नवा जीव धारणा करुन त्याचे नऊ महिने पोषण करण्याइतके शरीर सक्षम असेल तेव्हा म्हणजे 22 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पण 30 वर्षे वयाच्या आत विवाह करणे शरीरशास्त्रानुसार योग्य ठरेल. पूर्वीचे बालविवाह जसे चुकीचे होते तसे आताचे 30-35 नंतर होणारे विवाहसुद्धा योग्य नाहीत.
माझ्या परिचयातील एक मुलगी आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करते. उच्च विद्याविभूषित असल्याने महिन्याला एक लाख रुपये पगार तिला मिळतो. वयाची 35 वर्षे उलटली पण लग्नाचे नाव काढत नाही. सुरुवातीला आई-वडिलांनी तिचे लग्न जमवण्याची खटपट केली. पण एक दिवस तिने स्पष्ट सांगितले. सध्या माझा लग्नाचा विचार नाही, मला करिअर करायचे आहे. जेव्हा लग्न करावसे वाटेल तेव्हा मी तुम्हाला स्वत: सांगेन. यावर गप्प बसण्यापलिकडे ते काही करू शकले नाहीत. अशा अनेक मुली आजूबाजूला दिसतील. काही तर एकेकट्या स्वतंत्र अर्पाटमेंट घेऊन राहणार्याही आहेत. मुंबईसारख्या महानगरात अशा मुली स्वतंत्र जागा घेणे परवडले नाही तर कुठे कुठे पेईंग गेस्ट म्हणून राहतात.
स्त्रियांची इतकी प्रगती होईल, त्या स्वयंपूर्ण होतील अशी कल्पना अठरा-एकोणिसाव्या शतकात सुधारकांनीही केली नसेल. वयाच्या 7-8व्या वर्षी मुलीचे लग्न व्हायलाच हवे असा तो काळ होता. बालविवाहामुळे पुढे वैधव्य, केशवपन, सती जाणे असे भोग नवरा वारला तर तिच्या नशिबी येत असत. जन्मभर कुणाची तरी आश्रित म्हणून गुलामगिरीचे आयुष्य तिला काढावे लागे. रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित ‘उंच माझा झोका’ ह्या मालिकेत तत्कालीन स्त्रियांच्या वास्तव जीवनाचे उत्तम दर्शन घडवण्यात आले होते. पण आपल्या संस्कृतीत स्त्रियांना वेदकाळात मिळणारी वागणूक अशी गुलामगिरीची नव्हती. त्यांना चांगले शिक्षण दिले जाई. पुरुषांप्रमाणे त्यांचा उपनयन संस्कार होई. वेदांच्या रचैत्या 28 ऋषींमध्ये 7 स्त्रिया होत्या. ह्यावरून त्यांच्या बुद्धिमत्तेची कल्पना आपण करू शकतो. त्या शास्त्रनिर्णय करू शकत, वादविवाद करत, काही वेळा मोठमोठ्या वादविवादामध्ये त्या पंच म्हणून नि:पक्षपातीप्रमाणे निकालही देत. याचाच अर्थ त्यांना मानाने वागवले जाई. पुरुष श्रेष्ठ, बाई दुय्यम असा प्रकार नव्हता.
पण पुढे कधी तरी बालविवाहाची प्रथा सुरू झाली असणार. कारण मुलींना स्वयंवरात आपला पती निवडण्याचा अधिकार होता. द्रौपदी, सीता, रुक्मिणी ह्यांच्या स्वयंवरांचे उल्लेख महाकाव्यांमधून सापडतात. याचाच अर्थ त्यांना स्वत:चा जोडीदार निवडण्याइतकी समज आलेली असे आणि समाजाने तो अधिकारही त्यांना दिला होता. पण याज्ञवल्क्यसारखे काही ऋषीमुनी बालविवाहाचे पुरस्कर्ते होते. मुलीला ऋतुप्राप्ती होण्याआधी (तिची पाळी सुरू होण्याआधी) जर तिचा विवाह केला नाही तर पित्याला नरकात जावे लागते. तिच्या विवाहास उशीर केला तर तिच्या प्रत्येक ऋतुकालाच्या वेळी त्याला भ्रूणहत्येचे पातक लागते, अशी भीती त्या ऋषींना घातल्याचेही वाचनात आले. म्हणजे ज्या मुली ब्रह्मवादिनी होण्याइतकी पात्रता सिद्ध करत होत्या त्या पुढे जाऊ नयेत म्हणून 7-8 वर्षाच्या होताच त्यांचे विवाह करण्याची प्रथा सुरू झाली.
बालविवाहाची ही प्रथा पार एकोणिसाव्या शतकापर्यंत चालू होती. मुलगी 8-9 वर्षाची झाली की तिचा विवाह करून टाकायचा आणि जबाबदारीतून मोकळे व्हायचे अशी वृत्ती होती. मग मुलीसाठी वर शोधताना तो लहान, म्हणजे तिच्या बरोबरीचा आहे की नाही हे न पाहता घर खातंपितं आहे ना, वयाचे काय मोठे, बिजवर असला तरी चालेल, खूप म्हातारासुद्धा पैशांच्या जोरावर 7-8 वर्षांच्या बालिकेशी लग्न करू शकत असे.
पण इंग्रजी राजवटीत शिक्षणाची सुरुवात झाली. तरुण मुले शिक्षण घेऊ लागली. शिक्षणाचा खूप प्रसार झाला. इंग्रजी शिक्षणामुळे तरुणांना नव्या जगाची ओळख झाली. आपल्या समाजाचा विचार त्यांना करावासा वाटू लागला. त्यातूनच स्त्रियांचे प्रश्न फार गंभीर आहेत, त्यांना गुलामगिरीत जगावे लागते आहे, त्यांच्यासाठी आपण काम करायला हवे ह्या उद्देशाने प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन समाजात अशा लोकांची ‘सुधारक’ म्हणून हेटाळणी होत असे. त्यांना प्रचंड विरोध सहन करावा लागत असे. पण तरीही प्रयत्न न सोडता स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, सती बंदी असे काम सुधारक करत होते. वैचारिक बदल कधी होईल आणि समाजातील कुप्रथा बंद होतील अशा भरवशावर न राहता कायदे कसे केले जातील ह्यावर भर दिला. संमती वयाचा कायदा बालविवाहास बंदी, सती बंदीचा कायदा, विधवा विवाहाला मान्यता, अशा सुधारणा कायद्याने करण्यात आल्या. एकोणिसाव्या शतकातील सुधारकांनी जे कार्य केले ते अजोड होते. त्यांच्यामुळेच आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मुलींचे विवाहाचे वय आता खूप जास्त असते.
पण आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य समजले जाते त्या कुटुंबव्यवस्थेची आजची स्थिती काय आहे? स्त्री करिअरच्या किंवा अर्थार्जनाच्या मागे लागल्यामुळे कुटुंबावर काही परिणाम होतोय का, हे देखील विचार करण्यासारखे आहे. 1960-65 पर्यंत एसएससी किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकर्या मिळत असत. 18 वर्षे पूर्ण झाली की सरकारी नोकरीसुद्धा मिळत असे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 अशी नोकरीची वेळ होती. शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी पूर्ण दिवस सुट्टी असे. त्यामुळे नोकरी करूनसुद्धा बायकांना घरासाठी वेळ देणे शक्य होते. एकत्र कुटुंबव्यवस्थेत मुलांना सांभाळायला कोण हा प्रश्न नसे.
पुढे मुली जास्त शिकू लागल्या. एकूणच समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले. कमीत कमी पदवीपर्यंत शिक्षण (ग्रॅज्युएट) असलेल्यांनाच नोकर्या मिळू लागल्या. शिक्षण पद्धतीत बदल झाल्यानेही कॉलेजचे शिक्षण आवश्यकच झाले. त्यामुळे आधी शिक्षण, मग नोकरी शोधणे आणि नंतर विवाह. आता तर मुलींची लग्नच 25 च्या नंतर होऊ लागली आहेत. सगळ्या मुलींना शिक्षणाची किंवा नोकरीची आवड असते असे नाही. कधी तरी वाटते पूर्वी जसा बालविवाह लादला जात होता तसा आज उशिरा विवाह लादला जातोय का? आवडो न आवडो, पदवीपर्यंतचे शिक्षण सामान्यपणे मुलींना आज घ्यावे लागते असे दिसते.
पदवी मिळाल्यावर लग्न ठरेपर्यंत नोकरी करू दे म्हणून महत् प्रयासाने मुलगी नोकरी मिळवते. मिळवत्या मुलीला वरांची जास्त पसंती असते. त्यामुळे नोकरी करणार्या मुलीचे लग्न त्यामानाने लवकर जमते. लग्नानंतर नोकरी सोडणे कठीण असते. कारण मिळवती असल्यानेच तिला पसंत केलेले असते.
स्त्री हा खरे तर कुटुंबाचा केंद्रबिंदू व आधार असतो. शिक्षण आणि त्यामुळे सर्व क्षेत्रांत मिळणार्या संधी यामुळे खरी स्त्री-पुरुष समानता आता निर्माण झाल्याचे दिसते आहे. पण निसर्गाने जी दोघांत असमानता किंवा विषमता म्हणूया, ठेवली आहे तिचे काय? स्त्रीला अबला म्हटले जाते. पण प्रत्यक्षात ती एक नवा जीव स्वत:च्या शरीरात जन्माला घालते, नऊ महिने पोटात वाढवते हे सामर्थ्य निसर्गाने तिला दिले आहे. वंश सातत्य राखण्याची, जबाबदारीच निसर्गाने स्त्रीवर टाकली आहे. त्यामुळे मुळात स्त्रीने स्वत:ला कमी लेखण्याचे कारण कधीच नव्हते. पण आजही जेव्हा नोकरी-व्यवसाय न करता फक्त संसार करणार्या स्त्रीला जर विचारले, ‘आपण काय करता?’ तर अपराधी स्वरात उत्तर येते ‘काही नाही. घरीच असते. ’खरे तर मी गृहिणी आहे, संसाराची सगळी जबाबदारी मी सांभाळते, अर्थार्जन माझा जोडीदार करतो’, असे उत्तर यायला हवे.
अशी संसाराची आवड असणार्या मुलींची लग्नं कोणत्या वयात व्हावीत? त्यांना शिक्षण द्यावे की नाही असा प्रश्न काही पालकांना पडत असेल. प्रत्येक मुलीला काही उच्च शिक्षण घेऊन करिअर करावे, किंवा दिवसाचे 8-10 तास बाहेर राहून नोकरी करावी असे वाटेल असे नाही. पण म्हणून 18 वर्षे पूर्ण होताच मुलीचे लग्न करून देण्याची घाई करू नये. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर तिला तिच्या आवडीचे काही तरी शिकायला प्रोत्साहित केले पाहिजे. त्यासाठी क्लासला वगैरे घालावे. 22 वर्षांची मुलगी शारीरिकदृष्ट्या विवाहासाठी योग्य आहे. प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रश्मी फडणवीस यांनी त्यांच्या पुस्तकात 22 ते 30 ह्या वयापर्यंत स्त्रीला गर्भधारणा झाली तर प्रसूतीपर्यंत अडचणी येण्याची शक्यता कमी असते, असे मत व्यक्त केले आहे. त्या म्हणतात, ‘16 ते 18 वयात मूल होणे स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही.’ ह्या वयात अंडकोशात बीज निर्माण होण्याची क्रिया सुरू होते, समागमानंतर ते फलित होणे ही गोष्ट निसर्गनियमानुसार आहे. पण ह्या काळात मुलीच्या शरीराची वाढ होत असते. गर्भधारणा झाल्यास तो सांभाळणे व नैसर्गिक प्रसूती होणे कठीण असते. त्याचप्रमाणे तीस वर्षांनंतर गर्भधारणा झाली तरी प्रसूतीत अडचणी येऊ शकतात.
नवा जीव धारणा करून त्याचे नऊ महिने पोषण करण्याइतके शरीर सक्षम असेल तेव्हा म्हणजे 22 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पण 30 वर्षे वयाच्या आत विवाह करणे शरीरशास्त्रानुसार योग्य ठरेल. पूर्वीचे बालविवाह जसे चुकीचे होते तसे आताचे 30-35 नंतर होणारे विवाहसुद्धा योग्य नाहीत. शिक्षण, करिअर, पैसा यामागे पळता पळता तिशी केव्हा उलटते ते समजत नाही. त्यामुळे विवाह करायचा असल्यास तो शारीरिकदृष्टया योग्य वयात व्हायला हवा. यात थोडा भविष्यकाळाचा विचारही आपोआप येतो. योग्यवेळी मूल झाले तर पती-पत्नी निवृत्त होईपर्यंत मुलांचे शिक्षण, नोकरीत स्थिरस्थावर होऊन त्यांची लग्ने वेळेवर होऊन पालकांना आपले कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान मिळते. अन्यथा उशिरा जन्मलेल्या मुलांचे सगळेच उशिरा होत जाते. शिक्षणासाठी काही वेळा आई किंवा वडील यांना निवृत्तीनंतरसुद्धा नोकरी करावी लागते.
मुलींच्या बाजूने थोडा विचार करू. काळाची गरज म्हणून मुलीला नोकरी करावी लागते. प्रत्येक मुलीला असे बाहेर जाऊन काम करणे जमेल, आवडेल असे नाही. त्यामुळे नोकरीला लावण्यापूर्वीच पालकांनी तिची इच्छा जाणून घ्यायला हवी. माझ्या नात्यात एक मुलगी आहे. तिने डाएटेशियन (आहारशास्त्रज्ञ) म्हणून पदवी मिळवली आणि सात-आठ वर्षे मुंबईतल्या नामवंत हॉस्पिटलांमध्ये डायटेशियन म्हणून नोकरी केली. हुशार असल्याने तिने दोन नोकर्याही बदलल्या. पगार अर्थात चांगला होता. पण दोन शिफ्टमध्ये काम करावे लागे. दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले. मग दुर्दैवाने तिचा छोटासा अपघात झाला, हात मोडला. तो बरा होईपर्यंत तिने रजा घेतली. घरात सासू-सासरे, नवर्याला चांगला पगार त्यामुळे तिच्या नोकरीवाचून अडणार नाही इतकी चांगली आर्थिक परिस्थिती आहे असे पाहून तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. कोणीच विरोध केला नाही. कारण तिला अनेक गोष्टी येतात. स्वयंपाकाची आवड आहे. शोभेच्या वस्तू, मेंदी काढणे यात ती तरबेज आहे. त्यामुळे घरात बसून तिने आपल्या आवडींना गेल्या दोन वर्षांत दिशा दिली. नुकताच तिनं एका प्रदर्शनात भाग घेतला होता. तिने तयार केलेल्या वस्तू हातोहात विकल्या गेल्या. यापुढे आपण शोभेच्या वस्तू तयार करून विकण्यातच व्यवसाय करणार, प्रदर्शनात भाग घेणार, ओरिगामी व पेपर क्विलिंगचे क्लासेस घेणार (जे तिने आधीच सुरू केलेत) असे ठरवून टाकले. यातून एक दिसते की तिला आपल्याला खरी आवड कोणती आहे हे शोधायला शिक्षण आणि नोकरीच्या धबडग्यात सवडच मिळाली नाही. हात मोडल्यानंतर रजेच्या काळात तिच्या लक्षात आले की आपल्याला घरात कामे करायला, माणसाची ऊठबस करायला आवडते आहे. संसार करता करता जे छंद जपता येतील त्यातून मी काही तरी करू शकेन आणि मुख्य म्हणजे नवर्यासमोर नोकरी सोडण्याचा प्रस्ताव ती आत्मविश्वासाने ठेवू शकली हे महत्त्वाचे.
स्त्री कुटुंबाचा केंद्रबिंदू आणि आधार आहे असे म्हणताना ती घरासाठी, कुटुंबासाठी किती करू शकते हे महत्त्वाचे आहे. पेरावे ते उगवते ह्या न्यायाने संसारातही सुख-दु:ख वाट्याला येतात. आता एक किंवा दोन मुले असतात. आई-बापांची स्वाभाविक अपेक्षा असते की म्हातारपणी मुलांबरोबर राहावे, नातवंडांना वळण लावावे, आपले दुखले- खुपले तर मुलांनी आपली काळजी घ्यावी, जमेल तसे आणि जमेल तितिकच काम करून सुनेला मदत करावी. पण प्रत्यक्षात काय दिसते? मुले, शहरात जागा लहान ह्या कारणामुळे लग्न होताच स्वत:ची स्वतंत्र जागा घेऊन वेगळी होतात. आईवडील एकटे राहतात. मुले लांबून त्यांची काळजी घेतात, आर्थिक भारही उचलतात. पण शारिरीकदृष्ट्या कार्यक्षम राहण्यासाठी मात्र आईबापांना स्वत:च काळजी घ्यावी लागते.
मुलाच्या छोट्या कुटुंबात काही सगळे ‘ऑल वेल’ नसते. मुलाला पाळणाघरात किंवा नोकरांवर सोडून आई दिवसभर बाहेर नोकरी करते. मुलांच्या आरोग्याकडे, शिक्षणाकडे लक्ष द्यायला कसा वेळ मिळणार? त्यामुळे पूर्ण वेळाची नोकरी न करता नवर्याच्या पगारात घरखर्चाचे गणित मांडून फावल्या वेळात स्त्रिया काम करू शकतील. मुलीचे लग्न तेवीस-चोविसाव्या वर्षी केले तर ते योग्य ठरेल. कितीतरी मुलींना जशी नोकरीची आवड नसते तशी बर्याच तरुणांना बायकोने नोकरी करणे मनापासून आवडत नाही असेही असते. पण नोकरी असली तर सोडायला कसे सांगणार? कारण काळ व्यक्तिस्वातंत्र्याचा आहे. शिवाय तिने आर्थिक स्वातंत्र्य उपभोगले आहे माझ्या एकट्याच्या पगारात ती भागवू शकेल का? तिची खर्चिक राहणी परवडेल का? असे प्रश्न तरुणांनाही असतील. मुलींनी जर स्वत: म्हटले, ‘मी एकट्याच्या पगारात व्यवस्थित भागवीन. समाधानात राहीन, ‘तर हे घडू शकेल.
मग मुलींना शिकवायचे नाही का? तर ते चूक आहे. आजचा काळ व्यक्तीविकासाचा आहे. माहितीचा, ज्ञानाचा जणू स्फोट झाला आहे. त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण तर हवेच पण नंतरही मुलींनी आपली बौद्धिक पातळी वाढवत ठेवली पाहिजे. नोकरी व संसार यात मी फक्त संसार करणार आहे, माझे कार्यक्षेत्र फक्त चूल आणि मूल आहे, मला काय करायचे आहे. बौद्धिक पातळी वगैरे? असे म्हणून चालणार नाही. कारण ही दोन क्षेत्रंसुद्धा आता खूप विस्तारली आहेत. वैयक्तिक विकास झाला तरच कुटुंबाला तिचा खरा आधार वाटेल. चूल म्हणजे एका अर्थाने घरातल्या सदस्यांचे आरोग्य. मुलांच्या वाढीसाठी, तसेच नवर्याच्या व स्वत:च्या आरोग्यासाठी आहाराची योजना जाणीवपूर्वक पण बजेटमध्ये बसेल अशाप्रकारे करण्याचे कसब तिला मिळवावे लागेल. मुलांचे शिक्षण, निदान शालेय शिक्षण आता खूप गुंतागुंतीचे झाले आहे. पण तक्रार न करत, न चिडता त्यांना प्रोजेक्ट, अभ्यास यात मनापासून मदत करावी लागते. पालक सभांना जाऊन शंकांचे निरसन व मुलांच्या प्रगतीची, तक्रारीची माहिती घ्यावी लागते. मुले इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर जुजबी ज्ञान असून भागणार नाही. प्रयत्नपूर्वक इंग्रजी सुधारावे लागेल. तरच मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देता येईल. अन्यथा त्याच्या शिकवणीवर खर्च करावा लागेल. पैसा वाचवणे म्हणजे पैसा मिळवणे. नोकरी न करणार्या मुलींनी शिकवण्यांवरचा खर्च वाचवायला हवा. पुरुषाने चरितार्थासाठी अर्थार्जन करावे आणि स्त्रीने मुलांना जन्म देऊन मुलांचे पालनपोषण, घराचे व्यवस्थापन करावे. मग स्त्रियांनी नोकर्या करायच्याच नाही का? असे मुळीच येथे अभिप्रेत नाही. पण सरसकट नोकरी करण्याचे बंधन लादले जाऊ नये एवढेच सुचवायचे आहे. नोकर्या करणार्या स्त्रिया घर आणि कार्यालय यांचा उत्तम मेळ घालत असतील आणि मुलांना वेळ देऊ शकत असतील तर प्रश्न येणार नाही. संयुक्त कुटुंबात आजी-आजोबा मुलांना वेळ देत असत, त्यांच्याकडे लक्ष ठेवत असत. मुलांना संरक्षण आणि माया दोन्ही मिळे. पण जर वेगळा, स्वतंत्र संसार करायचा असेल तर पालकांवरची जबाबदारी वाढते. पैसा टाकला म्हणजे सगळ्या गोष्टी मिळतात असे नाही. पण विश्वासातली माणसे नेमणे, जातीने त्यांच्यावर लक्ष ठेवणे, मुलांना वेळेवर जेवणखाण मिळतय की नाही पहाणे, त्यांच्या अभ्यासावर लक्ष देणे, निदान अधूनमधून शाळेच्या व शिकवणीच्या शिक्षकांना भेटून त्यांच्या अडचणी सोडवणे मुख्य म्हणजे मुले सुरक्षित राहताहेत ना, त्यांना वाईट संगत तर लागत नाही ना, याची काळजी घेणे, हे सगळे नोकरी करणार्या स्त्रियांना पाहावे लागते.
ह्याउलट आपला संसार सांभाळून फावल्या वेळात काही तरी करू पाहणारी स्त्री मुलांना जबाबदार नागरिक बनवते. तिचे हे योगदान कुटुंबासाठी जितके महत्त्वाचे आहे तितकचे समाजासाठीही मोठे आहे. त्यामुळे वाटते करिअरच्या मागे न धावता वेळेवर म्हणजे 22 किंवा 23 व्या वर्षी मुलीचे लग्न व्हावे. आता मात्र कोणत्याच कायद्याची आवश्यकता नाही. जसजसा काळ पुढे जाईल लोकांना अनुभव येतील, तसे आपोआप वैचारिक बदल होतील. सध्या दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमांत एकत्र कुटुंबावरील मालिका दाखवितात. काय सांगावे, पुन्हा एकदा एकत्र कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व आणि फायदे समाजाला पटतील आणि एकत्र कुटुंब म्हणजे, अर्थात, आईवडील व मुलगा, सून, नातवंडं एकत्र येतीलही.
माझ्या परिचयातील एक मुलगी आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करते. उच्च विद्याविभूषित असल्याने महिन्याला एक लाख रुपये पगार तिला मिळतो. वयाची 35 वर्षे उलटली पण लग्नाचे नाव काढत नाही. सुरुवातीला आई-वडिलांनी तिचे लग्न जमवण्याची खटपट केली. पण एक दिवस तिने स्पष्ट सांगितले. सध्या माझा लग्नाचा विचार नाही, मला करिअर करायचे आहे. जेव्हा लग्न करावसे वाटेल तेव्हा मी तुम्हाला स्वत: सांगेन. यावर गप्प बसण्यापलिकडे ते काही करू शकले नाहीत. अशा अनेक मुली आजूबाजूला दिसतील. काही तर एकेकट्या स्वतंत्र अर्पाटमेंट घेऊन राहणार्याही आहेत. मुंबईसारख्या महानगरात अशा मुली स्वतंत्र जागा घेणे परवडले नाही तर कुठे कुठे पेईंग गेस्ट म्हणून राहतात.
स्त्रियांची इतकी प्रगती होईल, त्या स्वयंपूर्ण होतील अशी कल्पना अठरा-एकोणिसाव्या शतकात सुधारकांनीही केली नसेल. वयाच्या 7-8व्या वर्षी मुलीचे लग्न व्हायलाच हवे असा तो काळ होता. बालविवाहामुळे पुढे वैधव्य, केशवपन, सती जाणे असे भोग नवरा वारला तर तिच्या नशिबी येत असत. जन्मभर कुणाची तरी आश्रित म्हणून गुलामगिरीचे आयुष्य तिला काढावे लागे. रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित ‘उंच माझा झोका’ ह्या मालिकेत तत्कालीन स्त्रियांच्या वास्तव जीवनाचे उत्तम दर्शन घडवण्यात आले होते. पण आपल्या संस्कृतीत स्त्रियांना वेदकाळात मिळणारी वागणूक अशी गुलामगिरीची नव्हती. त्यांना चांगले शिक्षण दिले जाई. पुरुषांप्रमाणे त्यांचा उपनयन संस्कार होई. वेदांच्या रचैत्या 28 ऋषींमध्ये 7 स्त्रिया होत्या. ह्यावरून त्यांच्या बुद्धिमत्तेची कल्पना आपण करू शकतो. त्या शास्त्रनिर्णय करू शकत, वादविवाद करत, काही वेळा मोठमोठ्या वादविवादामध्ये त्या पंच म्हणून नि:पक्षपातीप्रमाणे निकालही देत. याचाच अर्थ त्यांना मानाने वागवले जाई. पुरुष श्रेष्ठ, बाई दुय्यम असा प्रकार नव्हता.
पण पुढे कधी तरी बालविवाहाची प्रथा सुरू झाली असणार. कारण मुलींना स्वयंवरात आपला पती निवडण्याचा अधिकार होता. द्रौपदी, सीता, रुक्मिणी ह्यांच्या स्वयंवरांचे उल्लेख महाकाव्यांमधून सापडतात. याचाच अर्थ त्यांना स्वत:चा जोडीदार निवडण्याइतकी समज आलेली असे आणि समाजाने तो अधिकारही त्यांना दिला होता. पण याज्ञवल्क्यसारखे काही ऋषीमुनी बालविवाहाचे पुरस्कर्ते होते. मुलीला ऋतुप्राप्ती होण्याआधी (तिची पाळी सुरू होण्याआधी) जर तिचा विवाह केला नाही तर पित्याला नरकात जावे लागते. तिच्या विवाहास उशीर केला तर तिच्या प्रत्येक ऋतुकालाच्या वेळी त्याला भ्रूणहत्येचे पातक लागते, अशी भीती त्या ऋषींना घातल्याचेही वाचनात आले. म्हणजे ज्या मुली ब्रह्मवादिनी होण्याइतकी पात्रता सिद्ध करत होत्या त्या पुढे जाऊ नयेत म्हणून 7-8 वर्षाच्या होताच त्यांचे विवाह करण्याची प्रथा सुरू झाली.
बालविवाहाची ही प्रथा पार एकोणिसाव्या शतकापर्यंत चालू होती. मुलगी 8-9 वर्षाची झाली की तिचा विवाह करून टाकायचा आणि जबाबदारीतून मोकळे व्हायचे अशी वृत्ती होती. मग मुलीसाठी वर शोधताना तो लहान, म्हणजे तिच्या बरोबरीचा आहे की नाही हे न पाहता घर खातंपितं आहे ना, वयाचे काय मोठे, बिजवर असला तरी चालेल, खूप म्हातारासुद्धा पैशांच्या जोरावर 7-8 वर्षांच्या बालिकेशी लग्न करू शकत असे.
पण इंग्रजी राजवटीत शिक्षणाची सुरुवात झाली. तरुण मुले शिक्षण घेऊ लागली. शिक्षणाचा खूप प्रसार झाला. इंग्रजी शिक्षणामुळे तरुणांना नव्या जगाची ओळख झाली. आपल्या समाजाचा विचार त्यांना करावासा वाटू लागला. त्यातूनच स्त्रियांचे प्रश्न फार गंभीर आहेत, त्यांना गुलामगिरीत जगावे लागते आहे, त्यांच्यासाठी आपण काम करायला हवे ह्या उद्देशाने प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन समाजात अशा लोकांची ‘सुधारक’ म्हणून हेटाळणी होत असे. त्यांना प्रचंड विरोध सहन करावा लागत असे. पण तरीही प्रयत्न न सोडता स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, सती बंदी असे काम सुधारक करत होते. वैचारिक बदल कधी होईल आणि समाजातील कुप्रथा बंद होतील अशा भरवशावर न राहता कायदे कसे केले जातील ह्यावर भर दिला. संमती वयाचा कायदा बालविवाहास बंदी, सती बंदीचा कायदा, विधवा विवाहाला मान्यता, अशा सुधारणा कायद्याने करण्यात आल्या. एकोणिसाव्या शतकातील सुधारकांनी जे कार्य केले ते अजोड होते. त्यांच्यामुळेच आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मुलींचे विवाहाचे वय आता खूप जास्त असते.
पण आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य समजले जाते त्या कुटुंबव्यवस्थेची आजची स्थिती काय आहे? स्त्री करिअरच्या किंवा अर्थार्जनाच्या मागे लागल्यामुळे कुटुंबावर काही परिणाम होतोय का, हे देखील विचार करण्यासारखे आहे. 1960-65 पर्यंत एसएससी किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकर्या मिळत असत. 18 वर्षे पूर्ण झाली की सरकारी नोकरीसुद्धा मिळत असे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 अशी नोकरीची वेळ होती. शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी पूर्ण दिवस सुट्टी असे. त्यामुळे नोकरी करूनसुद्धा बायकांना घरासाठी वेळ देणे शक्य होते. एकत्र कुटुंबव्यवस्थेत मुलांना सांभाळायला कोण हा प्रश्न नसे.
पुढे मुली जास्त शिकू लागल्या. एकूणच समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले. कमीत कमी पदवीपर्यंत शिक्षण (ग्रॅज्युएट) असलेल्यांनाच नोकर्या मिळू लागल्या. शिक्षण पद्धतीत बदल झाल्यानेही कॉलेजचे शिक्षण आवश्यकच झाले. त्यामुळे आधी शिक्षण, मग नोकरी शोधणे आणि नंतर विवाह. आता तर मुलींची लग्नच 25 च्या नंतर होऊ लागली आहेत. सगळ्या मुलींना शिक्षणाची किंवा नोकरीची आवड असते असे नाही. कधी तरी वाटते पूर्वी जसा बालविवाह लादला जात होता तसा आज उशिरा विवाह लादला जातोय का? आवडो न आवडो, पदवीपर्यंतचे शिक्षण सामान्यपणे मुलींना आज घ्यावे लागते असे दिसते.
पदवी मिळाल्यावर लग्न ठरेपर्यंत नोकरी करू दे म्हणून महत् प्रयासाने मुलगी नोकरी मिळवते. मिळवत्या मुलीला वरांची जास्त पसंती असते. त्यामुळे नोकरी करणार्या मुलीचे लग्न त्यामानाने लवकर जमते. लग्नानंतर नोकरी सोडणे कठीण असते. कारण मिळवती असल्यानेच तिला पसंत केलेले असते.
स्त्री हा खरे तर कुटुंबाचा केंद्रबिंदू व आधार असतो. शिक्षण आणि त्यामुळे सर्व क्षेत्रांत मिळणार्या संधी यामुळे खरी स्त्री-पुरुष समानता आता निर्माण झाल्याचे दिसते आहे. पण निसर्गाने जी दोघांत असमानता किंवा विषमता म्हणूया, ठेवली आहे तिचे काय? स्त्रीला अबला म्हटले जाते. पण प्रत्यक्षात ती एक नवा जीव स्वत:च्या शरीरात जन्माला घालते, नऊ महिने पोटात वाढवते हे सामर्थ्य निसर्गाने तिला दिले आहे. वंश सातत्य राखण्याची, जबाबदारीच निसर्गाने स्त्रीवर टाकली आहे. त्यामुळे मुळात स्त्रीने स्वत:ला कमी लेखण्याचे कारण कधीच नव्हते. पण आजही जेव्हा नोकरी-व्यवसाय न करता फक्त संसार करणार्या स्त्रीला जर विचारले, ‘आपण काय करता?’ तर अपराधी स्वरात उत्तर येते ‘काही नाही. घरीच असते. ’खरे तर मी गृहिणी आहे, संसाराची सगळी जबाबदारी मी सांभाळते, अर्थार्जन माझा जोडीदार करतो’, असे उत्तर यायला हवे.
अशी संसाराची आवड असणार्या मुलींची लग्नं कोणत्या वयात व्हावीत? त्यांना शिक्षण द्यावे की नाही असा प्रश्न काही पालकांना पडत असेल. प्रत्येक मुलीला काही उच्च शिक्षण घेऊन करिअर करावे, किंवा दिवसाचे 8-10 तास बाहेर राहून नोकरी करावी असे वाटेल असे नाही. पण म्हणून 18 वर्षे पूर्ण होताच मुलीचे लग्न करून देण्याची घाई करू नये. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर तिला तिच्या आवडीचे काही तरी शिकायला प्रोत्साहित केले पाहिजे. त्यासाठी क्लासला वगैरे घालावे. 22 वर्षांची मुलगी शारीरिकदृष्ट्या विवाहासाठी योग्य आहे. प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रश्मी फडणवीस यांनी त्यांच्या पुस्तकात 22 ते 30 ह्या वयापर्यंत स्त्रीला गर्भधारणा झाली तर प्रसूतीपर्यंत अडचणी येण्याची शक्यता कमी असते, असे मत व्यक्त केले आहे. त्या म्हणतात, ‘16 ते 18 वयात मूल होणे स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही.’ ह्या वयात अंडकोशात बीज निर्माण होण्याची क्रिया सुरू होते, समागमानंतर ते फलित होणे ही गोष्ट निसर्गनियमानुसार आहे. पण ह्या काळात मुलीच्या शरीराची वाढ होत असते. गर्भधारणा झाल्यास तो सांभाळणे व नैसर्गिक प्रसूती होणे कठीण असते. त्याचप्रमाणे तीस वर्षांनंतर गर्भधारणा झाली तरी प्रसूतीत अडचणी येऊ शकतात.
नवा जीव धारणा करून त्याचे नऊ महिने पोषण करण्याइतके शरीर सक्षम असेल तेव्हा म्हणजे 22 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पण 30 वर्षे वयाच्या आत विवाह करणे शरीरशास्त्रानुसार योग्य ठरेल. पूर्वीचे बालविवाह जसे चुकीचे होते तसे आताचे 30-35 नंतर होणारे विवाहसुद्धा योग्य नाहीत. शिक्षण, करिअर, पैसा यामागे पळता पळता तिशी केव्हा उलटते ते समजत नाही. त्यामुळे विवाह करायचा असल्यास तो शारीरिकदृष्टया योग्य वयात व्हायला हवा. यात थोडा भविष्यकाळाचा विचारही आपोआप येतो. योग्यवेळी मूल झाले तर पती-पत्नी निवृत्त होईपर्यंत मुलांचे शिक्षण, नोकरीत स्थिरस्थावर होऊन त्यांची लग्ने वेळेवर होऊन पालकांना आपले कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान मिळते. अन्यथा उशिरा जन्मलेल्या मुलांचे सगळेच उशिरा होत जाते. शिक्षणासाठी काही वेळा आई किंवा वडील यांना निवृत्तीनंतरसुद्धा नोकरी करावी लागते.
मुलींच्या बाजूने थोडा विचार करू. काळाची गरज म्हणून मुलीला नोकरी करावी लागते. प्रत्येक मुलीला असे बाहेर जाऊन काम करणे जमेल, आवडेल असे नाही. त्यामुळे नोकरीला लावण्यापूर्वीच पालकांनी तिची इच्छा जाणून घ्यायला हवी. माझ्या नात्यात एक मुलगी आहे. तिने डाएटेशियन (आहारशास्त्रज्ञ) म्हणून पदवी मिळवली आणि सात-आठ वर्षे मुंबईतल्या नामवंत हॉस्पिटलांमध्ये डायटेशियन म्हणून नोकरी केली. हुशार असल्याने तिने दोन नोकर्याही बदलल्या. पगार अर्थात चांगला होता. पण दोन शिफ्टमध्ये काम करावे लागे. दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले. मग दुर्दैवाने तिचा छोटासा अपघात झाला, हात मोडला. तो बरा होईपर्यंत तिने रजा घेतली. घरात सासू-सासरे, नवर्याला चांगला पगार त्यामुळे तिच्या नोकरीवाचून अडणार नाही इतकी चांगली आर्थिक परिस्थिती आहे असे पाहून तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. कोणीच विरोध केला नाही. कारण तिला अनेक गोष्टी येतात. स्वयंपाकाची आवड आहे. शोभेच्या वस्तू, मेंदी काढणे यात ती तरबेज आहे. त्यामुळे घरात बसून तिने आपल्या आवडींना गेल्या दोन वर्षांत दिशा दिली. नुकताच तिनं एका प्रदर्शनात भाग घेतला होता. तिने तयार केलेल्या वस्तू हातोहात विकल्या गेल्या. यापुढे आपण शोभेच्या वस्तू तयार करून विकण्यातच व्यवसाय करणार, प्रदर्शनात भाग घेणार, ओरिगामी व पेपर क्विलिंगचे क्लासेस घेणार (जे तिने आधीच सुरू केलेत) असे ठरवून टाकले. यातून एक दिसते की तिला आपल्याला खरी आवड कोणती आहे हे शोधायला शिक्षण आणि नोकरीच्या धबडग्यात सवडच मिळाली नाही. हात मोडल्यानंतर रजेच्या काळात तिच्या लक्षात आले की आपल्याला घरात कामे करायला, माणसाची ऊठबस करायला आवडते आहे. संसार करता करता जे छंद जपता येतील त्यातून मी काही तरी करू शकेन आणि मुख्य म्हणजे नवर्यासमोर नोकरी सोडण्याचा प्रस्ताव ती आत्मविश्वासाने ठेवू शकली हे महत्त्वाचे.
स्त्री कुटुंबाचा केंद्रबिंदू आणि आधार आहे असे म्हणताना ती घरासाठी, कुटुंबासाठी किती करू शकते हे महत्त्वाचे आहे. पेरावे ते उगवते ह्या न्यायाने संसारातही सुख-दु:ख वाट्याला येतात. आता एक किंवा दोन मुले असतात. आई-बापांची स्वाभाविक अपेक्षा असते की म्हातारपणी मुलांबरोबर राहावे, नातवंडांना वळण लावावे, आपले दुखले- खुपले तर मुलांनी आपली काळजी घ्यावी, जमेल तसे आणि जमेल तितिकच काम करून सुनेला मदत करावी. पण प्रत्यक्षात काय दिसते? मुले, शहरात जागा लहान ह्या कारणामुळे लग्न होताच स्वत:ची स्वतंत्र जागा घेऊन वेगळी होतात. आईवडील एकटे राहतात. मुले लांबून त्यांची काळजी घेतात, आर्थिक भारही उचलतात. पण शारिरीकदृष्ट्या कार्यक्षम राहण्यासाठी मात्र आईबापांना स्वत:च काळजी घ्यावी लागते.
मुलाच्या छोट्या कुटुंबात काही सगळे ‘ऑल वेल’ नसते. मुलाला पाळणाघरात किंवा नोकरांवर सोडून आई दिवसभर बाहेर नोकरी करते. मुलांच्या आरोग्याकडे, शिक्षणाकडे लक्ष द्यायला कसा वेळ मिळणार? त्यामुळे पूर्ण वेळाची नोकरी न करता नवर्याच्या पगारात घरखर्चाचे गणित मांडून फावल्या वेळात स्त्रिया काम करू शकतील. मुलीचे लग्न तेवीस-चोविसाव्या वर्षी केले तर ते योग्य ठरेल. कितीतरी मुलींना जशी नोकरीची आवड नसते तशी बर्याच तरुणांना बायकोने नोकरी करणे मनापासून आवडत नाही असेही असते. पण नोकरी असली तर सोडायला कसे सांगणार? कारण काळ व्यक्तिस्वातंत्र्याचा आहे. शिवाय तिने आर्थिक स्वातंत्र्य उपभोगले आहे माझ्या एकट्याच्या पगारात ती भागवू शकेल का? तिची खर्चिक राहणी परवडेल का? असे प्रश्न तरुणांनाही असतील. मुलींनी जर स्वत: म्हटले, ‘मी एकट्याच्या पगारात व्यवस्थित भागवीन. समाधानात राहीन, ‘तर हे घडू शकेल.
मग मुलींना शिकवायचे नाही का? तर ते चूक आहे. आजचा काळ व्यक्तीविकासाचा आहे. माहितीचा, ज्ञानाचा जणू स्फोट झाला आहे. त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण तर हवेच पण नंतरही मुलींनी आपली बौद्धिक पातळी वाढवत ठेवली पाहिजे. नोकरी व संसार यात मी फक्त संसार करणार आहे, माझे कार्यक्षेत्र फक्त चूल आणि मूल आहे, मला काय करायचे आहे. बौद्धिक पातळी वगैरे? असे म्हणून चालणार नाही. कारण ही दोन क्षेत्रंसुद्धा आता खूप विस्तारली आहेत. वैयक्तिक विकास झाला तरच कुटुंबाला तिचा खरा आधार वाटेल. चूल म्हणजे एका अर्थाने घरातल्या सदस्यांचे आरोग्य. मुलांच्या वाढीसाठी, तसेच नवर्याच्या व स्वत:च्या आरोग्यासाठी आहाराची योजना जाणीवपूर्वक पण बजेटमध्ये बसेल अशाप्रकारे करण्याचे कसब तिला मिळवावे लागेल. मुलांचे शिक्षण, निदान शालेय शिक्षण आता खूप गुंतागुंतीचे झाले आहे. पण तक्रार न करत, न चिडता त्यांना प्रोजेक्ट, अभ्यास यात मनापासून मदत करावी लागते. पालक सभांना जाऊन शंकांचे निरसन व मुलांच्या प्रगतीची, तक्रारीची माहिती घ्यावी लागते. मुले इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर जुजबी ज्ञान असून भागणार नाही. प्रयत्नपूर्वक इंग्रजी सुधारावे लागेल. तरच मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देता येईल. अन्यथा त्याच्या शिकवणीवर खर्च करावा लागेल. पैसा वाचवणे म्हणजे पैसा मिळवणे. नोकरी न करणार्या मुलींनी शिकवण्यांवरचा खर्च वाचवायला हवा. पुरुषाने चरितार्थासाठी अर्थार्जन करावे आणि स्त्रीने मुलांना जन्म देऊन मुलांचे पालनपोषण, घराचे व्यवस्थापन करावे. मग स्त्रियांनी नोकर्या करायच्याच नाही का? असे मुळीच येथे अभिप्रेत नाही. पण सरसकट नोकरी करण्याचे बंधन लादले जाऊ नये एवढेच सुचवायचे आहे. नोकर्या करणार्या स्त्रिया घर आणि कार्यालय यांचा उत्तम मेळ घालत असतील आणि मुलांना वेळ देऊ शकत असतील तर प्रश्न येणार नाही. संयुक्त कुटुंबात आजी-आजोबा मुलांना वेळ देत असत, त्यांच्याकडे लक्ष ठेवत असत. मुलांना संरक्षण आणि माया दोन्ही मिळे. पण जर वेगळा, स्वतंत्र संसार करायचा असेल तर पालकांवरची जबाबदारी वाढते. पैसा टाकला म्हणजे सगळ्या गोष्टी मिळतात असे नाही. पण विश्वासातली माणसे नेमणे, जातीने त्यांच्यावर लक्ष ठेवणे, मुलांना वेळेवर जेवणखाण मिळतय की नाही पहाणे, त्यांच्या अभ्यासावर लक्ष देणे, निदान अधूनमधून शाळेच्या व शिकवणीच्या शिक्षकांना भेटून त्यांच्या अडचणी सोडवणे मुख्य म्हणजे मुले सुरक्षित राहताहेत ना, त्यांना वाईट संगत तर लागत नाही ना, याची काळजी घेणे, हे सगळे नोकरी करणार्या स्त्रियांना पाहावे लागते.
ह्याउलट आपला संसार सांभाळून फावल्या वेळात काही तरी करू पाहणारी स्त्री मुलांना जबाबदार नागरिक बनवते. तिचे हे योगदान कुटुंबासाठी जितके महत्त्वाचे आहे तितकचे समाजासाठीही मोठे आहे. त्यामुळे वाटते करिअरच्या मागे न धावता वेळेवर म्हणजे 22 किंवा 23 व्या वर्षी मुलीचे लग्न व्हावे. आता मात्र कोणत्याच कायद्याची आवश्यकता नाही. जसजसा काळ पुढे जाईल लोकांना अनुभव येतील, तसे आपोआप वैचारिक बदल होतील. सध्या दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमांत एकत्र कुटुंबावरील मालिका दाखवितात. काय सांगावे, पुन्हा एकदा एकत्र कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व आणि फायदे समाजाला पटतील आणि एकत्र कुटुंब म्हणजे, अर्थात, आईवडील व मुलगा, सून, नातवंडं एकत्र येतीलही.