सतार, व्हायोलीन, संतूर, सारंगीसा रखी वाद्ये ऐकायला फार मधुर वाटतात. पण त्यांवर हुकुमत मिळविणे कठीण असते. सतार हे वाद्य आत्मसात करून सतारवादन क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे ती अलका गुजर ह्यांनी. सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आणि जल्लोष सुरू आहे. देवीचा; पर्यायाने स्त्रीशक्तीचा जागर सुरू आहे. ह्या निमित्ताने सतारवादक अलका गुजर यांच्याशी संवाद साधून त्यांचा सांगीतिक प्रवास जाणून घेण्याचा हा प्रयत्न…
सतारसारखे नजाकती पण तितकेच कठीण वाद्य त्यांनी कसे निवडले, असे विचारताच त्या म्हणाल्या की; ‘बहीण सरोद शिकायला गुरुजींकडे जात असे. मी तिच्यासोबत जाण्यास सुरुवात केली. तेव्हा मी जेमतेम १० ते ११ वर्षांची असेन. त्यावेळी गुरुजी आचार्य जियालाल वसंत यांनी माझ्या हातात सतार दिली आणि सारेगम शिकवलं. मला ते पटकन जमलं. तिथपासून माझा सतारसोबतचा सुरेल प्रवास सुरू झाला. असा योगायोगाने माझा ह्या क्षेत्रात प्रवेश झाला. काहीही ठरवून झालं नाही.’
सतारसारखं वाद्य त्यांनी निवडल्यामुळे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी संगीतक्षेत्राशी निगडीत असेल का, हे कुतूहल मनात होते. त्याबाबत त्यांना छेडल्यावर त्या उत्तरल्या, ‘वडील तबलावादन करत असत. काका रेडिओसाठी गात होते. मीही वाद्य वाजवायचं, असं काही ठरवलं नव्हतं. पण शिकायला लागल्यावर वडिलांनी प्रोत्साहन दिलं. त्यांना आनंद झाला. मी आठवी-नववीत असताना रेल्वे अपघातात बहिणीचा मृत्यू झाला आणि त्या धक्क्याने तीन महिन्यांनी वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी मला भेटण्यासाठी माझे गुरू आले होते. त्यांनी त्यावेळी दिलेला कानमंत्र मी आजही लक्षात ठेवला आहे. ते म्हणाले होते, जे झालं ते वाईट झालं, पण आता रडायचं नाही. उद्यापासून आपल्या पायावर उभं राहायचं. तिथपासून माझे आणि सतारीचे बंध घट्ट होत गेले. सतारवादन शिकायला सुरुवात केल्यानंतर वर्षही झालं नव्हतं. तरीही त्यांनी मला शिकवणी मिळवून दिली. पेडर रोडचा पत्ता दिला. मी तेव्हा छबीलदास शाळेत शिकत होते. शाळेचा गणवेश घालून मी पत्ता शोधत तेथे गेले. २० मजल्याची इमारत होती आणि मला १९व्या मजल्यावर जायचं होतं. त्याकाळी इतक्या उंच इमारतीत जाण्याचा कधी प्रश्नच आला नव्हता. लिफ्टमध्ये खूप भीती वाटली. अखेर घर गाठलं. एक ख्रिश्नच महिला होत्या. त्यांना आधी मी कुणी सेल्स गर्ल वाटले. मी तोडक्या मोडक्या इंग्रजीतच म्हटलं, ‘आय अॅम सतार टीचर’. मग त्या बाईंनी माझं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्या माझी काळजीही घ्यायच्या. अशाच सतारवादनाच्या शिकवण्या घेत एमएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. गुरुजींमुळे खूप मोठ्या घरांत शिकवायला मिळालं. प्रयाग संगीत समिती, अलाहाबादमधूनही गाणं आणि सतारमध्ये बीए केलं आहे.’
प्रारंभीचा संगीतप्रवास, गुरू, विद्याभ्यास ह्याविषयी माहिती देतांना अलकाताई अतिशय कृतज्ञतेने म्हणाल्या की, ‘गुरुंनी अक्षरश: आम्हाला घडवलं. बरं नसलं की, औषधपाणी करण्यापर्यंत सगळं त्यांनी केलं. लहानपणापासूनच मी सतारवादनाला सुरुवात केली होती. त्यामुळे शिकवण्या घ्यायच्या, शाळेत जायचं आणि नंतर रियाझ, असाच माझा दिनक्रम होता. दिवाळीची सुटी, मे महिन्याची सुटी ह्या कालावधीत आम्ही भारतभर कार्यक्रम करायचो. ह्या काळात सुमारे २० कार्यक्रम होत असत. तसे नियोजन गुरुजी करायचे. त्यावेळी मी १६ वेळा काश्मीरला गेले हेाते. आमचा ग्रुपही १६ जणांचा होता. अगदी इंदिरा गांधी यांच्याकडेही कार्यक्रम केले आहेत.’
महिला म्हटलं की अनेक कौटुंबिक व्यवधानं सांभाळावी लागतात. ही तारेवरची कसरत अलकाताईनी लीलया पेलली आहे. त्यांच्या विवाहोत्तर वाटचालीविषयी सांगतांना त्या उत्तरल्या की, ‘माझं लग्न थोडं उशिरा झालं. माझे पती प्रताप गुजर मंगलगाणीमध्ये बासरीवादन करत असत. आता बासऱ्या तयार करून त्या विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासारख्या दिग्गजांना ते बासऱ्या पुरवतात. जगभरात विक्री करतात. पती माझ्या क्षेत्रात असले तरी घरचे वातावरण वेगळे होते. माझे सासरे पोलीस इन्स्पेक्टर होते. त्यांना संगीत आवडत असे, पण करिअर म्हणून नाही. पण नंतर त्यांच्यासह सासू, नणंदा यांनी मला खूप साथ दिली. मी जोगेश्वरीच्या श्री समर्थ विद्यालयात संगीत शिक्षिका म्हणून नोकरी करत होते. ३० वर्षं नोकरी केली. आता निवृत्त झाले आहे. शाळेनेही खूप साथ दिली. कार्यक्रमांना जाण्यासाठी माझी कधीही अडवणूक केली नाही. सगळ्याच मुख्याध्यापकांनी पाठिंबा दिला. मी अनेकदा शाळा सुटली की संध्याकाळी कार्यक्रमांना जात असे. त्यावेळी माझे पती कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा रेल्वे स्थानकावर मला सतार आणून देत असत. रात्री यायला उशीर झाला की, सासरे वाट पाहत असत. त्यामुळे उत्साह वाढत गेला. घर सांभाळून मी सगळं केलं. काही वेळेला कार्यक्रम करून आल्यावर घरची कामंही करावी लागत असत. पण ती मी आवडीने करत असे. मुलालाही जसा वेळ मिळेल तसा देत गेले. त्याला शाळेत सोडायला जाणं, वेळ मिळाला की, आणायला जाणं, हे सांभाळलं. मुलानेही खूप समजून घेतलं. आता कथक नृत्यासाठी १० वर्षांपासून मी साथसंगत करत आहे. यासाठी परदेशात बरेच दौरे होतात. पण सतार ही माझी ऊर्जा आहे. हे व्यग्र असणं माझ्या अंगवळणी पडलंय.’
अलकाताईंनी लहान वयातच ह्या वाद्याच्या उपासनेला प्रारंभ केलाय. त्यामुळे त्यांची पहिली मैफिल नेमकी कुठे झाली आणि त्याविषयीच्या आठवणी जाणून घेण्याची उत्सुकता मनात होतीच.हा प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या की, ‘मी लहान असल्याने पहिली मैफल आठवत नाही, पण लक्षात राहिलेली मैफल म्हणजे, रेडिओ स्टेशनसाठी रंगलेली. दिल्ली रेडिओसाठी मी वाजवलं होतं. माझ्यासाठी गुरुजींनी छोटी सतार दिली होती. तसंच युववाणीमध्येही माझी फारुख शेख यांनी मुलाखत घेतली होती.सुरुवातीच्या वेळचे म्हणून हे प्रसंग मला आठवतात.’ भारतीय कलाकारांना परदेशात मोठा सन्मान लाभतो आणि तिकडे कार्यक्रम सादर करण्यासाठीसुद्धा त्यांना बोलावलं जातं. अलकाताईनीसुद्धा देशविदेशांत अनेक कार्यक्रम केले आहेत. त्यांचा हा प्रवास कसा आहे, ह्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘कथक नृत्यासाठी माझे परदेशात दौरे सुरू झाले. फ्रान्स, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दुबई, अशा अनेक देशांत गेले. तिथल्या लोकांकडून खूप कौतुक होतं. अगदी उभं राहून ते दाद देतात. आपली संस्कृती, पेहराव, याचंही त्यांना आकर्षण असतं. मी मोठी टिकली लावते आणि साडी नेसते. जपानला काही महिलांनी हात लावून साडी पाहिली. टिकलीचंही कौतुक केलं. खूप प्रेम मिळतं परदेशात सुद्धा!’
हल्ली झटपट संगीताचा जमाना आलाय. रिऍलिटि शोंचे पेव फुटले आहे. ह्या नव्या प्रवाहाबाबत आपले स्पष्ट मत मांडतांना अलकाताई बोलल्या की, ‘खूपच छान आहे. यामुळे लोकांमध्ये संगीताविषयी जागृती झालीय. वादकांना प्राधान्य मिळालं, ते पडद्यासमोर आले. आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगलं गाणं गावं, वाद्य वाजवावं, असं पालकांना वाटू लागलंय. लहानपणापासूनच त्यांना संगीताचे धडे देण्यावर भर देत आहेत.’ आजवरच्या सांगीतिक वाटचालीत त्यांना रोटरी क्लब, सूरमणी, आशादीप संस्था, शाळेचा आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार, असे अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळाले. काही उल्लेखनीय कामंही वाट्याला आली. यामध्ये जाऊ बाई जोरात, चिरीमिरी, ह्या नाटकांसाठी, सुमारे ५० भोजपरी चित्रपटांसाठी त्यांनी सतारवादन केलं. गायत्री मंत्रात त्यांचं सतारवादन आहे. अष्टविनायक मंत्र, शनिमंत्र यातही त्यांनी वादन केलंय.
सतारवादन क्षेत्रात येणाऱ्या महिलांना आपण काय सल्ला द्याल, असे विचारताच त्या उत्तरल्या, ‘महिलांनी आवडीने ह्या क्षेत्रात संगीताची सेवा करावी. घर सांभाळून करता येतं. मुख्य म्हणजे मनाची शांती मिळते. महिलांसाठी ते महत्त्वाचं आहे. मी सतारवादनाला गेले की दुसरं सगळं विसरून जाते. अगदी तब्येत बरी नसेल तरी ते विसरायला होतं. एक वेगळाच आनंद यात आहे. तो शब्दांत नाही मांडता येत, अनुभवता यायला हवा.’ ह्या क्षेत्राकडे त्या कोणत्या दृष्टीने पाहतात, कला की करिअर, असे विचारताच त्या हसून म्हणाल्या की, ह्या’ क्षेत्राकडे मी कला म्हणून वळले. नंतर त्यात मी करिअर केलं. म्हणजे शिक्षिका व्हावं, असं मी अजिबात ठरवलं नव्हतं. पण शाळेत ‘संगीत शिक्षिका हवी आहे’, अशी जाहिरात वाचली आणि अर्ज केला. मुलाखतीचं पत्र घेऊन तेथील कारकून माझ्या घरी आला आणि माझी संगीत शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे माझी कलाच माझे करियर झाले आणि हे फार सुखावह आहे.’
अलकाताईंकडे आज सुद्धा काही परदेशी संगीतप्रेमी शिकायला येतात. काही दिवसांसाठी ते भारतात आलेले असतात. त्यामुळे त्यांना प्राथमिक धडे त्या देतात. स्काइपवर काही परदेशी लोकांना शिकवतात. सातत्याने कार्यक्रम, विद्यादान आणि नवनवे शिकत राहणे, असे त्यांचे व्यग्र जगणे सुरू आहे. आठवणीतील काही खास प्रसंग सांगतांना गतकाळातील आठवणींना उजाळा देत त्या म्हणाल्या की, ‘एक प्रसंग कायम लक्षात राहिल. मी सतार घेऊन ट्रेनने येत होते. समोर तृतीय पंथीय बसला होता. मला पाहून तो भारावून गेला. म्हणाला, मां आपण तर सरस्वती मां आहात. मी तुमच्या पाया पडतो, असं म्हणत तो माझ्या आणि सतारीच्या पाया पडला. मीही लहानपणी व्हायोलिन वाजवायला जात असे. त्यावेळी सतार वादन ऐकलं होतं. हे वाद्य वाजवणं खूप कठीण असतं, हे माहिती आहे मला, असं तो म्हणाला आणि त्याने भावूक होऊन मला निरोप दिला. दुसरा प्रसंग पॅरिसचा. माझं सादरीकरण होतं. तेव्हा एका व्यक्तीने माझं वादन सुरू असताना त्याच्या मनात काय भावना उमटल्या, हे कॅनव्हासवर मांडलं आणि ते चित्र मला भेट दिलं. त्यावर उडणारे पक्षी होते. आणखी एक प्रसंग मी अमृतसरला कार्यक्रमात वाजवत होते. समोर मोठा रसिकवर्ग होता. खूप थंडी पडली होती. हात कोरडे पडले होते. त्यामुळे सतारवादन करताना हातातून रक्त यायला लागलं. पण मी कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत थांबले नाही. अशा अनेक खास प्रसंगांची भेट अनमोल अशीच. एका गोष्टीची मात्र खंत वाटते. मला पीएचडी करायची होती ती करणं राहून गेलं.’अशी खंत मात्र त्यांनी बोलताबोलता व्यक्त केली.
सतारसारखे नजाकती पण तितकेच कठीण वाद्य त्यांनी कसे निवडले, असे विचारताच त्या म्हणाल्या की; ‘बहीण सरोद शिकायला गुरुजींकडे जात असे. मी तिच्यासोबत जाण्यास सुरुवात केली. तेव्हा मी जेमतेम १० ते ११ वर्षांची असेन. त्यावेळी गुरुजी आचार्य जियालाल वसंत यांनी माझ्या हातात सतार दिली आणि सारेगम शिकवलं. मला ते पटकन जमलं. तिथपासून माझा सतारसोबतचा सुरेल प्रवास सुरू झाला. असा योगायोगाने माझा ह्या क्षेत्रात प्रवेश झाला. काहीही ठरवून झालं नाही.’
सतारसारखं वाद्य त्यांनी निवडल्यामुळे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी संगीतक्षेत्राशी निगडीत असेल का, हे कुतूहल मनात होते. त्याबाबत त्यांना छेडल्यावर त्या उत्तरल्या, ‘वडील तबलावादन करत असत. काका रेडिओसाठी गात होते. मीही वाद्य वाजवायचं, असं काही ठरवलं नव्हतं. पण शिकायला लागल्यावर वडिलांनी प्रोत्साहन दिलं. त्यांना आनंद झाला. मी आठवी-नववीत असताना रेल्वे अपघातात बहिणीचा मृत्यू झाला आणि त्या धक्क्याने तीन महिन्यांनी वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी मला भेटण्यासाठी माझे गुरू आले होते. त्यांनी त्यावेळी दिलेला कानमंत्र मी आजही लक्षात ठेवला आहे. ते म्हणाले होते, जे झालं ते वाईट झालं, पण आता रडायचं नाही. उद्यापासून आपल्या पायावर उभं राहायचं. तिथपासून माझे आणि सतारीचे बंध घट्ट होत गेले. सतारवादन शिकायला सुरुवात केल्यानंतर वर्षही झालं नव्हतं. तरीही त्यांनी मला शिकवणी मिळवून दिली. पेडर रोडचा पत्ता दिला. मी तेव्हा छबीलदास शाळेत शिकत होते. शाळेचा गणवेश घालून मी पत्ता शोधत तेथे गेले. २० मजल्याची इमारत होती आणि मला १९व्या मजल्यावर जायचं होतं. त्याकाळी इतक्या उंच इमारतीत जाण्याचा कधी प्रश्नच आला नव्हता. लिफ्टमध्ये खूप भीती वाटली. अखेर घर गाठलं. एक ख्रिश्नच महिला होत्या. त्यांना आधी मी कुणी सेल्स गर्ल वाटले. मी तोडक्या मोडक्या इंग्रजीतच म्हटलं, ‘आय अॅम सतार टीचर’. मग त्या बाईंनी माझं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्या माझी काळजीही घ्यायच्या. अशाच सतारवादनाच्या शिकवण्या घेत एमएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. गुरुजींमुळे खूप मोठ्या घरांत शिकवायला मिळालं. प्रयाग संगीत समिती, अलाहाबादमधूनही गाणं आणि सतारमध्ये बीए केलं आहे.’
प्रारंभीचा संगीतप्रवास, गुरू, विद्याभ्यास ह्याविषयी माहिती देतांना अलकाताई अतिशय कृतज्ञतेने म्हणाल्या की, ‘गुरुंनी अक्षरश: आम्हाला घडवलं. बरं नसलं की, औषधपाणी करण्यापर्यंत सगळं त्यांनी केलं. लहानपणापासूनच मी सतारवादनाला सुरुवात केली होती. त्यामुळे शिकवण्या घ्यायच्या, शाळेत जायचं आणि नंतर रियाझ, असाच माझा दिनक्रम होता. दिवाळीची सुटी, मे महिन्याची सुटी ह्या कालावधीत आम्ही भारतभर कार्यक्रम करायचो. ह्या काळात सुमारे २० कार्यक्रम होत असत. तसे नियोजन गुरुजी करायचे. त्यावेळी मी १६ वेळा काश्मीरला गेले हेाते. आमचा ग्रुपही १६ जणांचा होता. अगदी इंदिरा गांधी यांच्याकडेही कार्यक्रम केले आहेत.’
महिला म्हटलं की अनेक कौटुंबिक व्यवधानं सांभाळावी लागतात. ही तारेवरची कसरत अलकाताईनी लीलया पेलली आहे. त्यांच्या विवाहोत्तर वाटचालीविषयी सांगतांना त्या उत्तरल्या की, ‘माझं लग्न थोडं उशिरा झालं. माझे पती प्रताप गुजर मंगलगाणीमध्ये बासरीवादन करत असत. आता बासऱ्या तयार करून त्या विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासारख्या दिग्गजांना ते बासऱ्या पुरवतात. जगभरात विक्री करतात. पती माझ्या क्षेत्रात असले तरी घरचे वातावरण वेगळे होते. माझे सासरे पोलीस इन्स्पेक्टर होते. त्यांना संगीत आवडत असे, पण करिअर म्हणून नाही. पण नंतर त्यांच्यासह सासू, नणंदा यांनी मला खूप साथ दिली. मी जोगेश्वरीच्या श्री समर्थ विद्यालयात संगीत शिक्षिका म्हणून नोकरी करत होते. ३० वर्षं नोकरी केली. आता निवृत्त झाले आहे. शाळेनेही खूप साथ दिली. कार्यक्रमांना जाण्यासाठी माझी कधीही अडवणूक केली नाही. सगळ्याच मुख्याध्यापकांनी पाठिंबा दिला. मी अनेकदा शाळा सुटली की संध्याकाळी कार्यक्रमांना जात असे. त्यावेळी माझे पती कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा रेल्वे स्थानकावर मला सतार आणून देत असत. रात्री यायला उशीर झाला की, सासरे वाट पाहत असत. त्यामुळे उत्साह वाढत गेला. घर सांभाळून मी सगळं केलं. काही वेळेला कार्यक्रम करून आल्यावर घरची कामंही करावी लागत असत. पण ती मी आवडीने करत असे. मुलालाही जसा वेळ मिळेल तसा देत गेले. त्याला शाळेत सोडायला जाणं, वेळ मिळाला की, आणायला जाणं, हे सांभाळलं. मुलानेही खूप समजून घेतलं. आता कथक नृत्यासाठी १० वर्षांपासून मी साथसंगत करत आहे. यासाठी परदेशात बरेच दौरे होतात. पण सतार ही माझी ऊर्जा आहे. हे व्यग्र असणं माझ्या अंगवळणी पडलंय.’
अलकाताईंनी लहान वयातच ह्या वाद्याच्या उपासनेला प्रारंभ केलाय. त्यामुळे त्यांची पहिली मैफिल नेमकी कुठे झाली आणि त्याविषयीच्या आठवणी जाणून घेण्याची उत्सुकता मनात होतीच.हा प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या की, ‘मी लहान असल्याने पहिली मैफल आठवत नाही, पण लक्षात राहिलेली मैफल म्हणजे, रेडिओ स्टेशनसाठी रंगलेली. दिल्ली रेडिओसाठी मी वाजवलं होतं. माझ्यासाठी गुरुजींनी छोटी सतार दिली होती. तसंच युववाणीमध्येही माझी फारुख शेख यांनी मुलाखत घेतली होती.सुरुवातीच्या वेळचे म्हणून हे प्रसंग मला आठवतात.’ भारतीय कलाकारांना परदेशात मोठा सन्मान लाभतो आणि तिकडे कार्यक्रम सादर करण्यासाठीसुद्धा त्यांना बोलावलं जातं. अलकाताईनीसुद्धा देशविदेशांत अनेक कार्यक्रम केले आहेत. त्यांचा हा प्रवास कसा आहे, ह्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘कथक नृत्यासाठी माझे परदेशात दौरे सुरू झाले. फ्रान्स, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दुबई, अशा अनेक देशांत गेले. तिथल्या लोकांकडून खूप कौतुक होतं. अगदी उभं राहून ते दाद देतात. आपली संस्कृती, पेहराव, याचंही त्यांना आकर्षण असतं. मी मोठी टिकली लावते आणि साडी नेसते. जपानला काही महिलांनी हात लावून साडी पाहिली. टिकलीचंही कौतुक केलं. खूप प्रेम मिळतं परदेशात सुद्धा!’
हल्ली झटपट संगीताचा जमाना आलाय. रिऍलिटि शोंचे पेव फुटले आहे. ह्या नव्या प्रवाहाबाबत आपले स्पष्ट मत मांडतांना अलकाताई बोलल्या की, ‘खूपच छान आहे. यामुळे लोकांमध्ये संगीताविषयी जागृती झालीय. वादकांना प्राधान्य मिळालं, ते पडद्यासमोर आले. आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगलं गाणं गावं, वाद्य वाजवावं, असं पालकांना वाटू लागलंय. लहानपणापासूनच त्यांना संगीताचे धडे देण्यावर भर देत आहेत.’ आजवरच्या सांगीतिक वाटचालीत त्यांना रोटरी क्लब, सूरमणी, आशादीप संस्था, शाळेचा आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार, असे अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळाले. काही उल्लेखनीय कामंही वाट्याला आली. यामध्ये जाऊ बाई जोरात, चिरीमिरी, ह्या नाटकांसाठी, सुमारे ५० भोजपरी चित्रपटांसाठी त्यांनी सतारवादन केलं. गायत्री मंत्रात त्यांचं सतारवादन आहे. अष्टविनायक मंत्र, शनिमंत्र यातही त्यांनी वादन केलंय.
सतारवादन क्षेत्रात येणाऱ्या महिलांना आपण काय सल्ला द्याल, असे विचारताच त्या उत्तरल्या, ‘महिलांनी आवडीने ह्या क्षेत्रात संगीताची सेवा करावी. घर सांभाळून करता येतं. मुख्य म्हणजे मनाची शांती मिळते. महिलांसाठी ते महत्त्वाचं आहे. मी सतारवादनाला गेले की दुसरं सगळं विसरून जाते. अगदी तब्येत बरी नसेल तरी ते विसरायला होतं. एक वेगळाच आनंद यात आहे. तो शब्दांत नाही मांडता येत, अनुभवता यायला हवा.’ ह्या क्षेत्राकडे त्या कोणत्या दृष्टीने पाहतात, कला की करिअर, असे विचारताच त्या हसून म्हणाल्या की, ह्या’ क्षेत्राकडे मी कला म्हणून वळले. नंतर त्यात मी करिअर केलं. म्हणजे शिक्षिका व्हावं, असं मी अजिबात ठरवलं नव्हतं. पण शाळेत ‘संगीत शिक्षिका हवी आहे’, अशी जाहिरात वाचली आणि अर्ज केला. मुलाखतीचं पत्र घेऊन तेथील कारकून माझ्या घरी आला आणि माझी संगीत शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे माझी कलाच माझे करियर झाले आणि हे फार सुखावह आहे.’
अलकाताईंकडे आज सुद्धा काही परदेशी संगीतप्रेमी शिकायला येतात. काही दिवसांसाठी ते भारतात आलेले असतात. त्यामुळे त्यांना प्राथमिक धडे त्या देतात. स्काइपवर काही परदेशी लोकांना शिकवतात. सातत्याने कार्यक्रम, विद्यादान आणि नवनवे शिकत राहणे, असे त्यांचे व्यग्र जगणे सुरू आहे. आठवणीतील काही खास प्रसंग सांगतांना गतकाळातील आठवणींना उजाळा देत त्या म्हणाल्या की, ‘एक प्रसंग कायम लक्षात राहिल. मी सतार घेऊन ट्रेनने येत होते. समोर तृतीय पंथीय बसला होता. मला पाहून तो भारावून गेला. म्हणाला, मां आपण तर सरस्वती मां आहात. मी तुमच्या पाया पडतो, असं म्हणत तो माझ्या आणि सतारीच्या पाया पडला. मीही लहानपणी व्हायोलिन वाजवायला जात असे. त्यावेळी सतार वादन ऐकलं होतं. हे वाद्य वाजवणं खूप कठीण असतं, हे माहिती आहे मला, असं तो म्हणाला आणि त्याने भावूक होऊन मला निरोप दिला. दुसरा प्रसंग पॅरिसचा. माझं सादरीकरण होतं. तेव्हा एका व्यक्तीने माझं वादन सुरू असताना त्याच्या मनात काय भावना उमटल्या, हे कॅनव्हासवर मांडलं आणि ते चित्र मला भेट दिलं. त्यावर उडणारे पक्षी होते. आणखी एक प्रसंग मी अमृतसरला कार्यक्रमात वाजवत होते. समोर मोठा रसिकवर्ग होता. खूप थंडी पडली होती. हात कोरडे पडले होते. त्यामुळे सतारवादन करताना हातातून रक्त यायला लागलं. पण मी कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत थांबले नाही. अशा अनेक खास प्रसंगांची भेट अनमोल अशीच. एका गोष्टीची मात्र खंत वाटते. मला पीएचडी करायची होती ती करणं राहून गेलं.’अशी खंत मात्र त्यांनी बोलताबोलता व्यक्त केली.