आपल्याकडे पोपटवाल्या ज्योतिषापासून ते अगदी कुंडलीवरून तंतोतंत ज्योतिष सांगणाऱ्या होराभूषणांपर्यंत प्रत्येकाला काहीतरी राजकीय भविष्यवाणी केल्याशिवाय जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटत नाही. बऱ्याचदा हे निव्वळ पोपटपंची या सदरात जातं पण कधीकधी तोंडात बोटं घालवी इतकं अशक्य जुळून येतं. सगळ्यात ताजं उदहरण म्हणजे कर्नाटकातील तीन अंकी नाटक.
कर्नाटकातील एका प्रसिद्ध ज्योतिषाने सांगितलं होतं, “निवडणुकांचे निकाल काहीही येऊदेत, येडियुराप्पा, सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी या तिघांपैकी केवळ कुमारस्वामींना गुरुबळ असल्याने कुणाचेही कितीही आमदार निवडून आले तरीही मुख्यमंत्री फक्त कुमारस्वामीच होऊ शकतात.”
आजचं बंगळुरू मधलं वातावरण बघता आता त्या ज्योतिष्याला शोधून आपापली गुरुबळं कधी येणार आहेत हे बघण्यासाठी राजकारणातील सगळे घोडनवरे गुढघ्याला बाशिंगं बांधून तयार असतील यात शंका नाही. पण सदरहू ज्योतिषीबुवांबद्दल पुन्हा कधीतरी, आज पाहूया ते म्हणजे तीन अंकी कर्नाटकी नाटक.
ज्या भरतमुनींनी ‘नाट्यशास्त्र’ लिहिलं त्यांचा जन्मच मुळी कर्नाटकातला, यावरून कर्नाटक राज्याला नाटकांचा इतिहास किती जुना आहे त्याची कल्पना येईल. राजकीय परिस्थितीमध्ये संपूर्ण देश जे करतो त्यांच्या नेमकं उलटं काहीतरी करायचं ही या राज्याची खासियत. अगदी इंदिरा गांधींना सगळ्या देशाने हात ‘दाखवला’ असताना त्यावेळी कर्नाटकने मात्र हात ‘दिला’ होता. २०१३मध्ये देशात काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार होऊन मोदींची हवा तयार होत असताना कर्नाटकने मात्र काँग्रेसला पूर्ण बहुमत दिलं होतं. दिलीप प्रभावळकरांचा शब्द उसना घेऊन सांगायचं म्हणजे कर्नाटकमधली मतदार असे ‘चिवित्र’ असतात.
कोणत्याही उत्तम नाटकाचे तीन अंक असतात. अगदी असंच आपण ज्या राज्याचा उल्लेख गमतीने करनाटक असा करतो, त्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन अंकी नाटक सुरु आहे. आता हे नाटक सूडनाट्य आहे की रहस्यमय? कौटुंबिक जिव्हाळ्याचे आहे की निव्वळ विनोदी? की सामाजिक संदेश देणारं?
सध्यातरी यापैकी एकही धड नव्हे किंवा सगळ्यातील थोडंथोडं असं पण एक संगीत(खुर्ची) नाटक सुरु आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर करून आचारसंहितेची पहिली घंटा वाजवल्यापासून ते आज येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याचा दुसरा अंक संपेपर्यंतचे हे नाटक अतिशय उत्कंठावर्धक झाले आहे.
या नाटकाची नायिका अर्थात सत्तासुंदरीला मिळवण्यासाठीच्या स्वयंवरात भाग घेतलेल्या दोन नायकांची येडियुरप्पा, कुमारस्वामी आणि कुमारस्वामींचा मित्र सिद्धरामय्या अशा तिघांची ही संगीतखुर्ची कहाणी अतिशय रंगतदार होत चालली आहे.
या नाटकांत सत्तासुंदरी ही नायिका आहे, पण नायक आणि खलनायक नेमकं कोण हे दोन अंक होऊन गेले तरीही अजून ठरायचं आहे. हे नाटक संगीत(खुर्ची) नाटक असल्याने ते लांबत चालले आहे. यातल्या दोन्ही नायकांनी ‘सत्तासुंदरीचा सत्ताधीश’ या ‘पदा’साठी पदं देखील गाऊन झाली आहेत. सुरुवातीचं पद हे लोकशाहीने गायलं आहे.
परवशता पाश देवे गौडा गळा लागला।
आशाळभूती बघती सारे। घबाड-योग त्याला॥
असुनि खास बहुमत घरचे। म्हणति चोर येडीला॥
सौख्य-भोग कुमारा सारे। कष्ट मात्र शहाला॥
कर्मभूमि ज्याची त्याला। रिसॉर्ट होत बंदिशाला॥
पुढे मग कुमारस्वामींच्या मित्राने सिद्धरामय्यांनी कधी नव्हे ती चपळाई दाखवली आणि येडियुरप्पांच्या डोळ्यांसमोरून सत्तासुंदरीला हात धरून ओढून न्यायला सुरवात केल्यावर लगेच येडींनी त्या पदासाठी पद सुरु केलं.
कशि या त्यजू पदाला।
मम मुख्यमंत्रीपदाला॥
अडे बहुमत जिथे हे।
मम रेड्डी तेथ राहे॥
स्वपक्षी नाराज हे नसती।
तरि मजसि वृथा भीती ती॥
राज्यपाल अपुला असता।
कोण अडवे मला आता॥
येडींच्या या पदाने राज्यपालांचे हृदय द्रवले नसते तरच नवल होतं. येडींना सत्तासुंदरीच्या स्वयंवरात प्रथम मान देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला. सत्तासुंदरी येडींच्या प्रेमात पडून कुमारस्वामींवर कोपली. कुमारस्वामींनी मग तिची समजूत काढावी म्हणून एक पद गायलं.
नच सत्तासुंदरि करूं कोपा।
मजवरि धरिं अनुकंपा।
प्रेमाने तू पावशी कशि त्या येडियुरप्पा॥
आमदार त्यांचे बहु असती।
परि प्रीती मम तुजवरती॥
जाणसि हें तूं चित्तीं।
मग कां ही अशि रीती।
सदतीसी मी अडे जरिं।
तरि तव आस भारिं।
प्रेमा तो मजवरिचा देऊं नको येडियुरप्पा॥
नच सत्तासुंदरि करूं कोपा।
मजवरि धरिं अनुकंपा॥
पण सत्तासुंदरी येडींच्या प्रेमात पडलीय असे वाटत होते, येडींच्या जोडीला अनेक चाणक्य होतेच, काहीही करून सत्तासुंदरीला आपली दासी बनवायचीच हे त्यांचं ठरलं होतं आणि त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सगळं त्यांनी सुरु केलं होतं.
पण तरीही सत्तासुंदरी ऐनवेळी दगा देईल अशी चिन्हं होती. येडींच्या हृदयातील भीती आणि पुढे जाऊन वैताग त्यांनी पद गाऊन कमी करायचा प्रयत्न सुरु केला.
कठिण कठिण कठिण किती हे बहुमत बाई।
काँग्रेसमुक्तीप्रति झटता अंत कळत नाही॥
फोडुनि आमदार दावूनि ईडीचि भीती।
हसत हसत येति ते दात विचकविती॥
अखंड हिंदवी सत्तेचा गोफ गुंफिती।
भेसूर चेहरा मम परि शेवटि उघड होत जाई॥
कठिण कठिण कठिण किती हे बहुमत बाई।
काँग्रेसमुक्तीप्रति झटता अंत कळत नाही॥
शेवटी येडींना स्वयंवर जिंकता येणार नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी स्वयंवरातून काढता पाय घेतला. आणि मग कुमारस्वामींचे वडील देवेगौडा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी लागलीच पद गायलं.
कुमारस्वामी हा नभीं उगवला।
बंगळुरी जणूं दिपची गमला॥
त्रिशंकूवस्थेत सदतीसच येति।
परि राजमुकुट हा फिरे भोवती॥
येडी-रेड्डी जरी हताश होति।
पाठिंबा मिळे तव सोनियाचा॥
अशा पद्धतीने या तीनअंकी नाटकाचा दुसरा अंक ‘दरबारी कानडा’ या अतिशय गंभीर रागातील पदाने झाला आहे. तिसरा अंक अजून उत्कंठावर्धक असणारा आहे. तुर्तास पडदा पडला आहे.
कर्नाटकातील एका प्रसिद्ध ज्योतिषाने सांगितलं होतं, “निवडणुकांचे निकाल काहीही येऊदेत, येडियुराप्पा, सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी या तिघांपैकी केवळ कुमारस्वामींना गुरुबळ असल्याने कुणाचेही कितीही आमदार निवडून आले तरीही मुख्यमंत्री फक्त कुमारस्वामीच होऊ शकतात.”
आजचं बंगळुरू मधलं वातावरण बघता आता त्या ज्योतिष्याला शोधून आपापली गुरुबळं कधी येणार आहेत हे बघण्यासाठी राजकारणातील सगळे घोडनवरे गुढघ्याला बाशिंगं बांधून तयार असतील यात शंका नाही. पण सदरहू ज्योतिषीबुवांबद्दल पुन्हा कधीतरी, आज पाहूया ते म्हणजे तीन अंकी कर्नाटकी नाटक.
ज्या भरतमुनींनी ‘नाट्यशास्त्र’ लिहिलं त्यांचा जन्मच मुळी कर्नाटकातला, यावरून कर्नाटक राज्याला नाटकांचा इतिहास किती जुना आहे त्याची कल्पना येईल. राजकीय परिस्थितीमध्ये संपूर्ण देश जे करतो त्यांच्या नेमकं उलटं काहीतरी करायचं ही या राज्याची खासियत. अगदी इंदिरा गांधींना सगळ्या देशाने हात ‘दाखवला’ असताना त्यावेळी कर्नाटकने मात्र हात ‘दिला’ होता. २०१३मध्ये देशात काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार होऊन मोदींची हवा तयार होत असताना कर्नाटकने मात्र काँग्रेसला पूर्ण बहुमत दिलं होतं. दिलीप प्रभावळकरांचा शब्द उसना घेऊन सांगायचं म्हणजे कर्नाटकमधली मतदार असे ‘चिवित्र’ असतात.
कोणत्याही उत्तम नाटकाचे तीन अंक असतात. अगदी असंच आपण ज्या राज्याचा उल्लेख गमतीने करनाटक असा करतो, त्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन अंकी नाटक सुरु आहे. आता हे नाटक सूडनाट्य आहे की रहस्यमय? कौटुंबिक जिव्हाळ्याचे आहे की निव्वळ विनोदी? की सामाजिक संदेश देणारं?
सध्यातरी यापैकी एकही धड नव्हे किंवा सगळ्यातील थोडंथोडं असं पण एक संगीत(खुर्ची) नाटक सुरु आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर करून आचारसंहितेची पहिली घंटा वाजवल्यापासून ते आज येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याचा दुसरा अंक संपेपर्यंतचे हे नाटक अतिशय उत्कंठावर्धक झाले आहे.
या नाटकाची नायिका अर्थात सत्तासुंदरीला मिळवण्यासाठीच्या स्वयंवरात भाग घेतलेल्या दोन नायकांची येडियुरप्पा, कुमारस्वामी आणि कुमारस्वामींचा मित्र सिद्धरामय्या अशा तिघांची ही संगीतखुर्ची कहाणी अतिशय रंगतदार होत चालली आहे.
या नाटकांत सत्तासुंदरी ही नायिका आहे, पण नायक आणि खलनायक नेमकं कोण हे दोन अंक होऊन गेले तरीही अजून ठरायचं आहे. हे नाटक संगीत(खुर्ची) नाटक असल्याने ते लांबत चालले आहे. यातल्या दोन्ही नायकांनी ‘सत्तासुंदरीचा सत्ताधीश’ या ‘पदा’साठी पदं देखील गाऊन झाली आहेत. सुरुवातीचं पद हे लोकशाहीने गायलं आहे.
परवशता पाश देवे गौडा गळा लागला।
आशाळभूती बघती सारे। घबाड-योग त्याला॥
असुनि खास बहुमत घरचे। म्हणति चोर येडीला॥
सौख्य-भोग कुमारा सारे। कष्ट मात्र शहाला॥
कर्मभूमि ज्याची त्याला। रिसॉर्ट होत बंदिशाला॥
पुढे मग कुमारस्वामींच्या मित्राने सिद्धरामय्यांनी कधी नव्हे ती चपळाई दाखवली आणि येडियुरप्पांच्या डोळ्यांसमोरून सत्तासुंदरीला हात धरून ओढून न्यायला सुरवात केल्यावर लगेच येडींनी त्या पदासाठी पद सुरु केलं.
कशि या त्यजू पदाला।
मम मुख्यमंत्रीपदाला॥
अडे बहुमत जिथे हे।
मम रेड्डी तेथ राहे॥
स्वपक्षी नाराज हे नसती।
तरि मजसि वृथा भीती ती॥
राज्यपाल अपुला असता।
कोण अडवे मला आता॥
येडींच्या या पदाने राज्यपालांचे हृदय द्रवले नसते तरच नवल होतं. येडींना सत्तासुंदरीच्या स्वयंवरात प्रथम मान देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला. सत्तासुंदरी येडींच्या प्रेमात पडून कुमारस्वामींवर कोपली. कुमारस्वामींनी मग तिची समजूत काढावी म्हणून एक पद गायलं.
नच सत्तासुंदरि करूं कोपा।
मजवरि धरिं अनुकंपा।
प्रेमाने तू पावशी कशि त्या येडियुरप्पा॥
आमदार त्यांचे बहु असती।
परि प्रीती मम तुजवरती॥
जाणसि हें तूं चित्तीं।
मग कां ही अशि रीती।
सदतीसी मी अडे जरिं।
तरि तव आस भारिं।
प्रेमा तो मजवरिचा देऊं नको येडियुरप्पा॥
नच सत्तासुंदरि करूं कोपा।
मजवरि धरिं अनुकंपा॥
पण सत्तासुंदरी येडींच्या प्रेमात पडलीय असे वाटत होते, येडींच्या जोडीला अनेक चाणक्य होतेच, काहीही करून सत्तासुंदरीला आपली दासी बनवायचीच हे त्यांचं ठरलं होतं आणि त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सगळं त्यांनी सुरु केलं होतं.
पण तरीही सत्तासुंदरी ऐनवेळी दगा देईल अशी चिन्हं होती. येडींच्या हृदयातील भीती आणि पुढे जाऊन वैताग त्यांनी पद गाऊन कमी करायचा प्रयत्न सुरु केला.
कठिण कठिण कठिण किती हे बहुमत बाई।
काँग्रेसमुक्तीप्रति झटता अंत कळत नाही॥
फोडुनि आमदार दावूनि ईडीचि भीती।
हसत हसत येति ते दात विचकविती॥
अखंड हिंदवी सत्तेचा गोफ गुंफिती।
भेसूर चेहरा मम परि शेवटि उघड होत जाई॥
कठिण कठिण कठिण किती हे बहुमत बाई।
काँग्रेसमुक्तीप्रति झटता अंत कळत नाही॥
शेवटी येडींना स्वयंवर जिंकता येणार नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी स्वयंवरातून काढता पाय घेतला. आणि मग कुमारस्वामींचे वडील देवेगौडा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी लागलीच पद गायलं.
कुमारस्वामी हा नभीं उगवला।
बंगळुरी जणूं दिपची गमला॥
त्रिशंकूवस्थेत सदतीसच येति।
परि राजमुकुट हा फिरे भोवती॥
येडी-रेड्डी जरी हताश होति।
पाठिंबा मिळे तव सोनियाचा॥
अशा पद्धतीने या तीनअंकी नाटकाचा दुसरा अंक ‘दरबारी कानडा’ या अतिशय गंभीर रागातील पदाने झाला आहे. तिसरा अंक अजून उत्कंठावर्धक असणारा आहे. तुर्तास पडदा पडला आहे.