एप्रिल-मे म्हणजे जसे लगीनघाईचे दिवस तसे आघोटीच्या कामांचे दिवस. पावसाळ्याआधीची सगळी कामे ह्या काळात व्हायलाच हवीत; असे त्यावेळच्या वेळापत्रकानुसार ठरलेले होते. तो काळ म्हणजे फार दूरचा नाही. ३०-४० वर्षांपूर्वीचा काळ, जेव्हा माणसाची जीवनशैली आजच्यापेक्षा खूप वेगळी होती. निसर्गाशी सहजपणाने जुळवून घेत आपण जगत होतो. थंडी-ऊन-पाऊस याचा आनंद घेत होतो. ह्या ऋतूची मजा घेत होतो. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात, घामाच्या धारा पुसत गच्चीत किंवा अंगणात वाळवणं घालण्याचा त्रास वाटत नसे. दळणवळणाची साधने आजच्या तुलनेत कमी होती त्यामुळे बाहेरून बिगर मोसमी भाजीपाला-फळे एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नव्हती, असं उन्हाळ्यात बऱ्याच गोष्टी वाळवून, साठवून, भाजून त्यांची बेगमी पावसाळ्यासाठी करावी लागे. अाजच्यासारखी एक-दोन मुले नाही; तर किमान चार मुलं घरी असत. एकत्र कुटुंब म्हणून तजवीज तर करायलाच हवी. स्वयंपाकासाठी संपूर्ण बाकी लाकूड-फाटा, शेणाच्या गोवऱ्या, कोळसा यांची साठवण हे एक काम असे. घरात जराही कोणाला उसंत नसे. शिवाय मे महिन्यांत एकमेकांकडे चांगले महिना-पंधरा दिवस राहायला जाण्याइतका वेळ, माणसामाणसांत जिव्हाळा होता. आलेली पाहुणेमंडळी पण कामाला लागत. जाताना केलेले पदार्थ त्यांच्या बरोबर थोडे थोडे रवाना होत. आजच्यासारखी किलो अर्धा किलोची भाषा नव्हती. सगळं पायलीच्या हिशाेबात चाले. शेर दोनशेर डाळ आणण्यापेक्षा उन्हाळ्यात पोतंभर धान्य घेऊन त्याला ८-१० उन्हं लावायची आणि घट्ट झाकणाचे डबे भरून ठेवायचे. यात गहू फार थोडे, कारण जेवणात भाकऱ्या, त्याही तांदळाच्याच. त्यामुळे सणावाराला पुऱ्या, पुरणाच्या पोळ्या वगैरेसाठी गहू लागत म्हणून ते वाळवायचे. बाकी तुरीची डाळ वाळवून, त्याला तेल लावून टाकायचं, वाल (कडवे), हरभरा, तूर ही वाळवणं मार्च अखेरपर्यंत डब्यात जात.
हे लिहिताना खरं तर मी ती सगळी लगबग अनुभवते आहे. आमच्याकडे बटाट्याचा कीस, साबुदाण्याच्या चिकवड्या, तांदळाच्या उकडून केलेल्या पांढऱ्या शुभ्र फेण्या, कोहळ्याचे सांडगे, सांडगे मिरच्या, उडदाचे व पोह्याचे पापड, मोठ्या प्रमाणावर करावे लागत. कुर्डया मात्र फारच क्वचित केल्या असतील.
उडदाच्या पापडाचं डांगर भिजवायचं ते कोमट पाण्यात. म्हणजे केळीच्या खोडाचा गाभा घेऊन तो कुटून त्याचा रस काढायचा. जर केळीचा खुंट नाही मिळाला तर कोहळ्याच्या रसात पीठ भिजवण्याची पद्धत होती. पण वाडीत केळी असल्याने आम्ही केळीच्या रसातच भिजवत असू. त्याचं कारण विचारलं की कोणी म्हणे त्यामुळे पापड हलके होतात; तर कोणी सांगे ते जास्त टिकतात. आता मला आपलं वाटतं, केळ्यात कॅल्शियम असतं तसं कदाचित त्या रसात सुद्धा असू शकेल. पोह्यांचे पीठ पाण्यातच भिजवावे लागे. ५०-१०० पापड ताकात पीठ भिजवून केले जात असत, त्याची चव जरा वेगळी लागे. उडदाच्या पापडासाठी खास पांढऱ्या मिरच्या मिळवल्या जात असत. दोन्ही प्रकारचे पापड मात्र बायका एकमेकींच्या मदतीने करत. दुपारची जेवणे झाली की बायका स्वत:चं पोळपाट लाटणं घेऊन जात. जिच्या घरी पापड तिच्या ओटीवर नाही तर पडवीत कारखाना सुरू. रोज कोणाकडे तरी हा कार्यक्रम असे. मध्ये मग चहापाणी किंवा पन्ह दिलं जाई. डांगर कुटायचं म्हणजे ताकदीचं काम असे. तेल लसूण कुटून-कुटून करायचं आणि उडदाच्या पिठावर पापड लाटायचे. पापडांचं डांगर सगळे खाणारच असे गृहीतच धरलेलं असे. तेलात बुडूवून लाट्या खाण्याची तर मजा होतीच. पण पापड वाळत घलायला अंगणात गेल्यावर एखादा ओला पापड पण मोडून तोंडात टाकायचा मोह होत असे. आता काय दुकानातून डांगर विकत मिळतं. त्या लाट्या काही जण खाण्यासाठी म्हणून नेतात. आता पोह्याची मिरगुंड मिळतात ते चौकोनी शंकरपाळे असतात.
आमच्याकडे एक कोंड्याचा पापड पण आम्ही करायचो त्याला ‘कोंडेकडं’ म्हणत. आमच्यापुढे म्हणण्याचं कारण आजुबाजूला मी कोणाकडे केलेला कधी पाहिला नाही. घरीच तांदूळ सडले जात. त्याचा भरपूर कोंडा निघे तो बारीक चाळणीने चाळून घ्यायचा. (आता हातसडीचे तांदूळ शोधावे लागतात कोंडा तर दूरची गोष्ट) त्या कोंड्यात मीठ, ताक, मिरचीचा ठेचा, थोडा पापडखार आणि थोडं कोमट पाणी घालून भाकरचीच्या पिठासारखा गोळा मळायचा व हाताने पातळ थापून उन्हात चांगली ८-१० दिवस कोंदेकडं वाळवायची. जेवताना तोंडी लावणे म्हणून एकेक दोन दोन कोंडकडं भाजून घेतली की भागे. जर निखाऱ्यावर कोंडेकडं भाजल की खरपूस वास येई. त्याने भूक चाळवत असे. कोंडेकंडं मात्र पीठ भिजवून वाळेपर्यंत जेवढच्या तेवढं राही. पापडांच्या लाट्यांसारखी त्याला खायला मागणी नव्हती वाळल्यावर मात्र प्रत्येकाला ते हवंच असे.
तीन दिवस तांदूळ भिजत घालून (रोज पाणी बदलायचे असे) ते वाटून त्याच्या वाफेवरच्या फेण्या हा मोठा समारंभच असे. आदल्या दिवशी रात्रीचे दही विरजून ठेवायचे. रात्री पीठ वाटून ठेवायचे. सकाळी ७ वाजताच मोदकपात्रात आधण उकळायला लागे. केळीच्या पानावर तळहाताएवढ्या आकाराचे पीठ पसरून पाने वाफवायला ठेवायची. एकावेळी दोन फेण्या उकडल्या जात. बाजूला ओला पंचा घट पिळून पसरलेला असे त्यावर मोदकपात्रातून काढलेले पान उपडे टाकायचे. खाली टाकताच ओल्या पानामुळे फेणी हाताने सोडवण्याइतकी गार होई. आम्ही केळीची पानं व साईचे दही घेऊन तयारच असायचो. त्या दिवशी फेण्याचीच न्याहरी असे. आंबवलेल्या पिठाच्या त्या ओल्या फेण्या बोलबोल म्हणता संपून जात, पिठाचं पातेलं अर्ध झालं की मग मात्र बंद! उरलेल्याचा चीक शिजवून त्याच्या पापड्या घातल्या जात. पण लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यानी ओल्या फेण्या भरपूर रिचवलेल्या असत. आजच्या भाषेत बोलायचं तर हा ‘डाएट नाश्ता म्हणता येईल. दही वगळता त्यात काही वजन वाढवणारे, साखर वाढवणारे नाही. कोणी कोणी तांदुळाचा मुद्दा काढू शकेल पण एकतर फेण्या खूप पातळ पसरल्या जातात. शिवाय तांदूळ हातसडीचेच असत. असो, ह्या साठवणीच्या पदार्थांमुळे एक गोष्ट होती ती म्हणजे सौरुऊर्जेचा उपयोग करून ते टिकवले जात. धान्यरक्षक किंवा प्रिझर्वेटीव्हजी गरजच पडत नसे.
आठ-आठ दिवस कडाक्याच्या उन्हात वाळवून हवाबंद डब्यात भरलेली धान्ये किंवा अन्य खाद्यपदार्थ वर्षभर टिकतात. त्यामुळे धान्यरक्षकांचा दुष्परिणाम होण्याची शक्यता नसे. घरी सामान आणून स्वत: केल्याने स्वच्छ, शुद्ध म्हणजे कोणतीही भेसळ न केलेल्या वस्तू मिळत. आता ‘शेल्फ’ लाइफ असा एक शब्द वापरूला जातो. शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी रसायने वापरली जातात, पण उन्हात वाळवलेल्या पदार्थांना शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी वेगळी काळजी घ्याावी लागत नाही. आजही नोकरी करणाऱ्या अनेक स्त्रिया खास रजा घेऊन थोडेफार बेगमीचे पदार्थ करताना दिसतात. चिकवड्या, सांडगे, मिरच्या, बटाट्याचा कीस वगैरे त्या करू शकतात आणि करतातही. दोन वर्षापूर्वी काही कामासाठी मी गिरगावात एका चाळीत गेले होते. तिथे मला सुखद धक्का बसला होता. बऱ्याच खोल्यांच्या समोरच्या जागेत काही मसाल्याचे पदार्थ वाळत होते. त्यांचा वास भरून राहिला होता. एक दोन ठिकाणी बटाट्याचा कीस, चिकवड्याही प्लास्टिकच्या कागदावर असाव्यात. कारण त्यावर पातळ झाकण घातले होते. सांगायचा मुद्दा काही गोष्टी थोडे कष्ट घेऊन करायला काय हरकत आहे? स्वच्छ, स्वस्त आणि शुद्ध स्वरूपात आपल्यालाच वस्तू मिळतील. मात्र बाजारात मिळणाऱ्या ‘घरगुती’ वस्तूंचा वापर थोडा कमी करता येईल.
हे लिहिताना खरं तर मी ती सगळी लगबग अनुभवते आहे. आमच्याकडे बटाट्याचा कीस, साबुदाण्याच्या चिकवड्या, तांदळाच्या उकडून केलेल्या पांढऱ्या शुभ्र फेण्या, कोहळ्याचे सांडगे, सांडगे मिरच्या, उडदाचे व पोह्याचे पापड, मोठ्या प्रमाणावर करावे लागत. कुर्डया मात्र फारच क्वचित केल्या असतील.
उडदाच्या पापडाचं डांगर भिजवायचं ते कोमट पाण्यात. म्हणजे केळीच्या खोडाचा गाभा घेऊन तो कुटून त्याचा रस काढायचा. जर केळीचा खुंट नाही मिळाला तर कोहळ्याच्या रसात पीठ भिजवण्याची पद्धत होती. पण वाडीत केळी असल्याने आम्ही केळीच्या रसातच भिजवत असू. त्याचं कारण विचारलं की कोणी म्हणे त्यामुळे पापड हलके होतात; तर कोणी सांगे ते जास्त टिकतात. आता मला आपलं वाटतं, केळ्यात कॅल्शियम असतं तसं कदाचित त्या रसात सुद्धा असू शकेल. पोह्यांचे पीठ पाण्यातच भिजवावे लागे. ५०-१०० पापड ताकात पीठ भिजवून केले जात असत, त्याची चव जरा वेगळी लागे. उडदाच्या पापडासाठी खास पांढऱ्या मिरच्या मिळवल्या जात असत. दोन्ही प्रकारचे पापड मात्र बायका एकमेकींच्या मदतीने करत. दुपारची जेवणे झाली की बायका स्वत:चं पोळपाट लाटणं घेऊन जात. जिच्या घरी पापड तिच्या ओटीवर नाही तर पडवीत कारखाना सुरू. रोज कोणाकडे तरी हा कार्यक्रम असे. मध्ये मग चहापाणी किंवा पन्ह दिलं जाई. डांगर कुटायचं म्हणजे ताकदीचं काम असे. तेल लसूण कुटून-कुटून करायचं आणि उडदाच्या पिठावर पापड लाटायचे. पापडांचं डांगर सगळे खाणारच असे गृहीतच धरलेलं असे. तेलात बुडूवून लाट्या खाण्याची तर मजा होतीच. पण पापड वाळत घलायला अंगणात गेल्यावर एखादा ओला पापड पण मोडून तोंडात टाकायचा मोह होत असे. आता काय दुकानातून डांगर विकत मिळतं. त्या लाट्या काही जण खाण्यासाठी म्हणून नेतात. आता पोह्याची मिरगुंड मिळतात ते चौकोनी शंकरपाळे असतात.
आमच्याकडे एक कोंड्याचा पापड पण आम्ही करायचो त्याला ‘कोंडेकडं’ म्हणत. आमच्यापुढे म्हणण्याचं कारण आजुबाजूला मी कोणाकडे केलेला कधी पाहिला नाही. घरीच तांदूळ सडले जात. त्याचा भरपूर कोंडा निघे तो बारीक चाळणीने चाळून घ्यायचा. (आता हातसडीचे तांदूळ शोधावे लागतात कोंडा तर दूरची गोष्ट) त्या कोंड्यात मीठ, ताक, मिरचीचा ठेचा, थोडा पापडखार आणि थोडं कोमट पाणी घालून भाकरचीच्या पिठासारखा गोळा मळायचा व हाताने पातळ थापून उन्हात चांगली ८-१० दिवस कोंदेकडं वाळवायची. जेवताना तोंडी लावणे म्हणून एकेक दोन दोन कोंडकडं भाजून घेतली की भागे. जर निखाऱ्यावर कोंडेकडं भाजल की खरपूस वास येई. त्याने भूक चाळवत असे. कोंडेकंडं मात्र पीठ भिजवून वाळेपर्यंत जेवढच्या तेवढं राही. पापडांच्या लाट्यांसारखी त्याला खायला मागणी नव्हती वाळल्यावर मात्र प्रत्येकाला ते हवंच असे.
तीन दिवस तांदूळ भिजत घालून (रोज पाणी बदलायचे असे) ते वाटून त्याच्या वाफेवरच्या फेण्या हा मोठा समारंभच असे. आदल्या दिवशी रात्रीचे दही विरजून ठेवायचे. रात्री पीठ वाटून ठेवायचे. सकाळी ७ वाजताच मोदकपात्रात आधण उकळायला लागे. केळीच्या पानावर तळहाताएवढ्या आकाराचे पीठ पसरून पाने वाफवायला ठेवायची. एकावेळी दोन फेण्या उकडल्या जात. बाजूला ओला पंचा घट पिळून पसरलेला असे त्यावर मोदकपात्रातून काढलेले पान उपडे टाकायचे. खाली टाकताच ओल्या पानामुळे फेणी हाताने सोडवण्याइतकी गार होई. आम्ही केळीची पानं व साईचे दही घेऊन तयारच असायचो. त्या दिवशी फेण्याचीच न्याहरी असे. आंबवलेल्या पिठाच्या त्या ओल्या फेण्या बोलबोल म्हणता संपून जात, पिठाचं पातेलं अर्ध झालं की मग मात्र बंद! उरलेल्याचा चीक शिजवून त्याच्या पापड्या घातल्या जात. पण लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यानी ओल्या फेण्या भरपूर रिचवलेल्या असत. आजच्या भाषेत बोलायचं तर हा ‘डाएट नाश्ता म्हणता येईल. दही वगळता त्यात काही वजन वाढवणारे, साखर वाढवणारे नाही. कोणी कोणी तांदुळाचा मुद्दा काढू शकेल पण एकतर फेण्या खूप पातळ पसरल्या जातात. शिवाय तांदूळ हातसडीचेच असत. असो, ह्या साठवणीच्या पदार्थांमुळे एक गोष्ट होती ती म्हणजे सौरुऊर्जेचा उपयोग करून ते टिकवले जात. धान्यरक्षक किंवा प्रिझर्वेटीव्हजी गरजच पडत नसे.
आठ-आठ दिवस कडाक्याच्या उन्हात वाळवून हवाबंद डब्यात भरलेली धान्ये किंवा अन्य खाद्यपदार्थ वर्षभर टिकतात. त्यामुळे धान्यरक्षकांचा दुष्परिणाम होण्याची शक्यता नसे. घरी सामान आणून स्वत: केल्याने स्वच्छ, शुद्ध म्हणजे कोणतीही भेसळ न केलेल्या वस्तू मिळत. आता ‘शेल्फ’ लाइफ असा एक शब्द वापरूला जातो. शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी रसायने वापरली जातात, पण उन्हात वाळवलेल्या पदार्थांना शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी वेगळी काळजी घ्याावी लागत नाही. आजही नोकरी करणाऱ्या अनेक स्त्रिया खास रजा घेऊन थोडेफार बेगमीचे पदार्थ करताना दिसतात. चिकवड्या, सांडगे, मिरच्या, बटाट्याचा कीस वगैरे त्या करू शकतात आणि करतातही. दोन वर्षापूर्वी काही कामासाठी मी गिरगावात एका चाळीत गेले होते. तिथे मला सुखद धक्का बसला होता. बऱ्याच खोल्यांच्या समोरच्या जागेत काही मसाल्याचे पदार्थ वाळत होते. त्यांचा वास भरून राहिला होता. एक दोन ठिकाणी बटाट्याचा कीस, चिकवड्याही प्लास्टिकच्या कागदावर असाव्यात. कारण त्यावर पातळ झाकण घातले होते. सांगायचा मुद्दा काही गोष्टी थोडे कष्ट घेऊन करायला काय हरकत आहे? स्वच्छ, स्वस्त आणि शुद्ध स्वरूपात आपल्यालाच वस्तू मिळतील. मात्र बाजारात मिळणाऱ्या ‘घरगुती’ वस्तूंचा वापर थोडा कमी करता येईल.