाऊन खरी परिस्थिती पाहण्याचा निर्णय घेतला. आपल्या काही मित्र मंडळींसोबत ते गेलेही आणि तिथेच त्यांच्य्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. तिथली एकूणच परिस्थिती पाहून येथे काहीतरी केलं पाहिजे हा ध्य्यास त्यांनी घेतला. यासाठी काश्मीरमध्ये वास्तव्य करण्याचे ठरवले. अर्थात, घरच्यांचा पाठिंबा नव्हताच. मुलांनी शिकावं, हातभार लावावा, ही त्यांची विचारसरणी. त्यामुळे मुलगा समाजकार्यासाठी झोकून देतोय, हे पचवणं त्यांना कठीण होतं. अधिक मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. आपल्या वेगळ्या वाटेच्या प्रवासाला त्यांनी १९९६-९७ मध्ये सुरुवात केली. हळूहळू घरच्यांचा विरोध मावळला. त्यांच्या आईने त्यांना पहिली मदत केली. अधिक यांच्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं. त्यांनी नव्या जोमाने आपल्या कार्याला सुरुवात केली.
आर्थिक प्रगतीचे बंद दरवाजे, भ्रष्टाचार, सरकारची अनास्था यामुळे तसे अनेक प्रश्न काश्मीरमध्ये उभे होते. पण त्यातही महिलांची, अनाथ मुलींची अवस्था दयनीय होती. अधिक यांनी महिलांना आधार देण्याचं ठरवलं. कामाला सुरुवात झाली ती सर्वेक्षणाने. मी तुमच्यासाठी काहीतरी करायला आलोय, हा आविर्भाव त्यांच्यात नव्हताच. मी तुमच्यातला आहे, आपण मिळून एक एक पाऊल पुढे जाऊ, ही अधिक यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी तिथल्या लोकांमध्ये मिसळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना बर्याच गोष्टी समजल्या. एकूणच ह्या सगळ्या परिस्थितीत सामान्य माणूस अधिक भरडला जात आहे, हे त्यांच्या लक्षात आले. अधिक आणि त्यांच्या मित्र मंडळींनी स्थानिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले. हे काम करत असताना तुम्ही अनाथ मुलींसाठीही काहीतरी करा, असं ग्रामस्थांकडून सुचवण्यात आलं. कारण त्यावेळी तिथे असं काम करणारं कुणीही नव्हतं. ह्या मुली अत्याचाराच्या बळी ठरत होत्या. काही गर्भवती राहिल्याचे समोर आले. कुपवाडासारख्या १०० टक्के मुस्लिम जिल्ह्यात महाराष्ट्रातला एक हिंदू महाविद्यालयीन मुलगा येऊन तेथील अनाथ मुस्लिम मुलींचा सांभाळ करण्याचा विचार करतो हेच मुळी अविश्वसनीय वाटणारे होते. पण अधिक यांनीही ह्या मुलींच्या कल्याणासाठी काम करण्याचे ठरवले. २००१ मध्ये कुपवाडा येथे अनाथ मुलींसाठी बसेरा-ए-तबस्सुम हा आश्रम सुरू केला. सुरुवातीला ५ ते ६ मुली आश्रमात आल्या. सगळ्यात लहान मुलगी १८ महिन्यांची होती. अधिक आणि त्यांच्या सहकार्यांनी मुलींची काळजी घेताना कुपवाडासारख्या मुस्लिम बहुल भागातील लोकांमध्ये आपल्या कार्याबद्दल विश्वास निर्माण केला, तो रुजवला आणि हळूहळू मुलींची संख्या वाढली. परिणामी संस्थेचा पसाराही. २००४ मध्ये निर्वाह येथे दुसरं केंद्र सुरू झालं. २००६ मध्ये अनंतनाग येथे तिसरं आणि २००९ मध्ये जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांसाठी चौथं केंद्र स्थापन झालं. ह्या केंद्राचं नाव फा (पालनपोषण करणे) असं आहे. आता सर्व केंद्रांत मिळून जवळपास १४० मुली आहेत.
केवळ मुलींना आसरा द्यायचा असा अधिक यांचा उद्देश नव्हताच कधी. मुलींचं बालपण जपायचं. त्यांचं आयुष्य घडवायचं, यासाठी ही सारी तळमळ होती. येथे मुलींच्या प्रगतीसाठी आटोकाट प्रयत्न केला जातो. आश्रमात आलेल्या मुली बिथरलेल्या असतात. त्यांना आपलंसं करून घेण्याचंही एक कसब असतं. यामुळे हे आपलं घर आहे, याची जाणीव मुलींमध्ये निर्माण करावी लागते. अधिक आणि त्यांचे सहकारी यासाठी प्रयत्नशील असतात. तसंच मुली चुकल्या तर त्यांच्यावर आम्ही रागावतोही. आपले आई-बाबा कसे आपल्याला ओरडतात, हे अगदी तसंच असतं. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आमचा हा सारा खटाटोप असतो, असं अधिक सांगतात. हे केवळ ह्या मुलींच्या प्रगतीचं कार्य नाही, तर यातून संपूर्ण समाजाची प्रगती साधणार आहे, असंही ते म्हणतात.
ह्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आणि ते पुढे नेण्यासाठी अधिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीला त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. काहींना ते दहशतवाद्यांची माणसं, तर काहींना लष्काराचे खबरे वाटत असत. दहशतवाद्यांनी त्यांना अनेकदा उचलूनही नेलं होतं. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर, कार्य जाणून घेतल्यानंतर आणि त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. अधिक यांना कोणीही मदत करू नये, असा फतवाही काढण्यात आला होता. हे अनुभव खूप दाहक होते, पण अधिक यांचा लक्ष्य गाठण्याचा निर्धार पक्का होता, त्यामुळे अडथळ्यांचा डोंगर पार करण्याचं बळ त्यांना आपोआप मिळत गेलं आणि आता तर आश्रमात निर्धास्त वावरणार्या मुली पाहिल्या की याचसाठी केला होता अट्टाहास, असं काहीसं त्यांना वाटून जातं.
मुलींच्या प्रगतीची एक एक वीट उभी करणारे अधिक इतरांसाठी निगरगट्ट असतीलही, पण मुलींच्या बाबतीत ते खूप संवेदनशील आहेत. मुलींचा हा भैय्या त्यांच्या सोबत असताना वेगळाच दिसतो. तो मस्ती, धमाल करतो. दोघींची भांडणं झाली की कुणालाही न दुखावता तो सोडवतो. कधीतरी रागावतोही. पूर्वी ते मुलींच्या शाळेतही जात असत. त्यांची प्रगती जाणून घेत असत. ह्या मुलींच्या डोक्यावरून हात फिरवताना आई-वडिलांना जे समाधान मिळत असेल, तेच समाधान मिळतं. संस्थेच्या उभारणीसाठी केलेली धडपड आणि इतर समस्या मग क्षुल्लक वाटू लागतात. ह्या मुलींमधील निरागसता आणि चेहर्यावरचा आनंद खूप काही देऊन जातो, असं अधिक व त्यांच्या सहकार्यांचं म्हणणं आहे.
अनाथ मुलींना आसरा देण्याबरोबरच अधिक यांना महिला सक्षमीकरणाबाबत ठोस पावले उचलायची आहेत. खरंतर त्यांच्या समाजसेवेची सुरुवात याच कामाने झाली होती, पण आता पुन्हा त्याकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. यासाठी काही नवीन उपक्रम हाती घ्यायचे आहेत. महिलांचं सबलीकरण झालं की समाजही पुढे जाईल, असा विचार या मागे आहे. खरंतर कोणतंही सामाजिक कार्य उभं राहण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात लागतात. ते अधिक यांनाही मिळाले. अगदी सुरुवातीच्या सर्वेक्षणापासून ते आताच्या संस्थेचा पसारा सांभाळण्यापर्यंतची अनेक कामे त्यांचे मित्र मंडळी करतात. ती सारी तरुणाईच. कॉलेजमध्ये सामाजिक कार्याचं वेड तसं अनेकांना असतं. वृक्षारोपण, साफसफाई, अशा उपक्रमांत तरुण-तरुणी उत्साहाने सहभागी होतात. पण एकदा का करिअरच्या वाटा खुल्या झाल्या की सामाजिक कार्याबाबत केवळ संवेदनशीलता उरते; कृतीतून ते उतरत नाही, पण अधिक आणि त्यांच्या सहकार्यांनी वेगळं उदाहरण समाजापुढे ठेवलंय. निवृत्तीनंतर समाजकार्य करण्यापेक्षा तरुणाईची ताकद त्यासाठी खर्ची केली तर ते खर्या अर्थाने समाजहिताचं ठरतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे. पाच-सहा आकडी पगारापेक्षा दुसर्याला आनंद दिल्याचं समाधान अधिक मोलाचं, हे त्यांच्या आयुष्याचं सूत्रच त्यांना सतत नवी उर्मी देत राहतं.
आरोग्य, शिक्षण, अनाथांचे पुनर्वसन आणि महिला सक्षमीकरण… वरकरणी सरकारी भासणारा, परंतु प्रत्यक्षात काश्मिरातील एका स्वयंसेवी संस्थेचा हा अजेंडा. राज्यशास्त्राचा अभ्यास करणारा १९ वर्षांचा पुण्यातला एक तरुण काश्मीरमधली खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिथे जातो काय, तिथल्या अनाथ मुलांची परवड पाहून व्यथित होतो काय आणि तिथेच राहून या उद्ध्वस्त मुलांचे आयुष्य सावरण्यासाठी ‘बसेरा ए तबस्सुम’ अर्थात आनंद निवास उभारतो काय, हे सगळेच अनाकलनीय. तेथील दहशतवाद्यांचा दररोज सामना करत अनाथ मुलींचा सांभाळ म्हणजे जणू मृत्यूशी लपंडाव खेळण्यासारखेच. काश्मीरचा निसर्गरम्य प्रदेश भारताला हवा आहे, पण तेथील लोकांचे काय? ते देशवासीयांना आपलेसे वाटतात का, या प्रश्नाने अधिक कदम यांना भंडावून सोडले. काश्मीरमधील विदारक परिस्थिती अधिक कदम यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी येथील समाजाला आधार देण्याच्या उद्देशाने घराचा उंबरठा ओलांडला आणि त्याने काश्मिरात राहून अनाथ मुलांसाठी काम करण्यास प्रारंभ केला. खरंतर मुलगा एक-दोन वर्षांनी चांगला नोकरीधंद्याला लागेल, ह्या विचारात असलेल्या आई-बाबांना हे पचनी पडणं कठीण गेलं. पण अधिक आपल्या निर्णयावर ठाम होते. वाटेतले अनेक अडथळे त्यांनी निर्धाराने पार केले. कोणतंही पाठबळ नसूनही ह्या तरुणाने काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी आश्रम काढला, याच प्रयत्नांतून उभी राहिली संस्था ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ आणि आता तो त्यांना प्रगतीची दिशा दाखवत आहे.
एखाद्या कार्याला वाहून घेतलेली माणसं आजकाल मिळतात कुठे? प्रत्येकाला हवा असतो मोबदला. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून हमखास येणारा हा सूर. त्यातही तथ्य असेल म्हणा, म्हणजे समाजकार्यात झोकून दिलेल्यांची संख्या रोडावली असेल कदाचित पण, ती थांबलेली नक्कीच नाही. महाराष्ट्राचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याची संवेदनशीलता आजच्या पिढीतही आहे. अनेक तरुणांनी विविध सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलं आहे. मूळचे श्रीगोंदा येथील अधिक कदम हे त्यांपैकीच एक. घरदारच काय, पण राज्य सोडून काश्मीरमधील अनाथ मुलींना मायेचं छत देण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे.
अधिक यांचा जन्म शेतकरी कुटुंबातला. घरची परिस्थिती तशी बेताचीच. पण सारं सुरळीत चाललं होतं. अधिक राज्यशास्त्राचा अभ्यास करत होते. त्यादरम्यान १९९० मध्ये काश्मीर खोर्यातील अस्थिरता वाढली होती. यावेळी अधिक यांनी प्रत्यक्ष जाऊन खरी परिस्थिती पाहण्याचा निर्णय घेतला. आपल्या काही मित्र मंडळींसोबत ते गेलेही आणि तिथेच त्यांच्य्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. तिथली एकूणच परिस्थिती पाहून येथे काहीतरी केलं पाहिजे हा ध्य्यास त्यांनी घेतला. यासाठी काश्मीरमध्ये वास्तव्य करण्याचे ठरवले. अर्थात, घरच्यांचा पाठिंबा नव्हताच. मुलांनी शिकावं, हातभार लावावा, ही त्यांची विचारसरणी. त्यामुळे मुलगा समाजकार्यासाठी झोकून देतोय, हे पचवणं त्यांना कठीण होतं. अधिक मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. आपल्या वेगळ्या वाटेच्या प्रवासाला त्यांनी १९९६-९७ मध्ये सुरुवात केली. हळूहळू घरच्यांचा विरोध मावळला. त्यांच्या आईने त्यांना पहिली मदत केली. अधिक यांच्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं. त्यांनी नव्या जोमाने आपल्या कार्याला सुरुवात केली.
आर्थिक प्रगतीचे बंद दरवाजे, भ्रष्टाचार, सरकारची अनास्था यामुळे तसे अनेक प्रश्न काश्मीरमध्ये उभे होते. पण त्यातही महिलांची, अनाथ मुलींची अवस्था दयनीय होती. अधिक यांनी महिलांना आधार देण्याचं ठरवलं. कामाला सुरुवात झाली ती सर्वेक्षणाने. मी तुमच्यासाठी काहीतरी करायला आलोय, हा आविर्भाव त्यांच्यात नव्हताच. मी तुमच्यातला आहे, आपण मिळून एक एक पाऊल पुढे जाऊ, ही अधिक यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी तिथल्या लोकांमध्ये मिसळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना बर्याच गोष्टी समजल्या. एकूणच ह्या सगळ्या परिस्थितीत सामान्य माणूस अधिक भरडला जात आहे, हे त्यांच्या लक्षात आले. अधिक आणि त्यांच्या मित्र मंडळींनी स्थानिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले. हे काम करत असताना तुम्ही अनाथ मुलींसाठीही काहीतरी करा, असं ग्रामस्थांकडून सुचवण्यात आलं. कारण त्यावेळी तिथे असं काम करणारं कुणीही नव्हतं. ह्या मुली अत्याचाराच्या बळी ठरत होत्या. काही गर्भवती राहिल्याचे समोर आले. कुपवाडासारख्या १०० टक्के मुस्लिम जिल्ह्यात महाराष्ट्रातला एक हिंदू महाविद्यालयीन मुलगा येऊन तेथील अनाथ मुस्लिम मुलींचा सांभाळ करण्याचा विचार करतो हेच मुळी अविश्वसनीय वाटणारे होते. पण अधिक यांनीही ह्या मुलींच्या कल्याणासाठी काम करण्याचे ठरवले. २००१ मध्ये कुपवाडा येथे अनाथ मुलींसाठी बसेरा-ए-तबस्सुम हा आश्रम सुरू केला. सुरुवातीला ५ ते ६ मुली आश्रमात आल्या. सगळ्यात लहान मुलगी १८ महिन्यांची होती. अधिक आणि त्यांच्या सहकार्यांनी मुलींची काळजी घेताना कुपवाडासारख्या मुस्लिम बहुल भागातील लोकांमध्ये आपल्या कार्याबद्दल विश्वास निर्माण केला, तो रुजवला आणि हळूहळू मुलींची संख्या वाढली. परिणामी संस्थेचा पसाराही. २००४ मध्ये निर्वाह येथे दुसरं केंद्र सुरू झालं. २००६ मध्ये अनंतनाग येथे तिसरं आणि २००९ मध्ये जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांसाठी चौथं केंद्र स्थापन झालं. ह्या केंद्राचं नाव फा (पालनपोषण करणे) असं आहे. आता सर्व केंद्रांत मिळून जवळपास १४० मुली आहेत.
केवळ मुलींना आसरा द्यायचा असा अधिक यांचा उद्देश नव्हताच कधी. मुलींचं बालपण जपायचं. त्यांचं आयुष्य घडवायचं, यासाठी ही सारी तळमळ होती. येथे मुलींच्या प्रगतीसाठी आटोकाट प्रयत्न केला जातो. आश्रमात आलेल्या मुली बिथरलेल्या असतात. त्यांना आपलंसं करून घेण्याचंही एक कसब असतं. यामुळे हे आपलं घर आहे, याची जाणीव मुलींमध्ये निर्माण करावी लागते. अधिक आणि त्यांचे सहकारी यासाठी प्रयत्नशील असतात. तसंच मुली चुकल्या तर त्यांच्यावर आम्ही रागावतोही. आपले आई-बाबा कसे आपल्याला ओरडतात, हे अगदी तसंच असतं. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आमचा हा सारा खटाटोप असतो, असं अधिक सांगतात. हे केवळ ह्या मुलींच्या प्रगतीचं कार्य नाही, तर यातून संपूर्ण समाजाची प्रगती साधणार आहे, असंही ते म्हणतात.
ह्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आणि ते पुढे नेण्यासाठी अधिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीला त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. काहींना ते दहशतवाद्यांची माणसं, तर काहींना लष्काराचे खबरे वाटत असत. दहशतवाद्यांनी त्यांना अनेकदा उचलूनही नेलं होतं. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर, कार्य जाणून घेतल्यानंतर आणि त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. अधिक यांना कोणीही मदत करू नये, असा फतवाही काढण्यात आला होता. हे अनुभव खूप दाहक होते, पण अधिक यांचा लक्ष्य गाठण्याचा निर्धार पक्का होता, त्यामुळे अडथळ्यांचा डोंगर पार करण्याचं बळ त्यांना आपोआप मिळत गेलं आणि आता तर आश्रमात निर्धास्त वावरणार्या मुली पाहिल्या की याचसाठी केला होता अट्टाहास, असं काहीसं त्यांना वाटून जातं.
मुलींच्या प्रगतीची एक एक वीट उभी करणारे अधिक इतरांसाठी निगरगट्ट असतीलही, पण मुलींच्या बाबतीत ते खूप संवेदनशील आहेत. मुलींचा हा भैय्या त्यांच्या सोबत असताना वेगळाच दिसतो. तो मस्ती, धमाल करतो. दोघींची भांडणं झाली की कुणालाही न दुखावता तो सोडवतो. कधीतरी रागावतोही. पूर्वी ते मुलींच्या शाळेतही जात असत. त्यांची प्रगती जाणून घेत असत. ह्या मुलींच्या डोक्यावरून हात फिरवताना आई-वडिलांना जे समाधान मिळत असेल, तेच समाधान मिळतं. संस्थेच्या उभारणीसाठी केलेली धडपड आणि इतर समस्या मग क्षुल्लक वाटू लागतात. ह्या मुलींमधील निरागसता आणि चेहर्यावरचा आनंद खूप काही देऊन जातो, असं अधिक व त्यांच्या सहकार्यांचं म्हणणं आहे.
अनाथ मुलींना आसरा देण्याबरोबरच अधिक यांना महिला सक्षमीकरणाबाबत ठोस पावले उचलायची आहेत. खरंतर त्यांच्या समाजसेवेची सुरुवात याच कामाने झाली होती, पण आता पुन्हा त्याकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. यासाठी काही नवीन उपक्रम हाती घ्यायचे आहेत. महिलांचं सबलीकरण झालं की समाजही पुढे जाईल, असा विचार या मागे आहे. खरंतर कोणतंही सामाजिक कार्य उभं राहण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात लागतात. ते अधिक यांनाही मिळाले. अगदी सुरुवातीच्या सर्वेक्षणापासून ते आताच्या संस्थेचा पसारा सांभाळण्यापर्यंतची अनेक कामे त्यांचे मित्र मंडळी करतात. ती सारी तरुणाईच. कॉलेजमध्ये सामाजिक कार्याचं वेड तसं अनेकांना असतं. वृक्षारोपण, साफसफाई, अशा उपक्रमांत तरुण-तरुणी उत्साहाने सहभागी होतात. पण एकदा का करिअरच्या वाटा खुल्या झाल्या की सामाजिक कार्याबाबत केवळ संवेदनशीलता उरते; कृतीतून ते उतरत नाही, पण अधिक आणि त्यांच्या सहकार्यांनी वेगळं उदाहरण समाजापुढे ठेवलंय. निवृत्तीनंतर समाजकार्य करण्यापेक्षा तरुणाईची ताकद त्यासाठी खर्ची केली तर ते खर्या अर्थाने समाजहिताचं ठरतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे. पाच-सहा आकडी पगारापेक्षा दुसर्याला आनंद दिल्याचं समाधान अधिक मोलाचं, हे त्यांच्या आयुष्याचं सूत्रच त्यांना सतत नवी उर्मी देत राहतं.
बाॅर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनच्यावतीने सातत्याने सुरू असलेले काही उपक्रम ज्यांना आपण आर्थिक मदतीचे सहकार्य करू शकता
- 200 हून अधिक मुलींची सोय होईल अशा वसतिगृहाचे भुमीपुजन नुकतेच करण्यात आले. त्याचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्याची योजना.
- आपत्कालीन परिस्थितीतील रूग्णवाहिका. सध्या 8 कार्यरत. नवीन घेण्याची योजना.
- 2016 मध्ये 13 डाॅक्टरांच्या टीमच्या मदतीने 1300+ रूग्णांवर यशस्वी उपचार व आवश्यक शस्त्रक्रियांची पूर्तता.
- श्रीनगर येथे 10 संगणकाच्या मदतीने एक छोटीशी संगणक प्रयोगशाळा कार्यरत. संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू. त्यात नवीन संगणकांची उपलब्धता करून देण्याची योजना.
- मुलींना शालेय शिक्षण तसेच सॅनेटरी नॅपकीन पॅड्स तयार करणे, कश्मिरी शिवणकाम, भरतकाम, विणकाम इत्यादी माध्यमातून स्वयंरोजगाराचे शिक्षण व साधन उपलब्ध करून देण्याची योजना.
संपर्क : 91 20 24327766
(पूर्व प्रसिद्ध ऋतुगंध मासिक)