पिंजोर!
पंजाबच्या भाटिंडा जिल्ह्यातलं एक खेडेगाव. मात्र हे खेडं व्यावसायिक जगात भारतभर प्रसिद्ध आहे. कारण एचएमटी ऊर्फ हिंदुस्थान मशिन टुल्सचा कारखाना पिंजोरला आहे. मनगटी घड्याळे बनवण्यासाठी एचएमटी प्रसिद्ध आहेच. त्याशिवाय ह्या कंपनीत औद्योगिक उत्पादनांसाठी लागणारी वेगवेगळी मशिन्स आणि उपकरणं बनवली जातात. देशभरात एचएमटीच्या यंत्राशिवाय औद्योगिक क्षेत्रातलं पान हलत नाही. ह्या कारखान्यामुळे पिंजोर ह्या पंजाबातल्या खेड्याचं नावही देशात सर्वत्र माहीत झालेलं आहे.
खुद्द पिंजोरच्या रहिवाशांना मात्र एचएमटीच्या कारखान्याचं फारसं सोयरसुतक नाही. एकतर कारखाना आणि त्याची कर्मचारी वसाहत ही पन्नास चौरस किलोमीटरच्या अवाढव्य परिसरात पसरली आहे. कर्मचार्यांच्या दूध, भाजीपाल्यापासून ते अगदी शाळा कॉलेजपर्यंतच्या गरजा वसाहतीतच पूर्ण होतात. त्यामुळे पिंजोरच्या रहिवाशांशी कारखान्याच्या कर्मचार्यांचा तसा कधीच संबंध येत नाही. दुसरं कारण म्हणजे पिंजोरच्या एचएमटीत पार बंगाल, केरळपासून आलेले कर्मचारी आहेत, पण खुद्द पिंजोरचा मात्र एकही माणूस त्यात कामाला नाहीये. पिंजोरच्या रहिवाशांना तशी गरजच नाहिये. सारेजण सधन पंजाबी शेतकरी आहेत. पंजाबची सुपीक भूमी दरवर्षी भरभरून दान त्यांच्या पदरात टाकतेय. त्यामुळे त्यांना कुणाची गुलामगिरी करण्याची गरज वाटत नाही. पिंजोरचे तरुण नोकरी करतच नाहीत, असेे मात्र नाही. पिंजोरचे अनेक तरुण नोकरी करतात, पण सारेजण एकजात सैन्यात! एकतर घरी बसून शेती करावी किंवा सैन्यात मर्दुमकी गाजवावी. ह्यापेक्षा वेगळा विचार पिंजोरच्या रांगड्या माणसांना भावत नाही.
नाही म्हणायला पिंजोरमध्ये दोन-चार धाबे आणि काही ट्रक दुरुस्तीची गॅरेजेस मात्र आहेत. एचएमटीच्या कारखान्यात देशभरातून ट्रक्स येतात आणि रवाना होतात. कधी ह्या ट्रक्समध्ये छोटा-मोठा बिघाड होतो. त्याच्या दुरुस्तीसाठी पिंजोरमध्ये चार गॅरेजेस उभी आहेत आणि ह्याच ट्रक्सच्या ड्रायव्हर क्लीनरच्या जेवणाच्या सोयीसाठी काही धाबेही. पिंजोरचा कुठलाच रहिवासी ह्या धाब्याच्या किंवा गॅरेजच्या उत्पन्नावर अवलंबून नाही.
सरदार बलदेवसिंगांचंही तसंच होतं. त्यांची घरची भरपूर शेतीवाडी होती. गावात दुमजली घर होतं. एकुलता एक मुलगा गुरमुखसिंग हौसेनं सैन्यात नोकरी करत होता. घरात सून होती. खेळवायला नातवंड मात्र नव्हतं. म्हणून बलदेवसिंगांनी एचएमटीकडे जाणार्या रस्त्यावर एक गॅरेज सुरू केलं होतं. सैन्यातल्या नोकरीसारखाच ट्रक चालवणं हाही सरदारजींचा रक्तातला गुण. बलदेवसिंगांनी तरुणपणी लुधियानात गॅरेजमध्ये काम केलं होतं. त्यामुळे त्यांना ट्रक दुरुस्तीची पुष्कळशी माहिती होतीच. शिवाय त्यांनी मनजितसिंग नावाच्या एका तरण्याबांड हुशार मेकॅनिकला नोकरीला ठेवलं होतं. दोघं जण मिळून गॅरेज व्यवस्थित चालवत असत.
मनजितसिंग शिवाय अजून एक व्यक्ती सरदार बलदेवसिंगांच्या गॅरेजमध्ये होती. त्याचं नाव कोणालाच माहीत नव्हतं. सगळे जण त्याला म्हणायचे-बुढ्ढा! हा बुढ्ढा एक म्हातारा सरदारजी होता. त्याचं नाव, गाव, पत्ता, तो कुठून आला हे कुणालाच माहीत नव्हतं. त्याचं सारं आयुष्य ट्रकवर क्लीनर म्हणून गेलं होतं. त्यालाही ट्रक दुरुस्तीची जुजबी माहिती होती. म्हणून बलदेवसिंगांनी त्यालाही गॅरेजमध्ये ठेवून घेतलं होतं. बुढ्ढा गॅरेजमध्ये आश्रयाला राहायचा. पडेल ते आणि झेपेल ते काम करायचा. त्याचे आणि मनजितचे जेवण बलदेवसिंगांच्या हवेलीवरून यायचं. रात्री दोघंही खाटा टाकून गॅरेजमध्येच झोपायचे. रात्री बलदेवसिंग गावात झोपायला जात असत. ह्या दोघांमुळे आपोआच गॅरेजची राखणही होत असे.
अशा तर्हेने सरदार बलदेवसिंगांचं गॅरेज व्यवस्थित चालू होतं. 22 फेब्रुवारी 1988 ह्या दिवशी दिवसभरात विशेष काहीच घडलं नाही. चार-दोन ट्रक दुरूस्तीला आले. मनजितने त्यांची जुजबी दुरुस्ती करून दिली आणि दिवस संपला. ते थंडीचे दिवस असल्यामुळे दिवस लवकर मावळत असे. त्यामुळे बलदेवसिंगांची सून संध्याकाळीच कुणा नोकराकरवी मनजित आणि बुढ्ढ्याचं जेवण पाठवून देत असे. आजही तसंच जेवण आलं.
मनजित आणि बुढ्ढ्या नोकराने हातपाय धुतले. लवकर जेवण आटोपून घ्यायचं होतं, कारण बलदेवसिंग जेवणाची भांडी घेऊनच गावात परतणार होते. त्यादिवशी अतिशय थंडी होती. धुकंही संध्याकाळी चार वाजल्यापासूनच पडलं होतं. मनजितचे हात ग्रीसने आणि ऑईलने लडबडले होते. धुण्यासाठी गार पाण्यात हात घालायला मनजितला नकोसं वाटत होतं. म्हणून त्याने एक टायरचा तुकडा जाळून पाणी गरम केलं. स्वच्छ हातपाय धुतले. नंतर तो आणि बुढ्ढा नोकर जेवायला बसले.
जेवणाचा रिकामा डबा घेऊन बलदेवसिंग जायला निघाले तोच एक डंपर येऊन त्यांच्या गॅरेजसमोर उभा राहिला. हा डंपर दहा टायरवाला काँक्रीटचा डंपर होता. दहा टायर्सचा डंपर गॅरेजसमोर आलेला बघून बलदेवसिंग थबकले. डंपरची दुरुस्ती म्हणजे मोठे काम! म्हणजेच पैसेही चांगले मिळणार. त्यांनी पुढे येऊन चौकशी केली. डंपरच्या ड्रायव्हरने सांगितले, एचएमटी कंपनीत एक तेहतीस मीटर उंचीची गोल टाकी बांधायचं काम चालू आहे. हा डंपर त्या कामावरचा आहे. खडी, रेती आणि सिमेंट आणि पाणी ह्या डंपरच्या भांड्यात ओतले की डंपरचे भांडे गोल गोल फिरतं. त्यामुळे काँक्रिटचं मिश्रण घुसळून एकजीव होते. मग हे मिश्रण काँक्रिटच्या लिफ्टच्या ट्रेमध्ये ओतलं जातं. तिथून ते वर जातं.
ड्रायव्हरने सांगितलं की, संध्याकाळपर्यंत डंपर व्यवस्थित चालू होता पण शेवटच्या चार फेर्यांना मात्र त्याने खूपच त्रास दिला. डंपर चालूच होत नव्हता. खूप अॅक्सेलेटर दिल्यावर थोडासा चालू व्हायचा आणि नंतर मधेच गिअरमध्ये बंद पडायचा. काहीही करून आजच्या रात्रीतून डंपर चालू करून द्या. नाहीतर उद्या टाकीचे बांधकाम बंद ठेवावे लागेल. पैशाची काळजी करू नका पण उद्या डंपर चालू झाला पाहिजे. डंपरच्या ड्रायव्हरने सरदार बलदेवसिंगना कळवळून सांगितलं.
बलदेवसिंग आणि मनजितसिंग दोघंही डंपरच्या खाली घुसले. थोडे निरीक्षण केल्यावर त्यांना लगेच नादुरुतीचे कारणही समजलं. डंपरखाली झोपून बलदेवसिंगांनी आवाज दिला,
‘ओय बुढ्ढे! जरा खिंसट देना तो!’
खिंसट म्हणजे लांब स्क्रू-ड्रायव्हर!
डंपरच्या इंजिनमध्ये आणि कॉर्बोरेटरवर काँक्रिटचे शिंतोडे उडाले होते. इतके की काही ठिकाणी इंजिनमध्ये सिमेंटचा थरच साठला होता. त्यामुळेच डंपरचं इंजिन स्पार्क होत नव्हतं. बलदेवसिंगांनी दोन फूट लांबीचा खिंसट घेऊन ते काँक्रिट साफ करायला सुरुवात केली. पण थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आलं की ह्या साध्या खिंसटने होण्यासारखं ते काम नाहीये. त्यासाठी दोन फुटापेक्षा लांब आणि अधिक मजबूत, खिंसट हवा होता. डंपरच्या इंजिनात चिकटलेला काँक्रिटचा थर तसाच जाड आणि कडक होता.
डंपरच्या नादुरुस्तीचं कारण तर समजलं होतं. पण तो दुरुस्त करण्यासाठी मजबूत खिंसटची गरज होती आणि तो तर त्यांच्या गॅरेजमध्ये नव्हता. इतर कुणाच्या गॅरेजमध्ये असण्याचीही शक्यता नव्हती. साधारणत: दोन फूट लांबीचा स्क्रू ड्रायव्हर इंजिनच्या कुठल्याही भागात पोहोचू शकतो. तसेच जिथे मेकॅनिकचा हात किंवा बोटे पोहोचू शकत नाहीत तिथला कचरा, गंज वगैरेही तो साफ करू शकतो.
डंपरचा ड्रायव्हर सारखा लवकर डंपर दुरूस्त करण्याची विनंती करत होता. बलदेवसिंगांना एक विचार सुचला. त्यांनी डंपरच्या ड्रायव्हरला सांगितले, ‘उद्या सकाळी तुमचा डंपर चालू झालेला असेल. तुम्ही निश्चिंतपणे जा.’ त्यांच्या आश्वासनावर विसंबून डंपरचा ड्रायव्हर एचएमटीत गेला. तो गेल्यावर बलदेवसिंगांनी गॅरेजमधल्या अडगळीच्या सामानातून एक तीन फूट लांबीची जाड लोखंडी सळई शोधून काढली. ती सळई मनजितच्या हातात देत ते म्हणाले, ‘मनजित, ऐक, ही सळई घेऊन हायवेवर जा. तिथून कुठल्यातरी ट्रकमध्ये बसून नौशेर्याला जा. एखादा लोहार गाठ आणि या सळईच्या एका टोकाला स्क्रू ड्रायव्हरसारखा पसरट आकार दे आणि ताबडतोब परत ये.’ मनजितने मान डोलवली. पण तो म्हणाला, ‘पण परत आल्यावर मला एकट्याला हे काम जमेल असं वाटत नाही. तुमची गरज लागेलच.’ त्यावर बलदेवसिंग म्हणाले, ‘मी इथेच आहे. आज रात्री मी घरी जातच नाहीये. सुनेला तसा फोन करतो. तू मात्र लवकर परत ये. काम झाल्यावर मला फोन कर.’ बलदेवसिंगांचं बोलणं ऐकून मनजितच्या चेहर्यावर हसू पसरले. पुढे ते त्याला म्हणाले. ‘नमुन्यासाठी हा छोटा खिंसट बरोबर घेऊन जा.’ मनजितने छोटा खिंसट आणि ती सळई घेतली आणि तो हायवेकडे निघाला. मनजित गेला त्याला दोन तास झाले. सरदार बलदेवसिंग गॅरेजमधल्या एकमेव खुर्चीवर बसून पेंगत होते. बुढ्ढा नोकर उशाला ट्रकच्या ट्युबची उशी घेऊन झोपला होता. बलदेवसिंग आतुरतेने मनजितच्या फोनची वाट बघत होते. अडलेल्या डंपरवाल्याकडून त्यांना रात्रीतून डंपर दुरुस्त करून द्यायचे हजार रुपये ठरवले होतोे. मनजितचे खिंसटचं काम जेवढ्या लवकर होणार होतं तेवढं ते लवकर चिंतामुक्त होणार होते.
पिंजोरपासून नौशेरा तसं लांबही नव्हतं. जेमतेम बारा किलोमीटर! तेव्हा एव्हाना मनजितचं काम झालेले असायला हवं होतं. इतक्यात गॅरेजमधला फोन घणघणला. दोन लहान रिंगा वाजल्या. बुढ्ढ्याची झोप थोडीशी चाळवली. बलदेवसिंगांनी झडप घालून फोन उचलला आणि फोनवरून पलीकडच्या माणसाचा आवाज ऐकू आला. बलदेवसिंगांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. एक विलक्षण संवेदना त्यांच्या शरीरभर झंकारली. विलक्षण आश्चर्याने आणि आनंदातिरेकाने ते ओरडले, ‘ओये! तूऽऽऽ?’
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
सरदार बलदेवसिंग ह्यांच्या हवेलीत त्यांची सून हरविंदर कौर एकटीच होती. थोड्या वेळापूर्वीच तिच्या सासर्यांचा फोन येऊन गेला होता. त्यांनी तिला त्यांच्यासाठी जेवायला न थांबायला सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर आज रात्री ते गॅरेजमध्ये एकटेच झोपणार असल्याचंही कळवलं होतं. हरविंदर कौरने तिचं जेवण आटोपलं. हवेलीच्या सर्व दारांच्या कड्या नीट लावल्यात की नाही ते तपासलं. विशेषत: मागच्या दाराची, कारण तिकडून चोर येण्याची शक्यता जास्त होती. मग तिने आपलं अंथरूण टाकलं. दोन ब्लँकेट्स एकमेकांना जुळवून पांघरण्यासाठी घेतली आणि अंथरूणावर पाठ टेकली. नेमका त्याच वेळेला हवेलीतला फोन खणखणला. दोन लहान रिंगा वाजल्या. हरविंदर कौरने फोन उचलला. पलीकडच्या माणसाचा आवाज ऐकून आश्चयाने तिचे डोळे विस्फारले. एक विलक्षण संवेदना तिच्या सर्वांगावर झंकारली. विलक्षण आश्चर्याने आणि आनंदाच्या अतिरेकाने ती ओरडली, ‘ओये! तूऽऽऽ!’
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
मध्यरात्र टळून गेली होती. पिंजोरच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जसबीरसिंग बसले होते. अंगात एकावर एक दोन स्वेटर्स चढवूनही थंडी कमी होत नव्हती. जसबीरसिंग अधूनमधून हातावर हात घासून उब निर्माण करायचा प्रयत्न करत होते. ‘ड्युटीवर नसतो तर मस्तपैकी चार ब्लँकेट अंगावर घेऊन घरी झोपलो असतो.’ ते मनाशी पुटपुटत होते. अचानक त्यांच्या टेबलावरचा फोन खणखणला. ‘एवढ्या रात्री कोणाचे पोलीस स्टेशनात काम निघाले!’ असा विचार करत त्यांनी अनिच्छेने फोन उचलला आणि समोरच्या माणसाने जे सांगितलं ते ऐकून त्यांचेे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. पलीकडच्या माणसाने फक्त एकच वाक्य सांगितलं आणि फोन कट केला. त्याने आपले नाव, पत्ता काहीच सांगितलं नाही. जसबीरसिंगांनी फोन कट झाल्याचा आवाज ऐकला आणि ते रिसिव्हरमध्ये ओरडले, ‘ओये! तूऽऽ!’
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
जीवाभावाची व्यक्ती अनेक वर्षांनी भेटली होती. सरदार बलदेवसिंगांना खूप आनंद झाला होता. किती बोलू आणि किती नको असे त्यांना झाले होते. समोरची व्यक्तीही सुरुवातीला त्यांच्या बोलण्याला भरभरून प्रतिसाद देत होती. गप्पांचा पहिला बहर ओसरला आणि ती व्यक्ती चुळबुळ करू लागली.
थोड्या वेळाने ही गोष्ट बलदेवसिंगांच्या लक्षात आली.
त्या व्यक्तीच्या अस्वस्थेमागचं कारण ते समजू शकत होते. त्यात काही वावगंही नव्हतं. म्हणून मग सरदार बलदेवसिंगांनी प्रेमभराने त्या व्यक्तीला निरोप दिला. त्यांचा निरोप घेऊन ती व्यक्ती निघाली. जाताना बुढ्ढ्या नोकराच्या खाटेला तिचा थोडासा धक्का लागला. काही काळासाठी बुढ्ढ्याची झोप थोडीशी चाळवली. ती व्यक्ती गेल्यावर बलदेवसिंग परत त्या खुर्चीत बसले. ती व्यक्ती नुकतीच भेटून गेल्यामुळे आता लगेच झोप येणं शक्य नव्हतंच. पण ते उगीच डोळे मिटून बसले. अर्ध्या तासाने त्यांना परत गॅरेजसमोर धडपड ऐकू आली. बलदेवसिंग साशंक मनाने उठले आणि बाहेर आले. आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. थोड्या वेळापूर्वी त्यांचा निरोप घेऊन गेलेली तीच व्यक्ती परत आली होती. त्या व्यक्तीची आत्ताची अवस्था बघून बलदेवसिंगांच्या काळजाचा ठोका चुकला. त्या व्यक्तीच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते आणि ती धापा टाकत होती.
‘वाहिगुरू!!’ ते ओरडले, ‘कि गल है?’ आणि त्या व्यक्तीला आधार देण्यासाठी ते पुढे धावले.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
जीवाभावाची व्यक्ती अनेक महिन्यांनी भेटली होती.
हरविंदर कौरला खूप आनंद झाला होता. किती बोलू नि किती नको, आलेल्या व्यक्तीला कुठे ठेवू नि कुठे नको, असं तिला झालं होतं. समोरची व्यक्तीही तिच्या बोलण्याला, वागण्याला भरभरून प्रतिसाद देत होती. प्रेमाचा पहिला बहर ओसरला. ती व्यक्ती थोडीशी अस्वस्थ झाली. जाण्यासाठी चुळबुळ करू लागली. पण हरविंदर तिला एवढ्यात सोडणार नव्हती. हरविंदरने त्या व्यक्तीला परत एकदा आपल्या मोहपाशात गुंतवलं आणि धुंद केलं. प्रेमाचा दुसरा बहर ओसरला आणि ती व्यक्ती अधिकच अस्वस्थ झाली. तिच्या अस्वस्थतेमागचं कारण हरविंदरही समजू शकत होती. त्यात वावगे काहीच नव्हते. हरविंदरने त्या व्यक्तीला निरोप दिला. हरविंदरचा निरोप घेऊन ती व्यक्ती निघाली. हरविंदर झोपण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली. नुकतीच ती व्यक्ती भेटून गेल्यामुळे झोप लागणे शक्यच नव्हतं.
काही मिनिटांतच हरविंदरला हवेलीच्या मागच्या दरवाजात धडपड ऐकू आली. साशंक मनाने हरविंदर उठली आणि मागच्या दारात आली. तिने दार उघडलं. समोर बघितले आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. काही मिनिटांपूर्वी तिचा निरोप घेऊन गेलेली व्यक्ती परत आली होती. पण तिची आत्ताची अवस्था बघवत नव्हती. ती व्यक्ती रक्ताने उभी न्हाली होती. तिची पावलं कशीतरी लडखडत पडत होती.
‘वाहिगुरू!!’ हरविंदर ओरडली, ‘कि गल है?’ आणि ती त्या व्यक्तीला आधार देण्यासाठी पुढे धावली.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
समोरचा माणूस सांगतोय त्यावर विश्वास ठेवावा का? बलदेवसिंगांसमोर मोठा प्रश्न पडला होता. त्यांच्या माहितीनुसार शक्यतेच्या कोटीत ते बसत नव्हतं. पण समोरचा माणूस उगीचच खोटं बोलेल हेही शक्य नव्हतं. काय घडलं असेल ते असो. आता निदान समोरच्या माणसाला वाचवण्यासाठी धडपड करणं अत्यावश्यक होतं. बलदेवसिंग एक क्षणही न दवडता त्या तयारीला लागले.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
समोरचा माणूस सांगतोय त्यावर विश्वास ठेवणे हरविंदला कठीण जात होतं. असं घडू शकतं? कसे शक्य आहे ते? तिच्यापुढे मोठाच प्रश्न पडला होता. पण समोरची रक्ताच्या थारोळ्यात तडफडणारी व्यक्ती उगीचच खोटं कशाला बोलेल हेही शक्य नव्हतं.
काय असेल ते असो. निदान ह्या व्यक्तीला तरी वाचवू या, असा तिने विचार केला. एक क्षणही न दवडता हरविंदर त्या खटपटीला लागली.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
एक क्षणही न दवडता हालचाल करणं आवश्यक होतं. तरीही जसबीरसिंग काही वेळ विचारच करत बसले. थोड्या वेळापूर्वी फोन करणार्या माणसावर विश्वास ठेवावा का? त्याने सांगितंलं ते खरं असेल? कुणा एका मूर्ख माणसाच्या निनावी फोनवर विसंबून आपण एवढ्या थंडीत इतक्या दूरवर जायचं? फोन खोटा असेल तर सारी धडपड व्यर्थ जाईल. पण फोन खरा असेल तर? जसबीरसिंगाच्या काळजाचा ठोका क्षणभर चुकला. फोन करणार्याचा आवाज अजूनही त्यांच्या कानात घुमत होता, त्याच्या सांगण्यातली आर्तता, भीती, तगमग त्यांना फोनवरूनही जाणवली होती.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
जायचं! जसबीरसिंगांनी निर्णय घेतला.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
जायचं! बलदेवसिंगांनी निर्णय घेतला. त्याशिवाय दुसरा इलाज नव्हता.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
‘मी खून केलेला नाहीये.’ हरविंदर परत परत तेच सांगत होती. पण तिच्या पायजमा-कुर्त्यावरचे रक्ताचे डाग तिच्या म्हणण्याला पुष्टी देत नव्हते.
सरदार बलदेवसिंगांच्या हवेलीच्या मागच्या दारात त्यांचा गॅरेजमधला नोकर मनजितसिंग मरून पडला होता.
दोन फूट लांबीचा एक स्क्रू ड्रायव्हर त्याच्या डाव्या कानाजवळून मेंदूत शिरला होता. तो कवटी भेदून उजव्या कानाजवळून बाहेर आला होता. खुनाच्या वेळेला हरविंदर हवेलीत एकटीच होती. सरदार बलदेवसिंग त्या रात्री गॅरेजमध्येच थांबले होते. तेही रात्री बारा वाजेपर्यंतच!
बुढ्ढा नोकर सांगत होता की, रात्री बारा वाजता त्याला बलदेवसिंगांनी झोपेतून उठवलं आणि सांगितलं, ‘मनजित खिंसट आणायला गेलाय त्याचा अजून पत्ता नाहीये. तेव्हा आता मीच नौशेर्याला जातो आणि माझ्या एका गॅरेजवाल्या नातेवाईकाकडून खिंसट घेऊन येतो. सकाळी डंपर दुरुस्त करून द्यायचाय. तेव्हा आत्ताच हालचाल करणं भाग आहे. तू नीट सावध झोप.’
एवढं सांगून बलदेवसिंग रात्रीच नौशेर्याला एकटेच निघून गेले. ते अजूनही परतले नव्हते.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
एकूण सर्व परिस्थिती पाहून आणि हरविंदरच्या कुर्त्यावरचे डाग पाहून खून हरविंदरनेच केलाय, ह्याची जसबीरसिंगांना खात्री पटली. ‘या बाईंना अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन चला.’ त्यांनी महिला कॉन्स्टेबलला हुकूम सोडला. ‘मी खून केलेला नाहीये.’ हरविंदर रडत-रडत सांगत होती. तरीही तिला अटक करावीच लागली. दुसरा इलाजच नव्हता.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
सकाळी आठ वाजता बलदेवसिंग परत आले. त्यांच्याबरोबर नौशेर्याच्या त्यांच्या मामाचा मुलगाही होता. तोही नौशेर्यात गॅरेज चालवत असे. त्यांच्याजवळ चार फुटाचा पहारीपासून बनवलेला एक खास खिंसट होता. डंपरचे काम झाल्यावर मामाचा मुलगा तो खिंसट लगेच परत घेऊन जाणार होता. आपल्या हवेलीत खून झालाय हे ऐकून बलदेवसिंगांना चक्करच आली. त्यात तो खून मनजितचा झालाय आणि त्या प्रकरणात आपल्या सुनेला अटक झालीये, हे ऐकल्यावर ते कपाळाला हात लावून जमिनीवर बसले.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
नौशेर्याहून आलेल्या बलदेवसिंगांच्या मामेभावाचा विस्तृत जबाब इन्स्पेक्टर जसबीरसिंगांनी लिहून घेतला. बलदेवसिंगांच्या म्हणण्याची सत्यता त्यामुळे पटत होती. बुढ्ढ्या नोकराचाही जुजबी जबाब घेतला गेला. मनजितच्या पूर्वचारित्र्याची, त्याच्या इतिहासाची चौकशी सुरू झाली. जसबीरसिंगांच्या मते प्रकरण एकदम साधं होतं. हरविंदर घरात एकटी आहे हे मनजितला माहीत होतं, म्हणून तिच्यावर बलात्कार करण्यासाठी तो हवेलीत आला. हरविंदरने त्याला विरोध केला. दोघांची झटापटी झाली आणि त्यात मनजितचा खून झाला. अडचण फक्त एवढीच होती की हरविंदर हे कबूल करायला, तसा जबाब लिहून द्यायला तयार नव्हती.
‘एचएमटीच्या लेडी सोशल वेल्फेअर ऑफिसरना बोलवा.’ जसबीरसिंगांनी हुकूम दिला. ‘पिंजोर ग्रामीण पुलीस थाना’ची जीप एचएमटीच्या कारखान्याच्या आवारात शिरली.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
‘राज्यघटनेचं शंभरावं कलम असं आहे की…’ जसबीरसिंग एचएमटीच्या लेडी वेल्फेअर ऑफिसर श्रीमती अहलुवालियांना सांगत होते. ‘एखाद्या स्त्रीवर जर बलात्कार होत असेल तर तिला त्या बलात्कार करणार्या किंवा बलात्काराचा प्रयत्न करणार्या व्यक्तीला ठार मारण्याचा पूर्ण अधिकार असतो. जर एखाद्या व्यक्तीवर त्याला कोणी जीवे मारण्यासाठी हल्ला चढवला तर त्या व्यक्तीला जसा हल्ला करणार्याला मारायचा अधिकार आहे, तसेच हे आहे. ‘मी त्याला मारले नसते तर त्याने माझा खून केला असता.’ अशा परिस्थितीत केलेला खूनही क्षम्य असतो. तसेच बेसावध स्थितीत अब्रुवर घाला घालायचा प्रयत्न करणार्या पुरुषाला ठार मारायचा अधिकार प्रत्येक स्त्रीला असतो.
ही गोष्ट तुम्ही या हरविंदर कौरला नीट समजावून सांगा. आमच्या महिला कॉन्स्टेबलला बघून ती घाबरतेय. त्यात ती अशिक्षित असल्यामुळेही प्रश्न निर्माण झालाय. तेव्हा तुम्ही तिच्या पातळीवर जाऊन तिला हे नीट समजवा.’ जसबीरसिंगांनी कळकळीची विनंती केली. श्रीमती अहलुवालियांनी हसून मान डोलावली. एचएमटीच्या वेल्फेअर ऑफिसर म्हणून अशा अनेक केसेस हाताळायचा त्यांना चांगलाच अनुभव होता.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
हरविंदरने हवा तसा जबाब दिला. ‘बलात्काराचा प्रयत्न आणि म्हणून खून!!’ जसबीरसिंगांनी शेरा मारला. वरिष्ठांना तसं कळवलं आणि फाइल बंद केली.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
त्या दिवसापासून बलदेवसिंग नेहमी अस्वस्थ असायचे. दिवसातला बराचसा वेळ ते गॅरेजमध्येच काढायचे. त्यांचा स्वभावही हल्ली फार चिडचिडा झाला होता. राग काढायला आता मनजितही समोर नव्हता. त्यामुळे सगळा राग बुढ्ढ्या नोकरावर निघायचा. दुरुस्तीला ट्रक यायचे तेव्हा मनजितसारखी पटापट मदत करणं बुढ्ढ्याला जमत नसे. मग बलदेवसिंग त्याच्यावर भडकायचे. जोराने ओरडायचे. म्हणायचे, ‘ओये बुढ्ढे! कहाँ मर गया तू? ओये बुढ्ढे! कहाँ मर गया तू? ओये बुढ्ढे खिंसट!!’ खिंसट शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे पार पिकलेला म्हातारा! म्हातारडा किंवा थेरडा!!
एक दिवस काही कारणावरून बलदेवसिंग बुढ्ढ्या नोकरावर फारच भडकले. इतके की त्याचं सगळं सामान गोळा करून त्यांनी गॅरेजबाहेर फेकून दिलं. पोक आलेल्या बुढ्ढ्या खिंसटने कंबरेपर्यंत वाढवलेली दाढी सांभाळत ते सामान गोळा केलं. अश्रुभरल्या डोळ्यांनी गॅरेजकडे एक नजर टाकली आणि तो तिथून निघाला. मात्र ट्रक पकडण्यासाठी हायवेवर जाण्याऐवजी तो कंबरेत वाकलेला म्हातारा पिंजोरच्या ग्रामीण पोलीस ठाण्याकडे निघाला.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
जसबीरसिंगांनी फक्त एकच फोन केला! आमेरला! अजमेरजवळच्या आमेर बॉर्डरवर बलदेवसिंगांचा मुलगा गुरूमुखसिंग तैनात होता. आणि त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली.
22 फेब्रुवारी 1988 च्या दिवशीच त्याची दोन महिन्यांची रजा मंजूर झाली होती. घरातल्यांना आनंदाचा धक्का द्यावा म्हणून तो घरी काहीही न कळवता त्याच दिवशी तिथून निघालाही होता. पण तो लगेच तिसर्या दिवशी परत आला होता. कारण त्याने घरात न कळवल्यामुळे त्याच्या घरातले सारेजण अमृतसरला गेले होते. त्यामुळे तो परत आला होता. आल्यावर त्याने रजा रद्द केली आणि आता तो व्यवस्थित नोकरी करत होता. मग जसबीरसिंगांनी नौशेर्याला बलदेवसिंगांच्या मामाकडे परत कसून चौकशी केली. 22 फेब्रुवारी 1988 च्या रात्री खिंसट मागण्यासाठी बलदेवसिंग नेमके किती वाजता आले होते ते शोधून काढले. त्यांच्या मामेभावाने सांगितलं ती पहाटेची वेळ होती. आणि एक वेगळाच घटनाक्रम जसबीरसिंगांसमोर उलगडू लागला.
हरविंदर कौरच्या रूमची कसून झडती घेण्यात आली. त्यात मनजितने तिला लिहिलेली एक चार ओळींची चिठ्ठी मिळाली. गॅरेजमधल्या बिलबुकात मनजितचे गुरूमुखी (पंजाबी) भाषेतले हस्ताक्षर सापडले. दोन्ही हस्ताक्षरे जुळत होती. सगळे दुवे जुळले. आणि खुनी म्हणून बलदेवसिंगांचा लष्करातला मुलगा गुरूमुखसिंग याला अटक झाली.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
बायकोच्या बदफैलीपणामुळे जीवनातला अर्थच नाहीसा झालेल्या गुरूमुखला आता लपवाछपवी करायचं काहीच कारण नव्हतं. 22 फेब्रुवारीला त्याची रजा मंजूर झाली. वडिलांच्या आणि प्रिय पत्नीच्या ओढीने तो तडक निघाला. अचानक जाऊन घरातल्यांना आश्चर्याचा धक्का द्यावा असं त्याला वाटलं. रात्री दहा वाजता तो पिंजोरला पोहोचला. त्याने गॅरेजमध्ये बलदेवसिंगांना फोन केला. त्यांना खूप आनंद झाला. गॅरेजमध्ये येऊन त्याने थोडा वेळ वडिलांबरोबर गप्पा मारल्या. पण त्याला खरी ओढ होती, बायकोला भेटण्याची! थोड्याच वेळात तो तिथून निघाला आणि शेतातल्या रस्त्याने हवेलीच्या मागच्या दारी पोहोचला.
त्यावेळेला त्याची प्रिय पत्नी हरविंदर त्यांच्या गॅरेजमधला नोकर-मनजितबरोबर स्वर्गसुखाचा अनुभव घेत होती. हरविंदर पतीसुखापासून वंचित होती. तिची ती गरज संधी मिळेल तेव्हा मनजित पुर्ण करत असे. आज डंपरच्या दुरुस्तीचं काम अचानक रात्री आलं. त्यासाठी बलदेवसिंगांनी मनजितला खिंसट आणायला नौशेर्याला पाठवलं आणि दोघांनाही अचानक अजून एक संधी मिळाली.
मनजितने आधी हरविंदरला फोन करून कल्पना दिली आणि तो हवेलीत गेला. मनजित निघत असतानाही हरविंदरची तहान भागली नव्हती. ती त्याला मागच्या दरवाजात सोडवायला आली. त्याला बिलगून त्याच्याशी काही बोलत होती, आता परत कधी येशील? असं विचारत होती. नेमका त्याच वेळेला अंधारातून गुरूमुख तिथे आला. त्याने आपल्या पत्नीला अंधारात दुसर्या व्यक्तीबरोबर प्रेम करताना पाहिलं आणि तो बेभान झाला.
हरविंदर घरात जाईपर्यंत तो स्तब्ध राहिला. तिने हवेलीचे मागचं दार लावलं आणि गुरूमुखने मनजितवर हल्ला चढवला. दोघांची झटापट झाली. दोघांनी एकमेकांना ओळखलं नव्हतं. मनजितने नमुन्यासाठी घेतलेला खिंसट घेतला आणि गुरूमुखवर उगारला. गुरूमुख सैन्यातला होता. नि:शस्त्र लढाईचे डावपेच त्याला माहीत होते. त्याने खिंसट धरलेले मनजितचे मनगट पकडले, त्याचा हात पिरगळला आणि तोच खिंसट त्याच्या कवटीत घुसवला. आपण कुणाला मारलं हे गुरूमुखला माहीत नव्हतं. पण परत गॅरेजमध्ये येऊन त्याने बलदेवसिंगांना सर्व सांगितलं.
बलदेवसिंग घाबरले. प्रश्न घराच्या इज्जतीचा आणि गुरूमुखच्या नोकरीचा होता. त्यांनी त्याला ताबडतोब परत कामावर जायला सांगितलं. मग त्याला पोहोचवण्यासाठी तेही निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी पिंजोरच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला एक फोन करून आपल्या हवेलीत एक खून झाल्याची कल्पना मात्र एका वाक्यात दिली आणि फोन कट केला.
जाताना त्यांनी बुढ्ढ्या नोकराला उठवून, आपण खिंसट आणण्यासाठी स्वत: नौशेर्याला जात असल्याचं सांगितलं. गुरूमुख तेव्हा गॅरेजमागे लपला होता. दोघांनाही वाटलं बुढ्ढा खिंसट झोपेच्या तंद्रीत आहे. पण बुढ्ढा इतका काही गाढ झोपलेला नव्हता. थोड्या वेळापूर्वी गुरूमुख आला, त्याने गप्पा मारल्या, अर्ध्या तासाने तो परत आला, मग बलदेवसिंग आणि त्याची घाबर्या आवाजात चर्चा झाली ह्या सर्व गोष्टी त्याला अर्धवट झोपेत जाणवल्या होत्या. कारण तो होता, नावाप्रमाणेच बुढ्ढा खिंसट! खिंसट म्हणजे पार म्हातारा आणि म्हातार्या माणसांना झोप कमी असते.
पंजाबच्या भाटिंडा जिल्ह्यातलं एक खेडेगाव. मात्र हे खेडं व्यावसायिक जगात भारतभर प्रसिद्ध आहे. कारण एचएमटी ऊर्फ हिंदुस्थान मशिन टुल्सचा कारखाना पिंजोरला आहे. मनगटी घड्याळे बनवण्यासाठी एचएमटी प्रसिद्ध आहेच. त्याशिवाय ह्या कंपनीत औद्योगिक उत्पादनांसाठी लागणारी वेगवेगळी मशिन्स आणि उपकरणं बनवली जातात. देशभरात एचएमटीच्या यंत्राशिवाय औद्योगिक क्षेत्रातलं पान हलत नाही. ह्या कारखान्यामुळे पिंजोर ह्या पंजाबातल्या खेड्याचं नावही देशात सर्वत्र माहीत झालेलं आहे.
खुद्द पिंजोरच्या रहिवाशांना मात्र एचएमटीच्या कारखान्याचं फारसं सोयरसुतक नाही. एकतर कारखाना आणि त्याची कर्मचारी वसाहत ही पन्नास चौरस किलोमीटरच्या अवाढव्य परिसरात पसरली आहे. कर्मचार्यांच्या दूध, भाजीपाल्यापासून ते अगदी शाळा कॉलेजपर्यंतच्या गरजा वसाहतीतच पूर्ण होतात. त्यामुळे पिंजोरच्या रहिवाशांशी कारखान्याच्या कर्मचार्यांचा तसा कधीच संबंध येत नाही. दुसरं कारण म्हणजे पिंजोरच्या एचएमटीत पार बंगाल, केरळपासून आलेले कर्मचारी आहेत, पण खुद्द पिंजोरचा मात्र एकही माणूस त्यात कामाला नाहीये. पिंजोरच्या रहिवाशांना तशी गरजच नाहिये. सारेजण सधन पंजाबी शेतकरी आहेत. पंजाबची सुपीक भूमी दरवर्षी भरभरून दान त्यांच्या पदरात टाकतेय. त्यामुळे त्यांना कुणाची गुलामगिरी करण्याची गरज वाटत नाही. पिंजोरचे तरुण नोकरी करतच नाहीत, असेे मात्र नाही. पिंजोरचे अनेक तरुण नोकरी करतात, पण सारेजण एकजात सैन्यात! एकतर घरी बसून शेती करावी किंवा सैन्यात मर्दुमकी गाजवावी. ह्यापेक्षा वेगळा विचार पिंजोरच्या रांगड्या माणसांना भावत नाही.
नाही म्हणायला पिंजोरमध्ये दोन-चार धाबे आणि काही ट्रक दुरुस्तीची गॅरेजेस मात्र आहेत. एचएमटीच्या कारखान्यात देशभरातून ट्रक्स येतात आणि रवाना होतात. कधी ह्या ट्रक्समध्ये छोटा-मोठा बिघाड होतो. त्याच्या दुरुस्तीसाठी पिंजोरमध्ये चार गॅरेजेस उभी आहेत आणि ह्याच ट्रक्सच्या ड्रायव्हर क्लीनरच्या जेवणाच्या सोयीसाठी काही धाबेही. पिंजोरचा कुठलाच रहिवासी ह्या धाब्याच्या किंवा गॅरेजच्या उत्पन्नावर अवलंबून नाही.
सरदार बलदेवसिंगांचंही तसंच होतं. त्यांची घरची भरपूर शेतीवाडी होती. गावात दुमजली घर होतं. एकुलता एक मुलगा गुरमुखसिंग हौसेनं सैन्यात नोकरी करत होता. घरात सून होती. खेळवायला नातवंड मात्र नव्हतं. म्हणून बलदेवसिंगांनी एचएमटीकडे जाणार्या रस्त्यावर एक गॅरेज सुरू केलं होतं. सैन्यातल्या नोकरीसारखाच ट्रक चालवणं हाही सरदारजींचा रक्तातला गुण. बलदेवसिंगांनी तरुणपणी लुधियानात गॅरेजमध्ये काम केलं होतं. त्यामुळे त्यांना ट्रक दुरुस्तीची पुष्कळशी माहिती होतीच. शिवाय त्यांनी मनजितसिंग नावाच्या एका तरण्याबांड हुशार मेकॅनिकला नोकरीला ठेवलं होतं. दोघं जण मिळून गॅरेज व्यवस्थित चालवत असत.
मनजितसिंग शिवाय अजून एक व्यक्ती सरदार बलदेवसिंगांच्या गॅरेजमध्ये होती. त्याचं नाव कोणालाच माहीत नव्हतं. सगळे जण त्याला म्हणायचे-बुढ्ढा! हा बुढ्ढा एक म्हातारा सरदारजी होता. त्याचं नाव, गाव, पत्ता, तो कुठून आला हे कुणालाच माहीत नव्हतं. त्याचं सारं आयुष्य ट्रकवर क्लीनर म्हणून गेलं होतं. त्यालाही ट्रक दुरुस्तीची जुजबी माहिती होती. म्हणून बलदेवसिंगांनी त्यालाही गॅरेजमध्ये ठेवून घेतलं होतं. बुढ्ढा गॅरेजमध्ये आश्रयाला राहायचा. पडेल ते आणि झेपेल ते काम करायचा. त्याचे आणि मनजितचे जेवण बलदेवसिंगांच्या हवेलीवरून यायचं. रात्री दोघंही खाटा टाकून गॅरेजमध्येच झोपायचे. रात्री बलदेवसिंग गावात झोपायला जात असत. ह्या दोघांमुळे आपोआच गॅरेजची राखणही होत असे.
अशा तर्हेने सरदार बलदेवसिंगांचं गॅरेज व्यवस्थित चालू होतं. 22 फेब्रुवारी 1988 ह्या दिवशी दिवसभरात विशेष काहीच घडलं नाही. चार-दोन ट्रक दुरूस्तीला आले. मनजितने त्यांची जुजबी दुरुस्ती करून दिली आणि दिवस संपला. ते थंडीचे दिवस असल्यामुळे दिवस लवकर मावळत असे. त्यामुळे बलदेवसिंगांची सून संध्याकाळीच कुणा नोकराकरवी मनजित आणि बुढ्ढ्याचं जेवण पाठवून देत असे. आजही तसंच जेवण आलं.
मनजित आणि बुढ्ढ्या नोकराने हातपाय धुतले. लवकर जेवण आटोपून घ्यायचं होतं, कारण बलदेवसिंग जेवणाची भांडी घेऊनच गावात परतणार होते. त्यादिवशी अतिशय थंडी होती. धुकंही संध्याकाळी चार वाजल्यापासूनच पडलं होतं. मनजितचे हात ग्रीसने आणि ऑईलने लडबडले होते. धुण्यासाठी गार पाण्यात हात घालायला मनजितला नकोसं वाटत होतं. म्हणून त्याने एक टायरचा तुकडा जाळून पाणी गरम केलं. स्वच्छ हातपाय धुतले. नंतर तो आणि बुढ्ढा नोकर जेवायला बसले.
जेवणाचा रिकामा डबा घेऊन बलदेवसिंग जायला निघाले तोच एक डंपर येऊन त्यांच्या गॅरेजसमोर उभा राहिला. हा डंपर दहा टायरवाला काँक्रीटचा डंपर होता. दहा टायर्सचा डंपर गॅरेजसमोर आलेला बघून बलदेवसिंग थबकले. डंपरची दुरुस्ती म्हणजे मोठे काम! म्हणजेच पैसेही चांगले मिळणार. त्यांनी पुढे येऊन चौकशी केली. डंपरच्या ड्रायव्हरने सांगितले, एचएमटी कंपनीत एक तेहतीस मीटर उंचीची गोल टाकी बांधायचं काम चालू आहे. हा डंपर त्या कामावरचा आहे. खडी, रेती आणि सिमेंट आणि पाणी ह्या डंपरच्या भांड्यात ओतले की डंपरचे भांडे गोल गोल फिरतं. त्यामुळे काँक्रिटचं मिश्रण घुसळून एकजीव होते. मग हे मिश्रण काँक्रिटच्या लिफ्टच्या ट्रेमध्ये ओतलं जातं. तिथून ते वर जातं.
ड्रायव्हरने सांगितलं की, संध्याकाळपर्यंत डंपर व्यवस्थित चालू होता पण शेवटच्या चार फेर्यांना मात्र त्याने खूपच त्रास दिला. डंपर चालूच होत नव्हता. खूप अॅक्सेलेटर दिल्यावर थोडासा चालू व्हायचा आणि नंतर मधेच गिअरमध्ये बंद पडायचा. काहीही करून आजच्या रात्रीतून डंपर चालू करून द्या. नाहीतर उद्या टाकीचे बांधकाम बंद ठेवावे लागेल. पैशाची काळजी करू नका पण उद्या डंपर चालू झाला पाहिजे. डंपरच्या ड्रायव्हरने सरदार बलदेवसिंगना कळवळून सांगितलं.
बलदेवसिंग आणि मनजितसिंग दोघंही डंपरच्या खाली घुसले. थोडे निरीक्षण केल्यावर त्यांना लगेच नादुरुतीचे कारणही समजलं. डंपरखाली झोपून बलदेवसिंगांनी आवाज दिला,
‘ओय बुढ्ढे! जरा खिंसट देना तो!’
खिंसट म्हणजे लांब स्क्रू-ड्रायव्हर!
डंपरच्या इंजिनमध्ये आणि कॉर्बोरेटरवर काँक्रिटचे शिंतोडे उडाले होते. इतके की काही ठिकाणी इंजिनमध्ये सिमेंटचा थरच साठला होता. त्यामुळेच डंपरचं इंजिन स्पार्क होत नव्हतं. बलदेवसिंगांनी दोन फूट लांबीचा खिंसट घेऊन ते काँक्रिट साफ करायला सुरुवात केली. पण थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आलं की ह्या साध्या खिंसटने होण्यासारखं ते काम नाहीये. त्यासाठी दोन फुटापेक्षा लांब आणि अधिक मजबूत, खिंसट हवा होता. डंपरच्या इंजिनात चिकटलेला काँक्रिटचा थर तसाच जाड आणि कडक होता.
डंपरच्या नादुरुस्तीचं कारण तर समजलं होतं. पण तो दुरुस्त करण्यासाठी मजबूत खिंसटची गरज होती आणि तो तर त्यांच्या गॅरेजमध्ये नव्हता. इतर कुणाच्या गॅरेजमध्ये असण्याचीही शक्यता नव्हती. साधारणत: दोन फूट लांबीचा स्क्रू ड्रायव्हर इंजिनच्या कुठल्याही भागात पोहोचू शकतो. तसेच जिथे मेकॅनिकचा हात किंवा बोटे पोहोचू शकत नाहीत तिथला कचरा, गंज वगैरेही तो साफ करू शकतो.
डंपरचा ड्रायव्हर सारखा लवकर डंपर दुरूस्त करण्याची विनंती करत होता. बलदेवसिंगांना एक विचार सुचला. त्यांनी डंपरच्या ड्रायव्हरला सांगितले, ‘उद्या सकाळी तुमचा डंपर चालू झालेला असेल. तुम्ही निश्चिंतपणे जा.’ त्यांच्या आश्वासनावर विसंबून डंपरचा ड्रायव्हर एचएमटीत गेला. तो गेल्यावर बलदेवसिंगांनी गॅरेजमधल्या अडगळीच्या सामानातून एक तीन फूट लांबीची जाड लोखंडी सळई शोधून काढली. ती सळई मनजितच्या हातात देत ते म्हणाले, ‘मनजित, ऐक, ही सळई घेऊन हायवेवर जा. तिथून कुठल्यातरी ट्रकमध्ये बसून नौशेर्याला जा. एखादा लोहार गाठ आणि या सळईच्या एका टोकाला स्क्रू ड्रायव्हरसारखा पसरट आकार दे आणि ताबडतोब परत ये.’ मनजितने मान डोलवली. पण तो म्हणाला, ‘पण परत आल्यावर मला एकट्याला हे काम जमेल असं वाटत नाही. तुमची गरज लागेलच.’ त्यावर बलदेवसिंग म्हणाले, ‘मी इथेच आहे. आज रात्री मी घरी जातच नाहीये. सुनेला तसा फोन करतो. तू मात्र लवकर परत ये. काम झाल्यावर मला फोन कर.’ बलदेवसिंगांचं बोलणं ऐकून मनजितच्या चेहर्यावर हसू पसरले. पुढे ते त्याला म्हणाले. ‘नमुन्यासाठी हा छोटा खिंसट बरोबर घेऊन जा.’ मनजितने छोटा खिंसट आणि ती सळई घेतली आणि तो हायवेकडे निघाला. मनजित गेला त्याला दोन तास झाले. सरदार बलदेवसिंग गॅरेजमधल्या एकमेव खुर्चीवर बसून पेंगत होते. बुढ्ढा नोकर उशाला ट्रकच्या ट्युबची उशी घेऊन झोपला होता. बलदेवसिंग आतुरतेने मनजितच्या फोनची वाट बघत होते. अडलेल्या डंपरवाल्याकडून त्यांना रात्रीतून डंपर दुरुस्त करून द्यायचे हजार रुपये ठरवले होतोे. मनजितचे खिंसटचं काम जेवढ्या लवकर होणार होतं तेवढं ते लवकर चिंतामुक्त होणार होते.
पिंजोरपासून नौशेरा तसं लांबही नव्हतं. जेमतेम बारा किलोमीटर! तेव्हा एव्हाना मनजितचं काम झालेले असायला हवं होतं. इतक्यात गॅरेजमधला फोन घणघणला. दोन लहान रिंगा वाजल्या. बुढ्ढ्याची झोप थोडीशी चाळवली. बलदेवसिंगांनी झडप घालून फोन उचलला आणि फोनवरून पलीकडच्या माणसाचा आवाज ऐकू आला. बलदेवसिंगांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. एक विलक्षण संवेदना त्यांच्या शरीरभर झंकारली. विलक्षण आश्चर्याने आणि आनंदातिरेकाने ते ओरडले, ‘ओये! तूऽऽऽ?’
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
सरदार बलदेवसिंग ह्यांच्या हवेलीत त्यांची सून हरविंदर कौर एकटीच होती. थोड्या वेळापूर्वीच तिच्या सासर्यांचा फोन येऊन गेला होता. त्यांनी तिला त्यांच्यासाठी जेवायला न थांबायला सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर आज रात्री ते गॅरेजमध्ये एकटेच झोपणार असल्याचंही कळवलं होतं. हरविंदर कौरने तिचं जेवण आटोपलं. हवेलीच्या सर्व दारांच्या कड्या नीट लावल्यात की नाही ते तपासलं. विशेषत: मागच्या दाराची, कारण तिकडून चोर येण्याची शक्यता जास्त होती. मग तिने आपलं अंथरूण टाकलं. दोन ब्लँकेट्स एकमेकांना जुळवून पांघरण्यासाठी घेतली आणि अंथरूणावर पाठ टेकली. नेमका त्याच वेळेला हवेलीतला फोन खणखणला. दोन लहान रिंगा वाजल्या. हरविंदर कौरने फोन उचलला. पलीकडच्या माणसाचा आवाज ऐकून आश्चयाने तिचे डोळे विस्फारले. एक विलक्षण संवेदना तिच्या सर्वांगावर झंकारली. विलक्षण आश्चर्याने आणि आनंदाच्या अतिरेकाने ती ओरडली, ‘ओये! तूऽऽऽ!’
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
मध्यरात्र टळून गेली होती. पिंजोरच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जसबीरसिंग बसले होते. अंगात एकावर एक दोन स्वेटर्स चढवूनही थंडी कमी होत नव्हती. जसबीरसिंग अधूनमधून हातावर हात घासून उब निर्माण करायचा प्रयत्न करत होते. ‘ड्युटीवर नसतो तर मस्तपैकी चार ब्लँकेट अंगावर घेऊन घरी झोपलो असतो.’ ते मनाशी पुटपुटत होते. अचानक त्यांच्या टेबलावरचा फोन खणखणला. ‘एवढ्या रात्री कोणाचे पोलीस स्टेशनात काम निघाले!’ असा विचार करत त्यांनी अनिच्छेने फोन उचलला आणि समोरच्या माणसाने जे सांगितलं ते ऐकून त्यांचेे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. पलीकडच्या माणसाने फक्त एकच वाक्य सांगितलं आणि फोन कट केला. त्याने आपले नाव, पत्ता काहीच सांगितलं नाही. जसबीरसिंगांनी फोन कट झाल्याचा आवाज ऐकला आणि ते रिसिव्हरमध्ये ओरडले, ‘ओये! तूऽऽ!’
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
जीवाभावाची व्यक्ती अनेक वर्षांनी भेटली होती. सरदार बलदेवसिंगांना खूप आनंद झाला होता. किती बोलू आणि किती नको असे त्यांना झाले होते. समोरची व्यक्तीही सुरुवातीला त्यांच्या बोलण्याला भरभरून प्रतिसाद देत होती. गप्पांचा पहिला बहर ओसरला आणि ती व्यक्ती चुळबुळ करू लागली.
थोड्या वेळाने ही गोष्ट बलदेवसिंगांच्या लक्षात आली.
त्या व्यक्तीच्या अस्वस्थेमागचं कारण ते समजू शकत होते. त्यात काही वावगंही नव्हतं. म्हणून मग सरदार बलदेवसिंगांनी प्रेमभराने त्या व्यक्तीला निरोप दिला. त्यांचा निरोप घेऊन ती व्यक्ती निघाली. जाताना बुढ्ढ्या नोकराच्या खाटेला तिचा थोडासा धक्का लागला. काही काळासाठी बुढ्ढ्याची झोप थोडीशी चाळवली. ती व्यक्ती गेल्यावर बलदेवसिंग परत त्या खुर्चीत बसले. ती व्यक्ती नुकतीच भेटून गेल्यामुळे आता लगेच झोप येणं शक्य नव्हतंच. पण ते उगीच डोळे मिटून बसले. अर्ध्या तासाने त्यांना परत गॅरेजसमोर धडपड ऐकू आली. बलदेवसिंग साशंक मनाने उठले आणि बाहेर आले. आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. थोड्या वेळापूर्वी त्यांचा निरोप घेऊन गेलेली तीच व्यक्ती परत आली होती. त्या व्यक्तीची आत्ताची अवस्था बघून बलदेवसिंगांच्या काळजाचा ठोका चुकला. त्या व्यक्तीच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते आणि ती धापा टाकत होती.
‘वाहिगुरू!!’ ते ओरडले, ‘कि गल है?’ आणि त्या व्यक्तीला आधार देण्यासाठी ते पुढे धावले.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
जीवाभावाची व्यक्ती अनेक महिन्यांनी भेटली होती.
हरविंदर कौरला खूप आनंद झाला होता. किती बोलू नि किती नको, आलेल्या व्यक्तीला कुठे ठेवू नि कुठे नको, असं तिला झालं होतं. समोरची व्यक्तीही तिच्या बोलण्याला, वागण्याला भरभरून प्रतिसाद देत होती. प्रेमाचा पहिला बहर ओसरला. ती व्यक्ती थोडीशी अस्वस्थ झाली. जाण्यासाठी चुळबुळ करू लागली. पण हरविंदर तिला एवढ्यात सोडणार नव्हती. हरविंदरने त्या व्यक्तीला परत एकदा आपल्या मोहपाशात गुंतवलं आणि धुंद केलं. प्रेमाचा दुसरा बहर ओसरला आणि ती व्यक्ती अधिकच अस्वस्थ झाली. तिच्या अस्वस्थतेमागचं कारण हरविंदरही समजू शकत होती. त्यात वावगे काहीच नव्हते. हरविंदरने त्या व्यक्तीला निरोप दिला. हरविंदरचा निरोप घेऊन ती व्यक्ती निघाली. हरविंदर झोपण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली. नुकतीच ती व्यक्ती भेटून गेल्यामुळे झोप लागणे शक्यच नव्हतं.
काही मिनिटांतच हरविंदरला हवेलीच्या मागच्या दरवाजात धडपड ऐकू आली. साशंक मनाने हरविंदर उठली आणि मागच्या दारात आली. तिने दार उघडलं. समोर बघितले आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. काही मिनिटांपूर्वी तिचा निरोप घेऊन गेलेली व्यक्ती परत आली होती. पण तिची आत्ताची अवस्था बघवत नव्हती. ती व्यक्ती रक्ताने उभी न्हाली होती. तिची पावलं कशीतरी लडखडत पडत होती.
‘वाहिगुरू!!’ हरविंदर ओरडली, ‘कि गल है?’ आणि ती त्या व्यक्तीला आधार देण्यासाठी पुढे धावली.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
समोरचा माणूस सांगतोय त्यावर विश्वास ठेवावा का? बलदेवसिंगांसमोर मोठा प्रश्न पडला होता. त्यांच्या माहितीनुसार शक्यतेच्या कोटीत ते बसत नव्हतं. पण समोरचा माणूस उगीचच खोटं बोलेल हेही शक्य नव्हतं. काय घडलं असेल ते असो. आता निदान समोरच्या माणसाला वाचवण्यासाठी धडपड करणं अत्यावश्यक होतं. बलदेवसिंग एक क्षणही न दवडता त्या तयारीला लागले.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
समोरचा माणूस सांगतोय त्यावर विश्वास ठेवणे हरविंदला कठीण जात होतं. असं घडू शकतं? कसे शक्य आहे ते? तिच्यापुढे मोठाच प्रश्न पडला होता. पण समोरची रक्ताच्या थारोळ्यात तडफडणारी व्यक्ती उगीचच खोटं कशाला बोलेल हेही शक्य नव्हतं.
काय असेल ते असो. निदान ह्या व्यक्तीला तरी वाचवू या, असा तिने विचार केला. एक क्षणही न दवडता हरविंदर त्या खटपटीला लागली.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
एक क्षणही न दवडता हालचाल करणं आवश्यक होतं. तरीही जसबीरसिंग काही वेळ विचारच करत बसले. थोड्या वेळापूर्वी फोन करणार्या माणसावर विश्वास ठेवावा का? त्याने सांगितंलं ते खरं असेल? कुणा एका मूर्ख माणसाच्या निनावी फोनवर विसंबून आपण एवढ्या थंडीत इतक्या दूरवर जायचं? फोन खोटा असेल तर सारी धडपड व्यर्थ जाईल. पण फोन खरा असेल तर? जसबीरसिंगाच्या काळजाचा ठोका क्षणभर चुकला. फोन करणार्याचा आवाज अजूनही त्यांच्या कानात घुमत होता, त्याच्या सांगण्यातली आर्तता, भीती, तगमग त्यांना फोनवरूनही जाणवली होती.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
जायचं! जसबीरसिंगांनी निर्णय घेतला.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
जायचं! बलदेवसिंगांनी निर्णय घेतला. त्याशिवाय दुसरा इलाज नव्हता.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
‘मी खून केलेला नाहीये.’ हरविंदर परत परत तेच सांगत होती. पण तिच्या पायजमा-कुर्त्यावरचे रक्ताचे डाग तिच्या म्हणण्याला पुष्टी देत नव्हते.
सरदार बलदेवसिंगांच्या हवेलीच्या मागच्या दारात त्यांचा गॅरेजमधला नोकर मनजितसिंग मरून पडला होता.
दोन फूट लांबीचा एक स्क्रू ड्रायव्हर त्याच्या डाव्या कानाजवळून मेंदूत शिरला होता. तो कवटी भेदून उजव्या कानाजवळून बाहेर आला होता. खुनाच्या वेळेला हरविंदर हवेलीत एकटीच होती. सरदार बलदेवसिंग त्या रात्री गॅरेजमध्येच थांबले होते. तेही रात्री बारा वाजेपर्यंतच!
बुढ्ढा नोकर सांगत होता की, रात्री बारा वाजता त्याला बलदेवसिंगांनी झोपेतून उठवलं आणि सांगितलं, ‘मनजित खिंसट आणायला गेलाय त्याचा अजून पत्ता नाहीये. तेव्हा आता मीच नौशेर्याला जातो आणि माझ्या एका गॅरेजवाल्या नातेवाईकाकडून खिंसट घेऊन येतो. सकाळी डंपर दुरुस्त करून द्यायचाय. तेव्हा आत्ताच हालचाल करणं भाग आहे. तू नीट सावध झोप.’
एवढं सांगून बलदेवसिंग रात्रीच नौशेर्याला एकटेच निघून गेले. ते अजूनही परतले नव्हते.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
एकूण सर्व परिस्थिती पाहून आणि हरविंदरच्या कुर्त्यावरचे डाग पाहून खून हरविंदरनेच केलाय, ह्याची जसबीरसिंगांना खात्री पटली. ‘या बाईंना अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन चला.’ त्यांनी महिला कॉन्स्टेबलला हुकूम सोडला. ‘मी खून केलेला नाहीये.’ हरविंदर रडत-रडत सांगत होती. तरीही तिला अटक करावीच लागली. दुसरा इलाजच नव्हता.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
सकाळी आठ वाजता बलदेवसिंग परत आले. त्यांच्याबरोबर नौशेर्याच्या त्यांच्या मामाचा मुलगाही होता. तोही नौशेर्यात गॅरेज चालवत असे. त्यांच्याजवळ चार फुटाचा पहारीपासून बनवलेला एक खास खिंसट होता. डंपरचे काम झाल्यावर मामाचा मुलगा तो खिंसट लगेच परत घेऊन जाणार होता. आपल्या हवेलीत खून झालाय हे ऐकून बलदेवसिंगांना चक्करच आली. त्यात तो खून मनजितचा झालाय आणि त्या प्रकरणात आपल्या सुनेला अटक झालीये, हे ऐकल्यावर ते कपाळाला हात लावून जमिनीवर बसले.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
नौशेर्याहून आलेल्या बलदेवसिंगांच्या मामेभावाचा विस्तृत जबाब इन्स्पेक्टर जसबीरसिंगांनी लिहून घेतला. बलदेवसिंगांच्या म्हणण्याची सत्यता त्यामुळे पटत होती. बुढ्ढ्या नोकराचाही जुजबी जबाब घेतला गेला. मनजितच्या पूर्वचारित्र्याची, त्याच्या इतिहासाची चौकशी सुरू झाली. जसबीरसिंगांच्या मते प्रकरण एकदम साधं होतं. हरविंदर घरात एकटी आहे हे मनजितला माहीत होतं, म्हणून तिच्यावर बलात्कार करण्यासाठी तो हवेलीत आला. हरविंदरने त्याला विरोध केला. दोघांची झटापटी झाली आणि त्यात मनजितचा खून झाला. अडचण फक्त एवढीच होती की हरविंदर हे कबूल करायला, तसा जबाब लिहून द्यायला तयार नव्हती.
‘एचएमटीच्या लेडी सोशल वेल्फेअर ऑफिसरना बोलवा.’ जसबीरसिंगांनी हुकूम दिला. ‘पिंजोर ग्रामीण पुलीस थाना’ची जीप एचएमटीच्या कारखान्याच्या आवारात शिरली.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
‘राज्यघटनेचं शंभरावं कलम असं आहे की…’ जसबीरसिंग एचएमटीच्या लेडी वेल्फेअर ऑफिसर श्रीमती अहलुवालियांना सांगत होते. ‘एखाद्या स्त्रीवर जर बलात्कार होत असेल तर तिला त्या बलात्कार करणार्या किंवा बलात्काराचा प्रयत्न करणार्या व्यक्तीला ठार मारण्याचा पूर्ण अधिकार असतो. जर एखाद्या व्यक्तीवर त्याला कोणी जीवे मारण्यासाठी हल्ला चढवला तर त्या व्यक्तीला जसा हल्ला करणार्याला मारायचा अधिकार आहे, तसेच हे आहे. ‘मी त्याला मारले नसते तर त्याने माझा खून केला असता.’ अशा परिस्थितीत केलेला खूनही क्षम्य असतो. तसेच बेसावध स्थितीत अब्रुवर घाला घालायचा प्रयत्न करणार्या पुरुषाला ठार मारायचा अधिकार प्रत्येक स्त्रीला असतो.
ही गोष्ट तुम्ही या हरविंदर कौरला नीट समजावून सांगा. आमच्या महिला कॉन्स्टेबलला बघून ती घाबरतेय. त्यात ती अशिक्षित असल्यामुळेही प्रश्न निर्माण झालाय. तेव्हा तुम्ही तिच्या पातळीवर जाऊन तिला हे नीट समजवा.’ जसबीरसिंगांनी कळकळीची विनंती केली. श्रीमती अहलुवालियांनी हसून मान डोलावली. एचएमटीच्या वेल्फेअर ऑफिसर म्हणून अशा अनेक केसेस हाताळायचा त्यांना चांगलाच अनुभव होता.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
हरविंदरने हवा तसा जबाब दिला. ‘बलात्काराचा प्रयत्न आणि म्हणून खून!!’ जसबीरसिंगांनी शेरा मारला. वरिष्ठांना तसं कळवलं आणि फाइल बंद केली.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
त्या दिवसापासून बलदेवसिंग नेहमी अस्वस्थ असायचे. दिवसातला बराचसा वेळ ते गॅरेजमध्येच काढायचे. त्यांचा स्वभावही हल्ली फार चिडचिडा झाला होता. राग काढायला आता मनजितही समोर नव्हता. त्यामुळे सगळा राग बुढ्ढ्या नोकरावर निघायचा. दुरुस्तीला ट्रक यायचे तेव्हा मनजितसारखी पटापट मदत करणं बुढ्ढ्याला जमत नसे. मग बलदेवसिंग त्याच्यावर भडकायचे. जोराने ओरडायचे. म्हणायचे, ‘ओये बुढ्ढे! कहाँ मर गया तू? ओये बुढ्ढे! कहाँ मर गया तू? ओये बुढ्ढे खिंसट!!’ खिंसट शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे पार पिकलेला म्हातारा! म्हातारडा किंवा थेरडा!!
एक दिवस काही कारणावरून बलदेवसिंग बुढ्ढ्या नोकरावर फारच भडकले. इतके की त्याचं सगळं सामान गोळा करून त्यांनी गॅरेजबाहेर फेकून दिलं. पोक आलेल्या बुढ्ढ्या खिंसटने कंबरेपर्यंत वाढवलेली दाढी सांभाळत ते सामान गोळा केलं. अश्रुभरल्या डोळ्यांनी गॅरेजकडे एक नजर टाकली आणि तो तिथून निघाला. मात्र ट्रक पकडण्यासाठी हायवेवर जाण्याऐवजी तो कंबरेत वाकलेला म्हातारा पिंजोरच्या ग्रामीण पोलीस ठाण्याकडे निघाला.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
जसबीरसिंगांनी फक्त एकच फोन केला! आमेरला! अजमेरजवळच्या आमेर बॉर्डरवर बलदेवसिंगांचा मुलगा गुरूमुखसिंग तैनात होता. आणि त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली.
22 फेब्रुवारी 1988 च्या दिवशीच त्याची दोन महिन्यांची रजा मंजूर झाली होती. घरातल्यांना आनंदाचा धक्का द्यावा म्हणून तो घरी काहीही न कळवता त्याच दिवशी तिथून निघालाही होता. पण तो लगेच तिसर्या दिवशी परत आला होता. कारण त्याने घरात न कळवल्यामुळे त्याच्या घरातले सारेजण अमृतसरला गेले होते. त्यामुळे तो परत आला होता. आल्यावर त्याने रजा रद्द केली आणि आता तो व्यवस्थित नोकरी करत होता. मग जसबीरसिंगांनी नौशेर्याला बलदेवसिंगांच्या मामाकडे परत कसून चौकशी केली. 22 फेब्रुवारी 1988 च्या रात्री खिंसट मागण्यासाठी बलदेवसिंग नेमके किती वाजता आले होते ते शोधून काढले. त्यांच्या मामेभावाने सांगितलं ती पहाटेची वेळ होती. आणि एक वेगळाच घटनाक्रम जसबीरसिंगांसमोर उलगडू लागला.
हरविंदर कौरच्या रूमची कसून झडती घेण्यात आली. त्यात मनजितने तिला लिहिलेली एक चार ओळींची चिठ्ठी मिळाली. गॅरेजमधल्या बिलबुकात मनजितचे गुरूमुखी (पंजाबी) भाषेतले हस्ताक्षर सापडले. दोन्ही हस्ताक्षरे जुळत होती. सगळे दुवे जुळले. आणि खुनी म्हणून बलदेवसिंगांचा लष्करातला मुलगा गुरूमुखसिंग याला अटक झाली.
‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘
बायकोच्या बदफैलीपणामुळे जीवनातला अर्थच नाहीसा झालेल्या गुरूमुखला आता लपवाछपवी करायचं काहीच कारण नव्हतं. 22 फेब्रुवारीला त्याची रजा मंजूर झाली. वडिलांच्या आणि प्रिय पत्नीच्या ओढीने तो तडक निघाला. अचानक जाऊन घरातल्यांना आश्चर्याचा धक्का द्यावा असं त्याला वाटलं. रात्री दहा वाजता तो पिंजोरला पोहोचला. त्याने गॅरेजमध्ये बलदेवसिंगांना फोन केला. त्यांना खूप आनंद झाला. गॅरेजमध्ये येऊन त्याने थोडा वेळ वडिलांबरोबर गप्पा मारल्या. पण त्याला खरी ओढ होती, बायकोला भेटण्याची! थोड्याच वेळात तो तिथून निघाला आणि शेतातल्या रस्त्याने हवेलीच्या मागच्या दारी पोहोचला.
त्यावेळेला त्याची प्रिय पत्नी हरविंदर त्यांच्या गॅरेजमधला नोकर-मनजितबरोबर स्वर्गसुखाचा अनुभव घेत होती. हरविंदर पतीसुखापासून वंचित होती. तिची ती गरज संधी मिळेल तेव्हा मनजित पुर्ण करत असे. आज डंपरच्या दुरुस्तीचं काम अचानक रात्री आलं. त्यासाठी बलदेवसिंगांनी मनजितला खिंसट आणायला नौशेर्याला पाठवलं आणि दोघांनाही अचानक अजून एक संधी मिळाली.
मनजितने आधी हरविंदरला फोन करून कल्पना दिली आणि तो हवेलीत गेला. मनजित निघत असतानाही हरविंदरची तहान भागली नव्हती. ती त्याला मागच्या दरवाजात सोडवायला आली. त्याला बिलगून त्याच्याशी काही बोलत होती, आता परत कधी येशील? असं विचारत होती. नेमका त्याच वेळेला अंधारातून गुरूमुख तिथे आला. त्याने आपल्या पत्नीला अंधारात दुसर्या व्यक्तीबरोबर प्रेम करताना पाहिलं आणि तो बेभान झाला.
हरविंदर घरात जाईपर्यंत तो स्तब्ध राहिला. तिने हवेलीचे मागचं दार लावलं आणि गुरूमुखने मनजितवर हल्ला चढवला. दोघांची झटापट झाली. दोघांनी एकमेकांना ओळखलं नव्हतं. मनजितने नमुन्यासाठी घेतलेला खिंसट घेतला आणि गुरूमुखवर उगारला. गुरूमुख सैन्यातला होता. नि:शस्त्र लढाईचे डावपेच त्याला माहीत होते. त्याने खिंसट धरलेले मनजितचे मनगट पकडले, त्याचा हात पिरगळला आणि तोच खिंसट त्याच्या कवटीत घुसवला. आपण कुणाला मारलं हे गुरूमुखला माहीत नव्हतं. पण परत गॅरेजमध्ये येऊन त्याने बलदेवसिंगांना सर्व सांगितलं.
बलदेवसिंग घाबरले. प्रश्न घराच्या इज्जतीचा आणि गुरूमुखच्या नोकरीचा होता. त्यांनी त्याला ताबडतोब परत कामावर जायला सांगितलं. मग त्याला पोहोचवण्यासाठी तेही निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी पिंजोरच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला एक फोन करून आपल्या हवेलीत एक खून झाल्याची कल्पना मात्र एका वाक्यात दिली आणि फोन कट केला.
जाताना त्यांनी बुढ्ढ्या नोकराला उठवून, आपण खिंसट आणण्यासाठी स्वत: नौशेर्याला जात असल्याचं सांगितलं. गुरूमुख तेव्हा गॅरेजमागे लपला होता. दोघांनाही वाटलं बुढ्ढा खिंसट झोपेच्या तंद्रीत आहे. पण बुढ्ढा इतका काही गाढ झोपलेला नव्हता. थोड्या वेळापूर्वी गुरूमुख आला, त्याने गप्पा मारल्या, अर्ध्या तासाने तो परत आला, मग बलदेवसिंग आणि त्याची घाबर्या आवाजात चर्चा झाली ह्या सर्व गोष्टी त्याला अर्धवट झोपेत जाणवल्या होत्या. कारण तो होता, नावाप्रमाणेच बुढ्ढा खिंसट! खिंसट म्हणजे पार म्हातारा आणि म्हातार्या माणसांना झोप कमी असते.